संपादक साप्ताहिक बहुजन भूषण वृत्तपत्र
नातेपुते, ता.माळशिरस, जि.सोलापूर येथील ग्रामपंचायतचे रूपांतर नगरपंचायतमध्ये झाल्यानंतर कारभार चांगला चालला होता. परंतु या आषाढीवारी निमित्त कामकाज होत असताना नगरसेवक यांना विश्वासात न घेता नातेपुते नगरपंचायतचे मुख्याधिकारी विकास शिंगाडे कामकाज करीत आहेत. मुख्याधिकारी जोमात आणि नगरसेवक कोमात ही भयानक परिस्थिती झाली आहे.
नगरसेवकांना जनतेच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे. घरपटी, पाणीपट्टी तसेच इतर जनतेचे प्रश्न आहेत, जनतेने निवडुन दिले असताना अशा मुख्याधिकारी यांच्या मनमानीमुळे नगरसेवकांनी काय जनतेसाठी करावे हा प्रश्न नगरसेवक यांना पडला आहे. नगरसेवकांना रस्तावर उतरावे लागेल असे माजी उपनगराध्यक्स मालोजीराजे देशमुख यांनी आपली भूमिका पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी नगरपंचायतच्या सर्वं कामाचा लेखाजोखा देशमुख यांनी मांडला. मुख्याधिकारी यांना सर्वं नगरसेवकांनी धारेवर धरले, तसेच मुख्याधिकारी यांनी कामकाज नियमाप्रमाणे होत असल्याचे सांगितले. माहिती देताना देशमुख म्हणाले की, नवीन कर आकारणीचा ठराव सर्वं नगरसेवकांनी नामंजूर केला. तसेच सर्वं नगरसेवकांना विश्वासात घेऊनच कर आकारणी केली पाहिजे असे नगरसेवक यांनी सांगितले. ज्या कर आकारणीच्या नोटीसा मुख्याधिकारी यांनी वाटप करण्यास लावल्यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड चीड निर्माण झाली आहे. ज्ञानेश्वर महाराज पालखीसाठी नगरसेवक, पालकमंत्री जयकुमार गोरे, माजी आमदार रामभाऊ सातपुते यांच्याकडून ५५ लाख रुपये निधी मंजूर करून आणला आहे आणि मुख्याधिकारी मनमानी कारभार करीत आहेत हे दिसत आहे.
तसेच अकलूज कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती मामासाहेब पांढरे म्हणाले की, फोन लावला तरी मुख्याधिकारी फोन उचलत नाही त्यामुळे नागरिकांच्या अडिअडचणी सोडविता येत नाहीत. मुख्याधिकारी आणि नगरसेवक यांच्यात समन्व्य पाहिजे तसेच आषाढीवारी निमित्त पालखी तळावरील पाहणी करण्यासाठी जिल्हाधिकारी तसेच लोक प्रतिनिधी येणार असतील तर नगरसेवकांना माहिती नसते. आषाढीवारी निमित्त ५५ लाख रुपयेचा निधी आला आहे त्यामधून २५ लाख बांधकाम खात्याला तर ३० लाख रुपये नातेपुते नगरपंचायतला आले आहेत. असे असताना नगरसेवक यांना मुख्याधिकारी यांनी विश्वासात घेतले नाही. सदरची कामे कोणता ठेकेदार करतो, कोणत्या प्रभागात काम होतात हे ही नगरसेवक यांना माहिती नाही. या बैठकीत नगरसेवकांना संताप आला होता. तसेच नातेपुते नगरपंचायतमध्ये जे कर्मचारी आहेत की मुख्याधिकारी हेच समजत नाही ही गंभीर परिस्थिती आहे.
आज नगरसेवकांवरती "कशी नशिबानी थट्टा आज मांडली" अशी भयानक परिस्थिती नगरसेवक यांना म्हणण्याची आली आहे. मुख्याधिकारी यांची मनमानी चालू आहे असे नगरसेवक म्हणत आहेत. जनतेला नातेपुते येथे वाली आहे का नाही? असे जनतेतून बोलले जाते. तसेच पाण्याचा प्रश्न व विजेचा प्रश्न गंभीर बनला आहे.
पत्रकार परिषदेस मुख्याधिकारी विकास शिंगाडे, नगराध्यक्षा अनिता लांडगे, उपनगराध्यक्ष अतुल (बापू) पाटील, कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती मामासाहेब पांढरे, माजी नगराध्यक्षा उत्कर्षाराणी पलंगे, माजी उपनगराध्यक्ष मालोजीराजे देशमुख, पाणी पुरवठा सभापती भारतीताई पांढरे, नगरसेवक रावसाहेब पांढरे, दादासाहेब उराडे, बांधकाम सभापती सुरेंद्र सोरटे, नगरसेवक आणासाहेब पांढरे, उद्योगपती अतुल बावकर, अविनाश दोशी, रणवीर देशमुख, माया उराडे, संगीता काळे, नातेपुते पोलीस स्टेशनचे सपोनि विशाल वायकर साहेब तसेच नातेपुते नगरपंचायतचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
बातमी
अधिक जाहिरातीसाठी संपर्क
संपादक : मा.श्री. डॉ. अभिमन्यु बी. आठवले
९४२०३०२५६१
उपसंपादक : वैभव अ. आठवले
साप्ताहिक बहुजन भूषण, साप्ताहिक बहुजन मित्र वृत्तपत्र
संस्थापक : बहुजन राष्ट्रशक्ति सामाजिक संघटना महाराष्ट्र राज्य
टीप : जे दिसले, जे पाहिले तेच लिहिले हेच वृत्तपत्राचे ध्येय उद्दीष्ट आहे.
.jpg)
Comments
Post a Comment