Skip to main content

Posts

Showing posts from 2022

भीमाकोरेगाव येथील विजयीस्तंभाला जात असताना आंबेडकरी चळवळीच्या कार्यकर्त्यांनी “झेंडा लहान पण दांडा मोठा ठेवावा”. अभिमन्यु बी. आठवले

  १ जानेवारी भीमाकोरेगाव विजयस्तंभ संपादक (बहुजन भूषण वृत्तपत्र)      सर्व बांधवांनो १ जानेवारी रोजी भीमाकोरेगाव येथे विजयीस्तंभाला अभिवादन करण्यासाठी आपण सर्वजण जात असतो. भीमा कोरेगाव विजयस्तंभ हा आपली अस्मिता आहे त्या पवित्र भूमिस व शूर आपल्या बांधवांना विनम्र अभिवादन करण्यासाठी कुटुंबासोबत जात असतो. भीमा कोरेगावचा विजयस्तंभ म्हणजे १ जानेवारी १८१८ साली पेशवे आणि ब्रिटिश यांच्यामध्ये झालेल्या लढाईमध्ये पेशवांच्या प्रचंड म्हणजे ४३ , ८३७ सैनिकांना केवळ ८३२ महार सैनिकांनी चोख उत्तर देवून पेशव्यांना पराभूत केले हा इतिहास आहे. बांधवांनो सध्या समाजकंटकांना हाताशी धरून त्यांना बळ देवून जातिवादी विनाकारण वादविवाद घडवून आणण्यासाठी दृष्टहेतूने वातावरण गढूळ करण्याचे कटकारस्थान करतील. बांधवानो गाफिल राहू नका , सोबत पाणी , जेवण घेवून जावा.       शासकीय यंत्रणा तुमच्या गाड्यांची चौकशी करीत असताना तुम्ही गाडीजवळ स्वत: थांबा , गाडीपासून दूर जाऊ नका. तुमच्या गाडीत एखादी वस्तु ठेवून तुम्हास अडकवण्याचा डाव रचतील. भीम सैनिकांनो नम्रपणे अभिवादन करा. नेत्यांनो भड...

मा.संदीप (दादा) चंद्रकांत ठोंबरे म्हणजे “आदरयुक्त दयावान” नेतृत्व

  मा.श्री.संदीप(दादा) चंद्रकांत ठोंबरे  उपसंपादक : वैभव आठवले ( बहुजन भूषण वृत्तपत्र)           नातेपुते ता.माळशिरस , जि.सोलापूर येथील संदीप (दादा) चंद्रकांत ठोंबरे हे माजी नातेपुते ग्रामपंचायत सदस्य म्हणून राहिले आहेत. त्यांचा वाढदिवस 01/01/2023 रोजी वाढदिवस साजरा होत असून विविध सामाजिक उपक्रम राबविले जात आहेत. वाढदिवसानिमित्त 29/12/2022 रोजी कै.सुरेश(दादा) ठोंबरे युवा मंच , मा.अतुल(बापू) पाटील मित्र परिवार व समस्त ग्रामस्त नातेपुते यांच्या संयुक्त विद्यमाने   मनोरंजनाचा गौतमी पाटील यांचा कार्यक्रम होत आहे. संदीप (दादा ) ठोंबरे हे लहानथोर युवकांसाठी आदरयुक्त दयावान नेतृत्व म्हणून नातेपुते नगरी व परिसरामध्ये त्यांच्याकडे पाहिले जाते. प्रत्येक युवकासाठी संदीप (दादा) ठोंबरे म्हणजे जिव्हाळा समजला जातात. साधी राहणी , सर्वांना मान-सन्मान देणारे आहेत. आपल्या जवळ आलेला लहान युवक असो वा मोठे वयोवृद्ध व्यक्ति असो त्यांचा आदर करतात हे मी जवळून उपसंपादक म्हणून पाहिले आहे , अनुभवले आहे. कोणतेही संकट असो , आपत्तीकाळ असो , सामाजिक उ...

महान समाजसुधारकांचा राज्यकर्त्यांनी अवमान करू नये नाहीतर "जशास तसे उत्तर" जनता देईल हे लक्षात घ्यावे

उपसंपादक : साप्ताहिक बहुजन भूषण वृत्तपत्र           सध्या राज्यकर्ते पिसाळलेले असून त्यांनी प्रचंड संपत्ती गोळा केली असून त्या संपत्तीचा त्यांना “माज” चढला आहे. मतदार राज्यांनी मतदान करून राज्यकर्ते बनविले तेच राज्यकर्ते सध्या छत्रपती शिवाजी महाराज , महात्मा ज्योतिबा फुले , घटनेचे शिल्पकार परमपूज्य डॉ.बाबासाहेब आंबेडकर , कर्मवीर भाऊराव पाटील व इत्यादी समाजसुधारक यांच्याबाबत अवमानकारक भाषा वापरुन त्यांचा अपमान करीत आहेत हे चिंताजनक व गंभीर अशी बाब आहे. राज्यकर्ते झाले म्हणून समाजसुधारकांना वाईट समजू लागले आहेत. राज्यकर्त्यांनो तुमची लायकी काय ? तुम्ही समाजसुधारकांची बरोबरी तुमच्या हजार पिढ्या जरी आल्या तरी तुमची बरोबरी होणार नाही. जे राज्यकर्ते महान समाजसुधारक यांच्यावरती जे अवमानकारक बोलून त्यांचा अवमान करीत आहेत , जातीधर्मामध्ये तेढ निर्माण करीत आहेत , शांततेचा भंग करीत आहेत अशा राज्यकर्त्यांना घराबाहेर पडू देता कामा नये व त्यांना व त्यांच्या पार्टीला जनतेने मतदान करू नये.           जे र...

पोलिस भरती असो वा कोणत्याही विभागाची भरती असो ती रद्द करू नये, तरुणांच्या जीवाशी सरकारने खेळू नये, सरकारने डोके ठिकाणावर ठेवावे

  उपसंपादक : साप्ताहिक बहुजन भूषण वृत्तपत्र           आपण निवडून दिलेल्या कोणत्याही कालावधी मधील महाराष्ट्र सरकार यांनी पोलिस भरती असो वा कोणत्याही विभागाची भरती असो ती रद्द अथवा स्थगित करू नये. युवकांच्या जीवाशी खेळू नये. युवक शासनाच्या नियमांनुसार परीक्षा फी भरत आहेत. जी स्पर्धा परीक्षा/भरती असते त्यासाठी अभ्यास करतात. त्यासाठी लागणार्‍या नियमांनुसार तरुण त्यासाठी मेहनत , कष्ट घेत असतात. नोकरी लागेल म्हणून रात्रंदिवस काळजी करत असतात. आई , वडिलांच्या घामाचे चीज करावे अशी महत्वकांक्षा असते. त्या आशेवर युवक भरतीसाठी कष्ट घेत असतो. कोणतीही भरती रद्द झाल्यास अगर स्थगित केल्यास भरलेली फी युवकांना परत दिली जात नाही ही गंभीर व चिंताजनक बाब आहे. स्थगिती किंवा भरती रद्द का करतात ? असे होणार असेल तर भरती करण्यापूर्वी सरकार का विचार करत नाही असे वाटते. भरती करीत असताना स्थगित करणे किंवा रद्द केल्यास युवकांनी एकजुटीने एकत्र येवून कोणतेही महाराष्ट्र सरकार असो परत अशा सरकारला मतदान करू नये असे वाटते. युवक हा देशाचा अभिमान आहे. त्या युवकाला भरत...

गुरसाळे येथील श्रीकांत नानासाहेब मोरे यांचेवरती “प्राणघातक” हल्ला जनतेमध्ये भीतीचे वातावरण

संपादक : साप्ताहिक बहुजन भूषण वृत्तपत्र           गुरसाळे ता.माळशिरस जि.सोलापूर येथील ग्रामपंचायत निवडणूक होत आहे. या निवडणुकीत पॅनेल प्रमुख म्हणून श्रीकांत नानासाहेब मोरे पॅनेल सांभाळत आहेत. फॉर्म भरणे संपले , काढून घेणे संपले , चिन्ह वाटप झाले असे असताना दिनांक 07/12/2022 वार बुधवार या दिवशी 05.30 वा. च्या सुमारास गुरसाळे येथील घराच्या पटांगणात श्रीकांत नानासाहेब मोरे व त्यांची पत्नी बसले होते. त्या दरम्यान चारचाकी वाहनातून अज्ञात दोन व्यक्ती आले व त्यांनी त्यांचेवरती प्राणघातक हल्ला केला. हल्या दरम्यान मोरे यांनी प्रतिकार केल्यामुळे थोडक्यात बचावले. मोरे यांना मारण्यासाठी भाडोत्री गुंड कोणी पाठवले ? मोरे यांचा मारेकरी सुत्रधार कोण ? नातेपुते पोलिस स्टेशनला फिर्याद दिली असून पोलिस शोध घेत आहेत असे समजले. श्रीकांत नानासाहेब मोरे हे विविध सोसायटीचे माजी चेअरमन म्हणून काम पाहिले आहे. जनमाणसात त्यांची लोकप्रियता आहे व मोरे हे मोहिते-पाटील गटाचे कट्टर समर्थक आहेत. गुरसाळे येथील ग्रामपंचायत निवडणूक होत आहे. मोरे हे सर्वधर्म समभाव व सर्वात म...

आमची लेखणी सदैव “तळपतच” राहणार

  उपसंपादक : साप्ताहिक बहुजन भूषण वृत्तपत्र पत्रकारिता करीत असताना ती स्वच्छ केली पाहिजे. पत्रकारिता अन्याय , अत्याचार करणार्‍यांचा “कर्दनकाळ” ठरावी यासाठी आम्ही पत्रकारिता करीत आहे . पत्रकारिता करीत असताना कोणाचे वाईट करता येईल या दृष्ठीने करणार नाही. आमच्या वृत्तपत्राचे ध्येय उद्दीष्ट आहे की , जे दिसेल तेच लिहले जाते . पत्रकार हा रंजल्या गांजल्यांना आधार अशी पत्रकारिता करीत असतो. कोणाला तरी वेदना , दु:ख , व्हावे म्हणून म्हणून पत्रकारिता करीत नाही . कोणावरही अन्याय होता कामा नये. न्याय देण्यासाठीच पत्रकारितेचा उपयोग झाला पाहिजे. पत्रकारिता केवळ पैसे कमविणे , दहशत बसविणे , ब्लॅकमेल करणे यासाठी करायची नसते. घडणार्‍या घटनेची माहिती जनतेपर्यंत कशी पोहोचेल यासाठी करायची असते. आमची पत्रकारिता अन्यायाला वाचा फोडणे असे असते. सध्याच्या काळात नवीन पत्रकारामुळे , जुन्या पत्रकारांना बदनामीला सामोरे जावे लागते. त्यामध्ये “तोतया” पत्रकारांचे जास्त प्रमाण आहे. पत्रकारिता ही “विस्तव” आहे ती इतरांना चटके देताना कधीकधी पत्रकारांना सुद्धा चटके देत असते. सध्या नवीन पत्रकारांमुळे पत्रकार...

डॉक्टरांनी पत्रकारांच्या आरोग्यासाठी ५०% सूट देवून माणुसकीचे नाते जपावे

  उपसंपादक : बहुजन भूषण वृत्तपत्र पत्रकार हा लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे. पत्रकार आजूबाजूला घडणार्‍या घटनेची माहिती जनतेपर्यंत पोहोचवण्याचे पवित्र काम करीत असतो. पत्रकार हा एखाद्याला “हीरो ही करतो आणि झीरो ही करतो” कोणताही व्यवसाय असो , संस्था असो त्याची माहिती जनतेपर्यंत पोहोचवण्याचे पवित्र काम पत्रकार करतो. पत्रकार हा जनतेचा सेवक आहे. पत्रकारिता करीत असताना स्वत:ची , कुटुंबाची पर्वा न करता जनतेसाठी झटत असतो. पत्रकारांना पगार नसतो. ज्या जाहिरातीतुन कमिशन मिळते त्यातूनच कुटुंब चालवावे लागते. पत्रकार हा कोणाचाही “दुश्मन” नसतो तो “मित्र” असतो. डॉक्टरांनी पत्रकाराविषयी ५०% सूट देवून सहकार्य करावे. तसेच डॉक्टरांनी पत्रकारांना ५०% सूट दिल्यामुळे आर्थिक तोटा होईल असेही काही नाही. समुद्रातील घोटभर पाणी काढले म्हणून समुद्र कधी आठला नाही किंवा त्याची पातळी कमी झाली नाही असे आहे का ? तसेच जगाच्या पाठीवर कोणताही डॉक्टर अधिकृत नाही ते अनाधिकृत आहेत. याचा अर्थ असा आहे की , डॉक्टरांनी पेशंट कडून किती बिल घ्यावे याला मर्यादा नाही. तोंडातून जो शब्ध निघतो त्यानुसार डॉक्टर बिल घेतात हे ही संपाद...

वाखरी येथे यलम्मा देवीच्या यात्रेस सुरुवात

  उपसंपादक : साप्ताहिक बहुजन भूषण वृत्तपत्र                         वाखरी ता.पंढरपूर जि.सोलापूर येथे यलम्मा देवीच्या यात्रेला सुरुवात झाली असून भागवात एकादशी दिवशी पालखी पुजारी नारायण मनोहर पोरे यांच्या निवासस्थानापासून देवीच्या मंदिरापर्यंत वाजत गाजत नेण्यात आली दि.05/12/2022 रोजी सोमवार रोजी यलम्मा देवीला नैवद्य दाखविण्याचा कार्यक्रम असतो. दि.06/12/2022 रोजी मंगळवार या दिवशी पालखी नवसाची आहेर घेण्यासाठी भक्तांच्या घरी जाते. आहेर घेवून आलेनंतर पालखी कुंडाच्या पूजनाच्या कार्यक्रमासाठी जाते.           त्यानंतर मंदिराजवळ देणगीदारांचा व इतरांचा सहकार्य केल्याबद्दल सन्मान केला जातो. त्यानंतर पुजारी नारायण मनोहर पोरे , ज्योतीराम उर्फ परशुराम पोरे , हनुमंत पोरे यांचा होमाचा कार्यक्रम असतो. त्या होमातून हे तिघेजण जात असतात. या देवस्थानची स्थापना १९२४ साली झाली असून मंदिर पुर्णपणे दगडी आहे. २०२४ ला यलम्मा देवीच्या मंदिराला १०० वर्ष पूर्...

समाजभूषण नानासाहेब देशमुख यांच्या ९६ व्या जयंती निमित्त एस.एन.डी. स्कूल नातेपुतेच्या इमारतीच्या पहिला मजला भूमिपूजनाचा कार्यक्रम संपन्न

              डॉ.एम.के. इनामदार आपले मनोगत व्यक्त करताना  उपसंपादक : साप्ताहिक बहुजन भूषण           नातेपुते तालुका माळशिरस जि.सोलापूर येथील समाजभूषण नानासाहेब देशमुख यांची ९६ वी जयंती साजरी झाली यावेळी एस.एन.डी. इंटरनॅशनल स्कूल इमारतीच्या पहिल्या माजल्याचे भूमिपूजन डॉक्टर एम.के. इनामदार , डॉ.एम.पी. मोरे , कार्यक्रमाचे अध्यक्ष अॅड.डी.एन. काळे , बापूसाहेब देशमुख , माजी जिल्हापरिषद उपाध्यक्ष सोलापूर बाबाराजे (दादा) देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले. डॉ.एम.के. इनामदार यांनी या शाळेचे कौतुक केले व या शाळेला पाच लाख रुपयेची देणगी दिली. डॉ.एम.के. इनामदार म्हणाले , मराठी भाषेबरोबर इंग्रजी भाषेचे ज्ञान असणे गरजेचे आहे. या एस.एन.डी. स्कूलचे रूपांतर “वटवृक्षात” होईल. ही संस्था नावारूपाला येईल तसेच जे उत्सव साजरे करणारे असतात त्यांनी व्यसनमुक्त कार्यक्रम घेवून जनजागृती केली पाहिजे त्यास मी माझ्यापरीने मदत करेल असे डॉ.एम.के. इनामदार म्हणाले. तसेच यावेळी माजी जिल्हा परिषद सोलापूर उपाध्यक्ष बाबा...

मंत्रालय, विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, तहसील कार्यलयातील लोकशाही दिन म्हणजे “कागदी घोडे” नाचवले जातात ही चिंताजनक बाब

उपसंपादक : साप्ताहिक बहुजन भूषण वृत्तपत्र     लोकशाही दिन विभागीय आयुक्त मंत्रालय , जिल्हाधिकारी तहसील कार्यालयात साजरा होत आहे पण यामधून जनतेने दिलेल्या अर्जाचे “ना निवारण ना न्याय” होत नाही. या लोकशाही दिनात दिलेल्या अर्जानुसार त्या अर्जदाराला न्याय दिला पाहिजे. त्याचे निवारण केले गेले पाहिजे किंवा अडचण असल्यास अधिकारी यांनी अर्जदाराला मार्गदर्शन केले पाहिजे. लोकशाही दिन हा न्याय दिन झाला पाहिजे परंतु लोकशाही दिन जनतेसाठी “शाप दिन” ठरत आहे. लोकशाही दिनातील अर्जदाराच्या अर्जाला केराची टोपली दाखवली जाते. लोकशाही दिनात ज्या अधिकारी कार्यालयात अर्जदार अर्ज देतो व न्याय मिळेल अशी अपेक्षा ठेवतो परंतु ज्या अर्जदाराचे अर्ज ज्या त्या विषयानुसार आले असतात त्यानुसार त्या त्या विभागाचे अधिकारी यांच्याकडे त्या अर्जदाराचे अर्ज पाठवून कागदी “घोडे” नाचवून बनवाबनवी केली जाते. लोकशाही दिनातून त्या अर्जदाराला न्यायच मिळाला पाहिजे हा न्यायदिन सांगतो. लोकशाही दिनातील अर्ज हा एक प्रकारचा तक्रार ( FIR) असतो. त्यानुसार त्याची दखल घेवून त्या अर्जदाराचे समाधान व न्याय मिळाला पाहिजे. लोकशाही द...

गायरान जमिनीवर अतिक्रमणे नियमित केली गेली पाहिजेत त्या कुटुंबाला बेघर करू नये

उपसंपादक : साप्ताहिक बहुजन भूषण           सध्या गायरान जमिनीवर अतिक्रमणे काढण्यात येणार असल्यामुळे गोरगरीब कुटुंबावर अन्याय होणार आहे. शासनाने वेळोवेळी परिपत्रके काढून गावठाणामध्ये राहत असलेल्या कुटुंबाची घर जागा नियमित करण्यात यावी असे असंख्य परिपत्रके शासनाने काढलेली आहेत व लाखो कुटुंबाची घर जागा नियमित करून त्यांना शासनाच्या लोककल्याणकारी योजना देवून आधार दिला आहे. अतिक्रमणे ही गायरान जमिनी असो वा ग्रामपंचायत गावठाण असो. कुटुंबाच्या सदस्यानुसार ती जागा त्या कुटुंबाच्या नावावर करावी असे शासनाचे परिपत्रक सांगते. गायरान जमिनी त्या कुटुंबांनी मोठ्या प्रमाणात धरून त्या वहिवाट करून कब्जा केला आहे. त्याची मोजणी केली गेली पाहिजे व गरजेनुसार शासनाच्या परिपत्रकानुसार ती जागा देवून कायम करावी , त्यांना बेघर करू नये , उध्वस्त करू नये. महाराष्ट राज्यात मोठ्या प्रमाणात राजकीय पुढार्‍यांनी सत्तेचा दुरुपयोग करून शासनाच्या गायरानी जमिनी , गावठाण जागा बळकावून कब्जा केला आहे. त्याचप्रमाणे आजी - माजी ग्रामपंचायत मधील कारभारी , पंचायत समिति , जिल्हा परि...

अहिंसा सेवा समितीचे संस्थापक मा.श्री.अविनाशजी दोशी साहेब (नातेपुते नगरपंचायत, नगरसेवक) यांच्या सामाजिक कार्याची ओळख महाराष्ट्रभर

मा.श्री.अविनाशजी दोशी संस्थापक - अहिंसा सेवा समिती  नातेपुते नगरपंचायत नगरसेवक उपसंपादक : साप्ताहिक बहुजन भूषण           नातेपुते ता.माळशिरस , जि.सोलापूर येथील अहिंसा सेवा समितीचे संस्थापक मा.श्री.अविनाशजी दोशी नातेपुते नगरपंचायत नगरसेवक यांचे सामाजिक कार्य एक इतिहास बनत चालला आहे. अहिंसा सेवा समितीच्या माध्यमातून सामाजिक कार्य जोमाने व दिमाखदार चालू आहे. भुकेलेल्यांना अन्न , गरजूंना पाणी , अनाथांना पांघरून घेण्याइतपत कपडे , संकट काळात मदत , रोगराई काळात मदत , सर्वधर्म समभाव या नात्याने सर्व सामाजिक उपक्रमात सहभाग , वृक्षारोपण , व्यवसायभिमुख उपक्रम असे विविध उपक्रम राबवित आहेत. “अहिंसा “ याला समोर ठेवून आपले कर्तव्याचे पालन करीत आहेत. द्वेष , मत्सर , भेदभाव , निंदा , वाईट बोलणे याबाबत दक्षता घेवून आपली वाटचाल करीत आहेत. रागाला जवळ करती नाहीत. आदर द्या आदर घ्या ही भूमिका त्यांची अतिशय मौल्यवान ठरत आहे. माणुसकी कशी जपावी , मैत्री कशी करावी याचे ज्वेलंत उदाहरण म्हणजे अविनाश दोशी होय. सत्ता , संपत्तीचा कधी गर्व नाही , एक म...