महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी संघटना कर्मचारी प्रलंबित मागण्यांबाबत मा.ना.जयकुमार गोरे साहेब ग्रामविकास व पंचायतराज मंत्री तथा पालकमंत्री सोलापूर जिल्हा यांना वाखरी, ता.पंढरपूर, जि. सोलापूर येथे निवेदन
संपादक (बहुजन भूषण वृत्तपत्र)
राज्यात २७ हजार १२० ग्रामपंचायतीमध्ये लिपीक, पाणी पुरवठा, दिवाबत्ती कर्मचारी, शिपाई सफाई कामगार अशा विविध पदावर अतिशय कमी वेतनात काम करीत आहेत.
हे कर्मचारी गावातील नागरीकांना लोकोपयोगी सेवा निरंतर पुरविण्याचे काम करीत असलेल्या ६० हजार ग्रामपंचायत कर्मचा-यांचे विविध प्रश्न व मागण्या अनेक वर्षापासुन प्रलंबीत आहेत.
ग्रामपंचायत कर्मचा-यांना उदयोग उर्जा व कामगार विभागाने निश्चीत केलेले १४१२५/- ते ११६२५/- रुपये सुधारीत किमान वेतन दर लागु असुन शासनाकडून वसुलीच्या प्रमाणात सदर कर्मचा-यांचा किमान वेतनावरील खर्च भागविण्यासाठी ग्रामपंचायतीचे उत्पन्न व लोकसंख्या व परीमंडळ निहाय कुशल अर्धकुशल व अकुशल या वर्गवारीनुसार शासनाकडुन ५०, ७५ व १०० टक्के वेतन ग्रामपंचायत कर्मचा-यांना मिळत आहे. उर्वरीत ५० व २५ टक्के वेतन ग्रामपंचायतीने अदा करायचे असुन सदर वेतन ग्रामपंचायतीकडुन वसुली नसल्याचे कारण सांगितले जाते.
या किमान वेतनाव्यतिरीक्त रहाणीमान भत्ता विशेष भत्ता अदा करणे ग्रामपंचायतीला बंधनकारक आहे परंतु सद्यस्थीतीत जुलै २०२४ पासून सदर कर्मचा-यांचे वेतन ऑफलाईन पध्दतीने मिळत असल्याने सदर वेतन कर्मचा-यांना वेळेत मिळत नाही.
त्यामुळे ग्रामपंचायत कर्मचा-यांमध्ये प्रचंड नाराजी पसरली आहे असे अनेक प्रश्न व प्रलंबीत मागण्या खालील प्रमाणे आहेत.
१) ग्रामपंचायत कर्मचा-यांना नगरपरीषद, जिल्हापरीषद कर्मचा-याप्रमाणे वेतनश्रेणी लागू करावी.
२) मुंबई ग्रामपंचायत अधिनियम १९५८ मधील कलम ६१ वगळण्यात यावे.
३) ग्रामपंचायत कर्मचा-यांना उपदान, व निवृत्ती वेतन लागू करण्यात यावे.
४) ग्रामपंचायत कर्मचा-यांच्या वेतनासाठी लावण्यात आलेली जाचक वसुलीची अट रद्द करुन सरसकट १००% वेतन मिळावे.
५) ग्रामपंचायत कर्मचा-यांची प्रा. फंडाची रक्कम भविष्य निर्वाह निधी संघटन ईपीएफ कार्यालयाकडे वर्ग करण्यात यावी.
६) ग्रामपंचायत कर्मचा-यांचा आकृतीबंध सुधारीत करावा.
७) ग्रामपंचायत कर्मचारी नोकर भरती १०% आरक्षणानुसार अनुकंपा भरतीच्या धर्तीवर करण्यात यावी.
अशा प्रकारच्या मागणीचे पत्र मा. ना.जयकुमार भाऊ गोरे, ग्रामविकास व पंचायतराज मंत्री महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री सोलापूर जिल्हा यांना देण्यात आले.
बातमी
अधिक जाहिरातीसाठी संपर्क
संपादक : मा.श्री. डॉ. अभिमन्यु बी. आठवले
९४२०३०२५६१
उपसंपादक : वैभव अ. आठवले
साप्ताहिक बहुजन भूषण, साप्ताहिक बहुजन मित्र वृत्तपत्र
संस्थापक : बहुजन राष्ट्रशक्ति सामाजिक संघटना महाराष्ट्र राज्य
टीप : जे दिसले, जे पाहिले तेच लिहिले हेच वृत्तपत्राचे ध्येय उद्दीष्ट आहे.

Comments
Post a Comment