Skip to main content

महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी संघटना कर्मचारी प्रलंबित मागण्यांबाबत मा.ना.जयकुमार गोरे साहेब ग्रामविकास व पंचायतराज मंत्री तथा पालकमंत्री सोलापूर जिल्हा यांना वाखरी, ता.पंढरपूर, जि. सोलापूर येथे निवेदन

संपादक (बहुजन भूषण वृत्तपत्र) 

     राज्यात २७ हजार १२० ग्रामपंचायतीमध्ये लिपीक, पाणी पुरवठा, दिवाबत्ती कर्मचारी, शिपाई सफाई कामगार अशा विविध पदावर अतिशय कमी वेतनात काम करीत आहेत. 

     हे कर्मचारी गावातील नागरीकांना लोकोपयोगी सेवा निरंतर पुरविण्याचे काम करीत असलेल्या ६० हजार ग्रामपंचायत कर्मचा-यांचे विविध प्रश्न व मागण्या अनेक वर्षापासुन प्रलंबीत आहेत.

     ग्रामपंचायत कर्मचा-यांना उद‌योग उर्जा व कामगार विभागाने निश्चीत केलेले १४१२५/- ते ११६२५/- रुपये सुधारीत किमान वेतन दर लागु असुन शासनाकडून वसुलीच्या प्रमाणात सदर कर्मचा-यांचा किमान वेतनावरील खर्च भागविण्यासाठी ग्रामपंचायतीचे उत्पन्न व लोकसंख्या व परीमंडळ निहाय कुशल अर्धकुशल व अकुशल या वर्गवारीनुसार शासनाकडुन ५०, ७५ व १०० टक्के वेतन ग्रामपंचायत कर्मचा-यांना मिळत आहे. उर्वरीत ५० व २५ टक्के वेतन ग्रामपंचायतीने अदा करायचे असुन सदर वेतन ग्रामपंचायतीकडुन वसुली नसल्याचे कारण सांगितले जाते. 

     या किमान वेतनाव्यतिरीक्त रहाणीमान भत्ता विशेष भत्ता अदा करणे ग्रामपंचायतीला बंधनकारक आहे परंतु सद्यस्थीतीत जुलै २०२४ पासून सदर कर्मचा-यांचे वेतन ऑफलाईन पध्दतीने मिळत असल्याने सदर वेतन कर्मचा-यांना वेळेत मिळत नाही. 

     त्यामुळे ग्रामपंचायत कर्मचा-यांमध्ये प्रचंड नाराजी पसरली आहे असे अनेक प्रश्न व प्रलंबीत मागण्या खालील प्रमाणे आहेत.

१) ग्रामपंचायत कर्मचा-यांना नगरपरीषद, जिल्हापरीषद कर्मचा-याप्रमाणे वेतनश्रेणी लागू करावी.

२) मुंबई ग्रामपंचायत अधिनियम १९५८ मधील कलम ६१ वगळण्यात यावे.

३) ग्रामपंचायत कर्मचा-यांना उपदान, व निवृत्ती वेतन लागू करण्यात यावे.

४) ग्रामपंचायत कर्मचा-यांच्या वेतनासाठी लावण्यात आलेली जाचक वसुलीची अट रद्द करुन सरसकट १००% वेतन मिळावे.

५) ग्रामपंचायत कर्मचा-यांची प्रा. फंडाची रक्कम भविष्य निर्वाह निधी संघटन ईपीएफ कार्यालयाकडे वर्ग करण्यात यावी.

६) ग्रामपंचायत कर्मचा-यांचा आकृतीबंध सुधारीत करावा.

७) ग्रामपंचायत कर्मचारी नोकर भरती १०% आरक्षणानुसार अनुकंपा भरतीच्या धर्तीवर करण्यात यावी.

अशा प्रकारच्या मागणीचे पत्र  मा. ना.जयकुमार भाऊ गोरे, ग्रामविकास व पंचायतराज मंत्री महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री सोलापूर जिल्हा यांना देण्यात आले.

बातमी

अधिक जाहिरातीसाठी संपर्क

संपादक : मा.श्री. डॉ. अभिमन्यु बी. आठवले

९४२०३०२५६१

उपसंपादक : वैभव अ. आठवले

साप्ताहिक बहुजन भूषणसाप्ताहिक बहुजन मित्र वृत्तपत्र

संस्थापक : बहुजन राष्ट्रशक्ति सामाजिक संघटना महाराष्ट्र राज्य

टीप : जे दिसलेजे पाहिले तेच लिहिले हेच वृत्तपत्राचे ध्येय उद्दीष्ट आहे.

Comments

Popular posts from this blog

नातेपुते पोलीस ठाणेकडील गुन्हे प्रकटीकरण शाखेची आदर्श कामगिरी चंदन चोरी करणा-या आरोपीस २४ तासात केले जेरबंद

  उपसंपादक: वैभव आठवले साप्ताहिक बहुजन भूषण वृत्तपत्र नातेपुते पोलिस स्टेशन यांचेकडून मिळालेल्या माहितीनुसार      नातेपुते पोलीस ठाणे हददीमध्ये मौजे मांडवे, ता.माळशिरस येथे राजन सुकुमार दोशी यांचे शेतातील दिनांक २६/०६/२०२५ रोजी सकाळी ०८/०० वा ते सायंकाळी ०५/००वा. चे दरम्यान शेतातील बांधावरील १० वर्षे वयाची ०२ चंदनाची झाडे अंदाजे किंमत २७,०००/- रू चे कोणीतरी अज्ञात चोरटयाने चोरून नेली आहेत त्याबाबत फिर्यादी नामे राजन सुकुमार दोशी रा.नातेपुते, ता.माळशिरस, जि.सोलापुर यांचे फिर्यादीवरुन नातेपुते पोलीस ठाणेस गु.र.नं. २३७/२०२५ भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ३०३ (२) प्रमाणे दिनांक २६/०६/२०२५ रोजी गुन्हा दाखल झाला होता. सदर गुन्हयाचा तपास पोहेकॉ/१७०८ विकास बाबर हे करीत होते.      नातेपुते पोलीस ठाणेचे गुन्हे प्रकटीकरण शाखेचे अंमलदार यांनी सदर गुन्हयाचा तपास दरम्यान मिळालेल्या गोपनिय बातमीव्दारे माहीती काढून इसम नामे १) गोविंद दुर्याधन काळे २) मेघराज ज्ञानदेव भोसले दोघे रा माळशिरस यांनी गुन्हा केल्याचे निष्पन्न झाल्याने त्यास पोहकॉ/१७०८ बाबर व गुन्हे प्रकटीक...

नातेपुते पोलीस ठाणेकडून जबरी चोरी करणा-या आरोपीस २४ तासाच्या आत केले जेरबंद

उपसंपादक: वैभव आठवले (साप्ताहिक बहुजन भूषण वृत्तपत्र) नातेपुते पोलीस ठाणे यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार      नातेपुते पोलीस ठाणे हददीमध्ये मौजे नातेपुते, ता.माळशिरस येथे दिनांक ०३/०४/२०२५ रोजी सायकाळी ०७.३० वा सुमारास गुन्ह्यातील फिर्यादी नामे वैभव विठ्ठल नष्टे वय ३१ वर्षे, रा. माळशिरस ता. माळशिरस जि. सोलापुर व सोबत त्यांची आई माया नष्टे असे त्यांचेकडील स्कुटी गाडी क्र. एम.एच. ४५ ए.व्ही. १२६१ यावरुन नातेपुते परिसरात शिंगणापुर पाटी ते बायपास रोड मार्गे नातेपुते फडतरी जाणारे बायपास रोडवर आले असताना दोन अज्ञात इसमांनी त्यांचे पाठीमागुन येऊन फिर्यादीचे आई माया विठल नष्टे याचे गळयातील सोन्याचे दागीने बळजबरीने काढुन घेऊन मोटार सायकल वरुन पळुन गेल्याने त्याबाबत फिर्यादी नामे वैभव विठ्ठल नष्टे वय ३१ वर्षे रा. माळशिरस ता. माळशिरस जि. सोलापुर यांचे फिर्यादीवरुन नातेपुते पोलीस ठाणेस गुरनं १३३/२०२५ भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ३०९ (४), ३ (५) प्रमाणे दिनांक ०८/०४/२०२५ रोजी १८ वा ३९ मि. गुन्हा दाखल झाला होता. सदर गुन्हयाचा तपास गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोना/५६२ राकेश लोहार करीत ...

अतुल कुलकर्णी साहेब पोलीस अधीक्षक, सोलापूर ग्रामीण यांच्या संकल्पनेतून धर्मतुरी, ता.माळशिरस रोडलगत वृक्षारोपण

  उपसंपादक: वैभव आठवले साप्ताहिक बहुजन भूषण वृत्तपत्र नातेपुते पोलिस स्टेशन यांचेकडून मिळालेल्या माहितीनुसार       दिनांक 26/06/2025 रोजी मा. श्री. अतुल कुलकर्णी साहेब पोलीस अधीक्षक ,सोलापूर ग्रामीण यांच्या संकल्पनेतून  व मा. उपविभागीय पोलीस अधिकारी श्री नारायण शिरगावकर उपविभाग माळशिरस यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू करण्यात आलेल्या हरित वारी सन 2025 उपक्रमांतर्गत  नातेपुते पोलीस  ठाणे हद्दीतील  मौजे धर्मपुरी येथे  पालखी मार्गवर हरितवारी अनुषंगाने, माननीय पोलीस अधीक्षक श्री अतुल कुलकर्णी साहेब, यांच्या हस्ते रोडलगत वृक्षारोपण करण्यात आले.       सदर ठिकाणी वृक्षारोपण करिता गावातील सरपंच,शेतकरी व गावातील प्रतिष्ठित नागरिक तसेच  पोलीस पाटील, पोलीस मित्र, ग्राम सुरक्षा दल यांच्या उपस्थितीत हरित वारी उपक्रम संपन्न झाला आहे. बातमी अधिक जाहिरातीसाठी संपर्क संपादक : मा.श्री. डॉ. अभिमन्यु बी. आठवले ९४२०३०२५६१ उपसंपादक : वैभव अ. आठवले साप्ताहिक बहुजन भूषण ,  साप्ताहिक बहुजन मित्र वृत्तपत्र संस्थापक :  बहुजन राष्ट्रशक्ति साम...