Skip to main content

नातेपुते पोलिसांची वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर धडक कारवाई

ग्रामसभेत एखाद्या जाती धर्माच्या कुटुंबाच्या बाबतीत सरपंच, उपसरपंच, सदस्य, ग्रामसेवक यांनी ग्रामस्थापुढे खोटी दिशाभूल करणारी व चुकीची माहिती देवून बदनामी केली तर त्या पदाधिकारी यांचे पद रद्द होण्यास कारण ठरते

संपादक साप्ताहिक बहुजन भूषण वृत्तपत्र         

          ग्रामसभा ही लोकशाहीतील सर्वोच्च व्यवस्था आहे. २६ जानेवारी १९५० रोजी या भारत देशात पहिला प्रजासत्ताक दिन साजरा झाला त्यामुळे या देशात प्रजेची सत्ता आली. आम्ही सर्व भारतीय नागरिक म्हणून वावरू लागलो. या दिनामुळे लोकशाही आली, स्वातंत्र्य आले. ग्रामसभा ही सार्वभौम आहे. ग्रामसभेला निवडणूक नाही, गावातील प्रत्येक व्यक्ति ग्रामसभेचा सदस्य असतो. ग्रामसभा ही विधानसभा, लोकसभा यांची “जननी” आहे. ग्रामसभेला काही अधिकार देण्यात आले असले तरी सरपंच, उपसरपंच, सदस्य, ग्रामसेवक यांनी कोणत्याही जाती धर्माच्या विषयी खोटी दिशाभूल करणारी चुकीची माहिती ग्रामसभेमध्ये मांडू नये व मांडले व ग्रामसभेतील ग्रामस्थांनी त्या सुचनेला सहमती दाखवली व खोटा ठराव केला त्या सरपंच, उपसरपंच, सदस्य, ग्रामसेवक, अनुमोदक, सूचक व साह्य करणारे जे ग्रामस्थ त्यांचेवरती संघमताने कट रचून त्या कुटुंबाची नाहक बदनामी जाणूनबुजून करण्याच्या हेतूने केलेल्या ठरावानुसार वरिष्ठ अधिकारी यांच्याकडे तक्रार दाखल केली तर त्यांचे सदस्यत्व रद्द होण्यास कारण ठरते.

          तसेच जे कुटुंब अनुसूचीत जाती जमातीमध्ये मोडत असेल आणि त्या कुटुंबाची बदनामी ग्रामसभेच्या दिवशी केली गेली असेल तर त्यांचेवरती गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल होऊ शकतो. तसेच एखाद्या जाती धर्मातील कुटुंबाचा प्रश्न असेल तर सर्व ग्रामपंचायत सदस्य यांनी विशेष बैठक घेवून चर्चा करून मार्ग काढावा. ग्रामसभेत जनतेचा विकास त्याचबरोबर गावामध्ये सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी वरिष्ठाकडे त्याबाबत पाठपुरावा करण्यासाठी ग्रामसभेचा ठराव महत्वपूर्ण ठरू शकतो. ग्रामसभेत खोटे ठराव करणे हा ग्रामसभेचा अपमान समजला जातो. कोणत्याही जाती धर्माच्या व्यक्ति असोत त्यांची बदनामी व्हावी हा दृष्टीकोन ठेवून खोटा, चुकीचा दिशाभूल करणारा ठराव करणे हे चुकीचे ठरते. सरपंच, उपसरपंच, सदस्य हा पाच वर्षासाठी असतो तो कायमस्वरूपी नसतो.

          तसेच ग्रामसेवक हा जिल्हा परिषदेचा सचिव तो नियंत्रण अधिकारी म्हणून असतो. परंतु ग्रामपंचायतचा पदाधिकारी झाला म्हणून हुकुमशाही करू शकत नाही याचे भान पदाधिकारी यांनी ठेवणे गरजेचे आहे. सध्याच्या काळात अतिक्रमण हा विषय गंभीर बाब बनत आहे त्यामुळे वाद-विवाद वाढत आहेत, जातिवाद वाढत आहेत याला कारण म्हणजे जातिवादी सरपंच, उपसरपंच, सदस्य, ग्रामसेवक व गावातील पात्रताहीन काही मोजक्या व्यक्ति असू शकतात. हा वाद एक ठिणगी म्हणून त्या पदाधिकारी यांना महागात पडते.

          ग्रामपंचायत मधील कारभारी स्वच्छ नसतात. भ्रष्टाचारी व्यक्ति म्हणून त्यांची कामगिरी असू शकते. ग्रामसभेमध्ये एखाद्या जाती धर्माच्या व्यक्तीला टार्गेट करणे गुन्हा आहे. तसेच ग्रामसभेमध्ये ग्रामसेवकांनी केलेली कामे, त्यासाठी आलेला निधि, सरपंच, ग्रामसेवक यांनी चेक द्वारे काढलेली रक्कम, मंजूरी पत्रके, कोणी कामे केले, शासकीय योजनांची माहिती याबाबत ग्रामसेवकांनी माहिती देणे बंधनकारक आहे. तसेच ग्रामसभेचे चित्रीकरण करण्यात आले पाहिजे.

          सर्व स्तरावर २६ जानेवारी २०२३ प्रजासत्ताक दिना दिवशी भारतरत्न परमपूज्य डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे प्रतिमेचे फोटो ठेवून पुजा करून ध्वजारोहण करण्यात यावे. सर्व भारतीय बांधवांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा...!

जनहितार्थ

अधिक जाहिरातीसाठी संपर्क

संपादक : मा.श्री. डॉ. अभिमन्यु बी. आठवले

९४२०३०२५६१

उपसंपादक : वैभव अ. आठवले

साप्ताहिक बहुजन भूषण, साप्ताहिक बहुजन मित्र वृत्तपत्र

संस्थापक : बहुजन राष्ट्रशक्ति सामाजिक संघटना महाराष्ट्र राज्य

टीप : जे दिसेल, जे पाहिले तेच लिहिले हेच वृत्तपत्राचे ध्येय उद्दीष्ट आहे.

         

Comments

Popular posts from this blog

नातेपुते पोलीस ठाण्याची धडक कामगिरी 6,200 रुपये हिसकून घेऊन जाणाऱ्या चोरांना आपले ताब्यातील थार वाहनांसह केली अटक

उपसंपादक: वैभव आठवले साप्ताहिक बहुजन भूषण वृत्तपत्र नातेपुते पोलिस स्टेशन यांचेकडून मिळालेल्या माहितीनुसार           नातेपुते पोलीस ठाणे हद्दीमध्ये फिर्यादी यांच्या दीपक जनार्दन चव्हाण, राहणार मोराची, तालुका माळशिरस, जिल्हा सोलापूर हे फलटण-पंढरपूर रोडवरील इंडीयन ऑईल कंपनीचा सुळ पेंट्रोल पंप येथे दि.01/10/2025 रोजी दुपारी 03.50 वा. सुमारास इंडीयन ऑईल कंपनीचा सुळ पेंट्रोल पंप येथे डिझेल टाकण्याचे काम करित असताना एक राखाडी रंगाची थार गाडी नं MH06CG5558 अशी डिझेल भरण्याकरीता आली व त्यातील ड्रायव्हर शेजारी बसलेल्या अनोळखी इसमाने गाडीत 4000 रुपयचे डिझेल भरायचे आहे व 6200 रु आम्हाला रोख पैशाची गरज आहे मी तुम्हाला माझे फोन पे वरून 10200 रु ऑनलाईन पाठवतो असे म्हणाल्याने मी गाडीचे डिझेलचे झाकन उघडण्यास गेलो असता पाठीमागे बसलेला अनोळखी इसम म्हणाला की, आम्हाला डिझेल नको 6200 रु रोख द्या अशी विनंती केली. त्यावेळी मी माझे खिश्यातील डिझेल विक्रीचे जमा झालेले पैसे खिश्यातुन काढुन 6200 रु मोजले त्यामध्ये 500 रु दराच्या 12 व 100 रु दराच्या 02 असे 6200 रु बाजुला काढले व बाकी ...

नातेपुते पोलीस ठाण्याची धडक कामगिरी उभ्या असलेल्या वाहनाची टायर चोरणाऱ्या अट्टल चोरास अटक व चोरीस गेलेला 100% मुद्देमाल सह 2,04,000/ किमतीचा मुद्देमाल जप्त

उपसंपादक: वैभव आठवले साप्ताहिक बहुजन भूषण वृत्तपत्र नातेपुते पोलिस स्टेशन यांचेकडून मिळालेल्या माहितीनुसार      नातेपुते पोलीस ठाणे हद्दीमध्ये फिर्यादी यांच्या आकाश तानाजी बोडरे, राहणार नातेपुते, तालुका माळशिरस यांनी त्यांच्याकडील वापरते वाहन टाटा टिपर नंबर एम एच 11 सी एच 0551 या उभ्या असलेल्या वाहनाचे दोन टायर डिस्कसह किंमत 75,000/ रुपये खोलून कोणीतरी अज्ञात चोरट्याने ते चोरून नेले आहेत म्हणून वगैरे हकीगत वरून नातेपुते पोलीस ठाणे गुर नंबर 331/2025 बीएनएस कलम 303 (2) प्रमाणे गुन्हा दाखल होता.       सदर गुन्ह्यातील घडला प्रकाराबाबत वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली नातेपुते पोलीस ठाणे व उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय गुन्हे प्रकटीकरण पथक गुन्ह्यातील घटनास्थळाच्या आजूबाजूची सीसीटीव्ही पाहणी करून तसेच  सायबर शाखेकडील तांत्रिक माहितीचे विश्लेषण करून संशयित  आरोपीचा शोध घेतला असता संशयित आरोपी हा कडेगाव जिल्हा सांगली येथील नामे बुरान इलाही मुलाणी वय 40 वर्ष असे  असल्याबाबत खात्री झाली आणि त्यानंतर सदर आरोपीस सापळा लावून कडेगाव जिल्हा सांगली येथे...

शिवसेनेच्या सोलापूर जिल्हाप्रमुख पदी राजकुमार हिवरकर-पाटील

  उपसंपादक: वैभव आठवले साप्ताहिक बहुजन भूषण वृत्तपत्र शिवसेनेचे मुख्य नेते तथा महाराष्ट्र राज्याचे संवेदनशील उपमुख्यमंत्री मा.ना.एकनाथराव शिंदे साहेब यांच्या आदेशाने महाराष्ट्र राज्याचे रोजगार हमी पणन मंत्री भरत शेठ गोगावले यांच्या हस्ते व महाराष्ट्र प्रदेशचे ओबीसी विभागाचे प्रमुख रमेशजी बारसकर यांच्या उपस्थितीत मंत्रालय मुंबई येथे सोलापूर जिल्ह्याचे प्रमुख ओबीसी विभाग म्हणून श्री.राजकुमार लता शंकरराव हिवरकर-पाटील यांना निवडीचे पत्र देण्यात आले. आजवर शिवसेनेमध्ये पक्षाचे जडणघडणीमध्ये मोर्चे, आंदोलन, साडेनऊ हजार पेक्षा जास्त गरिबांची केलेली ऑपरेशन, सोलापूरच्या अक्कलकोटचे माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे साहेब यांच्या पक्षप्रवेशावेळी मुख्य नेत्यांच्या उपस्थितीत 12 बलुत्तरांचा पक्ष म्हणून ओबीसी विभाग निर्माण करण्यामागची मुख्य नेते यांची दूरदृष्टी सर्वांसमक्ष केलेल भाषण, राष्ट्रमाता जिजाऊ क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीच्या निमित्ताने 55 सायकलींच मोफत झालेल वाटप,  सवलतीच्या दरात  99000 माता-भगिनींना केलेली डाळ वाटप, सत्तावीस गावांना बचत गटाच्या माध्यमातून दिलेली ...