संपादक
महाराष्ट्र
राज्यातील पोलिस बांधवांची पोलिसाची नोकरी म्हणजे “खाकी वर्दी” याच वर्दीतील
हाच आपला रक्षणकर्ता संकट समयी धावून येतोय. आपल्या कुटुंबाचा, नातेवाईकांचा कोणाचा विचार न करता
आपली खाकी वर्दीतील पोलिसांची नोकरी म्हणजे ऊन, वारा, पाऊस यांना तोंड देत
सेवा बजावत आहेत. आज पोलिस बांधव आमचे कोरोना या रोगाच्या काळात रक्षण जनतेचे करीत
असताना या रोगाची लागण झाली आणि आमचे पोलिस बांधव मृत्यू पावले ही वेदनादायक, दुख, मन हेलावून टाकणारी घटना ऐकली की
माझ्या या रक्षणकर्त्या पोलिसाबाबत वाईट वाटते. पोलिस बांधव आहेत म्हणून जनता सुखी
आहे त्यांचा आदर केलाच पाहिजे. पोलिस खात्याची नोकरी ही आरामाची नोकरी नाही ती वेदनादायक
अशी नोकरी आहे. सतत सतर्क रहावे लागते, काळजी हाच शब्द या पोलिस बांधवांच्या नोकरीत आहे. मी अनेक पोलिस अधिकारी व कर्मचारी
मी पाहिले आहेत तसेच ते माझे वरिष्ठ अधिकारी व माझे मित्र आहेत. पोलिस खात्याच्या नोकरीत
“निवांत क्षण” हा त्यांच्या नशिबात नाही सदैव धगधग आहे. जनतेमधील वादविवाद, भांडण तंटे, मर्डर, चोर्या मार्या, उत्सव, नेत्यांचे दौरे, अधिकार्यांचे आदेश “एक घास तोंडात
तर एक घास हातात” ही आमच्या पोलिस बांधवांची दैयनीय अवस्था आहे. जनतेला खाकी हा
शब्दच डोळ्यासमोर असल्यामुळे पोलिसांची नोकरी चांगली दिसते, भरपूर पैसे मिळतात असे जनतेला वाटते
पण तसे प्रत्यक्षात असते किंवा नाही हे समजले नाही. पोलिसांना गुन्हेगार व आरोपी बनवायचे
अधिकार संविधानाने दिले आहे परंतु कोणत्याही सामान्य माणसावर पोलिसांनी अन्याय केला
असे पाहिले नाही. नेत्यांच्या कार्यक्रमावेळी कार्यकर्ते खुर्चीवर आणि आमचे पोलिस बांधव
उभे असतात त्यावेळी वाईट वाटते. पोलिसांना संसार, मुले बाळांचे शिक्षण, कौटुंबिक
प्रश्न असे अनेक प्रश्न त्यांच्यासमोर उभे असतात. पोलिस बांधव आपले रक्षण कर्ते आहेत
ते भक्षण कर्ते नाहीत पोलिसांना त्यांच्या निवासाचा प्रश्न शासनाने सोडवला पाहिजे असे
वाटते. जनतेनी त्यांचा आदर राखावा त्यांना मान सन्मान द्यावा हीच अपेक्षा जय हिंद...!
जनहितार्थ
अधिक जाहिरातीसाठी
संपर्क
संपादक : मा. श्री. डॉ. अभिमन्यु बी. आठवले
९४२०३०२५६१
उपसंपादक : वैभव अ.
आठवले
साप्ताहिक बहुजन
भूषण, साप्ताहिक बहुजन मित्र वृत्तपत्र
बहुजन राष्ट्रशक्ति
सामाजिक संघटना महाराष्ट्र राज्य
आठवले परिवार

Comments
Post a Comment