जे अधिकारी जनतेने दिलेल्या अर्जाची, निवेदनाची दखल घेत नाहीत, गेंड्याच्या कातडीचे झाले आहेत त्यांना वटणीवर आणणार. मा.श्री.डॉ.अभिमन्यु बी.आठवले
सध्या
ग्रामपंचायतचे ग्रामसेवक, पंचायत समिति,
जिल्हा परिषद, तहसील कार्यालय,
प्रांत कार्यालय, महानगरपालिका, नगरपालिका, नगरपंचायत, नगरपरिषद, भूमीअभिलेख,
वनीकरण, पाठबंधारे, सार्वजनिक बांधकाम,
आरोग्य खाते, शिक्षण खाते, वीज वितरण इ. विभागाचे अधिकारी,
कर्मचारी यांना जनतेने दिलेल्या अर्जाची, निवेदनाची दखल घेताना दिसत नाहीत. वेळ काढूपणा
करतात, दफ्तर दिरंगाई कायद्याचा अवमान करतात,
टाळाटाळ करतात हे मी संघटनेचा संस्थापक, वृत्तपत्राचा संपादक पत्रकार म्हणून अनुभवत
आहे असे “हरामखोर अधिकारी” यांची गय करणार नाही. अधिकारी व कर्मचारी यांनी जनतेच्या
अर्जाचा विचार करून, निवारण करून न्याय द्यावा. अडचण असल्यास लेखी कळवावे अथवा
मार्गदर्शन करावे. तसेच काही अधिकारी हे बंद दरवाज्यातून काम करतात त्यांना जनतेची
“अलर्जी” आहे की काय असा प्रश्न पडतो. जनतेचे सेवक आहात हे अधिकारी यांनी लक्षात घ्यावे.
जे अधिकारी बंद दरवाजातून कामकाज पाहत आहेत त्यांना अगोदर “सल्ला” आणि नंतर “दे धक्का”
याची जाणीव करून देणार. जनतेने दिलेल्या अर्जाची, निवेदनाची दखल घेवून योग्य ती चौकशी करून
न्याय देण्याची भूमिका ठेवली पाहिजे. ज्या अधिकारी यांच्या नावाने जनतेने दिलेले अर्ज
निवेदने यानुसार त्वरित दखल घेवून न्याय निवाडा केला पाहिजे. परंतु अर्जदाराच्या अर्जाला
“केराची टोपली” दाखविली जाते हे गंभीर व चिंताजनक बाब आहे. दफ्तर दिरंगाई कायदा २००६
सांगतो की, कोणत्याही शासकीय कर्मचारी यांच्याकडे जनतेने दिलेले अर्ज,
निवेदने दिले असतील तर ७ दिवसाच्या आत ते निकाली काढले पाहिजे. एखाद्याच्या “जीवित
व स्वातंत्र्य” यावरती आधारित अर्ज, निवेदने असतील तर तातडीने एका दिवसात अगर
दुसर्या दिवसात सकाळपर्यंत निकाली काढले पाहिजेत. तसेच ज्या अधिकार्याकडे अर्ज,
निवेदने दिले आहेत परंतु अर्जातील मागणी इतर अधिकारी कार्यालयाकडे असेल तर त्यांच्याकडून
घेवून अर्जदाराला ४५ दिवसात देण्यात यावे असा कायदा सांगतो मग अर्जदाराने दिलेल्या
अर्जाची चौकशी करण्यासाठी अधिकारी कर्मचारी यांच्याकडे अर्जदार गेला असता त्यांना उडवाउडवीची
उत्तरे दिली तर अर्जदाराने अधिकार्याच्या कानाखाली आवाज काढला तर “सरकारी कामात अडथळा
कुठे केला” त्यामुळे गुन्हा होऊ शकत नाही. जे अधिकारी अर्जदाराच्या अर्जाची,
निवेदनाची दखल घेणार नाहीत, टाळाटाळ करतील तर माझ्याकडून “चुकीला माफी
नाही.” अन्याय-अत्याचाराविरुद्ध लढत असताना मरण आले तर आनंदाने स्वीकारेल ही माझी भीम
प्रतिज्ञा आहे तरी अधिकारी यांनी जनतेच्या अर्जाची, निवेदनाची दखल घेवून कर्तव्य जपावे असे बहुजन
राष्ट्रशक्ति सामाजिक संघटनेचे संस्थापक अभिमन्यु बी. आठवले यांनी प्रसिद्धीद्वारे
केले आहे.
बातमी
अधिक जाहिरातीसाठी संपर्क
संपादक :
मा.श्री. डॉ. अभिमन्यु बी. आठवले
९४२०३०२५६१
उपसंपादक
: वैभव अ. आठवले
साप्ताहिक
बहुजन भूषण, साप्ताहिक बहुजन मित्र वृत्तपत्र
संस्थापक
: बहुजन राष्ट्रशक्ति सामाजिक संघटना महाराष्ट्र राज्य
टीप : जे
दिसेल, जे पाहिले तेच
लिहिले हेच वृत्तपत्राचे ध्येय उद्दीष्ट आहे.

Comments
Post a Comment