Skip to main content

जे अधिकारी जनतेने दिलेल्या अर्जाची, निवेदनाची दखल घेत नाहीत, गेंड्याच्या कातडीचे झाले आहेत त्यांना वटणीवर आणणार. मा.श्री.डॉ.अभिमन्यु बी.आठवले

मा.श्री.डॉ.अभिमन्यु बी.आठवले
संपादक : साप्ताहिक बहुजन भूषण वृत्तपत्र

सध्या ग्रामपंचायतचे ग्रामसेवक, पंचायत समिति, जिल्हा परिषदतहसील कार्यालय, प्रांत कार्यालय, महानगरपालिका, नगरपालिका, नगरपंचायत, नगरपरिषद, भूमीअभिलेख, वनीकरण, पाठबंधारे, सार्वजनिक बांधकाम, आरोग्य खाते, शिक्षण खाते, वीज वितरण इ. विभागाचे अधिकारी, कर्मचारी यांना जनतेने दिलेल्या अर्जाची, निवेदनाची दखल घेताना दिसत नाहीत. वेळ काढूपणा करतात, दफ्तर दिरंगाई कायद्याचा अवमान करतात, टाळाटाळ करतात हे मी संघटनेचा संस्थापक, वृत्तपत्राचा संपादक पत्रकार म्हणून अनुभवत आहे असे “हरामखोर अधिकारी” यांची गय करणार नाही. अधिकारी व कर्मचारी यांनी जनतेच्या अर्जाचा विचार करून, निवारण करून न्याय द्यावा. अडचण असल्यास लेखी कळवावे अथवा मार्गदर्शन करावे. तसेच काही अधिकारी हे बंद दरवाज्यातून काम करतात त्यांना जनतेची “अलर्जी” आहे की काय असा प्रश्न पडतो. जनतेचे सेवक आहात हे अधिकारी यांनी लक्षात घ्यावे. जे अधिकारी बंद दरवाजातून कामकाज पाहत आहेत त्यांना अगोदर “सल्ला” आणि नंतर “दे धक्का याची जाणीव करून देणार. जनतेने दिलेल्या अर्जाची, निवेदनाची दखल घेवून योग्य ती चौकशी करून न्याय देण्याची भूमिका ठेवली पाहिजे. ज्या अधिकारी यांच्या नावाने जनतेने दिलेले अर्ज निवेदने यानुसार त्वरित दखल घेवून न्याय निवाडा केला पाहिजे. परंतु अर्जदाराच्या अर्जाला “केराची टोपली” दाखविली जाते हे गंभीर व चिंताजनक बाब आहे. दफ्तर दिरंगाई कायदा २००६ सांगतो की, कोणत्याही शासकीय कर्मचारी यांच्याकडे जनतेने दिलेले अर्ज, निवेदने दिले असतील तर ७ दिवसाच्या आत ते निकाली काढले पाहिजे. एखाद्याच्या “जीवित व स्वातंत्र्य” यावरती आधारित अर्ज, निवेदने असतील तर तातडीने एका दिवसात अगर दुसर्‍या दिवसात सकाळपर्यंत निकाली काढले पाहिजेत. तसेच ज्या अधिकार्‍याकडे अर्ज, निवेदने दिले आहेत परंतु अर्जातील मागणी इतर अधिकारी कार्यालयाकडे असेल तर त्यांच्याकडून घेवून अर्जदाराला ४५ दिवसात देण्यात यावे असा कायदा सांगतो मग अर्जदाराने दिलेल्या अर्जाची चौकशी करण्यासाठी अधिकारी कर्मचारी यांच्याकडे अर्जदार गेला असता त्यांना उडवाउडवीची उत्तरे दिली तर अर्जदाराने अधिकार्‍याच्या कानाखाली आवाज काढला तर “सरकारी कामात अडथळा कुठे केला” त्यामुळे गुन्हा होऊ शकत नाही. जे अधिकारी अर्जदाराच्या अर्जाची, निवेदनाची दखल घेणार नाहीत, टाळाटाळ करतील तर माझ्याकडून “चुकीला माफी नाही.” अन्याय-अत्याचाराविरुद्ध लढत असताना मरण आले तर आनंदाने स्वीकारेल ही माझी भीम प्रतिज्ञा आहे तरी अधिकारी यांनी जनतेच्या अर्जाची, निवेदनाची दखल घेवून कर्तव्य जपावे असे बहुजन राष्ट्रशक्ति सामाजिक संघटनेचे संस्थापक अभिमन्यु बी. आठवले यांनी प्रसिद्धीद्वारे केले आहे.       

बातमी

अधिक जाहिरातीसाठी संपर्क

संपादक : मा.श्री. डॉ. अभिमन्यु बी. आठवले

९४२०३०२५६१

उपसंपादक : वैभव अ. आठवले

साप्ताहिक बहुजन भूषण, साप्ताहिक बहुजन मित्र वृत्तपत्र

संस्थापक : बहुजन राष्ट्रशक्ति सामाजिक संघटना महाराष्ट्र राज्य

टीप : जे दिसेल, जे पाहिले तेच लिहिले हेच वृत्तपत्राचे ध्येय उद्दीष्ट आहे.

 

Comments

Popular posts from this blog

नातेपुते पोलीस ठाणेकडील गुन्हे प्रकटीकरण शाखेची आदर्श कामगिरी चंदन चोरी करणा-या आरोपीस २४ तासात केले जेरबंद

  उपसंपादक: वैभव आठवले साप्ताहिक बहुजन भूषण वृत्तपत्र नातेपुते पोलिस स्टेशन यांचेकडून मिळालेल्या माहितीनुसार      नातेपुते पोलीस ठाणे हददीमध्ये मौजे मांडवे, ता.माळशिरस येथे राजन सुकुमार दोशी यांचे शेतातील दिनांक २६/०६/२०२५ रोजी सकाळी ०८/०० वा ते सायंकाळी ०५/००वा. चे दरम्यान शेतातील बांधावरील १० वर्षे वयाची ०२ चंदनाची झाडे अंदाजे किंमत २७,०००/- रू चे कोणीतरी अज्ञात चोरटयाने चोरून नेली आहेत त्याबाबत फिर्यादी नामे राजन सुकुमार दोशी रा.नातेपुते, ता.माळशिरस, जि.सोलापुर यांचे फिर्यादीवरुन नातेपुते पोलीस ठाणेस गु.र.नं. २३७/२०२५ भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ३०३ (२) प्रमाणे दिनांक २६/०६/२०२५ रोजी गुन्हा दाखल झाला होता. सदर गुन्हयाचा तपास पोहेकॉ/१७०८ विकास बाबर हे करीत होते.      नातेपुते पोलीस ठाणेचे गुन्हे प्रकटीकरण शाखेचे अंमलदार यांनी सदर गुन्हयाचा तपास दरम्यान मिळालेल्या गोपनिय बातमीव्दारे माहीती काढून इसम नामे १) गोविंद दुर्याधन काळे २) मेघराज ज्ञानदेव भोसले दोघे रा माळशिरस यांनी गुन्हा केल्याचे निष्पन्न झाल्याने त्यास पोहकॉ/१७०८ बाबर व गुन्हे प्रकटीक...

नातेपुते पोलीस ठाणेकडून जबरी चोरी करणा-या आरोपीस २४ तासाच्या आत केले जेरबंद

उपसंपादक: वैभव आठवले (साप्ताहिक बहुजन भूषण वृत्तपत्र) नातेपुते पोलीस ठाणे यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार      नातेपुते पोलीस ठाणे हददीमध्ये मौजे नातेपुते, ता.माळशिरस येथे दिनांक ०३/०४/२०२५ रोजी सायकाळी ०७.३० वा सुमारास गुन्ह्यातील फिर्यादी नामे वैभव विठ्ठल नष्टे वय ३१ वर्षे, रा. माळशिरस ता. माळशिरस जि. सोलापुर व सोबत त्यांची आई माया नष्टे असे त्यांचेकडील स्कुटी गाडी क्र. एम.एच. ४५ ए.व्ही. १२६१ यावरुन नातेपुते परिसरात शिंगणापुर पाटी ते बायपास रोड मार्गे नातेपुते फडतरी जाणारे बायपास रोडवर आले असताना दोन अज्ञात इसमांनी त्यांचे पाठीमागुन येऊन फिर्यादीचे आई माया विठल नष्टे याचे गळयातील सोन्याचे दागीने बळजबरीने काढुन घेऊन मोटार सायकल वरुन पळुन गेल्याने त्याबाबत फिर्यादी नामे वैभव विठ्ठल नष्टे वय ३१ वर्षे रा. माळशिरस ता. माळशिरस जि. सोलापुर यांचे फिर्यादीवरुन नातेपुते पोलीस ठाणेस गुरनं १३३/२०२५ भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ३०९ (४), ३ (५) प्रमाणे दिनांक ०८/०४/२०२५ रोजी १८ वा ३९ मि. गुन्हा दाखल झाला होता. सदर गुन्हयाचा तपास गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोना/५६२ राकेश लोहार करीत ...

अतुल कुलकर्णी साहेब पोलीस अधीक्षक, सोलापूर ग्रामीण यांच्या संकल्पनेतून धर्मतुरी, ता.माळशिरस रोडलगत वृक्षारोपण

  उपसंपादक: वैभव आठवले साप्ताहिक बहुजन भूषण वृत्तपत्र नातेपुते पोलिस स्टेशन यांचेकडून मिळालेल्या माहितीनुसार       दिनांक 26/06/2025 रोजी मा. श्री. अतुल कुलकर्णी साहेब पोलीस अधीक्षक ,सोलापूर ग्रामीण यांच्या संकल्पनेतून  व मा. उपविभागीय पोलीस अधिकारी श्री नारायण शिरगावकर उपविभाग माळशिरस यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू करण्यात आलेल्या हरित वारी सन 2025 उपक्रमांतर्गत  नातेपुते पोलीस  ठाणे हद्दीतील  मौजे धर्मपुरी येथे  पालखी मार्गवर हरितवारी अनुषंगाने, माननीय पोलीस अधीक्षक श्री अतुल कुलकर्णी साहेब, यांच्या हस्ते रोडलगत वृक्षारोपण करण्यात आले.       सदर ठिकाणी वृक्षारोपण करिता गावातील सरपंच,शेतकरी व गावातील प्रतिष्ठित नागरिक तसेच  पोलीस पाटील, पोलीस मित्र, ग्राम सुरक्षा दल यांच्या उपस्थितीत हरित वारी उपक्रम संपन्न झाला आहे. बातमी अधिक जाहिरातीसाठी संपर्क संपादक : मा.श्री. डॉ. अभिमन्यु बी. आठवले ९४२०३०२५६१ उपसंपादक : वैभव अ. आठवले साप्ताहिक बहुजन भूषण ,  साप्ताहिक बहुजन मित्र वृत्तपत्र संस्थापक :  बहुजन राष्ट्रशक्ति साम...