संपादक
भारत देशात अनुसूचीत जाती जमातीचे समाज गावापातळी पासून ते देशा पर्यंत सत्ता काबिज करू शकतात पण अनुसूचीत जाती जमाती मधील समाज एकत्र येऊ शकत नाहीत ही वेदनादायी परिस्थिति आहे. घटनेचे शिल्पकार परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळे अनुसूचीत जाती जमातींना त्यांचा हक्क न्याय मिळत आहे परंतु अनुसूचीत जाती जमातीचे समाज आपआपल्या परीने नेते “समाजसुधारक” यांच्या नावाने वेगवेगळे गटतट, संघटना उभारून मीपणा दाखवत आहेत. जरूर गटतट संघटना काढा पण निवडणुकीच्या दरम्यान सर्व अनुसूचीत जाती जमातीने एकत्र येऊन आपली ताकद दाखवली पाहिजे. अनुसूचीत जातीच्या समाजाने एकत्र येऊन आपले पवित्र मत आपण ठरवलेल्या उमेदवाराला दिले तर तो सर्वांच्या मतावर निवडून येईल व आपला व्यक्ति शासनकर्ता होईल असे वाटते परंतु सध्या अनुसूचीत जाती जमाती मध्ये रेडिमेड पुढारी यामुळे समाज एकत्र येऊ शकत नाही. आरक्षण, न्याय, हक्क इ. साठी घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने फायदा उचलायचा एवढे मात्र अनुसूचीत जाती जमातीच्या समाजाला कळले आहे . सर्वांनी एकत्र आले पाहिजे असे वाटते. गावापासून ते दिल्ली पर्यंत सत्ता काबिज आपण सर्वजण एकत्र आल्यास करू शकतो एवढी ताकत अनुसूचीत जाती जमातीच्या समाजामध्ये आहे परंतु तसे होत नाही. अनुसूचीत जाती जमातीच्या समाजामध्ये चढाओढ दिसून येत आहे हे मी संपादक म्हणून पाहत आहे. जो तो समाज स्वत: ला बलवान समजत आहे त्यामध्ये लाचारी, दलाल, नेते, अनुसूचीत जाती जमातीच्या समाजामध्ये आहेत. त्या दलालांना स्वता: चे भागले म्हणजे झाले, समाजाचे काही देणे घेणे नाही यामुळे अनुसूचीत जाती जमातीतील समाज थोडीफार प्रगती करीत आहेत नाहीतर सर्वांची अधोगतीच आहे. अनुसूचीत जाती जमातीच्या समाजाने एकत्र येणे काळाची गरज आहे, एकजूट महत्वाची आहे असे झाल्यास एक क्रांति होईल, परिवर्तन घडेल, इतिहास होईल. दरोराज कुठे ना कुठे अनुसूचीत जाती जमातीच्या समाजावर अन्याय अत्याचार, छळ, पिळवणूक होताना दिसते हे लक्षात घेता एकता यापुढे महत्वाची आहे
जनहितार्थ
अधिक जाहिरातीसाठी संपर्क
संपादक : मा. श्री. डॉ. अभिमन्यु बी. आठवले
९४२०३०२५६१
उपसंपादक : वैभव अ.
आठवले
साप्ताहिक बहुजन
भूषण, साप्ताहिक बहुजन मित्र वृत्तपत्र
बहुजन राष्ट्रशक्ति
सामाजिक संघटना महाराष्ट्र राज्य
आठवले परिवार
Comments
Post a Comment