संपादक
सध्याच्या
काळात माणसावर अनेक संकटावर संकटे येत आहे त्यासाठी कुटुंबाला जगवण्यासाठी घरातील
कर्ता पुरुष त्या अडचणी सोडवण्यासाठी एखाद्याकडून कर्ज घेणे, त्या कर्जाचा ताणतणाव येणे
त्यामुळे व्यसनाच्या आहारी जाणे,
कामधंदा न करता सतत इतरांकडून आर्थिक देवाण घेवाण करणे. पाणी अभावी शेती मध्ये
काहीच करता न येणे, मुलामुलीचे लग्ने, शिक्षणाचा खर्च अशा विविध
समस्या घरातील कर्ता पुरुष या नात्याने असतात पण हे कशामुळे तर स्वत: च्या आळशी
पणामुळे काम धंदा न करता सतत दुसर्याकडून आर्थिक मदत घ्यायची आणि घर परपंचा
चालवायचा हेच काम या पुरुषाचे असते. त्यामुळे घेतलेले पैसे देता येत नसल्यामुळे
कुटुंबाला वेठीस धरायचे घरात सतत भांडणतंटे यामुळे तो माणूस आत्महत्या करायचा
विचार करतो. मिळालेले जीवन अर्ध्यावर सोडून पत्नीचा, आई, वडील, भाऊ, भावजय, मुले, नातेवाईक यांचा विचार न करता
जीवन संपवतो व आपण सुटलो. माझ्या मागे या कुटुंबाचे काही होवो न होवो याची मला
काळजी नाही असे मनात आणून अनमोल जीवन संपवतो. परंतु जीवन संपवण्यापूर्वी जर विचार
केला असता की, कष्ट करून उपाशी
तापाशी कुटुंबाला जगवणे परंतु काही काम करायचे नाही, कर्जबाजारी होयचे आणि त्याचे टेंशन घ्यायचे आणि मरण जवळ करायचे ही मानसिकता
निर्माण झालेली असते. जीवनात अनंत अडचणी येत असतात त्यासाठी संघर्ष महत्वाचा असतो.
टेंशन आहे म्हणून पुरुषांनी व्यसनाच्या आहारी जायाचे मग घरातील पत्नी मुले यांना
टेंशन येत नसेल का? त्यांनी काय करावे? ज्या पुरूषांना गंभीर आजार आहे
त्याला बरे होण्यासाठी खर्च करता येत नाही. परिस्थिति बिकट असते, वेदना सहन करू शकत नाही व
कुटुंबाला आपला त्रास नको म्हणून टोकाची भूमिका घेऊन पुरुष आत्महत्या करतो हे
वेगळे आहे ही त्याची मानसिकता किंवा येणारी आर्थिक अडचण. बांधवांनो कामधंदा करा, परिस्थिति पाहून काम करा, व्यसन करू नका, व्यसनाच्या आहारी जाऊन स्वत: चे
व कुटुंबाचे नुकसान करू नका,
मिळालेले जीवन आनंदाने जगा,
जन्म आहे म्हणजे मरण हे आहे परंतु अर्ध्यावरती कंटाळून जीवन संपवू नका त्यामध्ये
पुरुषार्थ नाही तर तो नामर्द आहे. आत्महत्या करण्यापूर्वी का विचार केला नाही आपण
काम धंदा केला पाहिजे,
कोणाकडून आर्थिक पैसे व्याजाने घेऊ नये आपल्याला मानसिक त्रास होऊ नये. यामुळे आपले व आपल्या कुटुंबाचे
नुकसान होईल इ. कारणे आत्महत्येचा विचार करण्यापूर्वी केला तर ही वेळ येणारच नाही
यासाठी काळजी करावी. बांधवांनो जीवन एकदाच आहे याचा विचार करा परंतु आत्महत्याचे
पाऊल उचलू नका हीच अपेक्षा...!
जनहितार्थ
अधिक जाहिरातीसाठी
संपर्क
संपादक : मा. श्री. डॉ. अभिमन्यु बी. आठवले
९४२०३०२५६१
उपसंपादक : वैभव अ.
आठवले
साप्ताहिक बहुजन
भूषण, साप्ताहिक बहुजन मित्र वृत्तपत्र
बहुजन राष्ट्रशक्ति
सामाजिक संघटना महाराष्ट्र राज्य
आठवले परिवार
Comments
Post a Comment