महाराष्ट्र हा समाजसुधारकांचा व साधू संतांचा आहे. हा सर्व धर्माचा महाराष्ट्र आहे असे असताना जाणूनबुजून अनुसूचीत जाती जमातीचा तिरस्कार समाजकंटक करीत आहेत हे प्रमाण ग्रामीण भागात मोठया प्रमाणात दिसून येत आहे. समाजकंटकांनो तुम्हाला येवढा जातीचा का गर्व आहे ? तुमच्या आणि अनुसूचीत जाती जमातीच्या लोकांच्या रक्तामध्ये काय फरक आहे ? जातिनुसार रक्त रंगीबेरंगी आहे काय ? आपण २१ व्या शतकाकडे चाललो आहे. तरी समाजकंटकाच्या मनातील जात अजून गेली नाही ही शोकांतिका आहे. अनुसूचीत जाती जमाती विषयी विटाळ का होतो? तुम्हालाही धर्म जात आहे मग मला प्रश्न पडतो की, जातीचा ७/१२, खाते उतारा समाजकंटकाकडे आहे का? जातीचा नकाशा आहे का? जाती धर्मानुसार रक्ताचे रंग वेगवेगळे आहेत का? मग समाजकंटकांनो असे तर नाही ना? तरीपण स्वत: च्या जातीचा गर्व आणि अनुसूचीत जाती जमातीच्या लोकांचा तिरस्कार, अपमान, द्वेष, भेदभाव कशासाठी? प्रत्येक जाती जमातीचा धर्माचा मिळून गावी शहरे वसलेली असतात. अनुसूचीत जाती जमातीचे सध्याच्या काळात भक्षण केले जाते आहे. त्यांच्यावरती मोठ्या प्रमानात अन्याय अत्याचार होत आहेत याला फक्त “जात” या नावाची लागण पिढ्यान पिढ्या वंशावळी प्रमाणे येत असलेली जात यामध्ये लाज वाटायचे कारण काय? धर्म जात त्याचा स्वीकार केला पाहिजे. अभिमान बाळगला पाहिजे मग अनुसूचीत जाती जमाती बाबतच्या लोकांविषयी, विटाळ, तिरस्कार, अपमान, द्वेष, भेदभाव का? प्रत्येक व्यवहार सर्व जातीधर्माच्या व्यक्तीवर अवलंबून आहेत मग रोटीबेटी व्यवहार का नको? त्याचाच का विटाळ? विरोध कशासाठी? माणुसकीचा छळ होत असेल तर “अॅट्रोसिटी अॅक्ट” हे अनुसूचीत जाती जमातीचे रक्षण करण्यासाठी, न्याय मिळण्यासाठी कवच आहे. समाजकंटकांनो तुम्ही जबाबदार आहात हा कायदा लावून घेण्यासाठी हे लक्ष्यात घ्या. तुम्ही माणुसकी जपा यामध्ये सर्व काही आहे. समाजकंटकांनो हे वागणे बरे नाही. आपण माणूस म्हणून एकत्र जगूया. आज आमच्या अनुसूचीत जाती जमातीच्या बांधवांचे मर्डर केले जातात, हल्ले होत आहेत ही आमच्यासाठी चीड आणणारी आहेत. कारण या मागचे आम्ही एकसंघ नाही परंतु यापुढे अनुसूचीत जाती जमातीतील व्यक्तीने एकत्र यावे लागेल. जस्यास तसे उत्तर द्यावे लागेल. प्रत्येक जाती धर्मात फरक आहे. मग रक्तात फरक आहे का? मग कशासाठी वाद विवाद ? माणुसकी जपली पाहिजे. अनुसूचीत जाती जमातीचा तिरस्कार, विटाळ कशासाठी करता? आपण सगळे गुण्या गोविंदाने जेथे असेल तेथे राहू सर्व मनातील मतभेद काढून टाकू अशी मानसिकता असली पाहिजे इतकेच.
शोधपत्रकारिता
अधिक जाहिरातीसाठी संपर्क
संपादक : मा. श्री. डॉ. अभिमन्यु बी. आठवले
९४२०३०२५६१
उपसंपादक : वैभव अ. आठवले
साप्ताहिक बहुजन भूषण, साप्ताहिक बहुजन मित्र वृत्तपत्र
बहुजन राष्ट्रशक्ति सामाजिक
संघटना महाराष्ट्र राज्य
आठवले परिवार
Comments
Post a Comment