Skip to main content

आमची लेखणी सदैव “तळपतच” राहणार

 



उपसंपादक : साप्ताहिक बहुजन भूषण वृत्तपत्र

पत्रकारिता करीत असताना ती स्वच्छ केली पाहिजे. पत्रकारिता अन्याय, अत्याचार करणार्‍यांचा “कर्दनकाळ” ठरावी यासाठी आम्ही पत्रकारिता करीत आहे. पत्रकारिता करीत असताना कोणाचे वाईट करता येईल या दृष्ठीने करणार नाही. आमच्या वृत्तपत्राचे ध्येय उद्दीष्ट आहे की, जे दिसेल तेच लिहले जाते. पत्रकार हा रंजल्या गांजल्यांना आधार अशी पत्रकारिता करीत असतो. कोणाला तरी वेदना, दु:ख, व्हावे म्हणून म्हणून पत्रकारिता करीत नाही. कोणावरही अन्याय होता कामा नये. न्याय देण्यासाठीच पत्रकारितेचा उपयोग झाला पाहिजे. पत्रकारिता केवळ पैसे कमविणे, दहशत बसविणे, ब्लॅकमेल करणे यासाठी करायची नसते. घडणार्‍या घटनेची माहिती जनतेपर्यंत कशी पोहोचेल यासाठी करायची असते. आमची पत्रकारिता अन्यायाला वाचा फोडणे असे असते. सध्याच्या काळात नवीन पत्रकारामुळे, जुन्या पत्रकारांना बदनामीला सामोरे जावे लागते. त्यामध्ये “तोतया” पत्रकारांचे जास्त प्रमाण आहे. पत्रकारिता ही “विस्तव” आहे ती इतरांना चटके देताना कधीकधी पत्रकारांना सुद्धा चटके देत असते. सध्या नवीन पत्रकारांमुळे पत्रकारितेला ग्रहण, वाळवी लागली असली तरी स्वच्छ, पारदर्शी पत्रकारिता जे करीत असताना जगाच्या पाठीवर त्या पत्रकारांना भीती नसते. पैसे उकळण्यासाठी खंडणीच्या माध्यमातून एखाद्याचा छळ करणे मानसिक त्रास देणे हे पत्रकारितेचे लक्षण नाही. पत्रकार हा नावासाठी असतो परंतु इतरांना मोठे करण्यात त्यांचा मोठा हातभार असतो. पत्रकाराची लेखणी कधी जहालवादी तर कधी मवाळवादी असावी लागते. सध्या पत्रकारांची अवस्था कडीपत्ता सारखी झाली आहे “वापरा व फेकून द्या”. मी तर म्हणेन की, पत्रकार हे गुलाम म्हणून काम करीत आहेत. संपादकाला पेपर चालवायचा असतो, त्यासाठी आर्थिक निधि लागतो. त्यामुळे राज्यकर्त्यांना दुखविता येत नाही. त्यांचे अवैध व्यवसाय असले तरी त्यांना त्यांच्या व्यवसायविषयी चांगलेच लिहावे लागते. आमची पत्रकारिता म्हणजे “शोध पत्रकारिता” आहे. सत्य घटनेवर आधारित लेखणीद्वारे लिखाण केले जाते व जनतेसमोर मांडले जाते. त्यामध्ये द्वेष, मत्सर, भेदभाव असे काहीही नसते. आमची लेखणीच अन्याय करणारे आहेत त्यांना “रक्तबंबाळ” करण्यासाठी कारण ठरते. आम्ही लिहलेल्या लेखणीतून अनेकांना मानपान सन्मान मिळाला आहे. तर काही लोकसेवक झाले आहेत. इतरांना मोठे करणे यामध्येच आम्हाला समाधान वाटते. पत्रकाराने चौथ्या स्तंभाचा आदर केला पाहिजे असे वाटते.          

 

जनहितार्थ

अधिक जाहिरातीसाठी संपर्क

संपादक : मा.श्री. डॉ. अभिमन्यु बी. आठवले

९४२०३०२५६१

उपसंपादक : वैभव अ. आठवले

साप्ताहिक बहुजन भूषणसाप्ताहिक बहुजन मित्र वृत्तपत्र

संस्थापक : बहुजन राष्ट्रशक्ति सामाजिक संघटना महाराष्ट्र राज्य

टीप : जे दिसेलजे पाहिले तेच लिहिले हेच वृत्तपत्राचे ध्येय उद्दीष्ट आहे.

 

Comments

Popular posts from this blog

नातेपुते पोलीस ठाणेकडील गुन्हे प्रकटीकरण शाखेची आदर्श कामगिरी चंदन चोरी करणा-या आरोपीस २४ तासात केले जेरबंद

  उपसंपादक: वैभव आठवले साप्ताहिक बहुजन भूषण वृत्तपत्र नातेपुते पोलिस स्टेशन यांचेकडून मिळालेल्या माहितीनुसार      नातेपुते पोलीस ठाणे हददीमध्ये मौजे मांडवे, ता.माळशिरस येथे राजन सुकुमार दोशी यांचे शेतातील दिनांक २६/०६/२०२५ रोजी सकाळी ०८/०० वा ते सायंकाळी ०५/००वा. चे दरम्यान शेतातील बांधावरील १० वर्षे वयाची ०२ चंदनाची झाडे अंदाजे किंमत २७,०००/- रू चे कोणीतरी अज्ञात चोरटयाने चोरून नेली आहेत त्याबाबत फिर्यादी नामे राजन सुकुमार दोशी रा.नातेपुते, ता.माळशिरस, जि.सोलापुर यांचे फिर्यादीवरुन नातेपुते पोलीस ठाणेस गु.र.नं. २३७/२०२५ भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ३०३ (२) प्रमाणे दिनांक २६/०६/२०२५ रोजी गुन्हा दाखल झाला होता. सदर गुन्हयाचा तपास पोहेकॉ/१७०८ विकास बाबर हे करीत होते.      नातेपुते पोलीस ठाणेचे गुन्हे प्रकटीकरण शाखेचे अंमलदार यांनी सदर गुन्हयाचा तपास दरम्यान मिळालेल्या गोपनिय बातमीव्दारे माहीती काढून इसम नामे १) गोविंद दुर्याधन काळे २) मेघराज ज्ञानदेव भोसले दोघे रा माळशिरस यांनी गुन्हा केल्याचे निष्पन्न झाल्याने त्यास पोहकॉ/१७०८ बाबर व गुन्हे प्रकटीक...

नातेपुते पोलीस ठाणेकडून जबरी चोरी करणा-या आरोपीस २४ तासाच्या आत केले जेरबंद

उपसंपादक: वैभव आठवले (साप्ताहिक बहुजन भूषण वृत्तपत्र) नातेपुते पोलीस ठाणे यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार      नातेपुते पोलीस ठाणे हददीमध्ये मौजे नातेपुते, ता.माळशिरस येथे दिनांक ०३/०४/२०२५ रोजी सायकाळी ०७.३० वा सुमारास गुन्ह्यातील फिर्यादी नामे वैभव विठ्ठल नष्टे वय ३१ वर्षे, रा. माळशिरस ता. माळशिरस जि. सोलापुर व सोबत त्यांची आई माया नष्टे असे त्यांचेकडील स्कुटी गाडी क्र. एम.एच. ४५ ए.व्ही. १२६१ यावरुन नातेपुते परिसरात शिंगणापुर पाटी ते बायपास रोड मार्गे नातेपुते फडतरी जाणारे बायपास रोडवर आले असताना दोन अज्ञात इसमांनी त्यांचे पाठीमागुन येऊन फिर्यादीचे आई माया विठल नष्टे याचे गळयातील सोन्याचे दागीने बळजबरीने काढुन घेऊन मोटार सायकल वरुन पळुन गेल्याने त्याबाबत फिर्यादी नामे वैभव विठ्ठल नष्टे वय ३१ वर्षे रा. माळशिरस ता. माळशिरस जि. सोलापुर यांचे फिर्यादीवरुन नातेपुते पोलीस ठाणेस गुरनं १३३/२०२५ भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ३०९ (४), ३ (५) प्रमाणे दिनांक ०८/०४/२०२५ रोजी १८ वा ३९ मि. गुन्हा दाखल झाला होता. सदर गुन्हयाचा तपास गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोना/५६२ राकेश लोहार करीत ...

अतुल कुलकर्णी साहेब पोलीस अधीक्षक, सोलापूर ग्रामीण यांच्या संकल्पनेतून धर्मतुरी, ता.माळशिरस रोडलगत वृक्षारोपण

  उपसंपादक: वैभव आठवले साप्ताहिक बहुजन भूषण वृत्तपत्र नातेपुते पोलिस स्टेशन यांचेकडून मिळालेल्या माहितीनुसार       दिनांक 26/06/2025 रोजी मा. श्री. अतुल कुलकर्णी साहेब पोलीस अधीक्षक ,सोलापूर ग्रामीण यांच्या संकल्पनेतून  व मा. उपविभागीय पोलीस अधिकारी श्री नारायण शिरगावकर उपविभाग माळशिरस यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू करण्यात आलेल्या हरित वारी सन 2025 उपक्रमांतर्गत  नातेपुते पोलीस  ठाणे हद्दीतील  मौजे धर्मपुरी येथे  पालखी मार्गवर हरितवारी अनुषंगाने, माननीय पोलीस अधीक्षक श्री अतुल कुलकर्णी साहेब, यांच्या हस्ते रोडलगत वृक्षारोपण करण्यात आले.       सदर ठिकाणी वृक्षारोपण करिता गावातील सरपंच,शेतकरी व गावातील प्रतिष्ठित नागरिक तसेच  पोलीस पाटील, पोलीस मित्र, ग्राम सुरक्षा दल यांच्या उपस्थितीत हरित वारी उपक्रम संपन्न झाला आहे. बातमी अधिक जाहिरातीसाठी संपर्क संपादक : मा.श्री. डॉ. अभिमन्यु बी. आठवले ९४२०३०२५६१ उपसंपादक : वैभव अ. आठवले साप्ताहिक बहुजन भूषण ,  साप्ताहिक बहुजन मित्र वृत्तपत्र संस्थापक :  बहुजन राष्ट्रशक्ति साम...