कोरोना कोव्हिड -१९ चे क्वारंटाईन केलेले रुग्ण १४ दिवसानंतर पॉझिटिव्ह चे निगेटिव्ह कसे होतात त्यांना कोणते औषध, गोळ्या, इंजेक्शन दिले जातात ते डॉक्टरांनी जनतेसमोर अहवाल मांडावा
संपादक
सध्या कोरोना कोव्हीड -१९ या रोगाची सगळीकडे भीती पसरली असून
हा रोग ज्या व्यक्तिला झाला आहे त्या व्यक्तीला क्वारंटाईन केले जाते. क्वारंटाईन केल्यानंतर
कोणतेही औषध, गोळ्या, इंजेक्शन दिले जात नाही ते ही रुग्ण
निगेटिव्ह होऊन १४ दिवसांनी घरी जातात व पॉझिटीव्ह व्यक्तींना औषध, गोळ्या, इंजेक्शन डॉक्टर देऊन १४ दिवसात
बरे करतात ते कोणती औषधे, त्या
औषधांची एकूण किंमत किती त्या रुग्णांना १४ दिवसात बरे करण्यासाठी खर्च किती येतो ते
डॉक्टरांनी जनतेसमोर मांडावा. शासनाने ही कोरोना कोव्हिड -१९ या रोगाला जास्त महत्व
देऊ नये. संचारबंदी, जमावबंदी, लॉकडाऊन उठवावे. जनतेला मिळालेले
जीवन त्यांना आनंदाने जगू द्या. कोरोना या रोगाची भीती दाखवून त्यांचा खून करू नका.
त्या व्यक्तींना जीवनातून उठवू नका. हे पाप तुम्हाला क्षमा करणार नाही हा कोरोना रोग
क्षुल्लक रोग आहे याला घाबरण्याचे काहीच कारण नाही. जनतेची सरकारला एवढी काळजी आहे
तर जनतेवर दंडात्मक कारवाई करण्याचे आदेश पोलिस खात्याला का देता? त्यांच्याकडून दंडात्मक कारवाई करून
लाखो रूपयांचा दंड जनतेकडून का आकारता? कोरोनाचे नाव मोठे आणि लक्षण खोटे ही अफवा आहे असे माझे मत आहे. जनतेची पिळवणूक
करणे हे सरकारने ठरवलेले दिसते. कोरोना या रोगाची दास्ती हे सरकार दावत आहे त्यामुळे
अनेक व्यक्ति दगावत आहेत. जर कोरोना झालेला व्यक्ति १४ दिवसात बरे होत असेल तर महागडी
किमतीची औषधे, गोळ्या, इंजेक्शन वापरले पाहिजे परंतु तसे
काहीही डॉक्टर करीत नाहीत. फक्त क्वारंटाईन केले जाते व १४ दिवसांनी घरी जाण्यास सांगितले
जाते. केवळ हा रोग घालवण्यासाठी त्या रूग्णाला निवांत क्षण हेच औषध व इलाज वरदान ठरू
शकतो आणि जर कोरोना या रोगाचे रुग्ण बरे करण्यासाठी भरमसाठ किमतीचे औषध उपचार केल्याशिवाय
तर रुग्ण बरे होणार नाहीत. मग कोणते महागडे किमतीची औषधे दिली गेली त्याचा अहवाल बरे
झालेल्या रूग्णाला डॉक्टरांनी द्यावा. तसेच सरकार म्हणते की, कोरोना या रोगावर औषध लस नाही मग
हे औषध,गोळ्या, इंजेक्शन कोठून आणतात त्याचा तपशील
द्यावा. एकूण खर्च रुग्ण बरे होईपर्यंत किती येतो हे जनतेसमोर मांडावे. तसेच पॉझिटिव्ह
व्यक्ति व संपर्कात आलेल्या व क्वारंटाईन केलेल्या व्यक्तींना शासनाने चहा नाष्टा, दोन वेळचे जेवण, औषध उपचार व आर्थिक नुकसान म्हणून
दिवसाला २०० रुपये भत्ता देण्यात यावा
जनहितार्थ
अधिक जाहिरातीसाठी
संपर्क
संपादक : मा. श्री. डॉ. अभिमन्यु बी. आठवले
९४२०३०२५६१
उपसंपादक : वैभव अ.
आठवले
साप्ताहिक बहुजन
भूषण, साप्ताहिक बहुजन मित्र वृत्तपत्र
बहुजन राष्ट्रशक्ति
सामाजिक संघटना महाराष्ट्र राज्य
आठवले परिवार
Comments
Post a Comment