उपसंपादक : साप्ताहिक बहुजन भूषण
कारुंडे (लोंढेवस्ती) ता.माळशिरस,
जि.सोलापूर येथे चैतन्य जप प्रकल्पाचे २२ वे राज्यस्तरीय शिबीर आयोजित केले होते. या
नाम जपामुळे माणसं एकत्र येतात. व्यसनाच्या आहेरी गेलेली,
बिघडलेली, जातीपातीत द्वेष, मत्सर, भेदभाव होत आहेत तो या
नामजपामुळे नाहीसे होऊन आम्ही सारे बांधव आहोत हाच संदेश यामधून मिळतो आहे.
नामजपाच्या माध्यमातून माणसे घडविण्याचे काम केले जाते. सामाजिक समतोल यामधून
राखला जातो. संत ज्ञानेश्वर महाराज, ब्रम्हचैतन्य महाराज यांनी दिला आहे असे प्रतिपादन
विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी केले. यावेळी परमपूज्य
शिवानंद भारती महाराज, माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहते-पाटील, माजी जिल्हा
परिषद सोलापूर उपाध्यक्ष बाबाराजे (दादा) देशमुख यांची प्रमुख उपस्थिती होती. या
सोहळ्यानिमित्त ब्रम्हचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या प्रतिमेची हत्तीवरून शोभा
यात्रा काढली. तसेच पुढे रामराजे नाईक निंबाळकर म्हणाले की, माणूस हा सध्या लोभी झाला
आहे, त्याला हाव सुटली आहे असे असताना त्यामध्ये ते समाधानी नाहीत. मनाला
शांती देणारा धर्म माणसाने जोपासावा. श्रद्धा असावी पण अंधश्रद्धा नसावी, श्रद्धा
ही ठेवली पाहिजे असे म्हणाले. यावेळी परमपूज्य शिवानंद भारती महाराज यांनीही
नामजपाचे महत्व सांगितले तसेच चैतन्य नामजप प्रकल्पाचे कार्याध्यक्ष व शिबीर प्रमुख
मा.धैर्यशील देशमुख म्हणाले, साधू संतांनी नामस्मरण, भक्ती किती महत्वाचे आहे हे
सांगितले. महाराष्ट्रभर चैतन्य जप शाखा आहेत. या जपामुळे महाराष्ट्रात नावलौकिक
झाले आहे. फसव्या गुरुपासून सावध राहिले पाहिजे. चांगले गुरु तपासा असे देशमुख
म्हणाले. यावेळी, शिबीर प्रमुख धैर्यशील देशमुख, मिनादेवी देशमुख, माजी सरपंच अमरशील
देशमुख, तात्यासाहेब देशमुख, नातेपुते नगरपंचायतचे उपनगराध्यक्ष मालोजीराजे देशमुख,
कृषि उत्पन्न बाजार समितीचे उपसभापति मामासाहेब पांढरे, ह.भ.प.राजेंद्र महाराज
मोरे, साहेबराव देशमुख, नवनाथ महाराज, अर्जुन काटे, ज्ञानेश्वर लावंड, धनंजय पवार,
हनुमंत पाटील, सतीश बर्गे, सतीश बडवे, दिगंबर लाळगे, माऊली ठोंबरे इ. उपस्थित
होते. सूत्रसंचालन औदुंबर बुधावले सर यांनी केले.
बातमी
अधिक जाहिरातीसाठी संपर्क
संपादक : मा.श्री. डॉ. अभिमन्यु बी. आठवले
९४२०३०२५६१
उपसंपादक : वैभव अ. आठवले
साप्ताहिक बहुजन भूषण, साप्ताहिक बहुजन मित्र वृत्तपत्र
संस्थापक : बहुजन राष्ट्रशक्ति सामाजिक संघटना महाराष्ट्र राज्य
टीप : जे दिसेल, जे पाहिले तेच लिहिले हेच वृत्तपत्राचे ध्येय उद्दीष्ट आहे.

Comments
Post a Comment