Skip to main content

ज्या ग्रामपंचायतचा पाच वर्षाचा कालावधी संपला आहे त्यावरती सामाजिक कार्यकर्त्याची प्रशासक म्हणून नेमणूक करावी यासाठी शासनाने आदेशाचे परिपत्रक काढावे

संपादक

          महाराष्ट्र राज्यातील ज्या ग्रामपंचायतचा पाच वर्षाचा कालावधी संपला आहे. सध्याच्या या कोरोना कोव्हिड-१९ या रोगाच्या काळात ग्रामपंचायत निवडणुका घेणे योग्य नाही असे शासनाचे मत आहे त्यामुळे त्याच गावातील स्वच्छ, पारदर्शी, उच्चशिक्षण, एक आदर्श सामाजिक कार्यकर्ता असे असलेला त्याच गावातील ग्रामपंचायतीवर प्रशासक म्हणून त्या सामाजिक कार्यकर्त्याची नेमणूक करण्यात यावी. यामध्ये जिल्हा परिषदेच्या मुख्यकार्यकारी अधिकारी यांनाच तो अधिकार असावा. त्यामध्ये राजकीय पुढार्‍यांचा हस्तक्षेप नको. प्रशासक नेमताना तो अडाणी, कमी शिकलेला, अवैध धंदे करणारा व गुन्हेगारी वृत्तीचा नसावा. त्यागावातील जनतेच्या अडीअडचणी सोडविणारा गावाचा विकास करणारा व त्या विकासाची माहिती असणारा असावा. ज्या ग्रामपंचायतचा पाच वर्षाचा कार्यकाळ संपला आहे त्यातील कोणत्याही सरपंच, उपसरपंच, सदस्य यांना अधिकार देऊ नयेत व प्रशासक म्हणून नियुक्ती करू नये असे वाटते. सामाजिक कार्यकर्त्याला प्रशासक म्हणून नेमण्यात यावे तसेच पोलिस पाटला सारखी परीक्षा प्रशासक पदासाठी घेण्यात यावी. त्यामुळे जे चांगल्या पद्धतीने जो पास होईल त्याची नेमणूक मुख्यकार्यकारी अधिकारी यांनी करावी म्हणजे वादावाद होणार नाही व कोणत्याही राजकीय पक्षाचा हस्तक्षेप चालणार नाही. सध्या प्रशासक नेमण्यासाठी पालकमंत्री व मुख्यकार्यकारी अधिकारी यांचाकडे अधिकार शासनाने दिले आहेत. यामुळे काही सामाजिक कार्यकर्त्यांनी कोर्टात याचिका दाखल केले आहेत असे कळते. त्यामुळे कार्यकाल संपलेल्या ग्रामपंचायतला त्वरित बडतर्फ करून सामाजिक कार्यकर्ते यांना त्या ग्रामपंचायत वर प्रशासक म्हणून नेमणूक करावी असे वाटते. ज्या वेळी आपत्तीची काळ अगर आषाढी वारी सारखा सोहळा असतो त्या वेळीला स्वयंसेवक म्हणून शासनाला सहकार्य करण्यासाठी सामाजिक कार्यकर्त्यांना संधी दिली जाते त्याच पद्धतीने कार्यकर्त्यांना ग्रामपंचायतची मुदत संपलेली आहे. अशा ग्रामपंचायत वरती प्रशासक म्हणून नेमणूक व्हावी. प्रशासक परीक्षेसाठी त्याच गावातील कार्यकर्त्याकडून अर्ज मागवून घ्यावेत यासाठी शासनाने मुख्यकार्यकारी अधिकारी यांना आदेश द्यावेत असे वाटते. 

     जनहितार्थ

अधिक जाहिरातीसाठी संपर्क

संपादक : मा. श्री. डॉ. अभिमन्यु बी. आठवले

९४२०३०२५६१

उपसंपादक : वैभव अ. आठवले

साप्ताहिक बहुजन भूषण, साप्ताहिक बहुजन मित्र वृत्तपत्र

बहुजन राष्ट्रशक्ति सामाजिक संघटना महाराष्ट्र राज्य

आठवले परिवार

 

 

Comments

Popular posts from this blog

नातेपुते पोलीस ठाणेकडील गुन्हे प्रकटीकरण शाखेची आदर्श कामगिरी चंदन चोरी करणा-या आरोपीस २४ तासात केले जेरबंद

  उपसंपादक: वैभव आठवले साप्ताहिक बहुजन भूषण वृत्तपत्र नातेपुते पोलिस स्टेशन यांचेकडून मिळालेल्या माहितीनुसार      नातेपुते पोलीस ठाणे हददीमध्ये मौजे मांडवे, ता.माळशिरस येथे राजन सुकुमार दोशी यांचे शेतातील दिनांक २६/०६/२०२५ रोजी सकाळी ०८/०० वा ते सायंकाळी ०५/००वा. चे दरम्यान शेतातील बांधावरील १० वर्षे वयाची ०२ चंदनाची झाडे अंदाजे किंमत २७,०००/- रू चे कोणीतरी अज्ञात चोरटयाने चोरून नेली आहेत त्याबाबत फिर्यादी नामे राजन सुकुमार दोशी रा.नातेपुते, ता.माळशिरस, जि.सोलापुर यांचे फिर्यादीवरुन नातेपुते पोलीस ठाणेस गु.र.नं. २३७/२०२५ भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ३०३ (२) प्रमाणे दिनांक २६/०६/२०२५ रोजी गुन्हा दाखल झाला होता. सदर गुन्हयाचा तपास पोहेकॉ/१७०८ विकास बाबर हे करीत होते.      नातेपुते पोलीस ठाणेचे गुन्हे प्रकटीकरण शाखेचे अंमलदार यांनी सदर गुन्हयाचा तपास दरम्यान मिळालेल्या गोपनिय बातमीव्दारे माहीती काढून इसम नामे १) गोविंद दुर्याधन काळे २) मेघराज ज्ञानदेव भोसले दोघे रा माळशिरस यांनी गुन्हा केल्याचे निष्पन्न झाल्याने त्यास पोहकॉ/१७०८ बाबर व गुन्हे प्रकटीक...

नातेपुते पोलीस ठाणेकडून जबरी चोरी करणा-या आरोपीस २४ तासाच्या आत केले जेरबंद

उपसंपादक: वैभव आठवले (साप्ताहिक बहुजन भूषण वृत्तपत्र) नातेपुते पोलीस ठाणे यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार      नातेपुते पोलीस ठाणे हददीमध्ये मौजे नातेपुते, ता.माळशिरस येथे दिनांक ०३/०४/२०२५ रोजी सायकाळी ०७.३० वा सुमारास गुन्ह्यातील फिर्यादी नामे वैभव विठ्ठल नष्टे वय ३१ वर्षे, रा. माळशिरस ता. माळशिरस जि. सोलापुर व सोबत त्यांची आई माया नष्टे असे त्यांचेकडील स्कुटी गाडी क्र. एम.एच. ४५ ए.व्ही. १२६१ यावरुन नातेपुते परिसरात शिंगणापुर पाटी ते बायपास रोड मार्गे नातेपुते फडतरी जाणारे बायपास रोडवर आले असताना दोन अज्ञात इसमांनी त्यांचे पाठीमागुन येऊन फिर्यादीचे आई माया विठल नष्टे याचे गळयातील सोन्याचे दागीने बळजबरीने काढुन घेऊन मोटार सायकल वरुन पळुन गेल्याने त्याबाबत फिर्यादी नामे वैभव विठ्ठल नष्टे वय ३१ वर्षे रा. माळशिरस ता. माळशिरस जि. सोलापुर यांचे फिर्यादीवरुन नातेपुते पोलीस ठाणेस गुरनं १३३/२०२५ भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ३०९ (४), ३ (५) प्रमाणे दिनांक ०८/०४/२०२५ रोजी १८ वा ३९ मि. गुन्हा दाखल झाला होता. सदर गुन्हयाचा तपास गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोना/५६२ राकेश लोहार करीत ...

अतुल कुलकर्णी साहेब पोलीस अधीक्षक, सोलापूर ग्रामीण यांच्या संकल्पनेतून धर्मतुरी, ता.माळशिरस रोडलगत वृक्षारोपण

  उपसंपादक: वैभव आठवले साप्ताहिक बहुजन भूषण वृत्तपत्र नातेपुते पोलिस स्टेशन यांचेकडून मिळालेल्या माहितीनुसार       दिनांक 26/06/2025 रोजी मा. श्री. अतुल कुलकर्णी साहेब पोलीस अधीक्षक ,सोलापूर ग्रामीण यांच्या संकल्पनेतून  व मा. उपविभागीय पोलीस अधिकारी श्री नारायण शिरगावकर उपविभाग माळशिरस यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू करण्यात आलेल्या हरित वारी सन 2025 उपक्रमांतर्गत  नातेपुते पोलीस  ठाणे हद्दीतील  मौजे धर्मपुरी येथे  पालखी मार्गवर हरितवारी अनुषंगाने, माननीय पोलीस अधीक्षक श्री अतुल कुलकर्णी साहेब, यांच्या हस्ते रोडलगत वृक्षारोपण करण्यात आले.       सदर ठिकाणी वृक्षारोपण करिता गावातील सरपंच,शेतकरी व गावातील प्रतिष्ठित नागरिक तसेच  पोलीस पाटील, पोलीस मित्र, ग्राम सुरक्षा दल यांच्या उपस्थितीत हरित वारी उपक्रम संपन्न झाला आहे. बातमी अधिक जाहिरातीसाठी संपर्क संपादक : मा.श्री. डॉ. अभिमन्यु बी. आठवले ९४२०३०२५६१ उपसंपादक : वैभव अ. आठवले साप्ताहिक बहुजन भूषण ,  साप्ताहिक बहुजन मित्र वृत्तपत्र संस्थापक :  बहुजन राष्ट्रशक्ति साम...