Skip to main content

आत्महत्या करणारे पुरुष हे नामर्द पणाचे लक्षण ठरू शकते

संपादक

          सध्याच्या काळात माणसावर अनेक संकटावर संकटे येत आहे त्यासाठी कुटुंबाला जगवण्यासाठी घरातील कर्ता पुरुष त्या अडचणी सोडवण्यासाठी एखाद्याकडून कर्ज घेणे, त्या कर्जाचा ताणतणाव येणे त्यामुळे व्यसनाच्या आहारी जाणे, कामधंदा न करता सतत इतरांकडून आर्थिक देवाण घेवाण करणे. पाणी अभावी शेती मध्ये काहीच करता न येणे, मुलामुलीचे लग्ने, शिक्षणाचा खर्च अशा विविध समस्या घरातील कर्ता पुरुष या नात्याने असतात पण हे कशामुळे तर स्वत: च्या आळशी पणामुळे काम धंदा न करता सतत दुसर्‍याकडून आर्थिक मदत घ्यायची आणि घर परपंचा चालवायचा हेच काम या पुरुषाचे असते. त्यामुळे घेतलेले पैसे देता येत नसल्यामुळे कुटुंबाला वेठीस धरायचे घरात सतत भांडणतंटे यामुळे तो माणूस आत्महत्या करायचा विचार करतो. मिळालेले जीवन अर्ध्यावर सोडून पत्नीचा, आई, वडील, भाऊ, भावजय, मुले, नातेवाईक यांचा विचार न करता जीवन संपवतो व आपण सुटलो. माझ्या मागे या कुटुंबाचे काही होवो न होवो याची मला काळजी नाही असे मनात आणून अनमोल जीवन संपवतो. परंतु जीवन संपवण्यापूर्वी जर विचार केला असता की, कष्ट करून उपाशी तापाशी कुटुंबाला जगवणे परंतु काही काम करायचे नाही, कर्जबाजारी होयचे आणि त्याचे टेंशन घ्यायचे आणि मरण जवळ करायचे ही मानसिकता निर्माण झालेली असते. जीवनात अनंत अडचणी येत असतात त्यासाठी संघर्ष महत्वाचा असतो. टेंशन आहे म्हणून पुरुषांनी व्यसनाच्या आहारी जायाचे मग घरातील पत्नी मुले यांना टेंशन येत नसेल का? त्यांनी काय करावे? ज्या पुरूषांना गंभीर आजार आहे त्याला बरे होण्यासाठी खर्च करता येत नाही. परिस्थिति बिकट असते, वेदना सहन करू शकत नाही व कुटुंबाला आपला त्रास नको म्हणून टोकाची भूमिका घेऊन पुरुष आत्महत्या करतो हे वेगळे आहे ही त्याची मानसिकता किंवा येणारी आर्थिक अडचण. बांधवांनो कामधंदा करा, परिस्थिति पाहून काम करा, व्यसन करू नका, व्यसनाच्या आहारी जाऊन स्वत: चे व कुटुंबाचे नुकसान करू नका, मिळालेले जीवन आनंदाने जगा, जन्म आहे म्हणजे मरण हे आहे परंतु अर्ध्यावरती कंटाळून जीवन संपवू नका त्यामध्ये पुरुषार्थ नाही तर तो नामर्द आहे. आत्महत्या करण्यापूर्वी का विचार केला नाही आपण काम धंदा केला पाहिजे, कोणाकडून आर्थिक पैसे व्याजाने घेऊ नये आपल्याला मानसिक त्रास होऊ नये. यामुळे आपले व आपल्या कुटुंबाचे नुकसान होईल इ. कारणे आत्महत्येचा विचार करण्यापूर्वी केला तर ही वेळ येणारच नाही यासाठी काळजी करावी. बांधवांनो जीवन एकदाच आहे याचा विचार करा परंतु आत्महत्याचे पाऊल उचलू नका हीच अपेक्षा...!     

जनहितार्थ

अधिक जाहिरातीसाठी संपर्क

संपादक : मा. श्री. डॉ. अभिमन्यु बी. आठवले

९४२०३०२५६१

उपसंपादक : वैभव अ. आठवले

साप्ताहिक बहुजन भूषण, साप्ताहिक बहुजन मित्र वृत्तपत्र

बहुजन राष्ट्रशक्ति सामाजिक संघटना महाराष्ट्र राज्य

आठवले परिवार

 


Comments

Popular posts from this blog

नातेपुते पोलीस ठाणेकडील गुन्हे प्रकटीकरण शाखेची आदर्श कामगिरी चंदन चोरी करणा-या आरोपीस २४ तासात केले जेरबंद

  उपसंपादक: वैभव आठवले साप्ताहिक बहुजन भूषण वृत्तपत्र नातेपुते पोलिस स्टेशन यांचेकडून मिळालेल्या माहितीनुसार      नातेपुते पोलीस ठाणे हददीमध्ये मौजे मांडवे, ता.माळशिरस येथे राजन सुकुमार दोशी यांचे शेतातील दिनांक २६/०६/२०२५ रोजी सकाळी ०८/०० वा ते सायंकाळी ०५/००वा. चे दरम्यान शेतातील बांधावरील १० वर्षे वयाची ०२ चंदनाची झाडे अंदाजे किंमत २७,०००/- रू चे कोणीतरी अज्ञात चोरटयाने चोरून नेली आहेत त्याबाबत फिर्यादी नामे राजन सुकुमार दोशी रा.नातेपुते, ता.माळशिरस, जि.सोलापुर यांचे फिर्यादीवरुन नातेपुते पोलीस ठाणेस गु.र.नं. २३७/२०२५ भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ३०३ (२) प्रमाणे दिनांक २६/०६/२०२५ रोजी गुन्हा दाखल झाला होता. सदर गुन्हयाचा तपास पोहेकॉ/१७०८ विकास बाबर हे करीत होते.      नातेपुते पोलीस ठाणेचे गुन्हे प्रकटीकरण शाखेचे अंमलदार यांनी सदर गुन्हयाचा तपास दरम्यान मिळालेल्या गोपनिय बातमीव्दारे माहीती काढून इसम नामे १) गोविंद दुर्याधन काळे २) मेघराज ज्ञानदेव भोसले दोघे रा माळशिरस यांनी गुन्हा केल्याचे निष्पन्न झाल्याने त्यास पोहकॉ/१७०८ बाबर व गुन्हे प्रकटीक...

नातेपुते पोलीस ठाणेकडून जबरी चोरी करणा-या आरोपीस २४ तासाच्या आत केले जेरबंद

उपसंपादक: वैभव आठवले (साप्ताहिक बहुजन भूषण वृत्तपत्र) नातेपुते पोलीस ठाणे यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार      नातेपुते पोलीस ठाणे हददीमध्ये मौजे नातेपुते, ता.माळशिरस येथे दिनांक ०३/०४/२०२५ रोजी सायकाळी ०७.३० वा सुमारास गुन्ह्यातील फिर्यादी नामे वैभव विठ्ठल नष्टे वय ३१ वर्षे, रा. माळशिरस ता. माळशिरस जि. सोलापुर व सोबत त्यांची आई माया नष्टे असे त्यांचेकडील स्कुटी गाडी क्र. एम.एच. ४५ ए.व्ही. १२६१ यावरुन नातेपुते परिसरात शिंगणापुर पाटी ते बायपास रोड मार्गे नातेपुते फडतरी जाणारे बायपास रोडवर आले असताना दोन अज्ञात इसमांनी त्यांचे पाठीमागुन येऊन फिर्यादीचे आई माया विठल नष्टे याचे गळयातील सोन्याचे दागीने बळजबरीने काढुन घेऊन मोटार सायकल वरुन पळुन गेल्याने त्याबाबत फिर्यादी नामे वैभव विठ्ठल नष्टे वय ३१ वर्षे रा. माळशिरस ता. माळशिरस जि. सोलापुर यांचे फिर्यादीवरुन नातेपुते पोलीस ठाणेस गुरनं १३३/२०२५ भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ३०९ (४), ३ (५) प्रमाणे दिनांक ०८/०४/२०२५ रोजी १८ वा ३९ मि. गुन्हा दाखल झाला होता. सदर गुन्हयाचा तपास गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोना/५६२ राकेश लोहार करीत ...

अतुल कुलकर्णी साहेब पोलीस अधीक्षक, सोलापूर ग्रामीण यांच्या संकल्पनेतून धर्मतुरी, ता.माळशिरस रोडलगत वृक्षारोपण

  उपसंपादक: वैभव आठवले साप्ताहिक बहुजन भूषण वृत्तपत्र नातेपुते पोलिस स्टेशन यांचेकडून मिळालेल्या माहितीनुसार       दिनांक 26/06/2025 रोजी मा. श्री. अतुल कुलकर्णी साहेब पोलीस अधीक्षक ,सोलापूर ग्रामीण यांच्या संकल्पनेतून  व मा. उपविभागीय पोलीस अधिकारी श्री नारायण शिरगावकर उपविभाग माळशिरस यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू करण्यात आलेल्या हरित वारी सन 2025 उपक्रमांतर्गत  नातेपुते पोलीस  ठाणे हद्दीतील  मौजे धर्मपुरी येथे  पालखी मार्गवर हरितवारी अनुषंगाने, माननीय पोलीस अधीक्षक श्री अतुल कुलकर्णी साहेब, यांच्या हस्ते रोडलगत वृक्षारोपण करण्यात आले.       सदर ठिकाणी वृक्षारोपण करिता गावातील सरपंच,शेतकरी व गावातील प्रतिष्ठित नागरिक तसेच  पोलीस पाटील, पोलीस मित्र, ग्राम सुरक्षा दल यांच्या उपस्थितीत हरित वारी उपक्रम संपन्न झाला आहे. बातमी अधिक जाहिरातीसाठी संपर्क संपादक : मा.श्री. डॉ. अभिमन्यु बी. आठवले ९४२०३०२५६१ उपसंपादक : वैभव अ. आठवले साप्ताहिक बहुजन भूषण ,  साप्ताहिक बहुजन मित्र वृत्तपत्र संस्थापक :  बहुजन राष्ट्रशक्ति साम...