Skip to main content

वाढदिवसातून मैत्री घट्ट बनते

 

संपादक

          सध्या सोशल मीडियाच्या माध्यमातून एकमेकांच्या जन्म तारखा समजत असून त्यामुळे आपल्या मित्राचे, नेत्यांचे वाढदिवस साजरे करण्यासाठी मित्रच मित्रासाठी एकत्र येऊन वाढदिवस साजरे करीत असतात हा अविस्मरणीय क्षण असतो. या वाढदिवसामुळे एकसंघपणा, एकीचेबळ निर्माण होताना दिसते. पूर्वी नेत्यांच्याच वाढदिवसाला युवक वर्ग जायचा सध्या तशी परिस्थिति राहिली नाही. नेत्याला मागे टाकून आपले मित्रच, आपले नेते, सामाजिक कार्यकर्ते असे समजून एकमेकांचे वाढदिवस मोठ्या प्रमाणात साजरे करताना दिसतात खूप बरे वाटते. या वाढदिवसामुळे जात,पात, धर्म असा भेदभाव उरत नाही. सर्व मिळून मित्रच मित्राच्या वाढदिवसाचे औचित्य साधून वाढदिवस साजरा करतात. प्रत्येकाच्या चेहरावरती आनंद दिसून येतो. सर्व मित्र मंडळी अगदी मित्राच्या वाढदिवसामुळे खुश असताना दिसतात. सध्या मित्र आपल्या मित्राचे वाढदिवस नेत्यांच्या वाढदिवसापेक्षाही जोरात साजरे करतात. नेत्यांच्या वाढदिवसाला सध्या युवकांची पसंती दिसत नाही मात्र मित्रांच्या वाढदिवसाला मित्रांची पसंती मोठ्या प्रमाणात दिसत आहे. या वाढदिवसामुळे युवकांचे मोठी फळी निर्माण होताना दिसते. सामाजिक कार्यात युवक सर्व मिळून मिसळून आपले कर्तव्य समजून काम करतात. वाढदिवसातून मैत्री घट्ट बनते, माणुसकी दिसून येते, युवक नेत्यांच्या वाढदिवसाला शुभेच्छा देतात पण नेते मंडळी युवकांच्या वाढदिवसाला शुभेच्छा देत नाहीत ही खंत वाटते. त्यामुळे युवक आपल्या मित्राचे नेत्यापेक्षाही मोठा  वाढदिवस साजरा करून आनंद घेतात. वाढदिवस हे निमित्त असते त्यामागे मित्रपणा दडलेला असतो, त्यामध्ये गोडवा असतो, त्यामध्ये उत्साह असतो, दैनंदिन जीवनात दररोज कोणत्याना कोणत्या तरी मित्राचा वाढदिवस असतो त्यामुळे तो साजरा करण्यासाठी मित्रच पुढे येतो. त्यामुळे असंख्य युवकांचे ग्रुप निर्माण होताना दिसतात युवकांची मोठी फळी निर्माण झालेली दिसते. सध्या नेत्यांच्या वाढदिवसाला युवक जास्त महत्व देताना दिसत नाहीत. परंतु मित्रांच्या वाढदिवसाला मित्र भरभरून प्रतिसाद देतात हे आश्चर्य म्हणावे लागेल आणि ही काळाची गरज आहे. वाढदिवसातून मैत्री घट्ट होते, एक जीवाभावाचा मित्र बनतो तो आधार वाटतो. सुखा: दुखा: ला मित्र धावून येतो हेच वाढदिवसाचे महत्व सांगते. मित्रच मित्राचे वाढदिवस दररोज साजरे करताना त्या मित्रांच्या आनंदाला उधाण येते. सर्व मित्र रमून जातात हा वाढदिवसाचा रम्य असा सोहळा आनंद देऊन जातो हे वाढदिवसाच्या निमित्ताने घडते इतकेच...!  

जनहितार्थ

अधिक जाहिरातीसाठी संपर्क

संपादक : मा. श्री. डॉ. अभिमन्यु बी. आठवले

९४२०३०२५६१

उपसंपादक : वैभव अ. आठवले

साप्ताहिक बहुजन भूषण, साप्ताहिक बहुजन मित्र वृत्तपत्र

बहुजन राष्ट्रशक्ति सामाजिक संघटना महाराष्ट्र राज्य

आठवले परिवार

Comments

Popular posts from this blog

नातेपुते पोलीस ठाणेकडील गुन्हे प्रकटीकरण शाखेची आदर्श कामगिरी चंदन चोरी करणा-या आरोपीस २४ तासात केले जेरबंद

  उपसंपादक: वैभव आठवले साप्ताहिक बहुजन भूषण वृत्तपत्र नातेपुते पोलिस स्टेशन यांचेकडून मिळालेल्या माहितीनुसार      नातेपुते पोलीस ठाणे हददीमध्ये मौजे मांडवे, ता.माळशिरस येथे राजन सुकुमार दोशी यांचे शेतातील दिनांक २६/०६/२०२५ रोजी सकाळी ०८/०० वा ते सायंकाळी ०५/००वा. चे दरम्यान शेतातील बांधावरील १० वर्षे वयाची ०२ चंदनाची झाडे अंदाजे किंमत २७,०००/- रू चे कोणीतरी अज्ञात चोरटयाने चोरून नेली आहेत त्याबाबत फिर्यादी नामे राजन सुकुमार दोशी रा.नातेपुते, ता.माळशिरस, जि.सोलापुर यांचे फिर्यादीवरुन नातेपुते पोलीस ठाणेस गु.र.नं. २३७/२०२५ भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ३०३ (२) प्रमाणे दिनांक २६/०६/२०२५ रोजी गुन्हा दाखल झाला होता. सदर गुन्हयाचा तपास पोहेकॉ/१७०८ विकास बाबर हे करीत होते.      नातेपुते पोलीस ठाणेचे गुन्हे प्रकटीकरण शाखेचे अंमलदार यांनी सदर गुन्हयाचा तपास दरम्यान मिळालेल्या गोपनिय बातमीव्दारे माहीती काढून इसम नामे १) गोविंद दुर्याधन काळे २) मेघराज ज्ञानदेव भोसले दोघे रा माळशिरस यांनी गुन्हा केल्याचे निष्पन्न झाल्याने त्यास पोहकॉ/१७०८ बाबर व गुन्हे प्रकटीक...

नातेपुते पोलीस ठाणेकडून जबरी चोरी करणा-या आरोपीस २४ तासाच्या आत केले जेरबंद

उपसंपादक: वैभव आठवले (साप्ताहिक बहुजन भूषण वृत्तपत्र) नातेपुते पोलीस ठाणे यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार      नातेपुते पोलीस ठाणे हददीमध्ये मौजे नातेपुते, ता.माळशिरस येथे दिनांक ०३/०४/२०२५ रोजी सायकाळी ०७.३० वा सुमारास गुन्ह्यातील फिर्यादी नामे वैभव विठ्ठल नष्टे वय ३१ वर्षे, रा. माळशिरस ता. माळशिरस जि. सोलापुर व सोबत त्यांची आई माया नष्टे असे त्यांचेकडील स्कुटी गाडी क्र. एम.एच. ४५ ए.व्ही. १२६१ यावरुन नातेपुते परिसरात शिंगणापुर पाटी ते बायपास रोड मार्गे नातेपुते फडतरी जाणारे बायपास रोडवर आले असताना दोन अज्ञात इसमांनी त्यांचे पाठीमागुन येऊन फिर्यादीचे आई माया विठल नष्टे याचे गळयातील सोन्याचे दागीने बळजबरीने काढुन घेऊन मोटार सायकल वरुन पळुन गेल्याने त्याबाबत फिर्यादी नामे वैभव विठ्ठल नष्टे वय ३१ वर्षे रा. माळशिरस ता. माळशिरस जि. सोलापुर यांचे फिर्यादीवरुन नातेपुते पोलीस ठाणेस गुरनं १३३/२०२५ भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ३०९ (४), ३ (५) प्रमाणे दिनांक ०८/०४/२०२५ रोजी १८ वा ३९ मि. गुन्हा दाखल झाला होता. सदर गुन्हयाचा तपास गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोना/५६२ राकेश लोहार करीत ...

अतुल कुलकर्णी साहेब पोलीस अधीक्षक, सोलापूर ग्रामीण यांच्या संकल्पनेतून धर्मतुरी, ता.माळशिरस रोडलगत वृक्षारोपण

  उपसंपादक: वैभव आठवले साप्ताहिक बहुजन भूषण वृत्तपत्र नातेपुते पोलिस स्टेशन यांचेकडून मिळालेल्या माहितीनुसार       दिनांक 26/06/2025 रोजी मा. श्री. अतुल कुलकर्णी साहेब पोलीस अधीक्षक ,सोलापूर ग्रामीण यांच्या संकल्पनेतून  व मा. उपविभागीय पोलीस अधिकारी श्री नारायण शिरगावकर उपविभाग माळशिरस यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू करण्यात आलेल्या हरित वारी सन 2025 उपक्रमांतर्गत  नातेपुते पोलीस  ठाणे हद्दीतील  मौजे धर्मपुरी येथे  पालखी मार्गवर हरितवारी अनुषंगाने, माननीय पोलीस अधीक्षक श्री अतुल कुलकर्णी साहेब, यांच्या हस्ते रोडलगत वृक्षारोपण करण्यात आले.       सदर ठिकाणी वृक्षारोपण करिता गावातील सरपंच,शेतकरी व गावातील प्रतिष्ठित नागरिक तसेच  पोलीस पाटील, पोलीस मित्र, ग्राम सुरक्षा दल यांच्या उपस्थितीत हरित वारी उपक्रम संपन्न झाला आहे. बातमी अधिक जाहिरातीसाठी संपर्क संपादक : मा.श्री. डॉ. अभिमन्यु बी. आठवले ९४२०३०२५६१ उपसंपादक : वैभव अ. आठवले साप्ताहिक बहुजन भूषण ,  साप्ताहिक बहुजन मित्र वृत्तपत्र संस्थापक :  बहुजन राष्ट्रशक्ति साम...