उपसंपादक : साप्ताहिक बहुजन भूषण
सध्या
गायरान जमिनीवर अतिक्रमणे काढण्यात येणार असल्यामुळे गोरगरीब कुटुंबावर अन्याय होणार
आहे. शासनाने वेळोवेळी परिपत्रके काढून गावठाणामध्ये राहत असलेल्या कुटुंबाची घर जागा
नियमित करण्यात यावी असे असंख्य परिपत्रके शासनाने काढलेली आहेत व लाखो कुटुंबाची घर
जागा नियमित करून त्यांना शासनाच्या लोककल्याणकारी योजना देवून आधार दिला आहे. अतिक्रमणे
ही गायरान जमिनी असो वा ग्रामपंचायत गावठाण असो. कुटुंबाच्या सदस्यानुसार ती जागा त्या
कुटुंबाच्या नावावर करावी असे शासनाचे परिपत्रक सांगते. गायरान जमिनी त्या कुटुंबांनी
मोठ्या प्रमाणात धरून त्या वहिवाट करून कब्जा केला आहे. त्याची मोजणी केली गेली पाहिजे
व गरजेनुसार शासनाच्या परिपत्रकानुसार ती जागा देवून कायम करावी, त्यांना बेघर करू नये, उध्वस्त करू नये. महाराष्ट राज्यात
मोठ्या प्रमाणात राजकीय पुढार्यांनी सत्तेचा दुरुपयोग करून शासनाच्या गायरानी जमिनी, गावठाण जागा बळकावून कब्जा केला आहे. त्याचप्रमाणे आजी-माजी ग्रामपंचायत मधील कारभारी, पंचायत समिति, जिल्हा परिषद, आमदार, खासदार यामधील
राजकर्त्यांनी शासकीय जागा बळकावून कब्जा केला आहे. गायरान, पाटबंधारे, ग्रामपंचायत गावठाण यामध्ये मोठया प्रमाणात राजकर्त्यांनी कब्जा केला आहे
व वहिवाट केली आहे. त्या जागेची चौकशी करावी, चौकशी शिवाय त्या
कुटुंबांना बेघर करू नये. जे कुटुंब भारत देश स्वतंत्र झालेपासून त्या गायरान असो वा
पाठबंधारे, वनीकरण, गावठाण जागेवरती राहत
आहेत. त्यांना त्यांचे गरजेनुसार जागा देवून त्या नियमित केल्या गेल्या पाहिजेत. त्या
जागा मोठय प्रमाणात राजकीय मंडळींनी कब्जा करून अधिकार्यांना हाताशी धरून नावे लावून
घेतलेल्या आहेत त्याची चौकशी झाली पाहिजे. महाराष्ट्र राज्यात ग्रामपंचायत गावठाण जागेवरती
ज्या त्या काळातील ग्रामपंचायत कारभारी यांनी ठराव करून त्या जागा नियमित केलेली करोडो
कुटुंब आहेत त्यांना शासनाच्या लोककल्याणकारी देण्यात आलेल्या आहेत. असे असताना निमित
मात्र गायरान जमिनीवर अतिक्रमणे काढण्याचे पुढे करून इतर जागेवरील केलेले अतिक्रमण
काढण्यात येणार असल्याची वार्यासारखी बातमी महाराष्ट्रात पसरली त्यामुळे अतिक्रमण
धारक गोरगरीब कुटुंब भयभीत झाले आहे. शासकीय जागेवरती पक्के,
कच्चे अशी घरे त्या कुटुंबांनी बांधून निवारा केला आहे. असे असताना गोरगरीबांना उध्वस्त
करून शासन साध्य काय करणार? जनतेच्या जिवावर राज्यकर्ते बनला
आहे. ज्या कुटुंबांनी अतिक्रमण केले आहेत ती जागा मोजून गरजेनुसार त्या कुटुंबाला देण्यात
यावी व त्याजागेची कर आकारणी त्या-त्या विभागाने त्या कुटुंबाकडून वसूल करून महसूल
गोळा केला पाहिजे. जरूर अतिक्रमणे काढा पण त्या कुटुंबाची सदस्य संख्या व गरज बघून
चौकशी करून मगच काढण्यात यावी व काढताना ते कुटुंब उध्वस्त होणार नाही, पर्यायी त्या कुटुंबाची व्यवस्था करावी. कुटुंबाला गावठाण जागेपेक्षा गायरान
जमिनीवर मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे झाली आहेत. अतिक्रमणे काढताना त्या कुटुंबाची पूर्ण
चौकशी करून ते कुटुंब बेघर होणार नाही, उध्वस्त होणार नाही याची
काळजी घेवून अतिक्रमणे हटवावेत. अथवा हुकुमशाही पद्धतीने कुटुंबावर अन्याय करत असाल
तर बहुजन राष्ट्रशक्ति सामाजिक संघटना शासन दरबारी आंदोलन उभारेल असे संस्थापक अभिमन्यु
आठवले यांनी प्रसिद्धीद्वारे केले आहे.
जनहितार्थ
अधिक जाहिरातीसाठी संपर्क
संपादक : मा.श्री. डॉ. अभिमन्यु बी. आठवले
९४२०३०२५६१
उपसंपादक : वैभव अ. आठवले
साप्ताहिक बहुजन भूषण, साप्ताहिक बहुजन मित्र वृत्तपत्र
संस्थापक : बहुजन राष्ट्रशक्ति सामाजिक संघटना महाराष्ट्र राज्य
टीप : जे दिसेल, जे पाहिले तेच लिहिले हेच वृत्तपत्राचे ध्येय उद्दीष्ट आहे.
Comments
Post a Comment