Skip to main content

नातेपुते पोलिसांची वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर धडक कारवाई

कोल्हाटी समाजाने नवीन “प्रेरणा” घेऊन समाजामध्ये परिवर्तन घडवावे

 संपादक

     कोल्हाटी समाजामध्ये नोकरीचे प्रमाण अत्यल्प असे आहे. या समाजातील कुटुंबामध्ये मुलगी जन्माला येते त्यावेळी त्या कुटुंबाला लक्ष्मी घरात आल्याचा आनंद होतो तर कुटुंबात मुलगा जन्माला आला तर म्हणावा तसा आनंद होत नाही याचे कारण म्हणजे या समाजात असलेल्या रूढी परंपरा. कोल्हाटी समाजातील बांधव आणि महिला उदरनिर्वाहासाठी कलेचा आश्रय घेतात हे आनंददायी आहे परंतु समाजातील ज्या आजपर्यंत आलेल्या रूढी परंपरा आहेत त्या परंपरेत सुधारणा केली पाहिजे म्हणजे मुलगा आणि मुलगी यामध्ये समान हक्काची न्याय प्रणाली असायला हवी. उदा. ज्यावेळी मुलगा मुलगी यांच्या लग्नाची पाहणी ते लग्न असा जो कार्यक्रम असतो तो एकतर्फी असतो. मुलाला मुलगी पाहण्यासापासून ते लग्न पार पडे पर्यंत मुलाच्या आई वडिलांनी मुलीच्या आई वडिलांना वरदक्षिणा द्यावा लागतो त्यामुळे गरीब असो व श्रीमंत त्या मुलाच्या आई वडिलांना ५०,०००/- (पन्नास हजार रुपये) ते ५,०००००/- (पाच लाख रुपये) व त्यापुढेही खर्च होऊ शकतो. मुलीच्या आई वडिलांना खर्च नसतो. सारा खर्च मुलाच्या आई वडिलांनी करायचा असतो ही कोल्हाटी समाजमधील परंपरा आहे त्यामुळे सध्याच्या या नवीन तंत्रज्ञानाच्या काळामध्ये भरमसाठ खर्च मुलांच्या आई वडिलांना करावा लागतो. यामध्ये सुधारणा होऊन मुलगा मुलगी यांना समान परिस्थिती नुसार त्यांच्या आई वडिलांना खर्च करण्याचा अधिकार असायला हवा. त्यामध्ये समाजमधील जेष्ठ विचारवंत यांनी समाजबांधवांसाठी मेळावा घेऊन त्यामध्ये परिवर्तनाचे मार्गदर्शन करावे. प्रबोधन करणे हे समाजातील प्रत्येकाचे कर्तव्य आहे. या कोल्हाटी समाजात मुलगी म्हणजे लक्ष्मीचे “वरदान” आणि मुलगा म्हणजे “शाप” आहे की काय? असा प्रश्न पडतो. समाजामध्ये चालत आलेली परंपरा आहे त्यामध्ये काळानुसार बदल केला पाहिजे. मुलाच्या आई वडिलांनी मुलीच्या आई वडिलांना आर्थिक (पैसा) देवून सोयरीक जोडली जाते ही परंपरा एकतर्फी आहे. या समाजात लग्नावेळी असे असलेले बंधन न ठेवता समान अधिकार असायला हवा म्हणजे मुलगा मुलगी यांच्या वडिलांना आनंद होईल. एक नवी पहाट उगवेल. अंधारातून प्रकाशाकडे जाण्याचा दोन्ही कुटुंबांना मार्ग मिळाला असे म्हणता येईल. संपादक म्हणून माझ्याकडे माझ्या कोल्हाटी बांधवांनी ज्या व्यथावेदना मांडल्या त्यामुळेच माझ्या लेखनी द्वारे विचारातून प्रबोधन व्हावे यासाठी लिहीत आहे. हा समाज कष्टकरी, मेहनती आहे. तसेच या समाजाकडे माया, जिव्हाळा, आपुलकी, प्रेम, आदर इ. आहे. या बांधवांच्या व भगिनींच्या विचारात गोडवा आहे. या समाजाने काळाप्रमाणे जुन्या रूढी परंपरा सोडून समान हक्क अधिकार समजून परिवर्तन केल्यास प्रगतीचा मार्ग दिसेल. नवेचैतन्य दिसेल. त्याचप्रमाणे या समाजातील मुलामुलीने अंतरजातीय विवाह केल्यास त्या मुलामुलीच्या कुटुंबांना “वाळीत” टाकले जाते ही मानवजातीसाठी एक अवहेलना आहे, अपमान आहे. समाजाने केलेल्या या आघातामुळे त्या कुटुंबावर भयानक परिणाम होताना दिसतो. माणूस म्हणून जगण्याचा अधिकार नाही असे त्या कुटुंबांना वाटते. त्या कुटुंबाला बहिष्कृत केले जाते ही वेदनादायी परिस्थिति आहे. जातीचे बंधन समाजासाठी अधोगतीचे लक्षण असू शकते. समाजाच्या अशा बंधनामुळे समाजाचा रास होतो. या बंधनामुळे आपलेच कुटुंब परके होते निराधार होते. कोल्हाटी समाजातील विचारवंत व्यक्तींनी समजाला “दिशा” देण्याचे काम करावे “दशा” देण्याचे नको. कोल्हाटी समाजाचे ब्रीद वाक्य म्हणजे “अपमान नको, तर सन्मान झाला पाहिजे” अशी क्रांतिकारी, प्रेरणादायी, स्पूर्तिदायी, महत्वाकांक्षा भूमिका असायला हवी. नको भेदभाव समान हक्क अधिकार हे ध्येय उद्दिष्टे असायला हवीत तरच समाजाची वाटचाल प्रगतीकडे असेल. आपल्याच बांधवावरती जुन्या रूढी परंपरेनुसार आपण वागत गेलो तर तो अन्याय आहे असेच होऊ शकते. त्यासाठी जुन्या रूढी परंपरा सोडून त्यामध्ये बदल करायला हवा असे वाटते.

जनहितार्थ

अधिक जाहिरातीसाठी संपर्क

संपादक : मा. श्री. डॉ. अभिमन्यु बी. आठवले

९४२०३०२५६१

उपसंपादक : वैभव अ. आठवले

साप्ताहिक बहुजन भूषण, साप्ताहिक बहुजन मित्र वृत्तपत्र

बहुजन राष्ट्रशक्ति सामाजिक संघटना महाराष्ट्र राज्य

आठवले परिवार

टीप : जे दिसेल, जे पाहिले तेच लिहिले हेच वृत्तपत्राचे ध्येय उद्दीष्ट आहे.

Comments

Popular posts from this blog

नातेपुते पोलीस ठाण्याची धडक कामगिरी 6,200 रुपये हिसकून घेऊन जाणाऱ्या चोरांना आपले ताब्यातील थार वाहनांसह केली अटक

उपसंपादक: वैभव आठवले साप्ताहिक बहुजन भूषण वृत्तपत्र नातेपुते पोलिस स्टेशन यांचेकडून मिळालेल्या माहितीनुसार           नातेपुते पोलीस ठाणे हद्दीमध्ये फिर्यादी यांच्या दीपक जनार्दन चव्हाण, राहणार मोराची, तालुका माळशिरस, जिल्हा सोलापूर हे फलटण-पंढरपूर रोडवरील इंडीयन ऑईल कंपनीचा सुळ पेंट्रोल पंप येथे दि.01/10/2025 रोजी दुपारी 03.50 वा. सुमारास इंडीयन ऑईल कंपनीचा सुळ पेंट्रोल पंप येथे डिझेल टाकण्याचे काम करित असताना एक राखाडी रंगाची थार गाडी नं MH06CG5558 अशी डिझेल भरण्याकरीता आली व त्यातील ड्रायव्हर शेजारी बसलेल्या अनोळखी इसमाने गाडीत 4000 रुपयचे डिझेल भरायचे आहे व 6200 रु आम्हाला रोख पैशाची गरज आहे मी तुम्हाला माझे फोन पे वरून 10200 रु ऑनलाईन पाठवतो असे म्हणाल्याने मी गाडीचे डिझेलचे झाकन उघडण्यास गेलो असता पाठीमागे बसलेला अनोळखी इसम म्हणाला की, आम्हाला डिझेल नको 6200 रु रोख द्या अशी विनंती केली. त्यावेळी मी माझे खिश्यातील डिझेल विक्रीचे जमा झालेले पैसे खिश्यातुन काढुन 6200 रु मोजले त्यामध्ये 500 रु दराच्या 12 व 100 रु दराच्या 02 असे 6200 रु बाजुला काढले व बाकी ...

नातेपुते पोलीस ठाण्याची धडक कामगिरी उभ्या असलेल्या वाहनाची टायर चोरणाऱ्या अट्टल चोरास अटक व चोरीस गेलेला 100% मुद्देमाल सह 2,04,000/ किमतीचा मुद्देमाल जप्त

उपसंपादक: वैभव आठवले साप्ताहिक बहुजन भूषण वृत्तपत्र नातेपुते पोलिस स्टेशन यांचेकडून मिळालेल्या माहितीनुसार      नातेपुते पोलीस ठाणे हद्दीमध्ये फिर्यादी यांच्या आकाश तानाजी बोडरे, राहणार नातेपुते, तालुका माळशिरस यांनी त्यांच्याकडील वापरते वाहन टाटा टिपर नंबर एम एच 11 सी एच 0551 या उभ्या असलेल्या वाहनाचे दोन टायर डिस्कसह किंमत 75,000/ रुपये खोलून कोणीतरी अज्ञात चोरट्याने ते चोरून नेले आहेत म्हणून वगैरे हकीगत वरून नातेपुते पोलीस ठाणे गुर नंबर 331/2025 बीएनएस कलम 303 (2) प्रमाणे गुन्हा दाखल होता.       सदर गुन्ह्यातील घडला प्रकाराबाबत वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली नातेपुते पोलीस ठाणे व उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय गुन्हे प्रकटीकरण पथक गुन्ह्यातील घटनास्थळाच्या आजूबाजूची सीसीटीव्ही पाहणी करून तसेच  सायबर शाखेकडील तांत्रिक माहितीचे विश्लेषण करून संशयित  आरोपीचा शोध घेतला असता संशयित आरोपी हा कडेगाव जिल्हा सांगली येथील नामे बुरान इलाही मुलाणी वय 40 वर्ष असे  असल्याबाबत खात्री झाली आणि त्यानंतर सदर आरोपीस सापळा लावून कडेगाव जिल्हा सांगली येथे...

शिवसेनेच्या सोलापूर जिल्हाप्रमुख पदी राजकुमार हिवरकर-पाटील

  उपसंपादक: वैभव आठवले साप्ताहिक बहुजन भूषण वृत्तपत्र शिवसेनेचे मुख्य नेते तथा महाराष्ट्र राज्याचे संवेदनशील उपमुख्यमंत्री मा.ना.एकनाथराव शिंदे साहेब यांच्या आदेशाने महाराष्ट्र राज्याचे रोजगार हमी पणन मंत्री भरत शेठ गोगावले यांच्या हस्ते व महाराष्ट्र प्रदेशचे ओबीसी विभागाचे प्रमुख रमेशजी बारसकर यांच्या उपस्थितीत मंत्रालय मुंबई येथे सोलापूर जिल्ह्याचे प्रमुख ओबीसी विभाग म्हणून श्री.राजकुमार लता शंकरराव हिवरकर-पाटील यांना निवडीचे पत्र देण्यात आले. आजवर शिवसेनेमध्ये पक्षाचे जडणघडणीमध्ये मोर्चे, आंदोलन, साडेनऊ हजार पेक्षा जास्त गरिबांची केलेली ऑपरेशन, सोलापूरच्या अक्कलकोटचे माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे साहेब यांच्या पक्षप्रवेशावेळी मुख्य नेत्यांच्या उपस्थितीत 12 बलुत्तरांचा पक्ष म्हणून ओबीसी विभाग निर्माण करण्यामागची मुख्य नेते यांची दूरदृष्टी सर्वांसमक्ष केलेल भाषण, राष्ट्रमाता जिजाऊ क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीच्या निमित्ताने 55 सायकलींच मोफत झालेल वाटप,  सवलतीच्या दरात  99000 माता-भगिनींना केलेली डाळ वाटप, सत्तावीस गावांना बचत गटाच्या माध्यमातून दिलेली ...