संपादक: अभिमन्यु बी. आठवले (साप्ताहिक बहुजन भूषण वृत्तपत्र) पोलीस दल हे केवळ सरकारी नोकरीचे क्षेत्र नसून ते समाजसेवेचे एक महान माध्यम आहे. पोलीस अधिकारी आणि कर्मचारी हे दिवस-रात्र जनतेच्या सुरक्षेसाठी कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी आणि नागरिकांच्या हक्काचे संरक्षण करण्यासाठी कार्यरत असतात. त्यामुळे पोलिसांची नोकरी एक जबाबदारी, कर्तव्य आणि समाजसेवा आहे. समाजातील प्रत्येक नागरिक सुरक्षित रहावा, गुन्हेगारीला आळा बसावा, अन्यायग्रस्थांना न्याय मिळावा आणि समाजात शांतता व सुव्यवस्था टिकून रहावी यासाठी पोलीस दल अहोरात्र परिश्रम घेत असते. सण-उत्सव, निवडणुका, नैसर्गिक आपत्ती, अपघात किंवा कोणतीही आपत्कालीन परिस्थिती असो पोलीस कर्मचारी स्वतःच्या कुटुंबापेक्षा जनतेच्या हिताला प्राधान्य देऊन कर्तव्य बजावत असतात. पोलीस दलाचे ब्रीद वाक्य म्हणजे "सद्रक्षणाय खलनिग्रहणाय" म्हणजे सज्जनाचे रक्षण आणि दुर्जनाचे निर्दालन , हे ब्रीद वाक्य पोलीस सेवे मागील समाजहिताची भावना स्पष्ट करते. पोलीस केवळ गुन्हेगारावर कारवाई करत नाहीत तर हरवलेल्या व्यक्तींना शोधणे, महिलांचे संरक्षण, जेष्ठ नागरिका...
साप्ताहिक बहुजन भूषण
साप्ताहिक बहुजन भूषण हे वृत्तपत्र प्रबोधनवादी, परिवर्तनवादी, अन्याय-अत्याचार आवाज उठवणारे