Skip to main content

खरेदी केलेल्या जागा, जमिनीची गावपातळी वरती नोंद धरण्यास तलाठी, सर्कल यांच्याकडून दप्तर दिरंगाई कायद्याला बगल हि चिंताजनक गंभीर बाब

मा.श्री.डॉ.अभिमन्यू बी. आठवले
संपादक: साप्ताहिक बहुजन भूषण वृत्तपत्र

संपादक : मा.श्री.डॉ. अभिमन्यू आठवले  

(साप्ताहिक बहुजन भूषण वृत्तपत्र)

कोणतेही सरकार असू द्या त्या सरकारचे अधिकारी, कर्मचारी यांना "ना भीती ना चिंता'' असे अंग वळणी प्रत्येक विभागातील यांना पडले आहे. अधिकारी, कर्मचारी हे आर्थिक चिरीमिरीची अपेक्षा ठेऊन असतात. अधिकारी व कर्मचारी भरमसाठ पगार असताना सुद्धा चिरीमिरीची वाट बघतात या मध्ये ग्रामपंचायत शासकीय कर्मचारी असो वा अधिकारी टक्केवारीचे भुकेले असतात. त्यामध्ये महसूल विभागातील कर्मचारी, अधिकारी जोमात असतात ''द्या आणि करून घ्या'' असे समीकरण आहे. दुय्यम निबंधक यांच्या मार्फत जागा, जमिनी शासकीय स्टॅम्प वरती आर्थिक व्यवहार केलेला असतो. नियमानुसार फी भरलेली असते तरीही गाव पातळीवरील तलाठी, सर्कल नोंदी धरण्यास टाळाटाळ करतात, ते आर्थिक चिरीमिरीची अपेक्षा ठेवतात ही वेदनादायी आहे. हे जनतेचा छळ, मानसिक त्रास करतात असे संपादक म्हणून अनुभवले आहे, पाहिले आहे.

जे दिसते तेच मी निर्भिडपणे मांडतो. सगळेच अधिकारी, कर्मचारी चिरीमिरी घेतात असे नाही. ५०% टक्के असे आहेत ज्यांना भरमसाठ पगार असताना सुद्धा चिरीमिरीसाठी जनतेचे काम हातात असताना सुद्धा करीत नाहीत हे सत्य आहे. चिरीमिरी घेणारे अधिकारी, कर्मचारी, गेंड्याच्या कातडीचे झाले आहेत. फक्त पगार सोडून आर्थिक चिरीमिरी पाहिजे असते हे अपेक्षा असते. मला आज पर्यंत कोणीही चिरीमिरी मागतली नाही, अधिकारी मला मानपान सन्मान देतात, मला चिरीमिरी मागितली तर त्याचे गाल लाल करण्याची धमक माझ्याजवळ आहे. 

यात जनतेची चूक नसते, चुकतात ते अधिकारी, कर्मचारी. लालसा ही सवय लागलेली असते म्हणून हे अधिकारी संपतीचे धन दांडगे असतात. त्यांच्याकडे शेती, बंगले, महागाड्या गाड्या, सोने चांदी, मुबलक पैसा जळता जळत नाही अशी संपत्ती असते. ही लालसा अधिकारी कर्मचारी यांच्याकडून सुटेल असे वाटत नाही. यामध्ये साखळी पद्धत असते "खा गड्या खुशाल खा" म्हणत बसावे लागत आहे. चूक जनतेची समजली जाते घ्या पण लवकर काम करा यामुळे अधिकारी, कर्मचारी सोकले आहेत. 

तसेच तमाम नागरिकांना कळविण्यात येते की, ज्यांच्या नोंदी अधिकारी वेळेनुसार करत नाहीत, टाळाटाळ करतात त्यांनी साप्ताहिक बहुजन भूषण कार्यालयास संपर्क साधावा.

बातमी

अधिक जाहिरातीसाठी संपर्क 

संपादक : मा. श्री. डॉ. अभिमन्यु बी. आठवले 

९४२०३०२५६१

 उपसंपादक : वैभव अ. आठवले 
साप्ताहिक बहुजन भूषण, साप्ताहिक बहुजन मित्र वृत्तपत्र
संस्थापक : बहुजन राष्ट्रशक्ति सामाजिक संघटना महाराष्ट्र राज्य
टीप : जे दिसले, जे पाहिले तेच लिहिले हेच वृत्तपत्राचे ध्येय उद्दीष्ट आहे. 

  


Comments

Popular posts from this blog

नातेपुते पोलीस ठाणेकडील गुन्हे प्रकटीकरण शाखेची आदर्श कामगिरी चंदन चोरी करणा-या आरोपीस २४ तासात केले जेरबंद

  उपसंपादक: वैभव आठवले साप्ताहिक बहुजन भूषण वृत्तपत्र नातेपुते पोलिस स्टेशन यांचेकडून मिळालेल्या माहितीनुसार      नातेपुते पोलीस ठाणे हददीमध्ये मौजे मांडवे, ता.माळशिरस येथे राजन सुकुमार दोशी यांचे शेतातील दिनांक २६/०६/२०२५ रोजी सकाळी ०८/०० वा ते सायंकाळी ०५/००वा. चे दरम्यान शेतातील बांधावरील १० वर्षे वयाची ०२ चंदनाची झाडे अंदाजे किंमत २७,०००/- रू चे कोणीतरी अज्ञात चोरटयाने चोरून नेली आहेत त्याबाबत फिर्यादी नामे राजन सुकुमार दोशी रा.नातेपुते, ता.माळशिरस, जि.सोलापुर यांचे फिर्यादीवरुन नातेपुते पोलीस ठाणेस गु.र.नं. २३७/२०२५ भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ३०३ (२) प्रमाणे दिनांक २६/०६/२०२५ रोजी गुन्हा दाखल झाला होता. सदर गुन्हयाचा तपास पोहेकॉ/१७०८ विकास बाबर हे करीत होते.      नातेपुते पोलीस ठाणेचे गुन्हे प्रकटीकरण शाखेचे अंमलदार यांनी सदर गुन्हयाचा तपास दरम्यान मिळालेल्या गोपनिय बातमीव्दारे माहीती काढून इसम नामे १) गोविंद दुर्याधन काळे २) मेघराज ज्ञानदेव भोसले दोघे रा माळशिरस यांनी गुन्हा केल्याचे निष्पन्न झाल्याने त्यास पोहकॉ/१७०८ बाबर व गुन्हे प्रकटीक...

नातेपुते पोलीस ठाणेकडून जबरी चोरी करणा-या आरोपीस २४ तासाच्या आत केले जेरबंद

उपसंपादक: वैभव आठवले (साप्ताहिक बहुजन भूषण वृत्तपत्र) नातेपुते पोलीस ठाणे यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार      नातेपुते पोलीस ठाणे हददीमध्ये मौजे नातेपुते, ता.माळशिरस येथे दिनांक ०३/०४/२०२५ रोजी सायकाळी ०७.३० वा सुमारास गुन्ह्यातील फिर्यादी नामे वैभव विठ्ठल नष्टे वय ३१ वर्षे, रा. माळशिरस ता. माळशिरस जि. सोलापुर व सोबत त्यांची आई माया नष्टे असे त्यांचेकडील स्कुटी गाडी क्र. एम.एच. ४५ ए.व्ही. १२६१ यावरुन नातेपुते परिसरात शिंगणापुर पाटी ते बायपास रोड मार्गे नातेपुते फडतरी जाणारे बायपास रोडवर आले असताना दोन अज्ञात इसमांनी त्यांचे पाठीमागुन येऊन फिर्यादीचे आई माया विठल नष्टे याचे गळयातील सोन्याचे दागीने बळजबरीने काढुन घेऊन मोटार सायकल वरुन पळुन गेल्याने त्याबाबत फिर्यादी नामे वैभव विठ्ठल नष्टे वय ३१ वर्षे रा. माळशिरस ता. माळशिरस जि. सोलापुर यांचे फिर्यादीवरुन नातेपुते पोलीस ठाणेस गुरनं १३३/२०२५ भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ३०९ (४), ३ (५) प्रमाणे दिनांक ०८/०४/२०२५ रोजी १८ वा ३९ मि. गुन्हा दाखल झाला होता. सदर गुन्हयाचा तपास गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोना/५६२ राकेश लोहार करीत ...

अतुल कुलकर्णी साहेब पोलीस अधीक्षक, सोलापूर ग्रामीण यांच्या संकल्पनेतून धर्मतुरी, ता.माळशिरस रोडलगत वृक्षारोपण

  उपसंपादक: वैभव आठवले साप्ताहिक बहुजन भूषण वृत्तपत्र नातेपुते पोलिस स्टेशन यांचेकडून मिळालेल्या माहितीनुसार       दिनांक 26/06/2025 रोजी मा. श्री. अतुल कुलकर्णी साहेब पोलीस अधीक्षक ,सोलापूर ग्रामीण यांच्या संकल्पनेतून  व मा. उपविभागीय पोलीस अधिकारी श्री नारायण शिरगावकर उपविभाग माळशिरस यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू करण्यात आलेल्या हरित वारी सन 2025 उपक्रमांतर्गत  नातेपुते पोलीस  ठाणे हद्दीतील  मौजे धर्मपुरी येथे  पालखी मार्गवर हरितवारी अनुषंगाने, माननीय पोलीस अधीक्षक श्री अतुल कुलकर्णी साहेब, यांच्या हस्ते रोडलगत वृक्षारोपण करण्यात आले.       सदर ठिकाणी वृक्षारोपण करिता गावातील सरपंच,शेतकरी व गावातील प्रतिष्ठित नागरिक तसेच  पोलीस पाटील, पोलीस मित्र, ग्राम सुरक्षा दल यांच्या उपस्थितीत हरित वारी उपक्रम संपन्न झाला आहे. बातमी अधिक जाहिरातीसाठी संपर्क संपादक : मा.श्री. डॉ. अभिमन्यु बी. आठवले ९४२०३०२५६१ उपसंपादक : वैभव अ. आठवले साप्ताहिक बहुजन भूषण ,  साप्ताहिक बहुजन मित्र वृत्तपत्र संस्थापक :  बहुजन राष्ट्रशक्ति साम...