Skip to main content

मा.ना.श्री.छगनरावजी भुजबळ साहेब यांनी पुकारलेल्या एल्गार मेळावा यासाठी १७ नोव्हेंबर २०२३ रोजी अंबड जिल्हा जालना येथे लाखोंच्या संख्येने जाण्यासाठी नातेपुते येथे ओबीसी समाज बांधवांची आढावा बैठक संपन्न

 

या बैठकीला मार्गदर्शन करताना मा.श्री.अॅड. माजी आमदार रामहरी रूपनवर साहेब

 उपसंपादक: साप्ताहिक बहुजन भूषण वृत्तपत्र

माननीय नामदार श्री छगनरावजी भुजबळ साहेब यांनी 17 नोव्हेंबर रोजी अंबड जिल्हा जालना येथे ओबीसी समाजाचा एल्गार पुकारलेला आहे या सभेच्या नियोजनासाठी शंकरराव कॉम्प्लेक्स नातेपुते ता.माळशिरस याठिकाणी ओबीसी समाज बांधवांची बैठक संपन्न झाली.

यावेळी विधान परिषद माजी आमदार रामहरी रुपनवर, एडवोकेट बी वाय राऊत, अध्यक्ष ओबीसी मोर्चा भाजपा, श्री राजकुमार हिवरकर पाटील तालुकाप्रमुख शिवसेना, श्री रावसाहेब पांढरे नगरसेवक, भीमराव फुले जिल्हाध्यक्ष शेतकरी संघटना, सौ सीमाताई एकतपुरे, एडवोकेट राऊत वेळापूर, ऍडव्होकेट ताठे वेळापूर, श्री सोमनाथ पिसे शेतकरी संघटना, देविदास ढोपे सरपंच पुरंदावडे पोपट बोराटे, सरपंच फोंडशिरस सुनील गोरे तालुकाध्यक्ष ओबीसी मोर्चा राष्ट्रवादी, संभाजी फुले सर, कैलास बरडकर, अर्जुन जठार, विनायक शिंदे, नारायण बोराटे, उत्तम बरडकर अशोक राऊत संदीप बरडकर समाधान माळी उमाजी बोडरे जिल्हाध्यक्ष उमाजी नाईक रामोशी संघटना शिवाजी कोळी तंटामुक्ती अध्यक्ष, सुधाकर राऊत, नारायण बोराटे, भाजपचे मनोज जाधव, तेजस गोरे, सावता बोराटे समता परिषद अध्यक्ष, सतीश बरडकर, भैय्यासाहेब चांगन बाळासाहेब गोरे शिवसेनेचे अनिल दडस पोपट शिंदे फंटा टेंबरे हनुमंत तात्या जठार बाबा शेंडे नरवीर उमाजी नाईक संघटनेचे बाबा बोडरे.

    या बैठकीमध्ये मराठा समाजाच्या आंदोलनामध्ये विलास किसन क्षीरसागर या ओबीसी बांधवांचा मृत्यू झाला या घटनेचा निषेध करून त्यांना आदरांजली वाहण्यात आली यावेळी माजी आमदार रामहरी रुपनवर यांनी मार्गदर्शन करताना ओबीसी समाजाला आजची परिस्थिती बिकट आहे समाजावर मोठे संकट आले आहे ओबीसी समाजाला भीती दाखवण्याचे काम चालू आहे त्यामुळे ओबीसी समाजाने सामाजिक लढाई एकत्रित येऊन लढले पाहिजे दुबळे राहून चालणार नाही दहा नंबरी नागासारखा फणा काढला पाहिजे मोठी भीती सरकारला निर्माण झाली आहे आरक्षण म्हणजे गरीबी निर्मूलनाचा मंत्र नसून भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दुर्लक्षित समाज प्रवाहात आणण्याचा अधिकार दिला आहे अंबड येथे होणाऱ्या एल्गार परिषदेत मोठ्या संख्येने उपस्थित राहून शक्ती दाखवण्याची गरज असल्याची त्यांनी सांगितले आहे.

    यावेळी राजकुमार हिवरकर पाटील प्रमूख माळशिरस तालुका शिवसेना यांनी माळशिरस तालुक्यातील सर्व ओबीसी बांधवांनी एकत्र येण्याची काळाची गरज आहे ते सांगून अंबड येथील महा एल्गार परिषदेत मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन केले.

    त्याचबरोबर सीमाताई एकतपुरे रावसाहेब पांढरे सोमनाथ पिसे अरविंद राऊत ॲड.राऊत वेळापूर सोमनाथ यांनी मार्गदर्शन केले सूत्रसंचालन संभाजी फुले  यांनी केले.

बातमी

अधिक जाहिरातीसाठी संपर्क 

संपादक : मा. श्री. डॉ. अभिमन्यु बी. आठवले 

९४२०३०२५६१

 उपसंपादक : वैभव अ. आठवले 
साप्ताहिक बहुजन भूषण, साप्ताहिक बहुजन मित्र वृत्तपत्र
संस्थापक : बहुजन राष्ट्रशक्ति सामाजिक संघटना महाराष्ट्र राज्य

टीप : जे दिसले, जे पाहिले तेच लिहिले हेच वृत्तपत्राचे ध्येय उद्दीष्ट आहे. 


Comments

Popular posts from this blog

नातेपुते पोलीस ठाणेकडील गुन्हे प्रकटीकरण शाखेची आदर्श कामगिरी चंदन चोरी करणा-या आरोपीस २४ तासात केले जेरबंद

  उपसंपादक: वैभव आठवले साप्ताहिक बहुजन भूषण वृत्तपत्र नातेपुते पोलिस स्टेशन यांचेकडून मिळालेल्या माहितीनुसार      नातेपुते पोलीस ठाणे हददीमध्ये मौजे मांडवे, ता.माळशिरस येथे राजन सुकुमार दोशी यांचे शेतातील दिनांक २६/०६/२०२५ रोजी सकाळी ०८/०० वा ते सायंकाळी ०५/००वा. चे दरम्यान शेतातील बांधावरील १० वर्षे वयाची ०२ चंदनाची झाडे अंदाजे किंमत २७,०००/- रू चे कोणीतरी अज्ञात चोरटयाने चोरून नेली आहेत त्याबाबत फिर्यादी नामे राजन सुकुमार दोशी रा.नातेपुते, ता.माळशिरस, जि.सोलापुर यांचे फिर्यादीवरुन नातेपुते पोलीस ठाणेस गु.र.नं. २३७/२०२५ भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ३०३ (२) प्रमाणे दिनांक २६/०६/२०२५ रोजी गुन्हा दाखल झाला होता. सदर गुन्हयाचा तपास पोहेकॉ/१७०८ विकास बाबर हे करीत होते.      नातेपुते पोलीस ठाणेचे गुन्हे प्रकटीकरण शाखेचे अंमलदार यांनी सदर गुन्हयाचा तपास दरम्यान मिळालेल्या गोपनिय बातमीव्दारे माहीती काढून इसम नामे १) गोविंद दुर्याधन काळे २) मेघराज ज्ञानदेव भोसले दोघे रा माळशिरस यांनी गुन्हा केल्याचे निष्पन्न झाल्याने त्यास पोहकॉ/१७०८ बाबर व गुन्हे प्रकटीक...

नातेपुते पोलीस ठाणेकडून जबरी चोरी करणा-या आरोपीस २४ तासाच्या आत केले जेरबंद

उपसंपादक: वैभव आठवले (साप्ताहिक बहुजन भूषण वृत्तपत्र) नातेपुते पोलीस ठाणे यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार      नातेपुते पोलीस ठाणे हददीमध्ये मौजे नातेपुते, ता.माळशिरस येथे दिनांक ०३/०४/२०२५ रोजी सायकाळी ०७.३० वा सुमारास गुन्ह्यातील फिर्यादी नामे वैभव विठ्ठल नष्टे वय ३१ वर्षे, रा. माळशिरस ता. माळशिरस जि. सोलापुर व सोबत त्यांची आई माया नष्टे असे त्यांचेकडील स्कुटी गाडी क्र. एम.एच. ४५ ए.व्ही. १२६१ यावरुन नातेपुते परिसरात शिंगणापुर पाटी ते बायपास रोड मार्गे नातेपुते फडतरी जाणारे बायपास रोडवर आले असताना दोन अज्ञात इसमांनी त्यांचे पाठीमागुन येऊन फिर्यादीचे आई माया विठल नष्टे याचे गळयातील सोन्याचे दागीने बळजबरीने काढुन घेऊन मोटार सायकल वरुन पळुन गेल्याने त्याबाबत फिर्यादी नामे वैभव विठ्ठल नष्टे वय ३१ वर्षे रा. माळशिरस ता. माळशिरस जि. सोलापुर यांचे फिर्यादीवरुन नातेपुते पोलीस ठाणेस गुरनं १३३/२०२५ भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ३०९ (४), ३ (५) प्रमाणे दिनांक ०८/०४/२०२५ रोजी १८ वा ३९ मि. गुन्हा दाखल झाला होता. सदर गुन्हयाचा तपास गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोना/५६२ राकेश लोहार करीत ...

अतुल कुलकर्णी साहेब पोलीस अधीक्षक, सोलापूर ग्रामीण यांच्या संकल्पनेतून धर्मतुरी, ता.माळशिरस रोडलगत वृक्षारोपण

  उपसंपादक: वैभव आठवले साप्ताहिक बहुजन भूषण वृत्तपत्र नातेपुते पोलिस स्टेशन यांचेकडून मिळालेल्या माहितीनुसार       दिनांक 26/06/2025 रोजी मा. श्री. अतुल कुलकर्णी साहेब पोलीस अधीक्षक ,सोलापूर ग्रामीण यांच्या संकल्पनेतून  व मा. उपविभागीय पोलीस अधिकारी श्री नारायण शिरगावकर उपविभाग माळशिरस यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू करण्यात आलेल्या हरित वारी सन 2025 उपक्रमांतर्गत  नातेपुते पोलीस  ठाणे हद्दीतील  मौजे धर्मपुरी येथे  पालखी मार्गवर हरितवारी अनुषंगाने, माननीय पोलीस अधीक्षक श्री अतुल कुलकर्णी साहेब, यांच्या हस्ते रोडलगत वृक्षारोपण करण्यात आले.       सदर ठिकाणी वृक्षारोपण करिता गावातील सरपंच,शेतकरी व गावातील प्रतिष्ठित नागरिक तसेच  पोलीस पाटील, पोलीस मित्र, ग्राम सुरक्षा दल यांच्या उपस्थितीत हरित वारी उपक्रम संपन्न झाला आहे. बातमी अधिक जाहिरातीसाठी संपर्क संपादक : मा.श्री. डॉ. अभिमन्यु बी. आठवले ९४२०३०२५६१ उपसंपादक : वैभव अ. आठवले साप्ताहिक बहुजन भूषण ,  साप्ताहिक बहुजन मित्र वृत्तपत्र संस्थापक :  बहुजन राष्ट्रशक्ति साम...