ग्रामपंचायत सदस्य, पंचायत समिती सदस्य, जि.परिषद सदस्य, नगरपंचायत, नगरपरिषद, नगरपालिका, महानगरपालिका, नगरसेवक, आमदार, खासदार होण्यासाठी पात्रता परीक्षा घेण्यात यावी ही काळाची गरज: मा.श्री.डॉ.अभिमन्यु आठवले
संपादक बहुजन भूषण वृत्तपत्र सध्या सर्वच क्षेत्रात म्हणजे पोलीस पाटील, तलाठी, ग्रामसेवक, बी.डी.ओ., तहसिलदार, प्रांत, शिक्षक, डॉक्टर, जिल्हाधिकारी, वकील, इंजिनियर, कोर्ट इत्यादी विभागात शासकीय, निमशासकीय कर्मचारी अधिकारी होण्यासाठी परीक्षा द्याव्या लागतात. त्याचप्रमाणे ग्रामपंचायत, पंचायत समिती, जि.परिषद, नगरपंचायत, नगरपरिषद, नगरपालिका, महानगरपालिका, आमदार, खासदार इत्यादी क्षेत्रात पदाधिकारी, पुढारी होण्यासाठी त्यांना सुद्धा ग्रामपंचायत सदस्य यांना 10 वी पास, व इतर पदाधिकारी, पुढारी होण्यासाठी किमान शिक्षण ग्रॅज्युट झालेले असायलाच पाहिजे व यांना सुद्धा पात्रता परीक्षा असायला पाहिजे. सध्या ग्रामपंचायत, पंचायत समिती, जि.परिषद, नगरपरिषद, नगरपंचायत, नगरपालिका, महानगरपालिका, आमदार, खासदार, विधान परिषद सदस्य, शिक्षक आमदार, पदवीधर आमदार यांना पुढारी होण्यासाठी पात्रता परीक्षा असणे काळाची गरज आहे, परंतु यांना मात्र परीक्षा नाहीत ही मोठी शोकांतिका आहे. हे पदाधिकारी लायक आहेत की नाही हे परीक्षा घेतल्यानंतर दिसून येतील. यांच्यासाठी परीक्षा पेपर कसा असावा? ...