Skip to main content

नातेपुते पोलिसांची वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर धडक कारवाई

हेलमेट याच कंपनीचे वापरले पाहिजे यासाठी सरकारने मार्केटिंग करू नये व जनतेला वेठीस धरू नये

संपादक

          सध्या सरकार हे जनतेसाठी आहे की जनतेवर अन्याय करण्यासाठीच आहे? कोरोना कोव्हिड-१९ च्या काळात देश व जनता होरपळून निघत आहे आणि सरकारचे आदेश जनतेच्या हिताचे न राहता जनतेला वेठीस धरण्यासाठी आहेत अशी परिस्थिति निर्माण झाली आहे. जो नागरिक आहे त्यानुसार आपल्या परिस्थितीनुसार शासनाच्या आदेशाचे पालन व स्वत: च्या शरीराचे पालन करीत आहे. त्यामध्ये आता सरकारने BIS प्रमाणितच हेलमेट वापरणे पाहिजे असा आदेश काढला त्यामुळे जनतेमध्ये असंतोष पसरला आहे हा जनतेवर अन्याय आहे. कारण की या हेलमेटमुळे डोक्याला मार लागला तर हे हेलमेट डोक्याचे रक्षण करते हे झाले डोक्यापुरते अपघातामुळे हात पाय व इतर अवयव मोडू नये त्यासाठी कोणते हेलमेट वापरले पाहिजे त्यासाठी जनतेला सांगावे. जनतेने निवडून राज्यकर्ते बनवले हेच राज्यकर्ते जनतेवर आदेशावर आदेश काढून जनतेचा छळ करीत आहेत त्यासाठी सरकारने हेलमेट याच कंपनीचे वापरले गेले पाहिजे यासाठी मार्केटिंग चालू केले आहे व न वापरल्यास दंडात्मक कारवाई केली जाईल असे सरकार सांगत आहे. जनतेच्या अवयवाचे रक्षण करावे असे वाटत असेल तर सरकारने हेलमेट मोफत द्यावीत त्याचा स्वीकार जनता आनंदाने करतील. आदेश सरकारचे वेठीस मात्र जनतेला धरायचे हे योग्य नाही. जनतेच्या डोक्याचा विचार केला पण संपूर्ण शरीराचे काय? अपघात झाला, डोके शाबूत राहिले आणि इतर अवयव मोडले, मृत्यू पावला तर याची जबाबदारी कोण घेणार? जनतेला चांगल्या दिवसाचे गाजर दाखविले जनतेने भरभरून आपले पवित्र मत दिले त्याच मतावर राज्यकर्ते बनले पण त्याच मतदार राज्याला वाईट दिवस सरकारने आणले.  सतत सरकारची मनमानी, हुकुमशाही जनतेवर चालू आहे. जनतेच्या हिताचे निर्णय या सरकारला घेऊ वाटत नाहीत काय? असे माझे मत आहे. जनतेची कोरोना या रोगामुळे लागलेली विल्हेवाट यामुळे जनतेला जीवन जगणे अवघड होऊन बसले आहे. जनतेला सरकारने माकड बनविले आहे असे वाटते. या हेलमेटमुळे सरकारचे व त्या कंपनी मालकाचे भले होणार आहे. कंपनीचे मालक श्रीमंत होणार आहे हे जनतेच्या जोरावर जनतेबद्दल एवढी काळजी सरकारला असेल तर हेलमेट हे मोफत देऊन सरकारने दयाळूपणा दाखवावा. सरकारच्या आदेशामुळे जनता त्रस्त झाली आहे. जनतेचे भले करावे, जनतेचे वाटुळे करू नये यासाठी सरकारने खबरदारी घ्यावी. डोक्यासाठी BIS हे हेलमेट वापरले पाहिजे नाहीतर दंड भरावा लागेल ही सक्ती कशासाठी? यासाठी सरकारने विचार करावा असे हिटलर शाहीचे आदेश जनतेवर लादू नयेत असे वाटते.

जनहितार्थ

अधिक जाहिरातीसाठी संपर्क

संपादक : मा. श्री. डॉ. अभिमन्यु बी. आठवले

९४२०३०२५६१

उपसंपादक : वैभव अ. आठवले

साप्ताहिक बहुजन भूषण, साप्ताहिक बहुजन मित्र वृत्तपत्र

बहुजन राष्ट्रशक्ति सामाजिक संघटना महाराष्ट्र राज्य

आठवले परिवार


Comments

Popular posts from this blog

नातेपुते पोलीस ठाण्याची धडक कामगिरी 6,200 रुपये हिसकून घेऊन जाणाऱ्या चोरांना आपले ताब्यातील थार वाहनांसह केली अटक

उपसंपादक: वैभव आठवले साप्ताहिक बहुजन भूषण वृत्तपत्र नातेपुते पोलिस स्टेशन यांचेकडून मिळालेल्या माहितीनुसार           नातेपुते पोलीस ठाणे हद्दीमध्ये फिर्यादी यांच्या दीपक जनार्दन चव्हाण, राहणार मोराची, तालुका माळशिरस, जिल्हा सोलापूर हे फलटण-पंढरपूर रोडवरील इंडीयन ऑईल कंपनीचा सुळ पेंट्रोल पंप येथे दि.01/10/2025 रोजी दुपारी 03.50 वा. सुमारास इंडीयन ऑईल कंपनीचा सुळ पेंट्रोल पंप येथे डिझेल टाकण्याचे काम करित असताना एक राखाडी रंगाची थार गाडी नं MH06CG5558 अशी डिझेल भरण्याकरीता आली व त्यातील ड्रायव्हर शेजारी बसलेल्या अनोळखी इसमाने गाडीत 4000 रुपयचे डिझेल भरायचे आहे व 6200 रु आम्हाला रोख पैशाची गरज आहे मी तुम्हाला माझे फोन पे वरून 10200 रु ऑनलाईन पाठवतो असे म्हणाल्याने मी गाडीचे डिझेलचे झाकन उघडण्यास गेलो असता पाठीमागे बसलेला अनोळखी इसम म्हणाला की, आम्हाला डिझेल नको 6200 रु रोख द्या अशी विनंती केली. त्यावेळी मी माझे खिश्यातील डिझेल विक्रीचे जमा झालेले पैसे खिश्यातुन काढुन 6200 रु मोजले त्यामध्ये 500 रु दराच्या 12 व 100 रु दराच्या 02 असे 6200 रु बाजुला काढले व बाकी ...

नातेपुते पोलीस ठाण्याची धडक कामगिरी उभ्या असलेल्या वाहनाची टायर चोरणाऱ्या अट्टल चोरास अटक व चोरीस गेलेला 100% मुद्देमाल सह 2,04,000/ किमतीचा मुद्देमाल जप्त

उपसंपादक: वैभव आठवले साप्ताहिक बहुजन भूषण वृत्तपत्र नातेपुते पोलिस स्टेशन यांचेकडून मिळालेल्या माहितीनुसार      नातेपुते पोलीस ठाणे हद्दीमध्ये फिर्यादी यांच्या आकाश तानाजी बोडरे, राहणार नातेपुते, तालुका माळशिरस यांनी त्यांच्याकडील वापरते वाहन टाटा टिपर नंबर एम एच 11 सी एच 0551 या उभ्या असलेल्या वाहनाचे दोन टायर डिस्कसह किंमत 75,000/ रुपये खोलून कोणीतरी अज्ञात चोरट्याने ते चोरून नेले आहेत म्हणून वगैरे हकीगत वरून नातेपुते पोलीस ठाणे गुर नंबर 331/2025 बीएनएस कलम 303 (2) प्रमाणे गुन्हा दाखल होता.       सदर गुन्ह्यातील घडला प्रकाराबाबत वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली नातेपुते पोलीस ठाणे व उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय गुन्हे प्रकटीकरण पथक गुन्ह्यातील घटनास्थळाच्या आजूबाजूची सीसीटीव्ही पाहणी करून तसेच  सायबर शाखेकडील तांत्रिक माहितीचे विश्लेषण करून संशयित  आरोपीचा शोध घेतला असता संशयित आरोपी हा कडेगाव जिल्हा सांगली येथील नामे बुरान इलाही मुलाणी वय 40 वर्ष असे  असल्याबाबत खात्री झाली आणि त्यानंतर सदर आरोपीस सापळा लावून कडेगाव जिल्हा सांगली येथे...

शिवसेनेच्या सोलापूर जिल्हाप्रमुख पदी राजकुमार हिवरकर-पाटील

  उपसंपादक: वैभव आठवले साप्ताहिक बहुजन भूषण वृत्तपत्र शिवसेनेचे मुख्य नेते तथा महाराष्ट्र राज्याचे संवेदनशील उपमुख्यमंत्री मा.ना.एकनाथराव शिंदे साहेब यांच्या आदेशाने महाराष्ट्र राज्याचे रोजगार हमी पणन मंत्री भरत शेठ गोगावले यांच्या हस्ते व महाराष्ट्र प्रदेशचे ओबीसी विभागाचे प्रमुख रमेशजी बारसकर यांच्या उपस्थितीत मंत्रालय मुंबई येथे सोलापूर जिल्ह्याचे प्रमुख ओबीसी विभाग म्हणून श्री.राजकुमार लता शंकरराव हिवरकर-पाटील यांना निवडीचे पत्र देण्यात आले. आजवर शिवसेनेमध्ये पक्षाचे जडणघडणीमध्ये मोर्चे, आंदोलन, साडेनऊ हजार पेक्षा जास्त गरिबांची केलेली ऑपरेशन, सोलापूरच्या अक्कलकोटचे माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे साहेब यांच्या पक्षप्रवेशावेळी मुख्य नेत्यांच्या उपस्थितीत 12 बलुत्तरांचा पक्ष म्हणून ओबीसी विभाग निर्माण करण्यामागची मुख्य नेते यांची दूरदृष्टी सर्वांसमक्ष केलेल भाषण, राष्ट्रमाता जिजाऊ क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीच्या निमित्ताने 55 सायकलींच मोफत झालेल वाटप,  सवलतीच्या दरात  99000 माता-भगिनींना केलेली डाळ वाटप, सत्तावीस गावांना बचत गटाच्या माध्यमातून दिलेली ...