Skip to main content

नातेपुते पोलिसांची वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर धडक कारवाई

भारत देशातील अनुसूचीत जाती जमातीच्या समाजाने एकत्र आल्यास क्रांती घडेल

संपादक

भारत देशात अनुसूचीत जाती जमातीचे समाज गावापातळी पासून  ते देशा पर्यंत सत्ता काबिज करू शकतात पण अनुसूचीत जाती जमाती मधील समाज एकत्र येऊ शकत नाहीत ही वेदनादायी परिस्थिति आहे. घटनेचे शिल्पकार परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळे अनुसूचीत जाती जमातींना त्यांचा हक्क न्याय मिळत आहे परंतु अनुसूचीत जाती जमातीचे समाज आपआपल्या परीने नेते “समाजसुधारक” यांच्या नावाने वेगवेगळे गटतट, संघटना उभारून मीपणा दाखवत आहेत. जरूर गटतट संघटना काढा पण निवडणुकीच्या दरम्यान सर्व अनुसूचीत जाती जमातीने एकत्र येऊन आपली ताकद दाखवली पाहिजे. अनुसूचीत जातीच्या समाजाने एकत्र येऊन आपले पवित्र मत आपण ठरवलेल्या उमेदवाराला दिले तर तो सर्वांच्या मतावर निवडून येईल व आपला व्यक्ति शासनकर्ता होईल असे वाटते परंतु सध्या अनुसूचीत जाती जमाती मध्ये रेडिमेड पुढारी यामुळे समाज एकत्र येऊ शकत नाही. आरक्षण, न्याय, हक्क इ. साठी घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने फायदा उचलायचा एवढे मात्र अनुसूचीत जाती जमातीच्या समाजाला कळले आहे . सर्वांनी एकत्र आले पाहिजे असे वाटते. गावापासून ते दिल्ली पर्यंत सत्ता काबिज आपण सर्वजण एकत्र आल्यास करू शकतो एवढी ताकत अनुसूचीत जाती जमातीच्या समाजामध्ये आहे परंतु तसे होत नाही. अनुसूचीत जाती जमातीच्या समाजामध्ये चढाओढ दिसून येत आहे हे मी संपादक म्हणून पाहत आहे. जो तो समाज स्वत: ला बलवान समजत आहे त्यामध्ये लाचारी, दलाल, नेते, अनुसूचीत जाती जमातीच्या समाजामध्ये आहेत. त्या दलालांना स्वता: चे भागले म्हणजे झाले, समाजाचे काही देणे घेणे नाही यामुळे अनुसूचीत जाती जमातीतील समाज थोडीफार प्रगती करीत आहेत नाहीतर सर्वांची अधोगतीच आहे. अनुसूचीत जाती जमातीच्या समाजाने एकत्र येणे काळाची गरज आहे, एकजूट महत्वाची आहे असे झाल्यास एक क्रांति होईल, परिवर्तन घडेल, इतिहास होईल. दरोराज कुठे ना कुठे अनुसूचीत जाती जमातीच्या समाजावर अन्याय अत्याचार, छळ, पिळवणूक होताना दिसते हे लक्षात घेता एकता  यापुढे महत्वाची आहे 

जनहितार्थ 

 अधिक जाहिरातीसाठी संपर्क

संपादक : मा. श्री. डॉ. अभिमन्यु बी. आठवले

९४२०३०२५६१

उपसंपादक : वैभव अ. आठवले

साप्ताहिक बहुजन भूषण, साप्ताहिक बहुजन मित्र वृत्तपत्र

बहुजन राष्ट्रशक्ति सामाजिक संघटना महाराष्ट्र राज्य

आठवले परिवार

 

   


Comments

Popular posts from this blog

नातेपुते पोलीस ठाण्याची धडक कामगिरी 6,200 रुपये हिसकून घेऊन जाणाऱ्या चोरांना आपले ताब्यातील थार वाहनांसह केली अटक

उपसंपादक: वैभव आठवले साप्ताहिक बहुजन भूषण वृत्तपत्र नातेपुते पोलिस स्टेशन यांचेकडून मिळालेल्या माहितीनुसार           नातेपुते पोलीस ठाणे हद्दीमध्ये फिर्यादी यांच्या दीपक जनार्दन चव्हाण, राहणार मोराची, तालुका माळशिरस, जिल्हा सोलापूर हे फलटण-पंढरपूर रोडवरील इंडीयन ऑईल कंपनीचा सुळ पेंट्रोल पंप येथे दि.01/10/2025 रोजी दुपारी 03.50 वा. सुमारास इंडीयन ऑईल कंपनीचा सुळ पेंट्रोल पंप येथे डिझेल टाकण्याचे काम करित असताना एक राखाडी रंगाची थार गाडी नं MH06CG5558 अशी डिझेल भरण्याकरीता आली व त्यातील ड्रायव्हर शेजारी बसलेल्या अनोळखी इसमाने गाडीत 4000 रुपयचे डिझेल भरायचे आहे व 6200 रु आम्हाला रोख पैशाची गरज आहे मी तुम्हाला माझे फोन पे वरून 10200 रु ऑनलाईन पाठवतो असे म्हणाल्याने मी गाडीचे डिझेलचे झाकन उघडण्यास गेलो असता पाठीमागे बसलेला अनोळखी इसम म्हणाला की, आम्हाला डिझेल नको 6200 रु रोख द्या अशी विनंती केली. त्यावेळी मी माझे खिश्यातील डिझेल विक्रीचे जमा झालेले पैसे खिश्यातुन काढुन 6200 रु मोजले त्यामध्ये 500 रु दराच्या 12 व 100 रु दराच्या 02 असे 6200 रु बाजुला काढले व बाकी ...

नातेपुते पोलीस ठाण्याची धडक कामगिरी उभ्या असलेल्या वाहनाची टायर चोरणाऱ्या अट्टल चोरास अटक व चोरीस गेलेला 100% मुद्देमाल सह 2,04,000/ किमतीचा मुद्देमाल जप्त

उपसंपादक: वैभव आठवले साप्ताहिक बहुजन भूषण वृत्तपत्र नातेपुते पोलिस स्टेशन यांचेकडून मिळालेल्या माहितीनुसार      नातेपुते पोलीस ठाणे हद्दीमध्ये फिर्यादी यांच्या आकाश तानाजी बोडरे, राहणार नातेपुते, तालुका माळशिरस यांनी त्यांच्याकडील वापरते वाहन टाटा टिपर नंबर एम एच 11 सी एच 0551 या उभ्या असलेल्या वाहनाचे दोन टायर डिस्कसह किंमत 75,000/ रुपये खोलून कोणीतरी अज्ञात चोरट्याने ते चोरून नेले आहेत म्हणून वगैरे हकीगत वरून नातेपुते पोलीस ठाणे गुर नंबर 331/2025 बीएनएस कलम 303 (2) प्रमाणे गुन्हा दाखल होता.       सदर गुन्ह्यातील घडला प्रकाराबाबत वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली नातेपुते पोलीस ठाणे व उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय गुन्हे प्रकटीकरण पथक गुन्ह्यातील घटनास्थळाच्या आजूबाजूची सीसीटीव्ही पाहणी करून तसेच  सायबर शाखेकडील तांत्रिक माहितीचे विश्लेषण करून संशयित  आरोपीचा शोध घेतला असता संशयित आरोपी हा कडेगाव जिल्हा सांगली येथील नामे बुरान इलाही मुलाणी वय 40 वर्ष असे  असल्याबाबत खात्री झाली आणि त्यानंतर सदर आरोपीस सापळा लावून कडेगाव जिल्हा सांगली येथे...

शिवसेनेच्या सोलापूर जिल्हाप्रमुख पदी राजकुमार हिवरकर-पाटील

  उपसंपादक: वैभव आठवले साप्ताहिक बहुजन भूषण वृत्तपत्र शिवसेनेचे मुख्य नेते तथा महाराष्ट्र राज्याचे संवेदनशील उपमुख्यमंत्री मा.ना.एकनाथराव शिंदे साहेब यांच्या आदेशाने महाराष्ट्र राज्याचे रोजगार हमी पणन मंत्री भरत शेठ गोगावले यांच्या हस्ते व महाराष्ट्र प्रदेशचे ओबीसी विभागाचे प्रमुख रमेशजी बारसकर यांच्या उपस्थितीत मंत्रालय मुंबई येथे सोलापूर जिल्ह्याचे प्रमुख ओबीसी विभाग म्हणून श्री.राजकुमार लता शंकरराव हिवरकर-पाटील यांना निवडीचे पत्र देण्यात आले. आजवर शिवसेनेमध्ये पक्षाचे जडणघडणीमध्ये मोर्चे, आंदोलन, साडेनऊ हजार पेक्षा जास्त गरिबांची केलेली ऑपरेशन, सोलापूरच्या अक्कलकोटचे माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे साहेब यांच्या पक्षप्रवेशावेळी मुख्य नेत्यांच्या उपस्थितीत 12 बलुत्तरांचा पक्ष म्हणून ओबीसी विभाग निर्माण करण्यामागची मुख्य नेते यांची दूरदृष्टी सर्वांसमक्ष केलेल भाषण, राष्ट्रमाता जिजाऊ क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीच्या निमित्ताने 55 सायकलींच मोफत झालेल वाटप,  सवलतीच्या दरात  99000 माता-भगिनींना केलेली डाळ वाटप, सत्तावीस गावांना बचत गटाच्या माध्यमातून दिलेली ...