Skip to main content

“रोडपती” असणारे व्यक्ति खासदार आमदार झाल्यानंतर पाच वर्षात “करोडपती” कसे होतात याची चौकशी केली गेली पाहिजे : मा.श्री.डॉ.अभिमन्यु बी.आठवले

 

मा.श्री. डॉ. अभिमन्यु बी.आठवले
संस्थापक बहुजन राष्ट्रशक्ति सामाजिक संघटना महाराष्ट्र राज्य 

उपसंपादक : साप्ताहिक बहुजन भूषण वृत्तपत्र

          लोकसभा, विधानसभा जिंकून ज्या व्यक्ति खासदार आमदार निवडून जातात. निवडणुकीवेळी जे मालमत्तेचे विवरण पत्र भरून दिलेले असते. परंतु ५ वर्षात त्या मालमत्तेमध्ये कितीतरी पटीने त्या मालमत्तेत वाढ होऊन रोडपती असणारे खासदार आमदार करोडपती होतात, एवढी मालमत्ता पाच वर्षात कशी काय त्यांच्याकडे येते? सोने, चांदी, महागड्या गाड्या, जागा इ. संपत्ती येते. खासदार, आमदार झाल्यानंतर संपत्ती भूगर्भातून त्यांचाकडे येते काय? लक्ष्मी प्रसन्न होते काय? अशा खासदार, आमदाराची चौकशी होणे गरजेचे आहे. लोकसेवकच शासकीय निधीत जनतेचा असलेला पैसा यावरती डल्ला मारत असतील तर यांना लोकसेवक म्हणायचे की चोर हा प्रश्न आहे. सरकारी अधिकारी कर्मचारी यांना ५८ वर्षे नोकरी करून ना घर, ना जमीन, ना पैसे, ना सोने चांदी, ना आलीशान गाड्या, ना बंगले ही परिस्थिती आहे. आणि पाच वर्षात खासदार, आमदार प्रचंड संपत्तीचे वारसदार, हक्कदार होतात हा चमत्कार आहे मग भ्रष्टाचारी करणारे कोण? यांची चौकशी कोणता विभाग करणार? यासाठी शासकीय कमिटी असते का? यासाठी प्रश्न उभे राहतात. सध्या मतदार संघात विकास कामासाठी खासदार, आमदार निधीतून करोड रूपयांचा निधि यांच्यानावाने वाटप होतो. मग विकास कामे या निधीतून होतात का? या निधीतून टक्केवारीत अधिकारी, कर्मचारी, खासदार, आमदार साखळी पद्धतीने कागदोपत्री घोडे नाचवून निधि “आपण सगळे भाऊ भाऊ शासकीय निधि वाटून खाऊ तसेच वाट लाऊ” असेच दिसत आहे. खासदार, आमदार यांना पेंशन, मानपान, शासनाच्या सोयीसुविधा, अंगरक्षक म्हणून पोलिस संरक्षण असे असते. “खासदार, आमदारासाठी भगदाड मोकळे आणि मोरीला बोळा” असे चित्र दिसत आहे. सध्या नवीन आमदार करोडो रुपयांचे बंगले बांधून आलीशान गाडीत फिरत आहेत. निवडून जाणारे खासदार, आमदार जोमात आणि मतदार मात्र कोमात असे दिसत आहे. “खा गड्या खा खुशाल खा मिळाली संधी तोवर खा” असेच जनतेने म्हणत बसावे या पलीकडे जनतेच्या हातात काही नाही. खासदार, आमदार झाल्यानंतर प्रत्येक वर्षी त्यांच्या वाढीव मालमत्तेचे विवरण पत्र भरून घेतले पाहिजे तसेच सध्या कोणताही आमदार तालुक्यात आम सभा घेताना दिसत नाही ही शोकांतिका आहे असे बहुजन राष्ट्रशक्ती सामाजिक संघटनेचे संस्थापक अभिमन्यु आठवले यांनी प्रसिद्धीद्वारे केले आहे.

बातमी

अधिक जाहिरातीसाठी संपर्क

संपादक : मा.श्री. डॉ. अभिमन्यु बी. आठवले

९४२०३०२५६१

उपसंपादक : वैभव अ. आठवले

साप्ताहिक बहुजन भूषण, साप्ताहिक बहुजन मित्र वृत्तपत्र

संस्थापक : बहुजन राष्ट्रशक्ति सामाजिक संघटना महाराष्ट्र राज्य

टीप : जे दिसेल, जे पाहिले तेच लिहिले हेच वृत्तपत्राचे ध्येय उद्दीष्ट आहे.

 

    

         

Comments

Popular posts from this blog

नातेपुते पोलीस ठाणेकडील गुन्हे प्रकटीकरण शाखेची आदर्श कामगिरी चंदन चोरी करणा-या आरोपीस २४ तासात केले जेरबंद

  उपसंपादक: वैभव आठवले साप्ताहिक बहुजन भूषण वृत्तपत्र नातेपुते पोलिस स्टेशन यांचेकडून मिळालेल्या माहितीनुसार      नातेपुते पोलीस ठाणे हददीमध्ये मौजे मांडवे, ता.माळशिरस येथे राजन सुकुमार दोशी यांचे शेतातील दिनांक २६/०६/२०२५ रोजी सकाळी ०८/०० वा ते सायंकाळी ०५/००वा. चे दरम्यान शेतातील बांधावरील १० वर्षे वयाची ०२ चंदनाची झाडे अंदाजे किंमत २७,०००/- रू चे कोणीतरी अज्ञात चोरटयाने चोरून नेली आहेत त्याबाबत फिर्यादी नामे राजन सुकुमार दोशी रा.नातेपुते, ता.माळशिरस, जि.सोलापुर यांचे फिर्यादीवरुन नातेपुते पोलीस ठाणेस गु.र.नं. २३७/२०२५ भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ३०३ (२) प्रमाणे दिनांक २६/०६/२०२५ रोजी गुन्हा दाखल झाला होता. सदर गुन्हयाचा तपास पोहेकॉ/१७०८ विकास बाबर हे करीत होते.      नातेपुते पोलीस ठाणेचे गुन्हे प्रकटीकरण शाखेचे अंमलदार यांनी सदर गुन्हयाचा तपास दरम्यान मिळालेल्या गोपनिय बातमीव्दारे माहीती काढून इसम नामे १) गोविंद दुर्याधन काळे २) मेघराज ज्ञानदेव भोसले दोघे रा माळशिरस यांनी गुन्हा केल्याचे निष्पन्न झाल्याने त्यास पोहकॉ/१७०८ बाबर व गुन्हे प्रकटीक...

नातेपुते पोलीस ठाणेकडून जबरी चोरी करणा-या आरोपीस २४ तासाच्या आत केले जेरबंद

उपसंपादक: वैभव आठवले (साप्ताहिक बहुजन भूषण वृत्तपत्र) नातेपुते पोलीस ठाणे यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार      नातेपुते पोलीस ठाणे हददीमध्ये मौजे नातेपुते, ता.माळशिरस येथे दिनांक ०३/०४/२०२५ रोजी सायकाळी ०७.३० वा सुमारास गुन्ह्यातील फिर्यादी नामे वैभव विठ्ठल नष्टे वय ३१ वर्षे, रा. माळशिरस ता. माळशिरस जि. सोलापुर व सोबत त्यांची आई माया नष्टे असे त्यांचेकडील स्कुटी गाडी क्र. एम.एच. ४५ ए.व्ही. १२६१ यावरुन नातेपुते परिसरात शिंगणापुर पाटी ते बायपास रोड मार्गे नातेपुते फडतरी जाणारे बायपास रोडवर आले असताना दोन अज्ञात इसमांनी त्यांचे पाठीमागुन येऊन फिर्यादीचे आई माया विठल नष्टे याचे गळयातील सोन्याचे दागीने बळजबरीने काढुन घेऊन मोटार सायकल वरुन पळुन गेल्याने त्याबाबत फिर्यादी नामे वैभव विठ्ठल नष्टे वय ३१ वर्षे रा. माळशिरस ता. माळशिरस जि. सोलापुर यांचे फिर्यादीवरुन नातेपुते पोलीस ठाणेस गुरनं १३३/२०२५ भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ३०९ (४), ३ (५) प्रमाणे दिनांक ०८/०४/२०२५ रोजी १८ वा ३९ मि. गुन्हा दाखल झाला होता. सदर गुन्हयाचा तपास गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोना/५६२ राकेश लोहार करीत ...

अतुल कुलकर्णी साहेब पोलीस अधीक्षक, सोलापूर ग्रामीण यांच्या संकल्पनेतून धर्मतुरी, ता.माळशिरस रोडलगत वृक्षारोपण

  उपसंपादक: वैभव आठवले साप्ताहिक बहुजन भूषण वृत्तपत्र नातेपुते पोलिस स्टेशन यांचेकडून मिळालेल्या माहितीनुसार       दिनांक 26/06/2025 रोजी मा. श्री. अतुल कुलकर्णी साहेब पोलीस अधीक्षक ,सोलापूर ग्रामीण यांच्या संकल्पनेतून  व मा. उपविभागीय पोलीस अधिकारी श्री नारायण शिरगावकर उपविभाग माळशिरस यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू करण्यात आलेल्या हरित वारी सन 2025 उपक्रमांतर्गत  नातेपुते पोलीस  ठाणे हद्दीतील  मौजे धर्मपुरी येथे  पालखी मार्गवर हरितवारी अनुषंगाने, माननीय पोलीस अधीक्षक श्री अतुल कुलकर्णी साहेब, यांच्या हस्ते रोडलगत वृक्षारोपण करण्यात आले.       सदर ठिकाणी वृक्षारोपण करिता गावातील सरपंच,शेतकरी व गावातील प्रतिष्ठित नागरिक तसेच  पोलीस पाटील, पोलीस मित्र, ग्राम सुरक्षा दल यांच्या उपस्थितीत हरित वारी उपक्रम संपन्न झाला आहे. बातमी अधिक जाहिरातीसाठी संपर्क संपादक : मा.श्री. डॉ. अभिमन्यु बी. आठवले ९४२०३०२५६१ उपसंपादक : वैभव अ. आठवले साप्ताहिक बहुजन भूषण ,  साप्ताहिक बहुजन मित्र वृत्तपत्र संस्थापक :  बहुजन राष्ट्रशक्ति साम...