संपादक
कोरोना कोव्हिड – १९ या रोगाच्या काळात महाआघाडीचे सरकार जनतेच्या पाठीमागे खंबीरपणे उभे आहे असे दिसते. हे सरकार डोक ठिकाणावर ठेऊन कर्तव्य पार पाडत आहे परंतु बांधवांनो तुम्ही शासकीय आदेश मोडत आहात, तुम्ही जागृत राहत नाही म्हणून कोरोना हा रोग तुमच्यापर्यंत पोहचत आहे. तुम्ही स्वत: ची, कुटुंबाची व इतरांची काळजी घेत नाही. शासनाला सहकार्य करायची आपली सर्वांची जबाबदारी आहे. सरकारला दोष देण्याचे कारण नाही. बांधवानो कोरोना या रोगाची दिवसेंदिवस वाढ होत आहे केवळ आपल्यामुळे शासन, डॉक्टर, आरोग्य कर्मचारी, पोलिस, सफाई कामगार, पत्रकार हे आपल्यासाठी झटत आहेत त्यांना सहकार्य केले पाहिजे. लॉकडाउन वाढवण्यासाठी आपण सर्वस्वी जबाबदार आहोत हे सर्वांनी लक्षात घ्या. वेळेवर रक्त तपासा, तोंडाला मास्क बांधा, सॅनिटायझर चा वापर करा, हात स्वच्छ धुवा, गर्दीत जाऊ नका, मोकाट फिरू नका, कोरोना हा रोग घातक रोग आहे कधी मुळावर उठेल हे सांगता येत नाही. सरकारच्या नावाने बोटे मोडण्यापेक्षा आपणच आपली काळजी घेतली तर अशी आपत्ती येणार नाही. या कोरोना या रोगाच्या काळात मीपणा बाळगू नका, खबरदारी म्हणजेच जबाबदारी आहे. सरकारला दोष देण्यात अर्थ नाही. आपणच आपला रक्षणकर्ता आहे. कोरोना या नावाचा काळ प्रत्येकाच्या अवती भोवती गिरट्या घालत आहे त्याला दूर ठेवण्यास आपण दक्ष राहिले पाहिजे. बांधवांनो आपले डोके ठिकाणावर ठेऊन शासनाच्या आदेशाचे काटेकोरपणे पालन करावे.
जनहितार्थ
अधिक जाहिरातीसाठी
संपर्क
संपादक : मा. श्री. डॉ. अभिमन्यु बी. आठवले
९४२०३०२५६१
उपसंपादक : वैभव अ.
आठवले
साप्ताहिक बहुजन
भूषण, साप्ताहिक बहुजन मित्र वृत्तपत्र
बहुजन राष्ट्रशक्ति
सामाजिक संघटना महाराष्ट्र राज्य
आठवले परिवार
👍👍👍
ReplyDelete