“रोडपती” असणारे व्यक्ति खासदार आमदार झाल्यानंतर पाच वर्षात “करोडपती” कसे होतात याची चौकशी केली गेली पाहिजे : मा.श्री.डॉ.अभिमन्यु बी.आठवले
![]() |
| मा.श्री. डॉ. अभिमन्यु बी.आठवले संस्थापक बहुजन राष्ट्रशक्ति सामाजिक संघटना महाराष्ट्र राज्य |
उपसंपादक : साप्ताहिक बहुजन भूषण वृत्तपत्र
लोकसभा, विधानसभा जिंकून ज्या व्यक्ति खासदार आमदार निवडून जातात. निवडणुकीवेळी जे मालमत्तेचे विवरण पत्र भरून दिलेले असते. परंतु ५ वर्षात त्या मालमत्तेमध्ये कितीतरी पटीने त्या मालमत्तेत वाढ होऊन रोडपती असणारे खासदार आमदार करोडपती होतात, एवढी मालमत्ता पाच वर्षात कशी काय त्यांच्याकडे येते? सोने, चांदी, महागड्या गाड्या, जागा इ. संपत्ती येते. खासदार, आमदार झाल्यानंतर संपत्ती भूगर्भातून त्यांचाकडे येते काय? लक्ष्मी प्रसन्न होते काय? अशा खासदार, आमदाराची चौकशी होणे गरजेचे आहे. लोकसेवकच शासकीय निधीत जनतेचा असलेला पैसा यावरती डल्ला मारत असतील तर यांना लोकसेवक म्हणायचे की चोर हा प्रश्न आहे. सरकारी अधिकारी कर्मचारी यांना ५८ वर्षे नोकरी करून ना घर, ना जमीन, ना पैसे, ना सोने चांदी, ना आलीशान गाड्या, ना बंगले ही परिस्थिती आहे. आणि पाच वर्षात खासदार, आमदार प्रचंड संपत्तीचे वारसदार, हक्कदार होतात हा चमत्कार आहे मग भ्रष्टाचारी करणारे कोण? यांची चौकशी कोणता विभाग करणार? यासाठी शासकीय कमिटी असते का? यासाठी प्रश्न उभे राहतात. सध्या मतदार संघात विकास कामासाठी खासदार, आमदार निधीतून करोड रूपयांचा निधि यांच्यानावाने वाटप होतो. मग विकास कामे या निधीतून होतात का? या निधीतून टक्केवारीत अधिकारी, कर्मचारी, खासदार, आमदार साखळी पद्धतीने कागदोपत्री घोडे नाचवून निधि “आपण सगळे भाऊ भाऊ शासकीय निधि वाटून खाऊ तसेच वाट लाऊ” असेच दिसत आहे. खासदार, आमदार यांना पेंशन, मानपान, शासनाच्या सोयीसुविधा, अंगरक्षक म्हणून पोलिस संरक्षण असे असते. “खासदार, आमदारासाठी भगदाड मोकळे आणि मोरीला बोळा” असे चित्र दिसत आहे. सध्या नवीन आमदार करोडो रुपयांचे बंगले बांधून आलीशान गाडीत फिरत आहेत. निवडून जाणारे खासदार, आमदार जोमात आणि मतदार मात्र कोमात असे दिसत आहे. “खा गड्या खा खुशाल खा मिळाली संधी तोवर खा” असेच जनतेने म्हणत बसावे या पलीकडे जनतेच्या हातात काही नाही. खासदार, आमदार झाल्यानंतर प्रत्येक वर्षी त्यांच्या वाढीव मालमत्तेचे विवरण पत्र भरून घेतले पाहिजे तसेच सध्या कोणताही आमदार तालुक्यात आम सभा घेताना दिसत नाही ही शोकांतिका आहे असे बहुजन राष्ट्रशक्ती सामाजिक संघटनेचे संस्थापक अभिमन्यु आठवले यांनी प्रसिद्धीद्वारे केले आहे.
बातमी
अधिक जाहिरातीसाठी संपर्क
संपादक :
मा.श्री. डॉ. अभिमन्यु बी. आठवले
९४२०३०२५६१
उपसंपादक
: वैभव अ. आठवले
साप्ताहिक
बहुजन भूषण, साप्ताहिक बहुजन मित्र वृत्तपत्र
संस्थापक
: बहुजन राष्ट्रशक्ति सामाजिक संघटना महाराष्ट्र राज्य
टीप : जे
दिसेल, जे पाहिले तेच
लिहिले हेच वृत्तपत्राचे ध्येय उद्दीष्ट आहे.

Comments
Post a Comment