Skip to main content

नातेपुते पोलिसांची वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर धडक कारवाई

पत्रकारितेवरती विश्लेषण

 

संपादक : साप्ताहिक बहुजन भूषण

          सध्याच्या काळात पत्रकारिता म्हणजे “नाव मोठे आणि लक्षण खोटे असे झाले आहे.” सध्याच्या काळात पोटजातीमध्ये मोडणारे पत्रकार भरपूर झालेले आहेत त्यामध्ये भटके, भामटे, तोतीया, ब्लॅकमेल करणारे, स्वत:ला अतिशहाणे समजणारे असे पत्रकार मी संपादक म्हणून पाहत आहे. त्याने “पत्रकार होण्याऐवजी त्यांनी पात्रकार व्हावे” असे आचार्य अत्रे यांनी म्हटले आहे. परंतु आजच्या काळात अर्ध्या हळकुंडाने पिवळे झालेले पत्रकार पाहत आहे व तेच इतरांना कमी लेखत आहेत. पत्रकारितेचा धंदा मांडला आहे, पत्रकारितेच्या नावावर दुकानदारी सुरू केलेली आहे. जो पत्रकार सत्य वागतो, सत्य लिहतो त्याच्या विरुद्ध षडयंत्र केले जात आहे. दुकानदारी करणारे एकत्र येत असतात आणि सत्यवादी पत्रकाराविरुद्ध मोहीम उघडतात. दोन नंबर धंदे वाल्यास हाताशी धरून खोटे गुन्हे दाखल केले जातात अशा पत्रकारांचे जागोजागी पीक वाढले आहे, बिन कामाचे तन वाढले आहे. ज्याला चार ओळीची बातमी नीट लिहता येत नाही. ते स्वत:ला पत्रकार म्हणून मिरवत आहेत. अशा पत्रकारांना जनतेने खडयाप्रमाणे बाजूला ठेवले पाहिजे. जे सत्य लिहतात, अन्याय-अत्याचाराला वाचा फोडतात त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले पाहिजे. सध्या असंख्य पत्रकार गळ्यात प्रेस कार्ड अडकावून फिरत असतात त्यामुळे पत्रकार होत नसतो. माध्यम कोणतेही असो त्यामध्ये अभ्यासूपणा महत्वाचा असावा लागतो तर काही पत्रकार घमेंडीत वागत आहेत. आमचे दैनिक, पाक्षिक, साप्ताहिक, मोठे पेपर आहेत. तसेच मोठे चॅनेल हातात असले म्हणजे तो रेपोर्टर मोठा होत नाही त्यामध्ये आपण किती मोठे आहोत हे महत्वाचे आहे. कोणत्या पत्रकारांनी किती बातम्यांना न्याय दिला, कोणत्या बातम्यांचा पाठपुरावा केला यावरती पत्रकारांचे मूल्यमापन ठरते. केवळ पत्रकारितेचा जॉब करणे म्हणजे पत्रकारिता नाही, त्याला हाडाचा पत्रकार व्हावे लागते. जनावराचे हाडे खाऊन कोणी हाडाचा पत्रकार होत नाही. तसेच कोणी वाघाचे कातडे पांघरून कोणी वाघ होत नाही. तसेच गळ्यात प्रेस कार्ड अडकावून कोणी पत्रकार होत नसतो किंवा गाडीवर कोणी प्रेस लिहतो म्हणून तो पत्रकार होत नसतो. परंतु हृदयात प्रेस आहे का याचे आत्मपरीक्षण करावे. सध्याच्या काळात पत्रकारिता म्हणजे पैसे कमविणे असे झाले आहे. सध्याच्या काळात मोजक्या पत्रकारांनी धुमाकूळ घातला आहे ते जुन्या पत्रकारांना कमी लेखत आहेत व एकमेकांविषयी तिरस्कार निर्माण करीत आहेत. काही पत्रकार दहशत पसरवून, ब्लॅकमेल करून, सक्ती करून पैसे कमाविण्यासाठी पत्रकारिता करीत आहेत. जनतेने अशा पत्रकारांना चोप दिला पाहिजे. त्यांच्यावरती खंडणीचे गुन्हे दाखल केले गेले पाहिजे. अशा प्रवृत्तीच्या पत्रकारांनी पत्रकारितेची वाट लावली आहे. तसेच कोणत्याही विभागातील अधिकारी, कर्मचारी यांनी न भीता कोणी त्रास देत असेल, छळ करीत असेल, दमदाटी करीत असेल असा कोण पत्रकार असेल तर त्याचा माज जिरवला पाहिजे. सध्याच्या काळात पत्रकारिता म्हणजे धुणे झाले आहे. पत्रकार म्हणजे जनतेचा खरा लोकसेवक असतो. पत्रकारिता हे कर्तव्य म्हणून केले गेले पाहिजे व चांगला पत्रकार म्हणून नाव कमविले पाहिजे तरच पत्रकाराला जनमाणसात किंमत आहे त्यामुळे पत्रकारिता करीत असताना सत्यघटनेवरती  करावी, कोणालाही मानसिक त्रास होणार नाही याची दक्षता घ्यावी.

जनहितार्थ

अधिक जाहिरातीसाठी संपर्क

संपादक : मा.श्री. डॉ. अभिमन्यु बी. आठवले

९४२०३०२५६१

उपसंपादक : वैभव अ. आठवले

साप्ताहिक बहुजन भूषण, साप्ताहिक बहुजन मित्र वृत्तपत्र

संस्थापक : बहुजन राष्ट्रशक्ति सामाजिक संघटना महाराष्ट्र राज्य

टीप : जे दिसेल, जे पाहिले तेच लिहिले हेच वृत्तपत्राचे ध्येय उद्दीष्ट आहे.

 

Comments