छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराने प्रेरणा घेऊन निघालेले श्री गणेश प्रतिष्ठानचे संस्थापक शेखर (दादा) अटक म्हणजे बहुजन मावळा
संपादक
नातेपुते तालुका माळशिरस, जि. सोलापूर येथे शेखर ( दादा ) अटक हे श्री गणेश प्रतिष्ठान चे संस्थापक आहेत. छत्रपती शिवाजी महाराज यांचे विचार डोळ्यासमोर ठेऊन बहुजन समाजातील विचाराचे युवक एकत्र केले. आपले कर्तव्य समजून सामाजिक बांधिलकी हे ध्येय डोळ्यासमोर ठेऊन प्रत्येकाच्या आनंदात व दु:खात सहभागी होताना दिसतात. तसेच सर्व समाज सुधारकांच्या जयंतीनिमित्त विविध उपक्रम राबवतात असा एक आदर्श त्यांनी ठेवला आहे. जे आपण काम करतो ते काम प्रामाणिक व निष्ठेने केले तर हा वेगळाच आनंद देऊन जातो. बहुजन समाजातील युवक एकत्र करून एक संघपणा, एकात्मता निर्माण केली. शेखर अटक हे एक समाजप्रिय, बहुजन समाजप्रिय, एक आदर्श मित्र, एक आदर्श सामाजिक कार्यकर्ता म्हणून ठसा उमठविला आहे. “मूर्ति लहान पण किर्ति महान” असे म्हटले तर वावगे होणार नाही. शेखर अटक म्हणजे भविष्यातील जनतेचा एक आधार आहे उद्याचे नगरसेवक असतील. इच्छा असेल तर मार्ग सापडतो ही त्यांची महत्वकांक्षा आहे. आज पर्यंतचे केलेले कार्य महान आहे. गोरगरिबांच्या मदतीला धावून जातात त्यांना न्याय मिळवून देतात. कोणाचाही वाढदिवस असो त्यासाठी आपले कर्तव्य म्हणून सामाजिक काम हाती घेतात. आदर घ्या आदर द्या ही त्यांचा एक अलौकिक गुण आहे. मनाचा मोठेपणा माणुसकी जपणारा व माणूसच माणसाला उपयोगी पडतो हे त्यांची महत्वाची कामगिरी आहे. सध्या कोरोना या आपत्ती काळात आपले कर्तव्य समजून जीवनावशक वस्तु, मास्क इत्यादीचे वाटप करून आपले कर्तव्य बजावले. मा. शेखर (दादासाहेब ) अटक आपण चांगले काम करीत आहात पुढेही करत राहाल तुमच्या पुढील कामगिरीस आमच्या आभाळभर शुभेच्छा...!
शोधपत्रकारिता
अधिक माहितीसाठी संपर्क
संपादक - मा. डॉ.
श्री. अभिमन्यू बी.आठवले
९४२०३०२५६१
उपसंपादक - वैभव अ.
आठवले
साप्ताहिक बहुजन भूषण ,साप्ताहिक बहुजन मित्र
बहुजन राष्ट्रशक्ती
सामाजिक संघटना महाराष्ट्र राज्य
आठवले परिवार

Comments
Post a Comment