पोलीस दल हे केवळ सरकारी नोकरीचे क्षेत्र नसून ते समाजसेवेचे एक महान माध्यम आहे. पोलीस अधिकारी आणि कर्मचारी हे दिवस-रात्र जनतेच्या सुरक्षेसाठी कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी आणि नागरिकांच्या हक्काचे संरक्षण करण्यासाठी कार्यरत असतात. त्यामुळे पोलिसांची नोकरी एक जबाबदारी, कर्तव्य आणि समाजसेवा आहे.
समाजातील प्रत्येक नागरिक सुरक्षित रहावा, गुन्हेगारीला आळा बसावा, अन्यायग्रस्थांना न्याय मिळावा आणि समाजात शांतता व सुव्यवस्था टिकून रहावी यासाठी पोलीस दल अहोरात्र परिश्रम घेत असते. सण-उत्सव, निवडणुका, नैसर्गिक आपत्ती, अपघात किंवा कोणतीही आपत्कालीन परिस्थिती असो पोलीस कर्मचारी स्वतःच्या कुटुंबापेक्षा जनतेच्या हिताला प्राधान्य देऊन कर्तव्य बजावत असतात.
पोलीस दलाचे ब्रीद वाक्य म्हणजे "सद्रक्षणाय खलनिग्रहणाय" म्हणजे सज्जनाचे रक्षण आणि दुर्जनाचे निर्दालन, हे ब्रीद वाक्य पोलीस सेवे मागील समाजहिताची भावना स्पष्ट करते. पोलीस केवळ गुन्हेगारावर कारवाई करत नाहीत तर हरवलेल्या व्यक्तींना शोधणे, महिलांचे संरक्षण, जेष्ठ नागरिकांना मदत, वाहतूक नियंत्रण, अपघाती व्यवस्थापन आणि जनजागृती या सारखी अनेक समाजपयोगी कार्य करतात.
खऱ्या अर्थाने पोलीस हा समाजाचा मित्र, मार्गदर्शक, आणि रक्षक असतो. त्यांच्या गणवेशामागे जनतेची सेवा करण्याची भावना, न्याय मिळवून देण्याची तळमळ आणि राष्ट्राप्रती समर्पण दडलेले असते त्यामुळे पोलिसांची नोकरी ही केवळ उपजीविकेचे साधन नसुन राष्ट्रसेवा आणि समाजसेवेचे एक पवित्र वृत्त आहे.
आज प्रत्येक नागरिकांनी पोलीस दलाचा सन्मान केला पाहिजे, कायद्याचे पालन करून त्यांना सहकार्य केले पाहिजे. सुरक्षित, शांततापूर्ण आणि प्रगत समाज घडविण्यासाठी पोलीस आणि जनता यांचे सहकार्य अत्यंत आवशक आहे. "गणवेशातील समाजसेवक म्हणजे पोलीस होय"
जे पाहिले, तेच लिहिले
जनहितार्थ
अधिक जाहिरातीसाठी संपर्क
संपादक : मा.श्री. डॉ. अभिमन्यु बी. आठवले
९४२०३०२५६१
उपसंपादक : वैभव अ. आठवले
साप्ताहिक बहुजन भूषण, साप्ताहिक बहुजन मित्र वृत्तपत्र
संस्थापक : बहुजन राष्ट्रशक्ति सामाजिक संघटना महाराष्ट्र राज्य
टीप : जे दिसले, जे पाहिले तेच लिहिले हेच वृत्तपत्राचे ध्येय उद्दीष्ट आहे.

Comments
Post a Comment