Skip to main content

नातेपुते पोलिसांची वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर धडक कारवाई

“सरकारी कामात अडथळा” या कायद्याचा अधिकारी, कर्मचारी यांना आधार तर “दफ्तर दिरंगाई” या कायद्यानुसार अधिकारी, कर्मचारी यांना वटणीवर आणण्यासाठी या कायद्याचा अर्जदाराला आधार

संपादक

          शासकीय जे  अधिकारी, कर्मचारी विविध विभागाचे आहेत ते “सरकारी कामात अडथळा” या कायद्याचा आधार घेऊन अर्जदारावर अन्याय करतात. अर्जदाराने दिलेल्या अर्जानुसार काय कारवाई झाली हे अधिकारी यांना जाब विचारण्यासाठी गेले असता अधिकारी, कर्मचारी अर्जदाराला वेठीस धरतात, दम देतात हेच चाललेले असते. या कायद्याचा अधिकारी, कर्मचारी आधार घेवून “बळाचा” वापर करतात. या कायद्याचा आधार हे अधिकारी व कर्मचारी यांचे “हत्यार” झाले आहे त्यामुळे अधिकारी कर्मचारी यांना “गुर्मी, माज चढला आहे. शासकीय नोकरी म्हणजे हे अधिकारी कर्मचारी मनमानी करण्यासाठी आहेत असे अधिकारी कर्मचारी यांचे मत झाले आहे. अर्जदार वेळ, पैसा, मानसिक त्रास सहन करून न्याय मिळेल ही “भोळी” अशा बाळगून आपले अर्जदार लेखी म्हणणे अधिकारी यांचाकडे देतात परंतु हेच “हरामखोर” अधिकारी अर्जदाराला वेठीस धरतात. सरकारी कामात अडथळा केला म्हणून गुन्हे दाखल करू, तुरुंगात पाठवू अशा पद्धतीने धमक्या देतात, दम देतात त्यामुळे अर्जदार मनामध्ये भीती बाळगून राहत आहेत. अधिकारी आणि कर्मचारी यांच्या दबावाला अर्जदार यांनी घाबरून जावू नये. जसा शासकीय अधिकारी, कर्मचारी यांना सरकारी कामात अडथळा हा जसा कायदा त्यांना “संरक्षण कवच” ठरतो तसेच अर्जदारांना शासकीय अधिकारी कर्मचारी यांना चढलेला माज उतरवण्यासाठी अर्जदाराच्या हिताचा, हक्काचा कायदा म्हणजे “दफ्तर दिरंगाई कायदा” लागू पडत आहे. जसा माहिती अधिकार कायदा जनतेसाठी लाभदायक ठरत आहे तसाच अर्जदारांसाठी दफ्तर दिरंगाई कायदा लाभदाई ठरत आहे. अर्जदाराने या कायद्याचा आधार घेवून अधिकारी यांना जाब विचारण्याचा अधिकार आहे यासाठी अर्जदाराने दक्ष रहावे. या कायद्याचा अर्जदाराने आधार घेतला तर अधिकारी व कर्मचारी यांना “करंट” बसल्याशिवाय राहणार नाही. त्यांची मनमानी, गुर्मी, माज उतरल्याशिवाय राहणार नाही. अर्जदाराने दिलेल्या अर्जावरून ज्या त्या विभागाच्या कार्यालयाकडून अर्जावर पोच घेतली असेल आणि त्या अर्जाचे अधिकारी कर्मचारी यांनी दखल घेतली नाही, निवारण केले नाही त्या अर्जाला केराची टोपली दाखवली तर दफ्तर दिरंगाई कायद्यानुसार त्या अधिकारी व कर्मचारी यांचावरती दखल न घेतल्याबाबत वरिष्ठाकडे पत्रव्यवहार करून त्या अधिकारी व कर्मचारी यांच्यावरती “शिस्तभंगाची” कारवाई होऊ शकते. व वरिष्ठांनीही अधिकारी व कर्मचारी यांना पाठीशी घालून त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केल्यास वरिष्ठ अधिकारी, कर्मचारी यांच्या विरोधात मानसिक त्रास , छळ दिल्याच्या कारणावरून जवळच्या पोलिस स्टेशनकडे त्या अधिकारी व कर्मचारी यांच्यावरती गुन्हा दाखल होऊ शकतो. अर्जदाराने दिलेल्या अर्जाला उत्तर अधिकारी यांनी दिलेच पाहिजे, टाळाटाळ केली नाही पाहिजे, कर्तव्यात कसूर केली नाही पाहिजे, आपले कर्तव्य जपले पाहिजे. अर्जदाराने दिलेल्या अर्जानुसार त्या अधिकारी कर्मचारी यांना दिलेल्या अर्जानुसार दफ्तर दिरंगाई कायद्यानुसार जाब विचारण्याचा अधिकार आहे परंतु सरकारी कामात अडथळा या कायद्याचा सर्वच विविध शासकीय कार्यालयात अधिकारी व कर्मचारी यांना आधार वाटतो या कायद्याचा आधार घेवून अधिकारी व कर्मचारी अर्जदाराला गुरगुर करतात. परंतु सरकारी कामात अडथळा जसा शासकीय अधिकारी कर्मचारी यांना या कायद्याचा आधार वाटतो तसाच अधिकारी कर्मचारी यांना “धक्का” देण्यासाठी त्या अधिकारी कर्मचारी यांचा माज उतरण्यसाठी अर्जदार यांना दफ्तर दिरंगाई कायदा आधार आहे, वरचढ आहे या कायद्याचा अर्जदार यांनी आधार घ्यावा. दफ्तर दिरंगाई कायदा म्हणजे “चुकीला माफी नाही” असा कायदा आहे इतकेच.

जनहितार्थ

अधिक जाहिरातीसाठी संपर्क

संपादक : मा. श्री. डॉ. अभिमन्यु बी. आठवले

९४२०३०२५६१

उपसंपादक : वैभव अ. आठवले

साप्ताहिक बहुजन भूषण, साप्ताहिक बहुजन मित्र वृत्तपत्र

बहुजन राष्ट्रशक्ति सामाजिक संघटना महाराष्ट्र राज्य

आठवले परिवार

टीप : जे दिसेल, जे पाहिले तेच लिहिले हेच वृत्तपत्राचे ध्येय उद्दीष्ट आहे.

Comments

Popular posts from this blog

नातेपुते पोलीस ठाण्याची धडक कामगिरी 6,200 रुपये हिसकून घेऊन जाणाऱ्या चोरांना आपले ताब्यातील थार वाहनांसह केली अटक

उपसंपादक: वैभव आठवले साप्ताहिक बहुजन भूषण वृत्तपत्र नातेपुते पोलिस स्टेशन यांचेकडून मिळालेल्या माहितीनुसार           नातेपुते पोलीस ठाणे हद्दीमध्ये फिर्यादी यांच्या दीपक जनार्दन चव्हाण, राहणार मोराची, तालुका माळशिरस, जिल्हा सोलापूर हे फलटण-पंढरपूर रोडवरील इंडीयन ऑईल कंपनीचा सुळ पेंट्रोल पंप येथे दि.01/10/2025 रोजी दुपारी 03.50 वा. सुमारास इंडीयन ऑईल कंपनीचा सुळ पेंट्रोल पंप येथे डिझेल टाकण्याचे काम करित असताना एक राखाडी रंगाची थार गाडी नं MH06CG5558 अशी डिझेल भरण्याकरीता आली व त्यातील ड्रायव्हर शेजारी बसलेल्या अनोळखी इसमाने गाडीत 4000 रुपयचे डिझेल भरायचे आहे व 6200 रु आम्हाला रोख पैशाची गरज आहे मी तुम्हाला माझे फोन पे वरून 10200 रु ऑनलाईन पाठवतो असे म्हणाल्याने मी गाडीचे डिझेलचे झाकन उघडण्यास गेलो असता पाठीमागे बसलेला अनोळखी इसम म्हणाला की, आम्हाला डिझेल नको 6200 रु रोख द्या अशी विनंती केली. त्यावेळी मी माझे खिश्यातील डिझेल विक्रीचे जमा झालेले पैसे खिश्यातुन काढुन 6200 रु मोजले त्यामध्ये 500 रु दराच्या 12 व 100 रु दराच्या 02 असे 6200 रु बाजुला काढले व बाकी ...

नातेपुते पोलीस ठाण्याची धडक कामगिरी उभ्या असलेल्या वाहनाची टायर चोरणाऱ्या अट्टल चोरास अटक व चोरीस गेलेला 100% मुद्देमाल सह 2,04,000/ किमतीचा मुद्देमाल जप्त

उपसंपादक: वैभव आठवले साप्ताहिक बहुजन भूषण वृत्तपत्र नातेपुते पोलिस स्टेशन यांचेकडून मिळालेल्या माहितीनुसार      नातेपुते पोलीस ठाणे हद्दीमध्ये फिर्यादी यांच्या आकाश तानाजी बोडरे, राहणार नातेपुते, तालुका माळशिरस यांनी त्यांच्याकडील वापरते वाहन टाटा टिपर नंबर एम एच 11 सी एच 0551 या उभ्या असलेल्या वाहनाचे दोन टायर डिस्कसह किंमत 75,000/ रुपये खोलून कोणीतरी अज्ञात चोरट्याने ते चोरून नेले आहेत म्हणून वगैरे हकीगत वरून नातेपुते पोलीस ठाणे गुर नंबर 331/2025 बीएनएस कलम 303 (2) प्रमाणे गुन्हा दाखल होता.       सदर गुन्ह्यातील घडला प्रकाराबाबत वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली नातेपुते पोलीस ठाणे व उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय गुन्हे प्रकटीकरण पथक गुन्ह्यातील घटनास्थळाच्या आजूबाजूची सीसीटीव्ही पाहणी करून तसेच  सायबर शाखेकडील तांत्रिक माहितीचे विश्लेषण करून संशयित  आरोपीचा शोध घेतला असता संशयित आरोपी हा कडेगाव जिल्हा सांगली येथील नामे बुरान इलाही मुलाणी वय 40 वर्ष असे  असल्याबाबत खात्री झाली आणि त्यानंतर सदर आरोपीस सापळा लावून कडेगाव जिल्हा सांगली येथे...

शिवसेनेच्या सोलापूर जिल्हाप्रमुख पदी राजकुमार हिवरकर-पाटील

  उपसंपादक: वैभव आठवले साप्ताहिक बहुजन भूषण वृत्तपत्र शिवसेनेचे मुख्य नेते तथा महाराष्ट्र राज्याचे संवेदनशील उपमुख्यमंत्री मा.ना.एकनाथराव शिंदे साहेब यांच्या आदेशाने महाराष्ट्र राज्याचे रोजगार हमी पणन मंत्री भरत शेठ गोगावले यांच्या हस्ते व महाराष्ट्र प्रदेशचे ओबीसी विभागाचे प्रमुख रमेशजी बारसकर यांच्या उपस्थितीत मंत्रालय मुंबई येथे सोलापूर जिल्ह्याचे प्रमुख ओबीसी विभाग म्हणून श्री.राजकुमार लता शंकरराव हिवरकर-पाटील यांना निवडीचे पत्र देण्यात आले. आजवर शिवसेनेमध्ये पक्षाचे जडणघडणीमध्ये मोर्चे, आंदोलन, साडेनऊ हजार पेक्षा जास्त गरिबांची केलेली ऑपरेशन, सोलापूरच्या अक्कलकोटचे माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे साहेब यांच्या पक्षप्रवेशावेळी मुख्य नेत्यांच्या उपस्थितीत 12 बलुत्तरांचा पक्ष म्हणून ओबीसी विभाग निर्माण करण्यामागची मुख्य नेते यांची दूरदृष्टी सर्वांसमक्ष केलेल भाषण, राष्ट्रमाता जिजाऊ क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीच्या निमित्ताने 55 सायकलींच मोफत झालेल वाटप,  सवलतीच्या दरात  99000 माता-भगिनींना केलेली डाळ वाटप, सत्तावीस गावांना बचत गटाच्या माध्यमातून दिलेली ...