Skip to main content

नातेपुते पोलिसांची वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर धडक कारवाई

नातेपुते नगरपंचायतमध्ये जनतेने निवडुन दिलेल्या नगरसेवकांनी प्रारूप विकास योजनेला सर्वानुमते सहमती देऊन ठराव करून मतदार जनतेचा केला विश्वासघात - मा.श्री.डॉ.अभिमन्यू आठवले


संपादक बहुजन भूषण वृत्तपत्र 

हाती लागलेल्या पुराव्यानुसार "जे दिसले, जे हाती लागले, तेच मांडले" नातेपुते ग्रामपंचायतचे रूपांतर नगरपंचायतमध्ये झाले. निवडणूक झाली, उमेदवार नगरसेवक झाले, नगराध्यक्ष्, उपनगराध्यक्ष झाले, नगरपंचायतला मुख्याधिकारी मिळाले. नातेपुते नगरीचा विकास होईल, भरमसाठ निधी येईल, जनतेच्या हिताच्यादृष्टीने विकास योजना राबविले जातील, जनतेला सोयी-सुविधा मिळतील अशा अपेक्षा मतदार जनतेला होत्या.

महाराष्ट्र शासनाचा विकास आराखड्याबाबत नातेपुते नगरपंचायतकडे परिपत्रक आले होते. त्यानुसार शेती धारक, प्लॉट धारक, ग्रामस्थ यांची बैठक घेऊन माहिती जनते समोर मांडली पाहिजे होती. असे न करता शेती धारक, प्लॉट धारक, ग्रामस्थ यांना अंधारात ठेऊन कोणत्याही प्रकारची माहिती जनतेपर्यंत पोहचू दिली नाही. मतदार जनतेला गाफिल ठेऊन सर्व नगरसेवक यांनी ठरावास सहमती देऊन शेती धारक, प्लॉट धारक, ग्रामस्थ यांचा विश्वासघात केला. त्याच्या जागेवरती, जमिनीवरती आरक्षण पाडून शेती धारक, प्लॉट धारक, ग्रामस्थ यांना उध्वस्त करण्याचा डाव खेळला आहे. सर्व नगरसेवक यांनी ठरावास सहमती दिल्यामुळे मुख्याधिकारी यांनी सूचक म्हणून वरिष्ठ कार्यलयाकडे पाठपुरावा केला. नगरसेवक यांनी विरोध केला असता तर प्रारूप विकास आराखडा झालाच नसता. यामध्ये मुख्याधिकारी यांना दोष देता कामा नये, याला कारणीभूत सर्व नगरसेवक ठरले आहेत.

तसेच या मागे राजकीय दबाव सरळ दिसून येतोय. यामध्ये राजकीय मंडळींचे घरे, जमीन, असे काहीही गेले नाही असे जनतेतून बोलले जात आहे. ज्या नगरसेवक यांनी रहिवाशी यांची घरे पाडून शेतीवर आरक्षण टाकून प्लॉट धारक, शेती धारक, ग्रामस्थ यांना देशोधडीला लावण्यासाठी ठराव मंजूर केला त्यात नगरसेवक यांनी चूक केली. ज्या शेती धारक, प्लॉट धारक, ग्रामस्थ यांनी मतदारांनी निवडुन देऊन नगरसेवक केले,  त्याच मतदारांचा नगरसेवक यांनी विश्वासघात केला, ही शोकांतिका आहे. ठराव मंजूर करून नगरसेवक यांनी शेती धारक, प्लॉट धारक, ग्रामस्थ यांचे वाटोळे केले. (पद आज आहे ,उद्या नाही) हे लक्षात घेतले पाहिजे होते. 

यामुळे येणाऱ्या निवडणुकीत या नगरसेवक यांचे करायचे काय? मतदार बंधुनो तुम्हीच ठरवा, लोक चळवळ उभी करावी लागेल, उपोषण, गावाबंद, मतदानावर बहिष्कार अशी आंदोलने प्रारूप विकास आराखडा रद्द करण्यासाठी आवाज उठवावा लागेल. जागृत रहावे लागेल, करोडो रुपयेच्या जागा, जमिनी, इमारतीची विल्हेवाट लागणार आहे. आत्महत्या केल्याशिवाय पर्याय राहणार नाही.

तसेच शिवसेना नेते तथा विश्वस्थ दाते प्रशाला नातेपुते मा.राजकुमार-हिवरकर पाटील यांनी कोणताही शेतकरी, प्लॉट धारक, ग्रामस्थ उध्वस्त हौऊ नये यासाठी शासकीय दरबारी रीतसर आपली बाजू जनतेसाठी मांडत आहेत, त्यांचे जेवढे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे. 

    तसेच नगरसेवक यांनी प्रारूप विकास आराखडा यासाठी ठराव केला असला तर तो ठराव रद्द करता येतो, त्यासाठी सर्व नगरसेवक यांनी मानसिकता दाखवली पाहिजे इतकेच. 

बातमी

अधिक जाहिरातीसाठी संपर्क

संपादक : मा.श्री. डॉ. अभिमन्यु बी. आठवले

९४२०३०२५६१

उपसंपादक : वैभव अ. आठवले

साप्ताहिक बहुजन भूषणसाप्ताहिक बहुजन मित्र वृत्तपत्र

संस्थापक : बहुजन राष्ट्रशक्ति सामाजिक संघटना महाराष्ट्र राज्य

टीप : जे दिसलेजे पाहिले तेच लिहिले हेच वृत्तपत्राचे ध्येय उद्दीष्ट आहे.

Comments

Popular posts from this blog

नातेपुते पोलीस ठाण्याची धडक कामगिरी 6,200 रुपये हिसकून घेऊन जाणाऱ्या चोरांना आपले ताब्यातील थार वाहनांसह केली अटक

उपसंपादक: वैभव आठवले साप्ताहिक बहुजन भूषण वृत्तपत्र नातेपुते पोलिस स्टेशन यांचेकडून मिळालेल्या माहितीनुसार           नातेपुते पोलीस ठाणे हद्दीमध्ये फिर्यादी यांच्या दीपक जनार्दन चव्हाण, राहणार मोराची, तालुका माळशिरस, जिल्हा सोलापूर हे फलटण-पंढरपूर रोडवरील इंडीयन ऑईल कंपनीचा सुळ पेंट्रोल पंप येथे दि.01/10/2025 रोजी दुपारी 03.50 वा. सुमारास इंडीयन ऑईल कंपनीचा सुळ पेंट्रोल पंप येथे डिझेल टाकण्याचे काम करित असताना एक राखाडी रंगाची थार गाडी नं MH06CG5558 अशी डिझेल भरण्याकरीता आली व त्यातील ड्रायव्हर शेजारी बसलेल्या अनोळखी इसमाने गाडीत 4000 रुपयचे डिझेल भरायचे आहे व 6200 रु आम्हाला रोख पैशाची गरज आहे मी तुम्हाला माझे फोन पे वरून 10200 रु ऑनलाईन पाठवतो असे म्हणाल्याने मी गाडीचे डिझेलचे झाकन उघडण्यास गेलो असता पाठीमागे बसलेला अनोळखी इसम म्हणाला की, आम्हाला डिझेल नको 6200 रु रोख द्या अशी विनंती केली. त्यावेळी मी माझे खिश्यातील डिझेल विक्रीचे जमा झालेले पैसे खिश्यातुन काढुन 6200 रु मोजले त्यामध्ये 500 रु दराच्या 12 व 100 रु दराच्या 02 असे 6200 रु बाजुला काढले व बाकी ...

नातेपुते पोलीस ठाण्याची धडक कामगिरी उभ्या असलेल्या वाहनाची टायर चोरणाऱ्या अट्टल चोरास अटक व चोरीस गेलेला 100% मुद्देमाल सह 2,04,000/ किमतीचा मुद्देमाल जप्त

उपसंपादक: वैभव आठवले साप्ताहिक बहुजन भूषण वृत्तपत्र नातेपुते पोलिस स्टेशन यांचेकडून मिळालेल्या माहितीनुसार      नातेपुते पोलीस ठाणे हद्दीमध्ये फिर्यादी यांच्या आकाश तानाजी बोडरे, राहणार नातेपुते, तालुका माळशिरस यांनी त्यांच्याकडील वापरते वाहन टाटा टिपर नंबर एम एच 11 सी एच 0551 या उभ्या असलेल्या वाहनाचे दोन टायर डिस्कसह किंमत 75,000/ रुपये खोलून कोणीतरी अज्ञात चोरट्याने ते चोरून नेले आहेत म्हणून वगैरे हकीगत वरून नातेपुते पोलीस ठाणे गुर नंबर 331/2025 बीएनएस कलम 303 (2) प्रमाणे गुन्हा दाखल होता.       सदर गुन्ह्यातील घडला प्रकाराबाबत वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली नातेपुते पोलीस ठाणे व उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय गुन्हे प्रकटीकरण पथक गुन्ह्यातील घटनास्थळाच्या आजूबाजूची सीसीटीव्ही पाहणी करून तसेच  सायबर शाखेकडील तांत्रिक माहितीचे विश्लेषण करून संशयित  आरोपीचा शोध घेतला असता संशयित आरोपी हा कडेगाव जिल्हा सांगली येथील नामे बुरान इलाही मुलाणी वय 40 वर्ष असे  असल्याबाबत खात्री झाली आणि त्यानंतर सदर आरोपीस सापळा लावून कडेगाव जिल्हा सांगली येथे...

शिवसेनेच्या सोलापूर जिल्हाप्रमुख पदी राजकुमार हिवरकर-पाटील

  उपसंपादक: वैभव आठवले साप्ताहिक बहुजन भूषण वृत्तपत्र शिवसेनेचे मुख्य नेते तथा महाराष्ट्र राज्याचे संवेदनशील उपमुख्यमंत्री मा.ना.एकनाथराव शिंदे साहेब यांच्या आदेशाने महाराष्ट्र राज्याचे रोजगार हमी पणन मंत्री भरत शेठ गोगावले यांच्या हस्ते व महाराष्ट्र प्रदेशचे ओबीसी विभागाचे प्रमुख रमेशजी बारसकर यांच्या उपस्थितीत मंत्रालय मुंबई येथे सोलापूर जिल्ह्याचे प्रमुख ओबीसी विभाग म्हणून श्री.राजकुमार लता शंकरराव हिवरकर-पाटील यांना निवडीचे पत्र देण्यात आले. आजवर शिवसेनेमध्ये पक्षाचे जडणघडणीमध्ये मोर्चे, आंदोलन, साडेनऊ हजार पेक्षा जास्त गरिबांची केलेली ऑपरेशन, सोलापूरच्या अक्कलकोटचे माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे साहेब यांच्या पक्षप्रवेशावेळी मुख्य नेत्यांच्या उपस्थितीत 12 बलुत्तरांचा पक्ष म्हणून ओबीसी विभाग निर्माण करण्यामागची मुख्य नेते यांची दूरदृष्टी सर्वांसमक्ष केलेल भाषण, राष्ट्रमाता जिजाऊ क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीच्या निमित्ताने 55 सायकलींच मोफत झालेल वाटप,  सवलतीच्या दरात  99000 माता-भगिनींना केलेली डाळ वाटप, सत्तावीस गावांना बचत गटाच्या माध्यमातून दिलेली ...