Skip to main content

महान समाजसुधारकांचा राज्यकर्त्यांनी अवमान करू नये नाहीतर "जशास तसे उत्तर" जनता देईल हे लक्षात घ्यावे

उपसंपादक : साप्ताहिक बहुजन भूषण वृत्तपत्र

          सध्या राज्यकर्ते पिसाळलेले असून त्यांनी प्रचंड संपत्ती गोळा केली असून त्या संपत्तीचा त्यांना “माज” चढला आहे. मतदार राज्यांनी मतदान करून राज्यकर्ते बनविले तेच राज्यकर्ते सध्या छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, घटनेचे शिल्पकार परमपूज्य डॉ.बाबासाहेब आंबेडकर, कर्मवीर भाऊराव पाटील व इत्यादी समाजसुधारक यांच्याबाबत अवमानकारक भाषा वापरुन त्यांचा अपमान करीत आहेत हे चिंताजनक व गंभीर अशी बाब आहे. राज्यकर्ते झाले म्हणून समाजसुधारकांना वाईट समजू लागले आहेत. राज्यकर्त्यांनो तुमची लायकी काय? तुम्ही समाजसुधारकांची बरोबरी तुमच्या हजार पिढ्या जरी आल्या तरी तुमची बरोबरी होणार नाही. जे राज्यकर्ते महान समाजसुधारक यांच्यावरती जे अवमानकारक बोलून त्यांचा अवमान करीत आहेत, जातीधर्मामध्ये तेढ निर्माण करीत आहेत, शांततेचा भंग करीत आहेत अशा राज्यकर्त्यांना घराबाहेर पडू देता कामा नये व त्यांना व त्यांच्या पार्टीला जनतेने मतदान करू नये.

          जे राज्यकर्ते सध्या “वाचाळवीर” ठरत आहेत त्या औलादींना जनतेने धडा शिकविला पाहिजे. सध्या राज्यकर्त्यांनी हुकूमशाही चालू केली आहे, दहशतीचे वातावरण पसरविले आहे जेणेकरून वादविवाद व्हावेत, भांडणतंटे व्हावेत, एकमेकाविषयी समाजा-समाजामध्ये दूषित वातावरण व्हावे यासाठी राज्यकर्त्यांकडून समाजसुधारकांचा अवमान चालू आहे. राज्यकर्त्यांना समाजसुधारक “लहान” वाटत आहेत पण ते लहान नसून “महान” आहेत. राज्यकर्त्यांनी स्वत:ची पात्रता तपासावी, विनाकारण समाजसुधारकांवरती बोलून प्रसिद्धीमध्ये राहण्याचे स्वप्न बघू नये व ते कधीच साकार होणार नाही हे “भाडखाऊ” राज्यकर्त्यांनी लक्षात घ्यावे. समाजसुधारक यांचे महान कार्य असून त्यांना कमी लेखता कामा नये. त्यांची तुलना तुमच्याशी कधीही होणार नाही हे “हरामखोर” राज्यकर्त्यांनी लक्षात घ्यावे.

          जे पेराल तेच उगवले जाणार आहे हे राज्यकर्त्यांनी लक्षात घ्यावे. पदाचा दुरुपयोग करू नये, राज्यकर्त्यांनी खोट्या तक्रारी करून मजबूत कलमे लावून कार्यकर्त्याचे आयुष्य बरबाद करण्याचे कटकारस्थान चालू केले आहे त्याचे उत्तम उदाहरण म्हणजे पिंपरी चिंचवड मधील घटना. आमचे भिमसैनिक लढणारे आहेत, रडणारे नाहीत, जोर का झटका देणारे आहेत. राज्यकर्त्यांनो महान समाजसुधारकांचा अवमान होईल असे वागू नये, सावधगिरी बाळगावी. समाजसुधारकांचा अवमान करणार्‍या राज्यकर्त्या भडव्यांचा बहुजन राष्ट्रशक्ति सामाजिक संघटनेचे संस्थापक अभिमन्यु बी. आठवले यांच्याकडून जाहीर निषेध.

          तसेच 1 जानेवारी भीमाकोरेगाव विजयस्तंभ अभिवादन दिवस आहे. या दिवशी लाखो भिमसैनिक आपल्या कुटुंबासमवेत भिमाकोरेगाव येथे विजयीस्तंभास अभिवादन करण्यासाठी येत असतात. सध्या वातावरण चिघळे आहे यामुळे भिमसैनिकांनी गाफिल राहू नये. “झेंडा लहान पण दांडा मोठा” असायला हवा. काही समाजकंठकांना पाठबळ देवून काही जातिवादी पार्टीचे नेते वातावरण गढूळ करण्यासाठी कट रचतील असे वाटते. भिमसैनिक बांधवांनो सावधान रहावे व नम्रपणाने, शांततेने भीमकोरेगाव येथे जाऊन अभिवादन करावे. तसेच आमचा बाप डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी भीक मागू नका, लाचारी पत्करू नका. शिका, संघटित व्हा, संघर्ष करा, सुटाबुटात रहा, स्वाभिमानी व्हा असे सांगणारे आमचे बाप होते. जय भिम                  

जनहितार्थ

अधिक जाहिरातीसाठी संपर्क

संपादक : मा.श्री. डॉ. अभिमन्यु बी. आठवले

९४२०३०२५६१

उपसंपादक : वैभव अ. आठवले

साप्ताहिक बहुजन भूषणसाप्ताहिक बहुजन मित्र वृत्तपत्र

संस्थापक : बहुजन राष्ट्रशक्ति सामाजिक संघटना महाराष्ट्र राज्य

टीप : जे दिसेलजे पाहिले तेच लिहिले हेच वृत्तपत्राचे ध्येय उद्दीष्ट आहे.

Comments

Popular posts from this blog

नातेपुते पोलीस ठाणेकडील गुन्हे प्रकटीकरण शाखेची आदर्श कामगिरी चंदन चोरी करणा-या आरोपीस २४ तासात केले जेरबंद

  उपसंपादक: वैभव आठवले साप्ताहिक बहुजन भूषण वृत्तपत्र नातेपुते पोलिस स्टेशन यांचेकडून मिळालेल्या माहितीनुसार      नातेपुते पोलीस ठाणे हददीमध्ये मौजे मांडवे, ता.माळशिरस येथे राजन सुकुमार दोशी यांचे शेतातील दिनांक २६/०६/२०२५ रोजी सकाळी ०८/०० वा ते सायंकाळी ०५/००वा. चे दरम्यान शेतातील बांधावरील १० वर्षे वयाची ०२ चंदनाची झाडे अंदाजे किंमत २७,०००/- रू चे कोणीतरी अज्ञात चोरटयाने चोरून नेली आहेत त्याबाबत फिर्यादी नामे राजन सुकुमार दोशी रा.नातेपुते, ता.माळशिरस, जि.सोलापुर यांचे फिर्यादीवरुन नातेपुते पोलीस ठाणेस गु.र.नं. २३७/२०२५ भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ३०३ (२) प्रमाणे दिनांक २६/०६/२०२५ रोजी गुन्हा दाखल झाला होता. सदर गुन्हयाचा तपास पोहेकॉ/१७०८ विकास बाबर हे करीत होते.      नातेपुते पोलीस ठाणेचे गुन्हे प्रकटीकरण शाखेचे अंमलदार यांनी सदर गुन्हयाचा तपास दरम्यान मिळालेल्या गोपनिय बातमीव्दारे माहीती काढून इसम नामे १) गोविंद दुर्याधन काळे २) मेघराज ज्ञानदेव भोसले दोघे रा माळशिरस यांनी गुन्हा केल्याचे निष्पन्न झाल्याने त्यास पोहकॉ/१७०८ बाबर व गुन्हे प्रकटीक...

नातेपुते पोलीस ठाणेकडून जबरी चोरी करणा-या आरोपीस २४ तासाच्या आत केले जेरबंद

उपसंपादक: वैभव आठवले (साप्ताहिक बहुजन भूषण वृत्तपत्र) नातेपुते पोलीस ठाणे यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार      नातेपुते पोलीस ठाणे हददीमध्ये मौजे नातेपुते, ता.माळशिरस येथे दिनांक ०३/०४/२०२५ रोजी सायकाळी ०७.३० वा सुमारास गुन्ह्यातील फिर्यादी नामे वैभव विठ्ठल नष्टे वय ३१ वर्षे, रा. माळशिरस ता. माळशिरस जि. सोलापुर व सोबत त्यांची आई माया नष्टे असे त्यांचेकडील स्कुटी गाडी क्र. एम.एच. ४५ ए.व्ही. १२६१ यावरुन नातेपुते परिसरात शिंगणापुर पाटी ते बायपास रोड मार्गे नातेपुते फडतरी जाणारे बायपास रोडवर आले असताना दोन अज्ञात इसमांनी त्यांचे पाठीमागुन येऊन फिर्यादीचे आई माया विठल नष्टे याचे गळयातील सोन्याचे दागीने बळजबरीने काढुन घेऊन मोटार सायकल वरुन पळुन गेल्याने त्याबाबत फिर्यादी नामे वैभव विठ्ठल नष्टे वय ३१ वर्षे रा. माळशिरस ता. माळशिरस जि. सोलापुर यांचे फिर्यादीवरुन नातेपुते पोलीस ठाणेस गुरनं १३३/२०२५ भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ३०९ (४), ३ (५) प्रमाणे दिनांक ०८/०४/२०२५ रोजी १८ वा ३९ मि. गुन्हा दाखल झाला होता. सदर गुन्हयाचा तपास गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोना/५६२ राकेश लोहार करीत ...

अतुल कुलकर्णी साहेब पोलीस अधीक्षक, सोलापूर ग्रामीण यांच्या संकल्पनेतून धर्मतुरी, ता.माळशिरस रोडलगत वृक्षारोपण

  उपसंपादक: वैभव आठवले साप्ताहिक बहुजन भूषण वृत्तपत्र नातेपुते पोलिस स्टेशन यांचेकडून मिळालेल्या माहितीनुसार       दिनांक 26/06/2025 रोजी मा. श्री. अतुल कुलकर्णी साहेब पोलीस अधीक्षक ,सोलापूर ग्रामीण यांच्या संकल्पनेतून  व मा. उपविभागीय पोलीस अधिकारी श्री नारायण शिरगावकर उपविभाग माळशिरस यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू करण्यात आलेल्या हरित वारी सन 2025 उपक्रमांतर्गत  नातेपुते पोलीस  ठाणे हद्दीतील  मौजे धर्मपुरी येथे  पालखी मार्गवर हरितवारी अनुषंगाने, माननीय पोलीस अधीक्षक श्री अतुल कुलकर्णी साहेब, यांच्या हस्ते रोडलगत वृक्षारोपण करण्यात आले.       सदर ठिकाणी वृक्षारोपण करिता गावातील सरपंच,शेतकरी व गावातील प्रतिष्ठित नागरिक तसेच  पोलीस पाटील, पोलीस मित्र, ग्राम सुरक्षा दल यांच्या उपस्थितीत हरित वारी उपक्रम संपन्न झाला आहे. बातमी अधिक जाहिरातीसाठी संपर्क संपादक : मा.श्री. डॉ. अभिमन्यु बी. आठवले ९४२०३०२५६१ उपसंपादक : वैभव अ. आठवले साप्ताहिक बहुजन भूषण ,  साप्ताहिक बहुजन मित्र वृत्तपत्र संस्थापक :  बहुजन राष्ट्रशक्ति साम...