Skip to main content

आमदारांना "आमसभा" घेण्यास "अॅलर्जी" जनतेमध्ये तीव्र नाराजी


उपसंपादक  बहुजन भूषण

सध्या महाराष्ट्रामध्ये जे आमदार जनतेच्या मतामुळे निवडून गेले त्यांना आपल्या तालुक्याचा व तालुक्यातील जनतेचा विसर पडला आहे असे दिसते. मतदारांना वार्‍यावरती सोडले आहे, आमदारांनी आपल्या मतदार संघात आमसभा घेवून जनतेच्या असलेल्या अडीअडचणी याबाबत अर्ज, निवेदन घेवून चर्चा करून सोडविण्यासाठी आमदारांनी आमसभा घेतली पाहिजे. ज्या तालुक्यातून आमदार झाले त्या तालुक्यात आमदार आमसभा घेताना दिसत नाहीत ही चिंताजनक व खेदजनक गंभीर बाब आहे. आमदारांनी आमसभा घेणे बंधनकारक आहे. तसेच काही आमदार स्टंट करण्यात पटाईत आहेत. मत मागताना निवडणुकीच्या दरम्यान आमदार होण्यासाठी प्रत्येक गावात वाडी वस्तीवर जात होते. परंतु निवडून आलेवर कोण मतदार, कोणता तालुका? याचा विसर पडला. आमदारांना आमसभा घेण्यास अॅलर्जी आली आहे असे कदाचित दिसते. आमसभा घेणेही जनतेसाठी हिताचे असते. 

आमदारांनी आमसभा घेतल्याचे शासकीय दरबारी कागदोपत्री दाखविले जाते की काय? असे वाटते. आमसभा न घेणार्‍या आमदाराविषयी जनतेमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे व त्या आमदारावर जनता उदासीन आहे. केवळ आमदार निधीतून योजनेची नावे सांगून आमदाराचे स्टंट करणे महाराष्ट्रात चालू आहे असे पाहायला मिळत आहे. आमदारांनी आपआपल्या तालुक्यात आमसभा प्रसिद्धीद्वारे करून घेतली पाहिजे. न घेणार्‍या आमदारांना कारणे दाखवा नोटिसाद्वारे कळविण्याचा अधिकार वरिष्ठ अधिकारी यांना असतो. जसे ग्रामपंचायत ग्रामसभा न घेणार्‍या सरपंच, ग्रामसेवक यांच्यावरती कारवाई होते त्याच धर्तीवर आमसभा न घेणार्‍या आमदारावर कारवाई होऊ शकते. काही ठिकाणी आमदार जनता दरबार या अंतर्गत नौटंकी करून दरबार भरवत आहेत असेही दिसते. 

आमसभा तालुक्यातील जनतेसाठी एक परिषद, चर्चा, अडचणी, विकासात्मक गाव पातळीवरील प्रश्न यावरती असतात. त्यानुसार आमदारांनी त्या सोडविण्यासाठी पाठपुरावा करावा यासाठी आमसभा असते व आमसभा ही जनतेचे हित समजून कर्तव्य म्हणून घ्यावी लागते. जे आमदार तालुक्यात आमसभा घेत नाहीत, टाळाटाळ करतात त्यांची पुढील वाटचाल जनता थांबवेल अशी परिस्थिती दिसते. "आमदार दाखवा आणि हजार रुपये मिळवा” असे काही तालुक्यात परिस्थिती आहे. 

सध्या मतदारांना उच्च शिक्षित डॉक्टर, इंजिनिअर, वकील असे उमेदवार चालत नाहीत परंतु पैसे घेवून पवित्र मत देवून पात्रताहीन उमेदवार निवडून देतात ही शोकांतिका आहे. पैसे देवून मत देणार्‍या जनतेसाठी कशासाठी आमसभा घ्यायची असे आमदारांना वाटत असल्यामुळे ते आमसभा घेत नाहीत असे वाटते. परंतु आमसभा आमदारांनी घेणे तालुक्याच्या जनतेसाठी महत्वाचे ठरते असे असताना आमदारांना आमसभा घेण्याची अॅलर्जी आहे असे दिसते असे प्रसिद्धीद्वारे मा.श्री.अभिमन्यु बी. आठवले यांनी केले आहे.

बातमी

अधिक जाहिरातीसाठी संपर्क

संपादक : मा.श्री. डॉ. अभिमन्यु बी. आठवले

९४२०३०२५६१

उपसंपादक : वैभव अ. आठवले

साप्ताहिक बहुजन भूषणसाप्ताहिक बहुजन मित्र वृत्तपत्र

संस्थापक : बहुजन राष्ट्रशक्ति सामाजिक संघटना महाराष्ट्र राज्य

टीप : जे दिसेलजे पाहिले तेच लिहिले हेच वृत्तपत्राचे ध्येय उद्दीष्ट आहे.

Comments

Popular posts from this blog

नातेपुते पोलीस ठाणेकडील गुन्हे प्रकटीकरण शाखेची आदर्श कामगिरी चंदन चोरी करणा-या आरोपीस २४ तासात केले जेरबंद

  उपसंपादक: वैभव आठवले साप्ताहिक बहुजन भूषण वृत्तपत्र नातेपुते पोलिस स्टेशन यांचेकडून मिळालेल्या माहितीनुसार      नातेपुते पोलीस ठाणे हददीमध्ये मौजे मांडवे, ता.माळशिरस येथे राजन सुकुमार दोशी यांचे शेतातील दिनांक २६/०६/२०२५ रोजी सकाळी ०८/०० वा ते सायंकाळी ०५/००वा. चे दरम्यान शेतातील बांधावरील १० वर्षे वयाची ०२ चंदनाची झाडे अंदाजे किंमत २७,०००/- रू चे कोणीतरी अज्ञात चोरटयाने चोरून नेली आहेत त्याबाबत फिर्यादी नामे राजन सुकुमार दोशी रा.नातेपुते, ता.माळशिरस, जि.सोलापुर यांचे फिर्यादीवरुन नातेपुते पोलीस ठाणेस गु.र.नं. २३७/२०२५ भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ३०३ (२) प्रमाणे दिनांक २६/०६/२०२५ रोजी गुन्हा दाखल झाला होता. सदर गुन्हयाचा तपास पोहेकॉ/१७०८ विकास बाबर हे करीत होते.      नातेपुते पोलीस ठाणेचे गुन्हे प्रकटीकरण शाखेचे अंमलदार यांनी सदर गुन्हयाचा तपास दरम्यान मिळालेल्या गोपनिय बातमीव्दारे माहीती काढून इसम नामे १) गोविंद दुर्याधन काळे २) मेघराज ज्ञानदेव भोसले दोघे रा माळशिरस यांनी गुन्हा केल्याचे निष्पन्न झाल्याने त्यास पोहकॉ/१७०८ बाबर व गुन्हे प्रकटीक...

नातेपुते पोलीस ठाणेकडून जबरी चोरी करणा-या आरोपीस २४ तासाच्या आत केले जेरबंद

उपसंपादक: वैभव आठवले (साप्ताहिक बहुजन भूषण वृत्तपत्र) नातेपुते पोलीस ठाणे यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार      नातेपुते पोलीस ठाणे हददीमध्ये मौजे नातेपुते, ता.माळशिरस येथे दिनांक ०३/०४/२०२५ रोजी सायकाळी ०७.३० वा सुमारास गुन्ह्यातील फिर्यादी नामे वैभव विठ्ठल नष्टे वय ३१ वर्षे, रा. माळशिरस ता. माळशिरस जि. सोलापुर व सोबत त्यांची आई माया नष्टे असे त्यांचेकडील स्कुटी गाडी क्र. एम.एच. ४५ ए.व्ही. १२६१ यावरुन नातेपुते परिसरात शिंगणापुर पाटी ते बायपास रोड मार्गे नातेपुते फडतरी जाणारे बायपास रोडवर आले असताना दोन अज्ञात इसमांनी त्यांचे पाठीमागुन येऊन फिर्यादीचे आई माया विठल नष्टे याचे गळयातील सोन्याचे दागीने बळजबरीने काढुन घेऊन मोटार सायकल वरुन पळुन गेल्याने त्याबाबत फिर्यादी नामे वैभव विठ्ठल नष्टे वय ३१ वर्षे रा. माळशिरस ता. माळशिरस जि. सोलापुर यांचे फिर्यादीवरुन नातेपुते पोलीस ठाणेस गुरनं १३३/२०२५ भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ३०९ (४), ३ (५) प्रमाणे दिनांक ०८/०४/२०२५ रोजी १८ वा ३९ मि. गुन्हा दाखल झाला होता. सदर गुन्हयाचा तपास गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोना/५६२ राकेश लोहार करीत ...

अतुल कुलकर्णी साहेब पोलीस अधीक्षक, सोलापूर ग्रामीण यांच्या संकल्पनेतून धर्मतुरी, ता.माळशिरस रोडलगत वृक्षारोपण

  उपसंपादक: वैभव आठवले साप्ताहिक बहुजन भूषण वृत्तपत्र नातेपुते पोलिस स्टेशन यांचेकडून मिळालेल्या माहितीनुसार       दिनांक 26/06/2025 रोजी मा. श्री. अतुल कुलकर्णी साहेब पोलीस अधीक्षक ,सोलापूर ग्रामीण यांच्या संकल्पनेतून  व मा. उपविभागीय पोलीस अधिकारी श्री नारायण शिरगावकर उपविभाग माळशिरस यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू करण्यात आलेल्या हरित वारी सन 2025 उपक्रमांतर्गत  नातेपुते पोलीस  ठाणे हद्दीतील  मौजे धर्मपुरी येथे  पालखी मार्गवर हरितवारी अनुषंगाने, माननीय पोलीस अधीक्षक श्री अतुल कुलकर्णी साहेब, यांच्या हस्ते रोडलगत वृक्षारोपण करण्यात आले.       सदर ठिकाणी वृक्षारोपण करिता गावातील सरपंच,शेतकरी व गावातील प्रतिष्ठित नागरिक तसेच  पोलीस पाटील, पोलीस मित्र, ग्राम सुरक्षा दल यांच्या उपस्थितीत हरित वारी उपक्रम संपन्न झाला आहे. बातमी अधिक जाहिरातीसाठी संपर्क संपादक : मा.श्री. डॉ. अभिमन्यु बी. आठवले ९४२०३०२५६१ उपसंपादक : वैभव अ. आठवले साप्ताहिक बहुजन भूषण ,  साप्ताहिक बहुजन मित्र वृत्तपत्र संस्थापक :  बहुजन राष्ट्रशक्ति साम...