संपादक
सध्या सरकार
हे जनतेसाठी आहे की जनतेवर अन्याय करण्यासाठीच आहे? कोरोना कोव्हिड-१९ च्या काळात देश व जनता होरपळून निघत आहे आणि सरकारचे आदेश
जनतेच्या हिताचे न राहता जनतेला वेठीस धरण्यासाठी आहेत अशी परिस्थिति निर्माण झाली
आहे. जो नागरिक आहे त्यानुसार आपल्या परिस्थितीनुसार शासनाच्या आदेशाचे पालन व स्वत: च्या शरीराचे
पालन करीत आहे. त्यामध्ये आता सरकारने BIS प्रमाणितच हेलमेट वापरणे पाहिजे असा आदेश काढला त्यामुळे जनतेमध्ये
असंतोष पसरला आहे हा जनतेवर अन्याय आहे. कारण की या हेलमेटमुळे डोक्याला मार लागला
तर हे हेलमेट डोक्याचे रक्षण करते हे झाले डोक्यापुरते अपघातामुळे हात पाय व इतर अवयव
मोडू नये त्यासाठी कोणते हेलमेट वापरले पाहिजे त्यासाठी जनतेला सांगावे. जनतेने निवडून
राज्यकर्ते बनवले हेच राज्यकर्ते जनतेवर आदेशावर आदेश काढून जनतेचा छळ करीत आहेत त्यासाठी
सरकारने हेलमेट याच कंपनीचे वापरले गेले पाहिजे यासाठी मार्केटिंग चालू केले आहे व
न वापरल्यास दंडात्मक कारवाई केली जाईल असे सरकार सांगत आहे. जनतेच्या अवयवाचे रक्षण
करावे असे वाटत असेल तर सरकारने हेलमेट मोफत द्यावीत त्याचा स्वीकार जनता आनंदाने करतील.
आदेश सरकारचे वेठीस मात्र जनतेला धरायचे हे योग्य नाही. जनतेच्या डोक्याचा विचार केला
पण संपूर्ण शरीराचे काय? अपघात
झाला, डोके शाबूत राहिले आणि
इतर अवयव मोडले, मृत्यू पावला तर याची
जबाबदारी कोण घेणार? जनतेला चांगल्या दिवसाचे
गाजर दाखविले जनतेने भरभरून आपले पवित्र मत दिले त्याच मतावर राज्यकर्ते बनले पण त्याच
मतदार राज्याला वाईट दिवस सरकारने आणले. सतत सरकारची
मनमानी, हुकुमशाही जनतेवर चालू
आहे. जनतेच्या हिताचे निर्णय या सरकारला घेऊ वाटत नाहीत काय? असे माझे मत आहे. जनतेची कोरोना
या रोगामुळे लागलेली विल्हेवाट यामुळे जनतेला जीवन जगणे अवघड होऊन बसले आहे. जनतेला सरकारने
माकड बनविले आहे असे वाटते. या हेलमेटमुळे सरकारचे व त्या कंपनी मालकाचे भले होणार
आहे. कंपनीचे मालक श्रीमंत होणार आहे हे जनतेच्या जोरावर जनतेबद्दल एवढी काळजी सरकारला
असेल तर हेलमेट हे मोफत देऊन सरकारने दयाळूपणा दाखवावा. सरकारच्या आदेशामुळे जनता त्रस्त
झाली आहे. जनतेचे भले करावे, जनतेचे
वाटुळे करू नये यासाठी सरकारने खबरदारी घ्यावी. डोक्यासाठी BIS हे हेलमेट वापरले पाहिजे नाहीतर दंड
भरावा लागेल ही सक्ती कशासाठी? यासाठी
सरकारने विचार करावा असे हिटलर शाहीचे आदेश जनतेवर लादू नयेत असे वाटते.
जनहितार्थ
अधिक जाहिरातीसाठी
संपर्क
संपादक : मा. श्री. डॉ. अभिमन्यु बी. आठवले
९४२०३०२५६१
उपसंपादक : वैभव अ.
आठवले
साप्ताहिक बहुजन
भूषण, साप्ताहिक बहुजन मित्र वृत्तपत्र
बहुजन राष्ट्रशक्ति
सामाजिक संघटना महाराष्ट्र राज्य
आठवले परिवार
Comments
Post a Comment