Skip to main content

गायरान जमिनीवर अतिक्रमणे नियमित केली गेली पाहिजेत त्या कुटुंबाला बेघर करू नये

उपसंपादक : साप्ताहिक बहुजन भूषण

          सध्या गायरान जमिनीवर अतिक्रमणे काढण्यात येणार असल्यामुळे गोरगरीब कुटुंबावर अन्याय होणार आहे. शासनाने वेळोवेळी परिपत्रके काढून गावठाणामध्ये राहत असलेल्या कुटुंबाची घर जागा नियमित करण्यात यावी असे असंख्य परिपत्रके शासनाने काढलेली आहेत व लाखो कुटुंबाची घर जागा नियमित करून त्यांना शासनाच्या लोककल्याणकारी योजना देवून आधार दिला आहे. अतिक्रमणे ही गायरान जमिनी असो वा ग्रामपंचायत गावठाण असो. कुटुंबाच्या सदस्यानुसार ती जागा त्या कुटुंबाच्या नावावर करावी असे शासनाचे परिपत्रक सांगते. गायरान जमिनी त्या कुटुंबांनी मोठ्या प्रमाणात धरून त्या वहिवाट करून कब्जा केला आहे. त्याची मोजणी केली गेली पाहिजे व गरजेनुसार शासनाच्या परिपत्रकानुसार ती जागा देवून कायम करावी, त्यांना बेघर करू नये, उध्वस्त करू नये. महाराष्ट राज्यात मोठ्या प्रमाणात राजकीय पुढार्‍यांनी सत्तेचा दुरुपयोग करून शासनाच्या गायरानी जमिनी, गावठाण जागा बळकावून कब्जा केला आहे. त्याचप्रमाणे आजी-माजी ग्रामपंचायत मधील कारभारी, पंचायत समिति, जिल्हा परिषद, आमदार, खासदार यामधील राजकर्त्यांनी शासकीय जागा बळकावून कब्जा केला आहे. गायरान, पाटबंधारे, ग्रामपंचायत गावठाण यामध्ये मोठया प्रमाणात राजकर्त्यांनी कब्जा केला आहे व वहिवाट केली आहे. त्या जागेची चौकशी करावी, चौकशी शिवाय त्या कुटुंबांना बेघर करू नये. जे कुटुंब भारत देश स्वतंत्र झालेपासून त्या गायरान असो वा पाठबंधारे, वनीकरण, गावठाण जागेवरती राहत आहेत. त्यांना त्यांचे गरजेनुसार जागा देवून त्या नियमित केल्या गेल्या पाहिजेत. त्या जागा मोठय प्रमाणात राजकीय मंडळींनी कब्जा करून अधिकार्‍यांना हाताशी धरून नावे लावून घेतलेल्या आहेत त्याची चौकशी झाली पाहिजे. महाराष्ट्र राज्यात ग्रामपंचायत गावठाण जागेवरती ज्या त्या काळातील ग्रामपंचायत कारभारी यांनी ठराव करून त्या जागा नियमित केलेली करोडो कुटुंब आहेत त्यांना शासनाच्या लोककल्याणकारी देण्यात आलेल्या आहेत. असे असताना निमित मात्र गायरान जमिनीवर अतिक्रमणे काढण्याचे पुढे करून इतर जागेवरील केलेले अतिक्रमण काढण्यात येणार असल्याची वार्‍यासारखी बातमी महाराष्ट्रात पसरली त्यामुळे अतिक्रमण धारक गोरगरीब कुटुंब भयभीत झाले आहे. शासकीय जागेवरती पक्के, कच्चे अशी घरे त्या कुटुंबांनी बांधून निवारा केला आहे. असे असताना गोरगरीबांना उध्वस्त करून शासन साध्य काय करणार? जनतेच्या जिवावर राज्यकर्ते बनला आहे. ज्या कुटुंबांनी अतिक्रमण केले आहेत ती जागा मोजून गरजेनुसार त्या कुटुंबाला देण्यात यावी व त्याजागेची कर आकारणी त्या-त्या विभागाने त्या कुटुंबाकडून वसूल करून महसूल गोळा केला पाहिजे. जरूर अतिक्रमणे काढा पण त्या कुटुंबाची सदस्य संख्या व गरज बघून चौकशी करून मगच काढण्यात यावी व काढताना ते कुटुंब उध्वस्त होणार नाही, पर्यायी त्या कुटुंबाची व्यवस्था करावी. कुटुंबाला गावठाण जागेपेक्षा गायरान जमिनीवर मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे झाली आहेत. अतिक्रमणे काढताना त्या कुटुंबाची पूर्ण चौकशी करून ते कुटुंब बेघर होणार नाही, उध्वस्त होणार नाही याची काळजी घेवून अतिक्रमणे हटवावेत. अथवा हुकुमशाही पद्धतीने कुटुंबावर अन्याय करत असाल तर बहुजन राष्ट्रशक्ति सामाजिक संघटना शासन दरबारी आंदोलन उभारेल असे संस्थापक अभिमन्यु आठवले यांनी प्रसिद्धीद्वारे केले आहे.    

जनहितार्थ

अधिक जाहिरातीसाठी संपर्क

संपादक : मा.श्री. डॉ. अभिमन्यु बी. आठवले

९४२०३०२५६१

उपसंपादक : वैभव अ. आठवले

साप्ताहिक बहुजन भूषणसाप्ताहिक बहुजन मित्र वृत्तपत्र

संस्थापक : बहुजन राष्ट्रशक्ति सामाजिक संघटना महाराष्ट्र राज्य

टीप : जे दिसेलजे पाहिले तेच लिहिले हेच वृत्तपत्राचे ध्येय उद्दीष्ट आहे.

 

 

Comments

Popular posts from this blog

नातेपुते पोलीस ठाणेकडील गुन्हे प्रकटीकरण शाखेची आदर्श कामगिरी चंदन चोरी करणा-या आरोपीस २४ तासात केले जेरबंद

  उपसंपादक: वैभव आठवले साप्ताहिक बहुजन भूषण वृत्तपत्र नातेपुते पोलिस स्टेशन यांचेकडून मिळालेल्या माहितीनुसार      नातेपुते पोलीस ठाणे हददीमध्ये मौजे मांडवे, ता.माळशिरस येथे राजन सुकुमार दोशी यांचे शेतातील दिनांक २६/०६/२०२५ रोजी सकाळी ०८/०० वा ते सायंकाळी ०५/००वा. चे दरम्यान शेतातील बांधावरील १० वर्षे वयाची ०२ चंदनाची झाडे अंदाजे किंमत २७,०००/- रू चे कोणीतरी अज्ञात चोरटयाने चोरून नेली आहेत त्याबाबत फिर्यादी नामे राजन सुकुमार दोशी रा.नातेपुते, ता.माळशिरस, जि.सोलापुर यांचे फिर्यादीवरुन नातेपुते पोलीस ठाणेस गु.र.नं. २३७/२०२५ भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ३०३ (२) प्रमाणे दिनांक २६/०६/२०२५ रोजी गुन्हा दाखल झाला होता. सदर गुन्हयाचा तपास पोहेकॉ/१७०८ विकास बाबर हे करीत होते.      नातेपुते पोलीस ठाणेचे गुन्हे प्रकटीकरण शाखेचे अंमलदार यांनी सदर गुन्हयाचा तपास दरम्यान मिळालेल्या गोपनिय बातमीव्दारे माहीती काढून इसम नामे १) गोविंद दुर्याधन काळे २) मेघराज ज्ञानदेव भोसले दोघे रा माळशिरस यांनी गुन्हा केल्याचे निष्पन्न झाल्याने त्यास पोहकॉ/१७०८ बाबर व गुन्हे प्रकटीक...

नातेपुते पोलीस ठाणेकडून जबरी चोरी करणा-या आरोपीस २४ तासाच्या आत केले जेरबंद

उपसंपादक: वैभव आठवले (साप्ताहिक बहुजन भूषण वृत्तपत्र) नातेपुते पोलीस ठाणे यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार      नातेपुते पोलीस ठाणे हददीमध्ये मौजे नातेपुते, ता.माळशिरस येथे दिनांक ०३/०४/२०२५ रोजी सायकाळी ०७.३० वा सुमारास गुन्ह्यातील फिर्यादी नामे वैभव विठ्ठल नष्टे वय ३१ वर्षे, रा. माळशिरस ता. माळशिरस जि. सोलापुर व सोबत त्यांची आई माया नष्टे असे त्यांचेकडील स्कुटी गाडी क्र. एम.एच. ४५ ए.व्ही. १२६१ यावरुन नातेपुते परिसरात शिंगणापुर पाटी ते बायपास रोड मार्गे नातेपुते फडतरी जाणारे बायपास रोडवर आले असताना दोन अज्ञात इसमांनी त्यांचे पाठीमागुन येऊन फिर्यादीचे आई माया विठल नष्टे याचे गळयातील सोन्याचे दागीने बळजबरीने काढुन घेऊन मोटार सायकल वरुन पळुन गेल्याने त्याबाबत फिर्यादी नामे वैभव विठ्ठल नष्टे वय ३१ वर्षे रा. माळशिरस ता. माळशिरस जि. सोलापुर यांचे फिर्यादीवरुन नातेपुते पोलीस ठाणेस गुरनं १३३/२०२५ भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ३०९ (४), ३ (५) प्रमाणे दिनांक ०८/०४/२०२५ रोजी १८ वा ३९ मि. गुन्हा दाखल झाला होता. सदर गुन्हयाचा तपास गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोना/५६२ राकेश लोहार करीत ...

अतुल कुलकर्णी साहेब पोलीस अधीक्षक, सोलापूर ग्रामीण यांच्या संकल्पनेतून धर्मतुरी, ता.माळशिरस रोडलगत वृक्षारोपण

  उपसंपादक: वैभव आठवले साप्ताहिक बहुजन भूषण वृत्तपत्र नातेपुते पोलिस स्टेशन यांचेकडून मिळालेल्या माहितीनुसार       दिनांक 26/06/2025 रोजी मा. श्री. अतुल कुलकर्णी साहेब पोलीस अधीक्षक ,सोलापूर ग्रामीण यांच्या संकल्पनेतून  व मा. उपविभागीय पोलीस अधिकारी श्री नारायण शिरगावकर उपविभाग माळशिरस यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू करण्यात आलेल्या हरित वारी सन 2025 उपक्रमांतर्गत  नातेपुते पोलीस  ठाणे हद्दीतील  मौजे धर्मपुरी येथे  पालखी मार्गवर हरितवारी अनुषंगाने, माननीय पोलीस अधीक्षक श्री अतुल कुलकर्णी साहेब, यांच्या हस्ते रोडलगत वृक्षारोपण करण्यात आले.       सदर ठिकाणी वृक्षारोपण करिता गावातील सरपंच,शेतकरी व गावातील प्रतिष्ठित नागरिक तसेच  पोलीस पाटील, पोलीस मित्र, ग्राम सुरक्षा दल यांच्या उपस्थितीत हरित वारी उपक्रम संपन्न झाला आहे. बातमी अधिक जाहिरातीसाठी संपर्क संपादक : मा.श्री. डॉ. अभिमन्यु बी. आठवले ९४२०३०२५६१ उपसंपादक : वैभव अ. आठवले साप्ताहिक बहुजन भूषण ,  साप्ताहिक बहुजन मित्र वृत्तपत्र संस्थापक :  बहुजन राष्ट्रशक्ति साम...