![]() |
संस्थापक/संपादक पत्रकार मा. श्री. डॉ. अभिमन्यु बी. आठवले |
आजपर्यंत विविध सामाजिक संघटनेच्या माध्यमातून
बहुजन समाजातील लोकांचे विविध प्रश्न सोडवण्याचे काम केले आहे. आता स्वता: ची सामाजिक
संघटना उभी करून बहुजन समाजातील तळागाळातील लोकांपर्यंत पोहचवून त्यांच्यावर होणारे
अन्याय निवारण करण्याचा संकल्प केला आहे. बहुजनांना न्याय देण्यासाठीच १ मे २०१३ रोजी
बहुजन राष्ट्रशक्ति सामाजिक संघटना (महाराष्ट्र राज्य ) स्थापून त्याचे कार्य महाराष्ट्रभर
सुरू करीत आहे. ही बहुजन राष्ट्रशक्ति सामाजिक संघटना सर्व समाज्याच्या न्याय हक्कासाठी
लढा देणारी संघटना असल्याचे संस्थापक अध्यक्ष अभिमन्यु बी. आठवले यांनी सांगितले. डॉ.
बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितलेला “शिका, संघटित व्हा, संघर्ष करा” हा मूलमंत्र ध्यानात घेऊन
बहुजन सामाजाच्या हितासाठी संघटनेच्या माध्यमातून लोकांना एकत्र आणण्याचे काम करणार
आहे. ह्या संघटनेला स्थापन होऊन ७ वर्ष होत आहेत यशस्वी घोडदौड चालू आहे व विविध प्रश्न
सोडवण्या साठी कटिबद्ध संघटना असेल.
संघटनेची ध्येय व उद्दिष्टे पुढील प्रमाणे
- बेघर, बेसहारा अशा वाळवंटरूपी वादळामध्ये भरकटलेल्या पदवीधर बेकरांचे प्रश्न सोडविणे.
- शेतमजूर, लहूउद्योग केंद्र, शासकीय बँका, समाजकल्याण मधील विविध योजनांचा लाभ मिळवून देणे.
- गाव पातळीवरील जनतेचे प्रश्न सोडविणे, ग्रामीण भागातील सावकारी बाबत आवाज उठविणे.
- राजकीय वर्चस्वाखाली कर्मचार्यांवर होणारे अन्याय दूर करणे.
- महिलांवरील अन्यायाविरोधात लढा देणे.
- पोलिस कर्मचार्यांना राहण्यसाठी शासकीय वसाहती बांधण्यासाठी शासन दरबारी आवाज उठविणे.
- मटका, दारूधंदे इ. अवैध चालणारे धंदे बंद करणेसाठी शासकीय कारवाई होणेसाठी लढा देणे.
- जिल्हा परिषद, पंचायत समिति इ. मधील प्रलंबित कामे त्वरित होण्यासाठी पाठपुरावा करणे.
- पाटबंधारे, सामाजिक वनीकरण, सार्वजनिक बांधकाम, वीज वितरण, महसूल खाते, भूमी अभिलेख, दुय्यम निबंधक कार्यालय, कृषि खाते यामधील शेतकर्यांचे व नागरिकांचे विविध प्रश्न सोडविणे.
- पत्रकारांसाठी स्वतंत्र कार्यालय व त्यांचेवरील हल्याबाबत आवाज उठविणे.
- आरोग्य खाते , शिक्षण खाते, यामधील कर्मचार्यांना होणार्या त्रासाविरोधात आवाज उठविणे.
- सर्व प्रकारचे मागासवर्गीयांच्या मुलांच्या प्रलंबित स्कॉलरशिप मिळणेसाठी लढा देणे.
- विविध क्षेत्रात वाढलेल्या भ्रष्टाचाराविरोधात आवाज उठविणे, विविध सामाजिक प्रश्न सोडविणे.
- ग्रामीण असो व शहरी भागातील अतिक्रमणे नियमित करण्यासाठी लढा उभारणे.
- रेशन दुकानातील भ्रष्टाचाराला आळा बसविणे.
- तहसील कचेरीतील योजना गोरगरिबांना मिळवून देणे.
- ग्रामपंचायत मधील भ्रष्टाचारा बाबत आवाज उठविणे.
- अनुसूचीत जाती जमाती मधील कुटुंब ग्रामपंचायत गावठांमध्ये अनेक वर्ष राहत असताना ग्रामपंचायत ठराव करीत नाही आशांवरती गुन्हे दाखल करणे.
या उद्दिष्टाप्रमाणे बहुजन राष्ट्रशक्ति सामाजिक संघटना (महाराष्ट्र
राज्य ) सदैव तत्पर असेल.
टीप : संघटनेचे सभासद करून घेणे, महाराष्ट्रातील सर्व जिल्हा प्रमुख यांची मुलाखत घेऊन नियुक्ती करणे. इच्छुकांनी
संपर्क साधावा.
संपर्क : ९४२०३०२५६१
संघटनेचे वृत्तपत्र साप्ताहिक बहुजन भूषण, साप्ताहिक बहुजन मित्र आहे.
मा. श्री. वैभव अ. आठवले संघटक ( महाराष्ट्र राज्य ) ८६०००६७०७४
उपसंपादक / पत्रकार

Comments
Post a Comment