Skip to main content

मी जे लिहतो ते माझे स्वतंत्र विचार असतात व निर्भिडपणे मांडणे हे माझे कर्तव्य समजतो

मा. श्री. डॉ. अभिमन्यु बी. आठवले 

संपादक

          मी उच्च शिक्षण अत्यंत गरिबीतून घेतले. जवळपास ७०० लेखकांची पुस्तके, अनेक लेखकांचे लेख वाचले असून त्यामुळे मी अवांतर वाचन केले. त्यामुळे मला माझे विचार मवाळवादी असो वा जहालवादी त्यामध्ये परिवर्तनवादी, प्रबोधनवादी सामावलेले असतात. मी जे लिहतो त्यामध्ये कोणाचा द्वेष, मत्सर, टीका टिपणी, मतभेद असे काहीच नसते. पण मला एक चीड येत आहे की, खरे बोलणे, खरे लिहणे यावरती ०५/०३/२०१५ रोजी माझ्याच समाजातील काही मोजक्या समाजकंटकाने मी लिहलेल्या लेखावर आक्षेप घेऊन समाजात चुकीची माहिती पसरवून हल्ला केला. हल्ला केल्याने मी भीत नाही किंवा माझे विचार मेले नाहीत. हल्ल्यामुळे मी जोमाने सडेतोड विचार लिहण्यासाठी उलट मला बळ मिळाले. परंतु वाईट वाटते की, मी परिवर्तनवादी विचार मांडले होते त्यामध्ये गैर काही नव्हते असे असताना माझ्यावरती माझ्याच समाजाने हल्ला करावा ही चिंताजनक बाब आहे. त्यामुळे मी कधीही त्यांना माफ करणार नाही व कधीच चांगले म्हणणार नाही ही माझी भीम प्रतिज्ञा आहे असो. कोणावर काय लिहायचे हे मला चांगले समजते. माझ्या विचारात धमक आहे, माझ्या विचाराने समाजकंटक घायाळ होत असतील तर माझे विचार सडेतोड व निर्भिडपणे जे दिसेल तेच लिहतो ही माझ्या विचाराची सिदोरी मी समजतो. माझे विचार हे आजूबाजूला घडत असलेल्या, दिसत असलेल्या परिस्थितीवरती अवलंबून असतात. माझे विचार बहुजन समाजातील युवक वर्ग, वडीलधारी मंडळी, मित्र मंडळी मोठ्या प्रमाणात वाचतात. माझे विचार मांडण्याचे स्वातंत्र्य मला आहे. माझे विचार वाचतील, सोडून देतील त्यामुळे वाचकांचा तिरस्कार मी करणार नाही. मी अभ्यासू वृत्तीने  विचार विषय निवडून लिहीत असतो त्यावरती प्रकाश टाकत असतो. चांगले विचार, चांगले काम पात्रताहीन लोकांना कधीच आवडत नसते हे ग्राह्य धरूनच मी लिहीत असतो. परंतु मी जे लिहतो त्याप्रमाणे शब्दाचा, वाक्याचा अर्थ मी आणि मीच सांगू शकतो एवढी माझ्याकडे थोडीफार बुद्धीमत्ता आहे. तलवारीने घायाळ करण्यापेक्षा पेनातील शाईने माझे विचार घायाळ करतात, परिवर्तन घडवितात. माझ्याकडे असलेली विचारसरणी त्यामध्ये प्रेरणादायी, स्पृतीदायी, आनंददायी विचाराची देवाणघेवाण असते. मी लिहीत असलेल्या विचारामुळे मला गर्व नाही. मला शाबासकी मिळेल. माझे मोठेपण होईल, माझे नाव होईल ही लक्षणे मला योग्य वाटत नाहीत व ती मला मान्य ही नाहीत. मी चालवीत असलेल्या पेनातील लेखणीतून जे शब्द, विचार लिहले जातात ते मला समाधान मिळवून देतात. सध्या तलवारीची क्रांति ही महत्वाची नसून विचाराची क्रांति महत्वाची आहे. माझे विचार हे विषयानुसार लेखणीतून लिहले जातात व बघताबघता लेख तयार होतो. योग्य, अयोग्य, प्रगति, अधोगती, परिस्थिती, घटना, प्रसंग, चालू घडामोडी यावरती लिहीत असतो. विचारधारा, संवाद हे महत्वाचे आहे त्यासाठी अवांतर वाचन करणे काळाची गरज आहे त्यामुळे बुद्धिमत्ता तेज राहते व आनंद मिळतो.

             जनहितार्थ

अधिक जाहिरातीसाठी संपर्क

संपादक : मा. श्री. डॉ. अभिमन्यु बी. आठवले

९४२०३०२५६१

उपसंपादक : वैभव अ. आठवले

साप्ताहिक बहुजन भूषण, साप्ताहिक बहुजन मित्र वृत्तपत्र

बहुजन राष्ट्रशक्ति सामाजिक संघटना महाराष्ट्र राज्य

आठवले परिवार


Comments

Popular posts from this blog

नातेपुते पोलीस ठाणेकडील गुन्हे प्रकटीकरण शाखेची आदर्श कामगिरी चंदन चोरी करणा-या आरोपीस २४ तासात केले जेरबंद

  उपसंपादक: वैभव आठवले साप्ताहिक बहुजन भूषण वृत्तपत्र नातेपुते पोलिस स्टेशन यांचेकडून मिळालेल्या माहितीनुसार      नातेपुते पोलीस ठाणे हददीमध्ये मौजे मांडवे, ता.माळशिरस येथे राजन सुकुमार दोशी यांचे शेतातील दिनांक २६/०६/२०२५ रोजी सकाळी ०८/०० वा ते सायंकाळी ०५/००वा. चे दरम्यान शेतातील बांधावरील १० वर्षे वयाची ०२ चंदनाची झाडे अंदाजे किंमत २७,०००/- रू चे कोणीतरी अज्ञात चोरटयाने चोरून नेली आहेत त्याबाबत फिर्यादी नामे राजन सुकुमार दोशी रा.नातेपुते, ता.माळशिरस, जि.सोलापुर यांचे फिर्यादीवरुन नातेपुते पोलीस ठाणेस गु.र.नं. २३७/२०२५ भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ३०३ (२) प्रमाणे दिनांक २६/०६/२०२५ रोजी गुन्हा दाखल झाला होता. सदर गुन्हयाचा तपास पोहेकॉ/१७०८ विकास बाबर हे करीत होते.      नातेपुते पोलीस ठाणेचे गुन्हे प्रकटीकरण शाखेचे अंमलदार यांनी सदर गुन्हयाचा तपास दरम्यान मिळालेल्या गोपनिय बातमीव्दारे माहीती काढून इसम नामे १) गोविंद दुर्याधन काळे २) मेघराज ज्ञानदेव भोसले दोघे रा माळशिरस यांनी गुन्हा केल्याचे निष्पन्न झाल्याने त्यास पोहकॉ/१७०८ बाबर व गुन्हे प्रकटीक...

नातेपुते पोलीस ठाणेकडून जबरी चोरी करणा-या आरोपीस २४ तासाच्या आत केले जेरबंद

उपसंपादक: वैभव आठवले (साप्ताहिक बहुजन भूषण वृत्तपत्र) नातेपुते पोलीस ठाणे यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार      नातेपुते पोलीस ठाणे हददीमध्ये मौजे नातेपुते, ता.माळशिरस येथे दिनांक ०३/०४/२०२५ रोजी सायकाळी ०७.३० वा सुमारास गुन्ह्यातील फिर्यादी नामे वैभव विठ्ठल नष्टे वय ३१ वर्षे, रा. माळशिरस ता. माळशिरस जि. सोलापुर व सोबत त्यांची आई माया नष्टे असे त्यांचेकडील स्कुटी गाडी क्र. एम.एच. ४५ ए.व्ही. १२६१ यावरुन नातेपुते परिसरात शिंगणापुर पाटी ते बायपास रोड मार्गे नातेपुते फडतरी जाणारे बायपास रोडवर आले असताना दोन अज्ञात इसमांनी त्यांचे पाठीमागुन येऊन फिर्यादीचे आई माया विठल नष्टे याचे गळयातील सोन्याचे दागीने बळजबरीने काढुन घेऊन मोटार सायकल वरुन पळुन गेल्याने त्याबाबत फिर्यादी नामे वैभव विठ्ठल नष्टे वय ३१ वर्षे रा. माळशिरस ता. माळशिरस जि. सोलापुर यांचे फिर्यादीवरुन नातेपुते पोलीस ठाणेस गुरनं १३३/२०२५ भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ३०९ (४), ३ (५) प्रमाणे दिनांक ०८/०४/२०२५ रोजी १८ वा ३९ मि. गुन्हा दाखल झाला होता. सदर गुन्हयाचा तपास गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोना/५६२ राकेश लोहार करीत ...

अतुल कुलकर्णी साहेब पोलीस अधीक्षक, सोलापूर ग्रामीण यांच्या संकल्पनेतून धर्मतुरी, ता.माळशिरस रोडलगत वृक्षारोपण

  उपसंपादक: वैभव आठवले साप्ताहिक बहुजन भूषण वृत्तपत्र नातेपुते पोलिस स्टेशन यांचेकडून मिळालेल्या माहितीनुसार       दिनांक 26/06/2025 रोजी मा. श्री. अतुल कुलकर्णी साहेब पोलीस अधीक्षक ,सोलापूर ग्रामीण यांच्या संकल्पनेतून  व मा. उपविभागीय पोलीस अधिकारी श्री नारायण शिरगावकर उपविभाग माळशिरस यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू करण्यात आलेल्या हरित वारी सन 2025 उपक्रमांतर्गत  नातेपुते पोलीस  ठाणे हद्दीतील  मौजे धर्मपुरी येथे  पालखी मार्गवर हरितवारी अनुषंगाने, माननीय पोलीस अधीक्षक श्री अतुल कुलकर्णी साहेब, यांच्या हस्ते रोडलगत वृक्षारोपण करण्यात आले.       सदर ठिकाणी वृक्षारोपण करिता गावातील सरपंच,शेतकरी व गावातील प्रतिष्ठित नागरिक तसेच  पोलीस पाटील, पोलीस मित्र, ग्राम सुरक्षा दल यांच्या उपस्थितीत हरित वारी उपक्रम संपन्न झाला आहे. बातमी अधिक जाहिरातीसाठी संपर्क संपादक : मा.श्री. डॉ. अभिमन्यु बी. आठवले ९४२०३०२५६१ उपसंपादक : वैभव अ. आठवले साप्ताहिक बहुजन भूषण ,  साप्ताहिक बहुजन मित्र वृत्तपत्र संस्थापक :  बहुजन राष्ट्रशक्ति साम...