Skip to main content

हेलमेट याच कंपनीचे वापरले पाहिजे यासाठी सरकारने मार्केटिंग करू नये व जनतेला वेठीस धरू नये

संपादक

          सध्या सरकार हे जनतेसाठी आहे की जनतेवर अन्याय करण्यासाठीच आहे? कोरोना कोव्हिड-१९ च्या काळात देश व जनता होरपळून निघत आहे आणि सरकारचे आदेश जनतेच्या हिताचे न राहता जनतेला वेठीस धरण्यासाठी आहेत अशी परिस्थिति निर्माण झाली आहे. जो नागरिक आहे त्यानुसार आपल्या परिस्थितीनुसार शासनाच्या आदेशाचे पालन व स्वत: च्या शरीराचे पालन करीत आहे. त्यामध्ये आता सरकारने BIS प्रमाणितच हेलमेट वापरणे पाहिजे असा आदेश काढला त्यामुळे जनतेमध्ये असंतोष पसरला आहे हा जनतेवर अन्याय आहे. कारण की या हेलमेटमुळे डोक्याला मार लागला तर हे हेलमेट डोक्याचे रक्षण करते हे झाले डोक्यापुरते अपघातामुळे हात पाय व इतर अवयव मोडू नये त्यासाठी कोणते हेलमेट वापरले पाहिजे त्यासाठी जनतेला सांगावे. जनतेने निवडून राज्यकर्ते बनवले हेच राज्यकर्ते जनतेवर आदेशावर आदेश काढून जनतेचा छळ करीत आहेत त्यासाठी सरकारने हेलमेट याच कंपनीचे वापरले गेले पाहिजे यासाठी मार्केटिंग चालू केले आहे व न वापरल्यास दंडात्मक कारवाई केली जाईल असे सरकार सांगत आहे. जनतेच्या अवयवाचे रक्षण करावे असे वाटत असेल तर सरकारने हेलमेट मोफत द्यावीत त्याचा स्वीकार जनता आनंदाने करतील. आदेश सरकारचे वेठीस मात्र जनतेला धरायचे हे योग्य नाही. जनतेच्या डोक्याचा विचार केला पण संपूर्ण शरीराचे काय? अपघात झाला, डोके शाबूत राहिले आणि इतर अवयव मोडले, मृत्यू पावला तर याची जबाबदारी कोण घेणार? जनतेला चांगल्या दिवसाचे गाजर दाखविले जनतेने भरभरून आपले पवित्र मत दिले त्याच मतावर राज्यकर्ते बनले पण त्याच मतदार राज्याला वाईट दिवस सरकारने आणले.  सतत सरकारची मनमानी, हुकुमशाही जनतेवर चालू आहे. जनतेच्या हिताचे निर्णय या सरकारला घेऊ वाटत नाहीत काय? असे माझे मत आहे. जनतेची कोरोना या रोगामुळे लागलेली विल्हेवाट यामुळे जनतेला जीवन जगणे अवघड होऊन बसले आहे. जनतेला सरकारने माकड बनविले आहे असे वाटते. या हेलमेटमुळे सरकारचे व त्या कंपनी मालकाचे भले होणार आहे. कंपनीचे मालक श्रीमंत होणार आहे हे जनतेच्या जोरावर जनतेबद्दल एवढी काळजी सरकारला असेल तर हेलमेट हे मोफत देऊन सरकारने दयाळूपणा दाखवावा. सरकारच्या आदेशामुळे जनता त्रस्त झाली आहे. जनतेचे भले करावे, जनतेचे वाटुळे करू नये यासाठी सरकारने खबरदारी घ्यावी. डोक्यासाठी BIS हे हेलमेट वापरले पाहिजे नाहीतर दंड भरावा लागेल ही सक्ती कशासाठी? यासाठी सरकारने विचार करावा असे हिटलर शाहीचे आदेश जनतेवर लादू नयेत असे वाटते.

जनहितार्थ

अधिक जाहिरातीसाठी संपर्क

संपादक : मा. श्री. डॉ. अभिमन्यु बी. आठवले

९४२०३०२५६१

उपसंपादक : वैभव अ. आठवले

साप्ताहिक बहुजन भूषण, साप्ताहिक बहुजन मित्र वृत्तपत्र

बहुजन राष्ट्रशक्ति सामाजिक संघटना महाराष्ट्र राज्य

आठवले परिवार


Comments

Popular posts from this blog

नातेपुते पोलीस ठाणेकडील गुन्हे प्रकटीकरण शाखेची आदर्श कामगिरी चंदन चोरी करणा-या आरोपीस २४ तासात केले जेरबंद

  उपसंपादक: वैभव आठवले साप्ताहिक बहुजन भूषण वृत्तपत्र नातेपुते पोलिस स्टेशन यांचेकडून मिळालेल्या माहितीनुसार      नातेपुते पोलीस ठाणे हददीमध्ये मौजे मांडवे, ता.माळशिरस येथे राजन सुकुमार दोशी यांचे शेतातील दिनांक २६/०६/२०२५ रोजी सकाळी ०८/०० वा ते सायंकाळी ०५/००वा. चे दरम्यान शेतातील बांधावरील १० वर्षे वयाची ०२ चंदनाची झाडे अंदाजे किंमत २७,०००/- रू चे कोणीतरी अज्ञात चोरटयाने चोरून नेली आहेत त्याबाबत फिर्यादी नामे राजन सुकुमार दोशी रा.नातेपुते, ता.माळशिरस, जि.सोलापुर यांचे फिर्यादीवरुन नातेपुते पोलीस ठाणेस गु.र.नं. २३७/२०२५ भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ३०३ (२) प्रमाणे दिनांक २६/०६/२०२५ रोजी गुन्हा दाखल झाला होता. सदर गुन्हयाचा तपास पोहेकॉ/१७०८ विकास बाबर हे करीत होते.      नातेपुते पोलीस ठाणेचे गुन्हे प्रकटीकरण शाखेचे अंमलदार यांनी सदर गुन्हयाचा तपास दरम्यान मिळालेल्या गोपनिय बातमीव्दारे माहीती काढून इसम नामे १) गोविंद दुर्याधन काळे २) मेघराज ज्ञानदेव भोसले दोघे रा माळशिरस यांनी गुन्हा केल्याचे निष्पन्न झाल्याने त्यास पोहकॉ/१७०८ बाबर व गुन्हे प्रकटीक...

नातेपुते पोलीस ठाणेकडून जबरी चोरी करणा-या आरोपीस २४ तासाच्या आत केले जेरबंद

उपसंपादक: वैभव आठवले (साप्ताहिक बहुजन भूषण वृत्तपत्र) नातेपुते पोलीस ठाणे यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार      नातेपुते पोलीस ठाणे हददीमध्ये मौजे नातेपुते, ता.माळशिरस येथे दिनांक ०३/०४/२०२५ रोजी सायकाळी ०७.३० वा सुमारास गुन्ह्यातील फिर्यादी नामे वैभव विठ्ठल नष्टे वय ३१ वर्षे, रा. माळशिरस ता. माळशिरस जि. सोलापुर व सोबत त्यांची आई माया नष्टे असे त्यांचेकडील स्कुटी गाडी क्र. एम.एच. ४५ ए.व्ही. १२६१ यावरुन नातेपुते परिसरात शिंगणापुर पाटी ते बायपास रोड मार्गे नातेपुते फडतरी जाणारे बायपास रोडवर आले असताना दोन अज्ञात इसमांनी त्यांचे पाठीमागुन येऊन फिर्यादीचे आई माया विठल नष्टे याचे गळयातील सोन्याचे दागीने बळजबरीने काढुन घेऊन मोटार सायकल वरुन पळुन गेल्याने त्याबाबत फिर्यादी नामे वैभव विठ्ठल नष्टे वय ३१ वर्षे रा. माळशिरस ता. माळशिरस जि. सोलापुर यांचे फिर्यादीवरुन नातेपुते पोलीस ठाणेस गुरनं १३३/२०२५ भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ३०९ (४), ३ (५) प्रमाणे दिनांक ०८/०४/२०२५ रोजी १८ वा ३९ मि. गुन्हा दाखल झाला होता. सदर गुन्हयाचा तपास गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोना/५६२ राकेश लोहार करीत ...

अतुल कुलकर्णी साहेब पोलीस अधीक्षक, सोलापूर ग्रामीण यांच्या संकल्पनेतून धर्मतुरी, ता.माळशिरस रोडलगत वृक्षारोपण

  उपसंपादक: वैभव आठवले साप्ताहिक बहुजन भूषण वृत्तपत्र नातेपुते पोलिस स्टेशन यांचेकडून मिळालेल्या माहितीनुसार       दिनांक 26/06/2025 रोजी मा. श्री. अतुल कुलकर्णी साहेब पोलीस अधीक्षक ,सोलापूर ग्रामीण यांच्या संकल्पनेतून  व मा. उपविभागीय पोलीस अधिकारी श्री नारायण शिरगावकर उपविभाग माळशिरस यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू करण्यात आलेल्या हरित वारी सन 2025 उपक्रमांतर्गत  नातेपुते पोलीस  ठाणे हद्दीतील  मौजे धर्मपुरी येथे  पालखी मार्गवर हरितवारी अनुषंगाने, माननीय पोलीस अधीक्षक श्री अतुल कुलकर्णी साहेब, यांच्या हस्ते रोडलगत वृक्षारोपण करण्यात आले.       सदर ठिकाणी वृक्षारोपण करिता गावातील सरपंच,शेतकरी व गावातील प्रतिष्ठित नागरिक तसेच  पोलीस पाटील, पोलीस मित्र, ग्राम सुरक्षा दल यांच्या उपस्थितीत हरित वारी उपक्रम संपन्न झाला आहे. बातमी अधिक जाहिरातीसाठी संपर्क संपादक : मा.श्री. डॉ. अभिमन्यु बी. आठवले ९४२०३०२५६१ उपसंपादक : वैभव अ. आठवले साप्ताहिक बहुजन भूषण ,  साप्ताहिक बहुजन मित्र वृत्तपत्र संस्थापक :  बहुजन राष्ट्रशक्ति साम...