Skip to main content

नातेपुते पोलीसांची उल्लेखनिय कामगिरी खुनाच्या गुन्ह्यातील मुख्य आरोपीस 24 तासाच्या आत केले जेरबंद

नातेपुते नगरपंचायतने प्रसिद्ध केलेल्या नकाशामुळे शेतीधारक व प्लॉट धारकांची दीपावली सणात उडवली झोप : मा.अभिमन्यू आठवले

संपादक : अभिमन्यु बी. आठवले (साप्ताहिक बहुजन भूषण वृत्तपत्र) 

नातेपुते नगरपंचायतने प्रसिद्ध केलेल्या व संपादक यांच्या हाती लागलेल्या नकाशानुसार, दसरा सण झाला, दीपावली सण सुरु होत आहे हे जनतेसाठी आनंदाचे सण आहेत परंतु नातेपुते नगरपंचायतने शेती धारक व प्लॉट धारक यांना माहिती न देता नकाशा प्रसिद्धी करून झोप उडवली आहे. शेती धारक व प्लॉट धारक यांचे प्रचंड नुकसान होणार आहे, बेघर होणार आहेत, शेती धारक व प्लॉट धारक आपले कसे होणार? यामुळे चिंताग्रस्त झाले आहेत. ग्रामपंचायतचे नगरपंचायतमध्ये रूपांतर केले आता यापुढे शेती धारक व प्लॉट धारक यांना उध्वस्त करून नगरपरिषद करायची आहे काय? नगरपरिषद करायची असल्यास नातेपुते नगरपंचायतला लागून असलेली गावे मोरोची, कारुंडे, व इतर गावे घेणार का?, असे संपादक व संघटनेचा संस्थापक म्हणून वाटते.

शेती धारक व प्लॉट धारक यांनी त्वरित गट नंबरचे ७/१२ उतारे, तसेच असिसमेंट उतारे काढून त्यावरती बाधित क्षेत्र असा उल्लेख आहे का? यासाठी उतारे काढून बघावेत व आपले म्हणणे नातेपुते नगरपंचायतकडे लेखी द्यावे. शेती धारक व प्लॉट धारक यांना देशोधडीला लावून रस्ते करणे, बगीचे करणे हा विकास समजावा काय? दीपावली सणाच्या तोंडावर नातेपुते नगरपंचायतने जनतेची झोप उडवली आहे असे करण्यामागचा सूत्रधार कोण? त्याचा शोध घेणे महत्वाचे आहे. 

शेती धारक व प्लॉट धारक सर्वांनी आवाज उठवला पाहिजे, लोकशाही मार्गाने आंदोलने केली पाहिजेत, सध्या लागलेल्या विधानसभा निवडणुकीवर बहिष्कार घातला पाहिजे हे शेती धारक व प्लॉट धारक यांनी लक्षात घ्यावे. आपण आवाज उठविला नाही तर येणाऱ्या काळात आपल्या डोळ्यादेखत घरादारावर व शेतीवर "बुलडोझर" फिरणार असेल करोडो रुपयाची संपत्ती हातातून जाणार असेल तर "जगण्यापेक्षा मरण बरे" वाटते .हा नकाशा तयार करण्यासाठी नगरपंचायतमधील अधिकारी व पदाधिकारी यांनी ठराव करून सह्या केल्या कि काय असे वाटते. 

नातेपुते नगरपंचायतने प्रसिद्धी केलेल्या नकाशामुळे नातेपुते नगरीमध्ये भयानक स्मशान शांतता पसरली आहे, यापुढे हा नकाशा रद्द करण्यात यावा यासाठी शेती धारक, प्लॉट धारक, सामाजिक कार्यकर्ते यांनी सह्याची मोहीम राबवून आवाज उठवणे गरजेचे आहे. 

तसेच प्रारूप विकास आराखडा तयार करण्याअगोदर ज्या गट नंबर धारकांचे व प्लॉट धारकांचे क्षेत्र जाणार आहे त्या बाबत गाव पातळीवर बैठक नगरपंचायतच्या अधिकारी यांनी बोलावली पाहिजे, मते जाणून घेतली पाहिजेत, तसेच प्रारूप विकास आराखडाबाबत जनजागृती केली पाहिजे, प्रसिद्ध केलेला विकास आराखडा नकाशा नगरपंचायत मुख्य दरवाजा समोर लावला गेला पाहिजे, तो आड बगलेला लावला नाही पाहिजे. 

प्रसिद्ध केलेला नकाशा लावल्यानंतर अधिकारी यांनी शिक्का व सही करून तारीख टाकून हरकतीसाठी अर्ज मागवले पाहिजेत, हरकतीसाठी ३० ते ६० दिवसांचा शासकीय कालावधी असतो तो पत्रकानुसार त्याची माहिती दिली पाहिजे. शेती धारक, प्लॉट धारक यांना अंधारात ठेऊन प्रारूप विकास आराखडा अधिकारी व पदाधिकारी यांनी ठराव करून करणे हे योग्य नाही.

तसेच खोडसाळपणाने मुद्दाम नकाशा प्रसिद्ध केलेला चिटकावून मागील तारीख टाकून ८ ते १० दिवस राहतील, त्यामुळे हरकती ग्रामस्थांना घेणे अवघड होईल असे कटकारस्थान रचून ग्रामस्थांना गाफिल ठेऊन प्रारूप विकास आराखडा कसा मंजूर करता येईल हा उद्देश असतो.

अर्जदारांना अर्ज देताना तारीख संपली, अर्ज घेतले जाणार नाहीत असे अधिकारी सांगतात. त्यांना हरकतीपासून दूर ठेवले जाते. त्या वेळेला लेखी ग्रामस्थांनी अर्ज घेत नसल्या बाबत मागणी करावी, तसेच तुम्हास सरकारी कामात अडथळा या कायद्याचा आधार घेऊन अधिकारी तुमच्यावर दबाव टाकतील, त्या वेळीस अधिकारी यांच्यावरती ग्रामस्थांनी दफ्तर दिरंगाई कायदा याचा आधार घ्यावा. 

जनहितार्थ

अधिक जाहिरातीसाठी संपर्क

संपादक : मा.श्री. डॉ. अभिमन्यु बी. आठवले

९४२०३०२५६१

उपसंपादक : वैभव अ. आठवले

साप्ताहिक बहुजन भूषणसाप्ताहिक बहुजन मित्र वृत्तपत्र

संस्थापक : बहुजन राष्ट्रशक्ति सामाजिक संघटना महाराष्ट्र राज्य

टीप : जे दिसलेजे पाहिले तेच लिहिले हेच वृत्तपत्राचे ध्येय उद्दीष्ट आहे. 


Comments

Popular posts from this blog

नातेपुते पोलीस ठाणेकडील गुन्हे प्रकटीकरण शाखेची आदर्श कामगिरी चंदन चोरी करणा-या आरोपीस २४ तासात केले जेरबंद

  उपसंपादक: वैभव आठवले साप्ताहिक बहुजन भूषण वृत्तपत्र नातेपुते पोलिस स्टेशन यांचेकडून मिळालेल्या माहितीनुसार      नातेपुते पोलीस ठाणे हददीमध्ये मौजे मांडवे, ता.माळशिरस येथे राजन सुकुमार दोशी यांचे शेतातील दिनांक २६/०६/२०२५ रोजी सकाळी ०८/०० वा ते सायंकाळी ०५/००वा. चे दरम्यान शेतातील बांधावरील १० वर्षे वयाची ०२ चंदनाची झाडे अंदाजे किंमत २७,०००/- रू चे कोणीतरी अज्ञात चोरटयाने चोरून नेली आहेत त्याबाबत फिर्यादी नामे राजन सुकुमार दोशी रा.नातेपुते, ता.माळशिरस, जि.सोलापुर यांचे फिर्यादीवरुन नातेपुते पोलीस ठाणेस गु.र.नं. २३७/२०२५ भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ३०३ (२) प्रमाणे दिनांक २६/०६/२०२५ रोजी गुन्हा दाखल झाला होता. सदर गुन्हयाचा तपास पोहेकॉ/१७०८ विकास बाबर हे करीत होते.      नातेपुते पोलीस ठाणेचे गुन्हे प्रकटीकरण शाखेचे अंमलदार यांनी सदर गुन्हयाचा तपास दरम्यान मिळालेल्या गोपनिय बातमीव्दारे माहीती काढून इसम नामे १) गोविंद दुर्याधन काळे २) मेघराज ज्ञानदेव भोसले दोघे रा माळशिरस यांनी गुन्हा केल्याचे निष्पन्न झाल्याने त्यास पोहकॉ/१७०८ बाबर व गुन्हे प्रकटीक...

नातेपुते पोलीस ठाणेकडून जबरी चोरी करणा-या आरोपीस २४ तासाच्या आत केले जेरबंद

उपसंपादक: वैभव आठवले (साप्ताहिक बहुजन भूषण वृत्तपत्र) नातेपुते पोलीस ठाणे यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार      नातेपुते पोलीस ठाणे हददीमध्ये मौजे नातेपुते, ता.माळशिरस येथे दिनांक ०३/०४/२०२५ रोजी सायकाळी ०७.३० वा सुमारास गुन्ह्यातील फिर्यादी नामे वैभव विठ्ठल नष्टे वय ३१ वर्षे, रा. माळशिरस ता. माळशिरस जि. सोलापुर व सोबत त्यांची आई माया नष्टे असे त्यांचेकडील स्कुटी गाडी क्र. एम.एच. ४५ ए.व्ही. १२६१ यावरुन नातेपुते परिसरात शिंगणापुर पाटी ते बायपास रोड मार्गे नातेपुते फडतरी जाणारे बायपास रोडवर आले असताना दोन अज्ञात इसमांनी त्यांचे पाठीमागुन येऊन फिर्यादीचे आई माया विठल नष्टे याचे गळयातील सोन्याचे दागीने बळजबरीने काढुन घेऊन मोटार सायकल वरुन पळुन गेल्याने त्याबाबत फिर्यादी नामे वैभव विठ्ठल नष्टे वय ३१ वर्षे रा. माळशिरस ता. माळशिरस जि. सोलापुर यांचे फिर्यादीवरुन नातेपुते पोलीस ठाणेस गुरनं १३३/२०२५ भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ३०९ (४), ३ (५) प्रमाणे दिनांक ०८/०४/२०२५ रोजी १८ वा ३९ मि. गुन्हा दाखल झाला होता. सदर गुन्हयाचा तपास गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोना/५६२ राकेश लोहार करीत ...

अतुल कुलकर्णी साहेब पोलीस अधीक्षक, सोलापूर ग्रामीण यांच्या संकल्पनेतून धर्मतुरी, ता.माळशिरस रोडलगत वृक्षारोपण

  उपसंपादक: वैभव आठवले साप्ताहिक बहुजन भूषण वृत्तपत्र नातेपुते पोलिस स्टेशन यांचेकडून मिळालेल्या माहितीनुसार       दिनांक 26/06/2025 रोजी मा. श्री. अतुल कुलकर्णी साहेब पोलीस अधीक्षक ,सोलापूर ग्रामीण यांच्या संकल्पनेतून  व मा. उपविभागीय पोलीस अधिकारी श्री नारायण शिरगावकर उपविभाग माळशिरस यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू करण्यात आलेल्या हरित वारी सन 2025 उपक्रमांतर्गत  नातेपुते पोलीस  ठाणे हद्दीतील  मौजे धर्मपुरी येथे  पालखी मार्गवर हरितवारी अनुषंगाने, माननीय पोलीस अधीक्षक श्री अतुल कुलकर्णी साहेब, यांच्या हस्ते रोडलगत वृक्षारोपण करण्यात आले.       सदर ठिकाणी वृक्षारोपण करिता गावातील सरपंच,शेतकरी व गावातील प्रतिष्ठित नागरिक तसेच  पोलीस पाटील, पोलीस मित्र, ग्राम सुरक्षा दल यांच्या उपस्थितीत हरित वारी उपक्रम संपन्न झाला आहे. बातमी अधिक जाहिरातीसाठी संपर्क संपादक : मा.श्री. डॉ. अभिमन्यु बी. आठवले ९४२०३०२५६१ उपसंपादक : वैभव अ. आठवले साप्ताहिक बहुजन भूषण ,  साप्ताहिक बहुजन मित्र वृत्तपत्र संस्थापक :  बहुजन राष्ट्रशक्ति साम...