Skip to main content

माण खटाव तालुक्याचे आमदार ते नामदार ग्रामविकास मंत्री महाराष्ट्र राज्य ते सोलापूर जिल्हा पालकमंत्री मा.जयकुमार (भाऊ) गोरे साहेब जनतेसाठी न्यायदाते ठरतील : मा.श्री.अभिमन्यू आठवले

मा.आ.ना.श्री.जयकुमार (भाऊ) गोरे,
महाराष्ट्र राज्य ग्रामविकास व पंचायतराज मंत्री, सोलापूर जिल्हा पालकमंत्री 

संपादक: बहुजन भूषण वृत्तपत्र 

    सोलापूर जिल्ह्याला मा.जयकुमार गोरे यांच्या रूपाने पालकमंत्री पद मिळाले आहे. त्यामुळे जनतेला आपला माणूस आहे, जनतेशी शासन दरबारी न होणारी कामे मा.पालकमंत्री यांच्यामदतीने होतील असे जनतेला वाटत आहे. 

ग्रामविकास मंत्री असल्यामुळे ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद या मधील कामे मार्गी लागणार. ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद या मधील अधिकारी, कर्मचारी हे (गेंड्याच्या कातडीचे झाले आहेत) जनतेने दिलेल्या अर्जाची दखल घेत नाहीत, टाळाटाळ करतात, कोणालाही घाबरत नाहीत असे चित्र दिसत आहे. पण आता ग्रामविकास मंत्री ते सोलापूर जिल्हा पालकमंत्री मा.जयकुमार (भाऊ)गोरे साहेब आहेत. अधिकारी व कर्मचारी यांना वटणीवर आणल्याशिवाय राहणार नाहीत, आता अधिकारी, कर्मचारी यांना दिवसा चांदण्या दाखवतील. अधिकारी, कर्मचारी यांना आलेला माज जिरवतील. मा.जयकुमार गोरे साहेब हे एक उत्तम जनतेसाठी काम करणारे नेतृत्व मानले जाते. 

मा.जयकुमार गोरे साहेब यांनी माण खटाव या दुष्काळ भागाचे नंदनवन केले आहे. रस्ते, पाणी या योजना राबवून तालुक्याचा विकास केला आहे. सोलापूर जिल्हा यामध्ये प्रचंड बागायती, जिरायती शेती असून त्या मानाने पाणी ही आहे. सोलापूर जिल्ह्यात राजकारण हे हेवे-दावे असे आहे, मनमानी कारभार आहे, त्यामुळे जनतेच्या अडीअडचणी सुटत नाहीत, न्याय कोणाकडे मागायचा हा प्रश्न जनतेसमोर उभा होता. यापूर्वीही कितीतरी पालकमंत्री झाले पण ते फक्त राजकारणी लोकांचे हित पाहणारे व जनतेला वाऱ्यावर सोडणारे, जनतेला वाली सोलापूर जिल्ह्यात नव्हता. ग्रामपंचायतपासून पंचायत समिती ते जिल्हा परिषद यामधील कामे राजकीय दबावाखाली जनतेची होत नव्हती असे चित्र आहे. 

अधिकारी, कर्मचारी हे नोकरीच्या ठिकाणी हजर नसतात, जनतेला उल्लू बनवितात, राजकीय दबावामुळे जनतेला विकासाच्या योजना मिळत नाहीत ही या सोलापूर जिल्ह्याची शोकांतिका आहे. मा.जयकुमार गोरे साहेब पालकमंत्री सोलापूर जिल्हा आपण जनतेसाठी अशेचे किरण ठराल ही जनतेची अपेक्षा आहे. 

भाऊ नक्कीच ग्रामपंचायत ते पंचायत समिती ते जिल्हा परिषद यामधील जनतेची कामे होणेसाठी अधिकारी, कर्मचारी यांना आदेश देतील. भाऊ यांच्यारूपाने सोलापूर जिल्ह्याला पालकमंत्री, तर महाराष्ट्र राज्याला ग्रामविकास मंत्री लाभले आहेत त्यांचे अभिनंदन व पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा...!

बातमी

अधिक जाहिरातीसाठी संपर्क

संपादक : मा.श्री. डॉ. अभिमन्यु बी. आठवले

९४२०३०२५६१

उपसंपादक : वैभव अ. आठवले

साप्ताहिक बहुजन भूषणसाप्ताहिक बहुजन मित्र वृत्तपत्र

संस्थापक : बहुजन राष्ट्रशक्ति सामाजिक संघटना महाराष्ट्र राज्य

टीप : जे दिसलेजे पाहिले तेच लिहिले हेच वृत्तपत्राचे ध्येय उद्दीष्ट आहे.

Comments

Popular posts from this blog

नातेपुते पोलीस ठाणेकडील गुन्हे प्रकटीकरण शाखेची आदर्श कामगिरी चंदन चोरी करणा-या आरोपीस २४ तासात केले जेरबंद

  उपसंपादक: वैभव आठवले साप्ताहिक बहुजन भूषण वृत्तपत्र नातेपुते पोलिस स्टेशन यांचेकडून मिळालेल्या माहितीनुसार      नातेपुते पोलीस ठाणे हददीमध्ये मौजे मांडवे, ता.माळशिरस येथे राजन सुकुमार दोशी यांचे शेतातील दिनांक २६/०६/२०२५ रोजी सकाळी ०८/०० वा ते सायंकाळी ०५/००वा. चे दरम्यान शेतातील बांधावरील १० वर्षे वयाची ०२ चंदनाची झाडे अंदाजे किंमत २७,०००/- रू चे कोणीतरी अज्ञात चोरटयाने चोरून नेली आहेत त्याबाबत फिर्यादी नामे राजन सुकुमार दोशी रा.नातेपुते, ता.माळशिरस, जि.सोलापुर यांचे फिर्यादीवरुन नातेपुते पोलीस ठाणेस गु.र.नं. २३७/२०२५ भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ३०३ (२) प्रमाणे दिनांक २६/०६/२०२५ रोजी गुन्हा दाखल झाला होता. सदर गुन्हयाचा तपास पोहेकॉ/१७०८ विकास बाबर हे करीत होते.      नातेपुते पोलीस ठाणेचे गुन्हे प्रकटीकरण शाखेचे अंमलदार यांनी सदर गुन्हयाचा तपास दरम्यान मिळालेल्या गोपनिय बातमीव्दारे माहीती काढून इसम नामे १) गोविंद दुर्याधन काळे २) मेघराज ज्ञानदेव भोसले दोघे रा माळशिरस यांनी गुन्हा केल्याचे निष्पन्न झाल्याने त्यास पोहकॉ/१७०८ बाबर व गुन्हे प्रकटीक...

नातेपुते पोलीस ठाणेकडून जबरी चोरी करणा-या आरोपीस २४ तासाच्या आत केले जेरबंद

उपसंपादक: वैभव आठवले (साप्ताहिक बहुजन भूषण वृत्तपत्र) नातेपुते पोलीस ठाणे यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार      नातेपुते पोलीस ठाणे हददीमध्ये मौजे नातेपुते, ता.माळशिरस येथे दिनांक ०३/०४/२०२५ रोजी सायकाळी ०७.३० वा सुमारास गुन्ह्यातील फिर्यादी नामे वैभव विठ्ठल नष्टे वय ३१ वर्षे, रा. माळशिरस ता. माळशिरस जि. सोलापुर व सोबत त्यांची आई माया नष्टे असे त्यांचेकडील स्कुटी गाडी क्र. एम.एच. ४५ ए.व्ही. १२६१ यावरुन नातेपुते परिसरात शिंगणापुर पाटी ते बायपास रोड मार्गे नातेपुते फडतरी जाणारे बायपास रोडवर आले असताना दोन अज्ञात इसमांनी त्यांचे पाठीमागुन येऊन फिर्यादीचे आई माया विठल नष्टे याचे गळयातील सोन्याचे दागीने बळजबरीने काढुन घेऊन मोटार सायकल वरुन पळुन गेल्याने त्याबाबत फिर्यादी नामे वैभव विठ्ठल नष्टे वय ३१ वर्षे रा. माळशिरस ता. माळशिरस जि. सोलापुर यांचे फिर्यादीवरुन नातेपुते पोलीस ठाणेस गुरनं १३३/२०२५ भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ३०९ (४), ३ (५) प्रमाणे दिनांक ०८/०४/२०२५ रोजी १८ वा ३९ मि. गुन्हा दाखल झाला होता. सदर गुन्हयाचा तपास गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोना/५६२ राकेश लोहार करीत ...

अतुल कुलकर्णी साहेब पोलीस अधीक्षक, सोलापूर ग्रामीण यांच्या संकल्पनेतून धर्मतुरी, ता.माळशिरस रोडलगत वृक्षारोपण

  उपसंपादक: वैभव आठवले साप्ताहिक बहुजन भूषण वृत्तपत्र नातेपुते पोलिस स्टेशन यांचेकडून मिळालेल्या माहितीनुसार       दिनांक 26/06/2025 रोजी मा. श्री. अतुल कुलकर्णी साहेब पोलीस अधीक्षक ,सोलापूर ग्रामीण यांच्या संकल्पनेतून  व मा. उपविभागीय पोलीस अधिकारी श्री नारायण शिरगावकर उपविभाग माळशिरस यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू करण्यात आलेल्या हरित वारी सन 2025 उपक्रमांतर्गत  नातेपुते पोलीस  ठाणे हद्दीतील  मौजे धर्मपुरी येथे  पालखी मार्गवर हरितवारी अनुषंगाने, माननीय पोलीस अधीक्षक श्री अतुल कुलकर्णी साहेब, यांच्या हस्ते रोडलगत वृक्षारोपण करण्यात आले.       सदर ठिकाणी वृक्षारोपण करिता गावातील सरपंच,शेतकरी व गावातील प्रतिष्ठित नागरिक तसेच  पोलीस पाटील, पोलीस मित्र, ग्राम सुरक्षा दल यांच्या उपस्थितीत हरित वारी उपक्रम संपन्न झाला आहे. बातमी अधिक जाहिरातीसाठी संपर्क संपादक : मा.श्री. डॉ. अभिमन्यु बी. आठवले ९४२०३०२५६१ उपसंपादक : वैभव अ. आठवले साप्ताहिक बहुजन भूषण ,  साप्ताहिक बहुजन मित्र वृत्तपत्र संस्थापक :  बहुजन राष्ट्रशक्ति साम...