Skip to main content

नातेपुते पोलिसांची वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर धडक कारवाई

समान नागरी कायदा सर्व जातीधर्मासाठी धोक्याचा असू शकतो

संपादक

समान नागरी कायदा हा सर्व जाती धर्मासाठी व त्यांच्या रूढी परंपरेसाठी धोकादायक असून सर्व जाती धर्मावर अन्यायकारक ठरू शकतो. प्रत्येक जाती धर्मामधील असलेले सण, उत्सव, सांस्कृतिक, सामाजिक कार्यक्रम हे त्या जाती धर्माच्या नुसार होत असतात. समान नागरी कायदा हा राज्य सरकार व केंद्र सरकारच्या अधिकारात करता येतो परंतु तो करताना असंख्य अडीअडचणी निर्माण होऊ शकतात. प्रत्येक जात धर्म यांना हा कायदा करावा असे वाटत नाही. प्रत्येक जाती धर्मांना त्यांच्या चालत आलेल्या रूढी परंपरेने वागावे लागते. प्रत्येक जाती धर्मात वेग वेगळे विवाह सोहळे, त्या रूढी परंपरेने पाढीत असतात. समान नागरी कायदा जर केंद्र सरकारने व राज्य सरकारने हुकुमशाही या पद्धतीने वापर करून तो जातीपाती धर्मावर लादला तर राज्य सरकार व केंद्र सरकारला व त्यांच्या पक्षाला मोठा धक्का बसल्याशिवाय राहणार नाही तसेच केंद्र सरकार मधील व राज्य सरकार मधील जे कारभारी आहेत त्यांना जाती धर्माच्या व्यक्तींना तो सहन होणार नाही. समान नागरी कायदा भाजप आणू पाहत असले तरी त्यांना जाती धर्माकडून प्रचंड विरोध झाल्याशिवाय राहणार नाही. समान नागरी कायद्यात प्रत्येक जाती धर्माचे कुटुंब हे समान असले पाहिजेत या मध्ये भेदभाव, विटाळ, जातीयता, त्या त्या धर्माचे कायदे हे राहणार नाहीत त्यामुळे हा कायदा जरी सत्येचा वापर समजून केला तरी तो अन्यायकारकच राहणार असे मला संपादक म्हणून वाटते. समान नागरी कायदा नाव गोंडस व बाळशेदार आहे पण त्यामागचा इतिहास रक्तरंजीत दिवस असाही होऊ शकतो. समान नागरी कायदा म्हटल्यावर प्रत्येकाला समान शेती, त्यामध्ये जातपात नाही जे जातींनुसार व धर्मानुसार कायदे आहेत ते या कायद्यामुळे नसणार नाहीत त्यामुळे अन्याय अत्याचार वाढतील असेही कदाचित घडू शकेल असे वाटते. समान नागरी कायदा करण्यासाठी कोर्टाचा सहभाग राहणार नाही असेही वाटते. जरी अंतरजातीय विवाह घडून येत असतील तरी ते कितपत टिकत आहेत हे सांगता येत नाही. या कायद्यामुळे जात जावून एकच समान धर्म व जात समान राहील का? का जाती अशाच ठेवून मग समान कायदा कसा आणता येईल हे ही अवघड जागेचे दुखणे असू शकते. हा कायदा केंद्र सरकार व राज्य सरकार आणत असताना तो कोणाला आवडेल न आवडेल हे सांगता येत नाही जर सत्येचा माज समजून आम्ही सत्ताधारी असे समजून हा कायदा मंजूर केला तर त्याचा परिणाम सुद्धा वाईट सत्ताधार्‍यासाठी होऊ शकतो. जे संविधानाने प्रत्येक जातीधर्मांना न्याय दिला आहे त्यामुळे समान नागरी कायदा करून जातीय तनाव वाढणार नाहीत याची काळजी घेतली पाहिजे. कोणत्याही जाती धर्माचे कायदे मोडीत काढणे हे संविधांनाला न जुमानता करणे हे प्रत्येक जाती धर्मांच्या व्यक्तीचा अपमान, अवहेलना, द्वेष, सूड असे होऊ शकते. समान नागरी कायदा हा सहजासजी अमलात आणता येणार नाही. निवडणुकी दरम्यान भाजपवाले त्यांच्या अजेंडात समान नागरी कायदा या बाबत घोषणा असते. घोषणा करणे सोपे आहे पण अमलात आणणे अवघड आहे. तसेच या कायद्यामुळे अनुसूचीत जाती जमातीच्या कुटुंबावरती प्रचंड अन्याय अत्याचार वाढतील असे घडू शकते. समान नागरी कायदा म्हणजे प्रत्येकाच्या जाती धर्मावर संकट असू शकते. हा कायदा हिटलरशाही ने केंद्र सरकार व राज्य सरकार यांनी त्यांच्या सदस्यांच्या जोरावर केला तर तो प्रत्येक जाती धर्माच्या बांधवासाठी हानिकारकच होईल. त्यामुळे हा समान नागरी कायदा करताना प्रत्येक जाती धर्माच्या व्यक्तिकडून मत जाणून घेऊनच तो करावा लागणार आहे त्यामुळे समान नागरी कायदा होईल की नाही हा येणारा काळच ठरवेल इतकेच.   

जनहितार्थ

अधिक जाहिरातीसाठी संपर्क

संपादक : मा. श्री. डॉ. अभिमन्यु बी. आठवले

९४२०३०२५६१

उपसंपादक : वैभव अ. आठवले

साप्ताहिक बहुजन भूषण, साप्ताहिक बहुजन मित्र वृत्तपत्र

बहुजन राष्ट्रशक्ति सामाजिक संघटना महाराष्ट्र राज्य

आठवले परिवार

टीप : जे दिसेल, जे पाहिले तेच लिहिले हेच वृत्तपत्राचे ध्येय उद्दीष्ट आहे.

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

नातेपुते पोलीस ठाण्याची धडक कामगिरी 6,200 रुपये हिसकून घेऊन जाणाऱ्या चोरांना आपले ताब्यातील थार वाहनांसह केली अटक

उपसंपादक: वैभव आठवले साप्ताहिक बहुजन भूषण वृत्तपत्र नातेपुते पोलिस स्टेशन यांचेकडून मिळालेल्या माहितीनुसार           नातेपुते पोलीस ठाणे हद्दीमध्ये फिर्यादी यांच्या दीपक जनार्दन चव्हाण, राहणार मोराची, तालुका माळशिरस, जिल्हा सोलापूर हे फलटण-पंढरपूर रोडवरील इंडीयन ऑईल कंपनीचा सुळ पेंट्रोल पंप येथे दि.01/10/2025 रोजी दुपारी 03.50 वा. सुमारास इंडीयन ऑईल कंपनीचा सुळ पेंट्रोल पंप येथे डिझेल टाकण्याचे काम करित असताना एक राखाडी रंगाची थार गाडी नं MH06CG5558 अशी डिझेल भरण्याकरीता आली व त्यातील ड्रायव्हर शेजारी बसलेल्या अनोळखी इसमाने गाडीत 4000 रुपयचे डिझेल भरायचे आहे व 6200 रु आम्हाला रोख पैशाची गरज आहे मी तुम्हाला माझे फोन पे वरून 10200 रु ऑनलाईन पाठवतो असे म्हणाल्याने मी गाडीचे डिझेलचे झाकन उघडण्यास गेलो असता पाठीमागे बसलेला अनोळखी इसम म्हणाला की, आम्हाला डिझेल नको 6200 रु रोख द्या अशी विनंती केली. त्यावेळी मी माझे खिश्यातील डिझेल विक्रीचे जमा झालेले पैसे खिश्यातुन काढुन 6200 रु मोजले त्यामध्ये 500 रु दराच्या 12 व 100 रु दराच्या 02 असे 6200 रु बाजुला काढले व बाकी ...

नातेपुते पोलीस ठाण्याची धडक कामगिरी उभ्या असलेल्या वाहनाची टायर चोरणाऱ्या अट्टल चोरास अटक व चोरीस गेलेला 100% मुद्देमाल सह 2,04,000/ किमतीचा मुद्देमाल जप्त

उपसंपादक: वैभव आठवले साप्ताहिक बहुजन भूषण वृत्तपत्र नातेपुते पोलिस स्टेशन यांचेकडून मिळालेल्या माहितीनुसार      नातेपुते पोलीस ठाणे हद्दीमध्ये फिर्यादी यांच्या आकाश तानाजी बोडरे, राहणार नातेपुते, तालुका माळशिरस यांनी त्यांच्याकडील वापरते वाहन टाटा टिपर नंबर एम एच 11 सी एच 0551 या उभ्या असलेल्या वाहनाचे दोन टायर डिस्कसह किंमत 75,000/ रुपये खोलून कोणीतरी अज्ञात चोरट्याने ते चोरून नेले आहेत म्हणून वगैरे हकीगत वरून नातेपुते पोलीस ठाणे गुर नंबर 331/2025 बीएनएस कलम 303 (2) प्रमाणे गुन्हा दाखल होता.       सदर गुन्ह्यातील घडला प्रकाराबाबत वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली नातेपुते पोलीस ठाणे व उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय गुन्हे प्रकटीकरण पथक गुन्ह्यातील घटनास्थळाच्या आजूबाजूची सीसीटीव्ही पाहणी करून तसेच  सायबर शाखेकडील तांत्रिक माहितीचे विश्लेषण करून संशयित  आरोपीचा शोध घेतला असता संशयित आरोपी हा कडेगाव जिल्हा सांगली येथील नामे बुरान इलाही मुलाणी वय 40 वर्ष असे  असल्याबाबत खात्री झाली आणि त्यानंतर सदर आरोपीस सापळा लावून कडेगाव जिल्हा सांगली येथे...

शिवसेनेच्या सोलापूर जिल्हाप्रमुख पदी राजकुमार हिवरकर-पाटील

  उपसंपादक: वैभव आठवले साप्ताहिक बहुजन भूषण वृत्तपत्र शिवसेनेचे मुख्य नेते तथा महाराष्ट्र राज्याचे संवेदनशील उपमुख्यमंत्री मा.ना.एकनाथराव शिंदे साहेब यांच्या आदेशाने महाराष्ट्र राज्याचे रोजगार हमी पणन मंत्री भरत शेठ गोगावले यांच्या हस्ते व महाराष्ट्र प्रदेशचे ओबीसी विभागाचे प्रमुख रमेशजी बारसकर यांच्या उपस्थितीत मंत्रालय मुंबई येथे सोलापूर जिल्ह्याचे प्रमुख ओबीसी विभाग म्हणून श्री.राजकुमार लता शंकरराव हिवरकर-पाटील यांना निवडीचे पत्र देण्यात आले. आजवर शिवसेनेमध्ये पक्षाचे जडणघडणीमध्ये मोर्चे, आंदोलन, साडेनऊ हजार पेक्षा जास्त गरिबांची केलेली ऑपरेशन, सोलापूरच्या अक्कलकोटचे माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे साहेब यांच्या पक्षप्रवेशावेळी मुख्य नेत्यांच्या उपस्थितीत 12 बलुत्तरांचा पक्ष म्हणून ओबीसी विभाग निर्माण करण्यामागची मुख्य नेते यांची दूरदृष्टी सर्वांसमक्ष केलेल भाषण, राष्ट्रमाता जिजाऊ क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीच्या निमित्ताने 55 सायकलींच मोफत झालेल वाटप,  सवलतीच्या दरात  99000 माता-भगिनींना केलेली डाळ वाटप, सत्तावीस गावांना बचत गटाच्या माध्यमातून दिलेली ...