Skip to main content

Posts

Showing posts from June, 2020

मा. शरद पवार साहेब हे देशासाठी व महाराष्ट्रातील जनतेसाठी वरदान आहेत त्यांचा आदर केला गेला पाहिजे

संपादक           मा. श्री. शरद पवार साहेब यांच्यावरती भाजपचे विधान परिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी जे पवार साहेबांना कोरोना या रोगाची उपमा दिली आहे ती चीड आणणारी आहे , ती वेदनादायी आहे. पवार साहेब कोरोना आहेत असे म्हणणे तुमचे असेल तर याची लागण झाली तर आयुष्यभर क्वारंटाईन व्हावे लागेल आणि जगातील कोणतेही शास्त्रज्ञ   व डॉक्टर यांचा इलाज चालणार नाही हे पडळकरांनी लक्षात घेतले पाहिजे. पवार साहेब या भारत मातेचे सुपुत्र आहेत त्यांचा सल्ला , मार्गदर्शन असंख्य नेते घेत आहेत. पवार साहेब मातेचे सोने करणारे आहेत. त्यांच्याबद्दल अशा प्रकारचे बोलून प्रसिद्धी मिळावी या हेतूने बोलणे महागात पडेल. पवार साहेब हे देशातील जनतेच्या हिताचे निर्णय घेणारे कल्याणकारी नेते आहेत. त्यांच्यावर उपमा म्हणजे तमाम देशातील जनतेवरील उपमा हे पडळकरांनी लक्षात घ्यावे. स्वत:चे सामाजिक काम काय आहे हे तपासून पहावे. सध्याच्या काळात कोरोना या रोगाने जग घायाळ केले आहे मग पवार साहेबांना कोरोना या रोगाची उपमा देऊन काय साध्य झाले ? तुम्हालाही घायाळ केल्याशिवाय सोडणार नाही. पव...

लोकनाट्य तमाशा मंडळ व थेटर चालक, मालक कला केंद्रातील कलावंतावर उपासमारीची वेळ येऊ नये यासाठी महाराष्ट्र सरकारने दखल घ्यावी

संपादक  मा. उद्धवजी ठाकरे साहेब , मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य व मा. अजितदादा पवार साहेब उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य तसेच सांस्कृतिक मंत्री महाराष्ट्र राज्य व सर्व मंत्री यांना सविनय सादर           महाराष्ट्रातील नामवंत लोकनाट्य तमाशा मंडळ तसेच कला केंद्र असून याचे मालक व कलाकार यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. शासन लोकनाट्य तमाशा मंडळांना , नामवंतांना आर्थिक मदत देत होते ती मदत बंद झालेचे मालक सांगतात. कला ही महाराष्ट्राची शान आहे. कलाकारामुळेच तर आपल्या जीवनात आनंद मिळत असतो. त्याच कलाकारांच्या या कोरोना कोव्हिड -19 या रोगामुळे त्यांचे उपजीविकेचे साधन बंद झाले. आपली कला दाखवून ते उदरनिर्वाह करत होते. आज त्यांच्यावरती उपासमारीची वेळ आली आहे. तसेच लोकनाट्य तमाशा मंडळ व थेटर कला केंद्र मालक व चालक यांना   सुरू करण्यास शासन मान्यता देत नाही. आज कलाकारांना दुसरे कोणतेच काम करता येत नाही. आयुष्य त्यांचे कला सादर करण्यातच गेले आहे त्यामुळे आता उतरत्या वयात काय काम करायचे ? कसे जगायचे ? हा कलाकारापुढे गंभीर प्रश्न उभा राहिला आ...

लॉकडाऊन च्या काळातील विज बिले माफ करावीत यासाठी महाराष्ट शासनाने दखल घ्यावी

संपादक             लॉकडाऊन च्या काळातील विज वितरण कार्यालयाकडून आलेले बिले ते दुपटी तिपटीने वाढीव आले आहेत त्यामुळे जनतेवर विज वितरण कंपनीची ही हुकुमशाही म्हणावी लागेल. लॉकडाऊनमुळे कमधंदे करता आले नाहीत , शासनाने बाहेर पडू नका असे आदेश काढले , बाहेर पडाल तर गुन्हे दाखल करू असे सांगितले. कोरोना कोव्हिड -१९ हा जीव घेणारा रोग आहे. त्यामध्ये घरगुती , व्यवसाईक बिलांमध्ये भरमसाठ वाढ करून बिले ग्राहकांना पाठविले आहेत त्यामुळे ग्राहकावरती हा विज वितरण कंपनीचा अन्याय आहे. कुठून बिले भरायची हा प्रश्न ग्राहका पुढे उभा राहिला आहे. महाराष्ट्राचे ऊर्जामंत्री मा.नितिन जी राऊत साहेब यांना लॉकडाऊन च्या काळातील विज बिले माफ करावी असे ट्वीटरद्वारे ट्वीट आठवले यांनी केले आहे परंतु त्याला ऊर्जामंत्री यांनी उत्तर दिले नाही. त्यामुळे आलेल्या विज बिलाचे करायचे काय ? वीज बिल भरणे ग्राहकांना शक्य नाही. लॉकडाऊन च्या काळातील विज बिले माफच केली पाहिजेत. शासनाने घराबाहेर पडू नका कोरोना या रोगाच्या काळात आदेश काढले तसेच आदेश महाराष्ट्र शासनाने जनतेने लॉकडाऊन च्या काळातील विज ब...

महाराष्ट्र राज्यातील पोलिस बांधवांची आदर्श कामगिरी

संपादक           महाराष्ट्र राज्यातील पोलिस बांधवांची पोलिसाची नोकरी म्हणजे “खाकी वर्दी” याच वर्दीतील हाच आपला रक्षणकर्ता संकट समयी धावून येतोय. आपल्या कुटुंबाचा , नातेवाईकांचा कोणाचा विचार न करता आपली खाकी वर्दीतील पोलिसांची नोकरी म्हणजे ऊन , वारा , पाऊस यांना तोंड देत सेवा बजावत आहेत. आज पोलिस बांधव आमचे कोरोना या रोगाच्या काळात रक्षण जनतेचे करीत असताना या रोगाची लागण झाली आणि आमचे पोलिस बांधव मृत्यू पावले ही वेदनादायक , दुख , मन हेलावून टाकणारी घटना ऐकली की माझ्या या रक्षणकर्त्या पोलिसाबाबत वाईट वाटते. पोलिस बांधव आहेत म्हणून जनता सुखी आहे त्यांचा आदर केलाच पाहिजे. पोलिस खात्याची नोकरी ही आरामाची नोकरी नाही ती वेदनादायक अशी नोकरी आहे. सतत सतर्क रहावे लागते , काळजी हाच शब्द या पोलिस बांधवांच्या नोकरीत आहे. मी अनेक पोलिस अधिकारी व कर्मचारी मी पाहिले आहेत तसेच ते माझे वरिष्ठ अधिकारी व माझे मित्र आहेत. पोलिस खात्याच्या नोकरीत “निवांत क्षण” हा त्यांच्या नशिबात नाही सदैव धगधग आहे. जनतेमधील वादविवाद , भांडण तंटे , मर्डर , चोर्‍या मार...

भारत देशातील अनुसूचीत जाती जमातीच्या समाजाने एकत्र आल्यास क्रांती घडेल

संपादक भारत देशात अनुसूचीत जाती जमातीचे समाज गावापातळी पासून   ते देशा पर्यंत सत्ता काबिज करू शकतात पण अनुसूचीत जाती जमाती मधील समाज एकत्र येऊ शकत नाहीत ही वेदनादायी परिस्थिति आहे. घटनेचे शिल्पकार परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळे अनुसूचीत जाती जमातींना त्यांचा हक्क न्याय मिळत आहे परंतु अनुसूचीत जाती जमातीचे समाज आपआपल्या परीने नेते “समाजसुधारक” यांच्या नावाने वेगवेगळे गटतट , संघटना उभारून मीपणा दाखवत आहेत. जरूर गटतट संघटना काढा पण निवडणुकीच्या दरम्यान सर्व अनुसूचीत जाती जमातीने एकत्र येऊन आपली ताकद दाखवली पाहिजे. अनुसूचीत जातीच्या समाजाने एकत्र येऊन आपले पवित्र मत आपण ठरवलेल्या उमेदवाराला दिले तर तो सर्वांच्या मतावर निवडून येईल व आपला व्यक्ति शासनकर्ता होईल असे वाटते परंतु सध्या अनुसूचीत जाती जमाती मध्ये रेडिमेड पुढारी यामुळे समाज एकत्र येऊ शकत नाही. आरक्षण , न्याय , हक्क इ. साठी घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने फायदा उचलायचा एवढे मात्र अनुसूचीत जाती जमातीच्या समाजाला कळले आहे . सर्वांनी एकत्र आले पाहिजे असे वाटते. गावापासून ते दिल्ली पर्यंत सत्त...

कोरोना कोव्हिड -१९ या रोगाच्या काळात देव सुद्धा झाले “पालापाचोळा”

संपादक कोरोना कोव्हिड – १९ या रोगाने जगावर दहशत पसरवली. जगातील देश , राज्य , जिल्हे , तालुके , गावे ओसाड पडली . कोरोना हा रोग नुकसानीचा रोग ठरला , या रोगाने माणुसकी मारली , नात संपविल , कोणीही कोणाचं नाही , आला एकटा चालला एकटा , येताना काही घेऊन आला जाताना काय घेऊन चालला मिळालेल्या आयुष्याची मूठभर राख या पलिकडे माणसाचे काय अस्तित्व आहे. जेथे माणसाचे अस्तित्व नाही तेथे देवाचे तरी काय अस्तित्व राहणार ? कोरोना या रोगाच्या संकट समयी देवालाच कोंडून ठेवले आहे. जर देव खरे असतील तर भक्तासाठी देव अशा संकटाला पळवून लावतील परंतु तसे देवाने केले नाही. भक्तांनी भरभरून देवासाठी भक्ति करायची , दान धर्म करायचा , देवाची देवालयाच्या इमारती मजल्यावर मजले चढवायचे , सोने , चांदी , पैसे अशी मदत (दान) देवाला संकट घालविल म्हणून सढळ हाताने भक्त देतात त्याच भक्तांना देवाने कोरोना कोव्हिड -१९ च्या काळात वार्‍यावरती सोडले. देवा कोरोना सारख्या रोगाचे संकट तू घालवले पाहिजे होते पण तू खरा नाही खोटा आहे हे सिद्ध झाले आहे. भक्त देवा तुज्यावरती भावनेमुळे तुझा आदर करतात पण तुझ्यात संकट निवारण करण्याची ...

भारत देशाचे जवान हे बहादुर आहेत भारत देशावर हल्ला करणार्‍या औलादीने लक्षात घ्यावे

संपादक जगाच्या पाठीवर एक देश म्हणजे भारत आणि या देशाला जगाच्या पाठीवर “ भारतमाता” म्हटले आहे. या भारत भूमीच्या रक्षणासाठी आमचे भारतीय जवान स्वत: चा , आई , वडील , भाऊ , पत्नी , मुले , नातेवाईक याचा विचार न करता या भारत देशासाठी व या देशातील जनतेसाठी अहोरात्र खडा पहारा देत आहेत. आमचे जवान हे बहादुर आहेत. जो कोणी देशावर चालून येईल त्याची “टराटरा” फाडल्याशिवाय राहणार नाहीत. भारत देशाचे हे जवान सुपुत्र आहेत ते रणांगणात शत्रूचा सामना करण्यासाठी झुंजर वृत्ती डोळ्यासमोर ठेऊन झुंज देत असतात. आमचे भारतीय बांधव रणांगणात लढून धारातिर्थी पडतील पण मागे हटणार नाहीत या जवानांच्या पाठीमागे संपूर्ण देश व देशातील जनता यांचा आशीर्वाद त्यांना आहे. ते जवान आमचे सर्वांचे शूरवीर आहेत. ताणून ताणून शत्रूला ठोकणारे आहेत. देशासाठी सीमेवर लढाईचे तर निधड्या छातीने लढतील आणि गिधाडांची वाट लावतील. आमचे भारतीय जवान हे देशातील शान आणि भूषण आहेत. आमचे जवान हे वार झेलणारे आहेत , शत्रूंचा नायनाट करणारे आहेत , शत्रूंना देशोधडीला लावणारे आहेत. जे देशावर हल्ला करतील तर त्यांचा हिशोब वजाबाकी करून आमचे जवान येतील ही...

“जातीचा विटाळ” हा पुरोगामी महाराष्ट्राला शोभणारा नाही

          महाराष्ट्र हा समाजसुधारकांचा व साधू संतांचा आहे. हा सर्व धर्माचा महाराष्ट्र आहे असे असताना जाणूनबुजून अनुसूचीत जाती जमातीचा तिरस्कार समाजकंटक करीत आहेत हे प्रमाण ग्रामीण भागात मोठया प्रमाणात दिसून येत आहे. समाजकंटकांनो तुम्हाला येवढा जातीचा का गर्व आहे ? तुमच्या आणि अनुसूचीत जाती जमातीच्या लोकांच्या रक्तामध्ये काय फरक आहे ? जातिनुसार रक्त रंगीबेरंगी आहे काय ? आपण २१ व्या शतकाकडे चाललो आहे. तरी समाजकंटकाच्या मनातील जात अजून गेली नाही ही शोकांतिका आहे. अनुसूचीत जाती जमाती विषयी विटाळ का होतो ? तुम्हालाही धर्म जात आहे मग मला प्रश्न पडतो की , जातीचा ७/१२ , खाते उतारा समाजकंटकाकडे आहे का ? जातीचा नकाशा आहे का ? जाती धर्मानुसार रक्ताचे रंग वेगवेगळे आहेत का ? मग समाजकंटकांनो असे तर नाही ना ? तरीपण स्वत: च्या जातीचा गर्व आणि अनुसूचीत जाती जमातीच्या लोकांचा तिरस्कार , अपमान , द्वेष, भेदभाव कशासाठी ? प्रत्येक जाती जमातीचा धर्माचा मिळून गावी शहरे वसलेली असतात. अनुसूचीत जाती जमातीचे सध्याच्या काळात भक्षण केले जाते आहे. त्यांच्यावरती मोठ्या प्रम...

पंढरपूरातील तीन कर्तव्यदक्ष पोलिस अधिकार्‍याचा सन्मान

मा. डॉ. सागर कवडे   उपविभागीय पोलिस अधिकारी,पंढरपूर  मा. किरण अवचर पंढरपूर तालुका पोलिस निरीक्षक, पंढरपूर    प्रशांत बस्मे पोलिस निरीक्षक, पंढरपूर           दिल्ली केंद्रीय ग्रहमंत्रालयाकडून आंतरिक सेवा सुरक्षा पथक पुरस्काराचे मानकरी ठरले बाबत पंढरपूर उपविभागीय पोलिस अधिकारी मा. डॉ. सागर कवडे पंढरपूर तालुका पोलिस स्टेशन चे पोलिस निरीक्षक मा. किरण अवचर व पोलिस निरीक्षक प्रशांत  बस्मे  यांचे हार्दिक अभिनंदन...! संपादक : अभिमन्यु बी. आठवले 9420302561 उपसंपादक : वैभव अ. आठवले साप्ताहिक बहुजन भूषण , साप्ताहिक बहुजन मित्र वृत्तपत्र आठवले परिवार

अन्याया विरोधात लढा देण्यासाठीच बहुजन राष्ट्रशक्ति सामाजिक संघटनेची स्थापना

 संस्थापक/संपादक पत्रकार  मा. श्री. डॉ. अभिमन्यु बी. आठवले  संपादक           आजपर्यंत विविध सामाजिक संघटनेच्या माध्यमातून बहुजन समाजातील लोकांचे विविध प्रश्न सोडवण्याचे काम केले आहे. आता स्वता: ची सामाजिक संघटना उभी करून बहुजन समाजातील तळागाळातील लोकांपर्यंत पोहचवून त्यांच्यावर होणारे अन्याय निवारण करण्याचा संकल्प केला आहे. बहुजनांना न्याय देण्यासाठीच १ मे २०१३ रोजी बहुजन राष्ट्रशक्ति सामाजिक संघटना (महाराष्ट्र राज्य ) स्थापून त्याचे कार्य महाराष्ट्रभर सुरू करीत आहे. ही बहुजन राष्ट्रशक्ति सामाजिक संघटना सर्व समाज्याच्या न्याय हक्कासाठी लढा देणारी संघटना असल्याचे संस्थापक अध्यक्ष अभिमन्यु बी. आठवले यांनी सांगितले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितलेला “शिका , संघटित व्हा , संघर्ष करा” हा मूलमंत्र ध्यानात घेऊन बहुजन सामाजाच्या हितासाठी संघटनेच्या माध्यमातून लोकांना एकत्र आणण्याचे काम करणार आहे. ह्या संघटनेला स्थापन होऊन ७ वर्ष होत आहेत यशस्वी घोडदौड चालू आहे व विविध प्रश्न सोडवण्या साठी कटिबद्ध संघटना असेल.   ...

मा. श्री. अॅड. अमृत प्रल्हाद भोसले बहुजनांना न्याय देणारे तारणहार

अॅड. अमृत भोसले संपादक                मा. श्री. अॅड. अमृत भोसले साहेब आज आपला वाढदिवस आहे आपली रांजल्या गांजलेल्यांना न्याय देण्याची भूमिका असते आपला मानवतावाद माणुसकीला जवळ करतो. आपण आजपर्यंत वकील हा व्यवसाय माळशिरस कोर्टात करीत असताना ज्या व्यक्तीने जे अपराध केले त्यानुसारच शिक्षा दिली. जेथे अन्याय तेथे न्याय देत आहात. अनेक संकट आली असताना त्या संकटावर आपण मात करीत पुढे जात आहात. आपण भयंकर वादळातील चमकणारा दिवा आहे. आजूबाजूला वैवाहिक जीवनात संकट आली पण धैर्याने पुढे जात आहात. जन्माला आलो म्हणजे संकट आलीच संकटाविना जन्म नाही. संकट येतात ही परीक्षा बघण्यसाठी जो कितीही संकटे आली तर तो मोठ्या हिमतीने , जिद्दीने , चिकाटीने मागे वळून बघत नाही तो पुढे बघूनच जातो. तो संकटावर मात करतो. जो आलेले संकटे पचवायला सामोरे जातो तो खरा झुंज देणारा लढवय्या असतो. वेदना , दु: ख ही वाटून घेणारे पदार्थ नाहीत तर ह्या वेथा वेदना व्याकुळ करतात पण दिसत नाहीत. पण वकील साहेब रडत बसण्यापेक्षा येणार्‍या संकटाचा सामना करण्यासाठी लढत राहिले पाहिजे हीच तुमची भूमिका आहे....

कै. सुरेश (दादा) ठोंबरे म्हणजे नातेपुते गावचे भूषण

लोकनेते कै. सुरेश (दादा) ठोंबरे   संपादक                कै. सुरेश (दादा) ठोंबरे हे नातेपुते ता. माळशिरस जि. सोलापूर येथील लोकप्रिय असलेले नेते होते. सुरेश (दादा) ठोंबरे म्हणजे दिलेला शब्द पाळणारे , कर्तव्यात कसूर न करणारे , एक धाडशी व्यक्तिमत्व . राजकीय जीवनाची सुरुवात नातेपुते येथून शिवसेना शाखा प्रमुख म्हणून वयाच्या २१ व्या वर्षापासून झाली तेथून पुढे वाटचाल म्हणजे नातेपुते गावचे ग्रामपंचायत सदस्य , पंचायत समिति सदस्य ते जिल्हा परिषद सदस्य असा त्यांचा राजकीय प्रवास होता. कै. सुरेश (दादा) ठोंबरे हे मनाने मोठे होते. त्यांच्याजवळ दयाळूपणा होता. एक व्यवसायातील अभ्यासू वृत्तीचे होते. त्याचप्रमाणे दरारा असा स्वभाव होता परंतु कधीही कोनावरतीही अन्याय केलेला आढळून आलेला नाही त्यांच्याकडून न्याय देण्यासाठीच राजकीय पदाचा वापर केला गेला. शासनाचा विविध योजना जनतेला मिळाल्या पाहिजेत यासाठी पंचायत समिति तसेच जिल्हा परिषद सदस्य असताना प्रयत्न केले. गोरगरीबांना विविध योजनेचा लाभ मिळवून दिला.      ...

सदगुरु श्री लक्ष्मणदास महाराज पुण्यतिथि मोहोत्सव (भंडारा ) रद्द

संपादक      सदगुरु श्री लक्ष्मणदास महाराज पुण्यतिथि मोहोत्सव ( भंडारा ) वाखरी ता. पंढरपूर जि. सोलापूर जर वर्षी मोठया प्रमाणात साजरा होत असतो परंतु या वर्षी जमावबंदी , संचारबंदी असल्यामुळे , कोरोंना या रोगाचे संकट असल्यामुळे या वर्षी साजरा होणारा भंडारा ग्रामस्थांनी एकमताने निर्णय घेऊन तो रद्द केला व शासकीय आदेशाचे पालन केले. त्याच प्रमाणे सकाळ व सायंकाळी दररोज आरतीचा कार्यक्रम वाखरी गावाचे माजी सरपंच गंगाधर पाराप्पा गायकवाड ( भाऊ ) करीत आहेत व मठाची देखभाल व काळजी घेत आहेत. लॉकडाउन झाल्यापासून मठाचा दरवाजा बंद केला आहे. ग्रामस्थ बाहेरूनच दर्शन घेत आहेत. श्री लक्ष्मणदास महाराज हे जागृत असे वाखरी येथील देवस्थान आहे. बातमी   अधिक माहितीसाठी संपर्क संपादक - मा. डॉ. श्री. अभिमन्यू   बी.आठवले ९४२०३०२५६१ उपसंपादक - वैभव अ. आठवले साप्ताहिक बहुजन भूषण , साप्ताहिक बहुजन मित्र बहुजन राष्ट्रशक्ती सामाजिक संघटना महाराष्ट्र राज्य आठवले परिवार     जे दिसेल तेच लिहले जाते            ...