अहिंसा सेवा समितीचे संस्थापक मा.श्री.अविनाशजी दोशी साहेब (नातेपुते नगरपंचायत, नगरसेवक) यांच्या सामाजिक कार्याची ओळख महाराष्ट्रभर
![]() |
| मा.श्री.अविनाशजी दोशी संस्थापक - अहिंसा सेवा समिती नातेपुते नगरपंचायत नगरसेवक |
उपसंपादक : साप्ताहिक बहुजन भूषण
नातेपुते ता.माळशिरस, जि.सोलापूर येथील अहिंसा सेवा समितीचे संस्थापक मा.श्री.अविनाशजी दोशी नातेपुते
नगरपंचायत नगरसेवक यांचे सामाजिक कार्य एक इतिहास बनत चालला आहे. अहिंसा सेवा समितीच्या
माध्यमातून सामाजिक कार्य जोमाने व दिमाखदार चालू आहे. भुकेलेल्यांना अन्न, गरजूंना पाणी, अनाथांना पांघरून घेण्याइतपत कपडे, संकट काळात मदत, रोगराई काळात मदत, सर्वधर्म समभाव या नात्याने सर्व सामाजिक उपक्रमात सहभाग, वृक्षारोपण, व्यवसायभिमुख उपक्रम असे विविध उपक्रम राबवित
आहेत. “अहिंसा “ याला समोर ठेवून आपले कर्तव्याचे पालन करीत आहेत. द्वेष, मत्सर, भेदभाव, निंदा, वाईट बोलणे याबाबत दक्षता घेवून आपली वाटचाल करीत आहेत. रागाला जवळ करती नाहीत.
आदर द्या आदर घ्या ही भूमिका त्यांची अतिशय मौल्यवान ठरत आहे. माणुसकी कशी जपावी, मैत्री कशी करावी याचे ज्वेलंत उदाहरण म्हणजे अविनाश दोशी होय. सत्ता, संपत्तीचा कधी गर्व नाही, एक मनमिळावू सामाजिक कार्यकर्ते
म्हणून महाराष्ट्रात ओळख निर्माण झाली आहे. विनयशिलता, नम्रपणा
हे गुण त्यांचे मोठेपण सांगतात. कर्तव्य समजून जे सामाजिक कार्य करता येईल ते करीत
असतात. जे सामाजिक कार्य करतात ते “उपकार” म्हणून करीत नाहीत तर ते आपुलकी, बंधुभाव, माणसातील भक्तीभाव या हेतूने करीत असतात. प्रामाणिकपणा, आपलेपणा ही त्यांची विचाराची “शिदोरी” माणुसकीचे दर्शन घडविते. सामाजिक
काम करीत असताना “तळमळ” ही भावना
दिसून येते. सर्वधर्म समभाव ही माझी बांधिलकी आहे त्याला तडा जाऊ देणार नाही असेही
त्यांच्याबाबतीत आढळून आले आहे. सदैव मनमोकळेपणा, हसतमुख, कधी घमेंड नाही असे वर्तन असते. गरीबी, श्रीमंती ह्या
प्रत्येकाच्या वाटेला आलेले सुखदुख ही ज्याच्या त्याच्या नशिबाचा भाग असतो त्यामुळे
त्यांना कमी लेखणे असे काहीही नसते. सामाजिक काम करताना आनंदी राहून केले पाहिजे असे
त्यांचे मत असते हे अनुभवातून पाहिले तेच लिहले. मा.अविनाश दोशी साहेब, नगरपंचायत नातेपुते नगरसेवक आपण करीत असलेले सामाजिक कार्य एक दिशा देत राहील, चकाकत राहील, आठवणीत राहील असे करीत आहात. तुम्हास खूप
खूप शुभेच्छा...!
बातमी
अधिक जाहिरातीसाठी संपर्क
संपादक : मा.श्री. डॉ. अभिमन्यु बी. आठवले
९४२०३०२५६१
उपसंपादक : वैभव अ. आठवले
साप्ताहिक बहुजन भूषण, साप्ताहिक बहुजन मित्र वृत्तपत्र
संस्थापक : बहुजन राष्ट्रशक्ति सामाजिक संघटना महाराष्ट्र राज्य
टीप : जे दिसेल, जे पाहिले तेच लिहिले हेच वृत्तपत्राचे ध्येय उद्दीष्ट आहे.
%20%E0%A4%A6%E0%A5%8B%E0%A4%B6%E0%A5%80.jpg)
Comments
Post a Comment