Skip to main content

वाखरी गाव हे महाराष्ट्रातील डेंगू, चिकनगुणिया, मलेरिया इ. रोगाचे केंद्र बनेल अशी गंभीर भयानक परिस्थिती, जनतेमध्ये घबराट

पंढरपूर : बहुजन भूषण वृत्तपत्र

संपादक  आढळून आलेल्या माहितीनुसार वाखरी ता.पंढरपूर जि.सोलापूर या गावात जनावरे पाळणारे जे ग्रामस्थ आहेत त्यांनी वाखरी गावात, गल्लीत, रस्त्यावर, वाखरी ग्रामपंचायत गावठाणात शेणाचे उकिरडे केले आहेत. त्या शेणामुळे दुर्गंधी, काळे किडे, डास, चिलटे, आळया इ. झाल्या आहेत. हे उकिरडे ज्या ठिकाणी ग्रामस्थ राहत आहेत त्या ठिकाणी केलेले आहेत. त्या ठिकाणावरून लहान मुले, तरुण, वृद्ध महिला, पुरुष ये जा करीत असतात. वाखरी गाव हे अ स्वच्छ गाव असे झाले आहे. याला सर्वस्वी जबाबदार जनावरे पाळणारे ग्रामस्थ आहेत. तसेच आठवले यांचे बहुजन भूषण कार्यालय याच्या पुढे उकिर्डा असून त्याच्यामुळे अनेकांना आजार होऊ लागले आहेत. तसेच कार्यालयाच्या मागे तेथील ग्रामस्थांनी मुद्दाम खोडसाळपणाने जनावरे बांधलेली आहेत त्यामुळे प्रचंड प्रमाणात दुर्गंधी पसरली आहे. हे कार्यालय कचाट्यात सापडले आहे. तरी ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच, सदस्य, ग्रामसेवक यांनी गावातील जनावरे धारक व्यक्ति यांना गाव व परिसर, गल्ली, रस्ते स्वच्छ ठेवण्याबाबत नोटिसा काढण्यात यावेत. जर जनावरे पाळणारे ऐकत नसतील तर ग्रामपंचायतने त्यांच्यावर फौजदारी स्वरूपाचा गुन्हा दाखला करावा. कचरा गाडी नेण्यासाठी घंटा गाडी आहे परंतु त्याचा उपयोग ग्रामस्थ करीत नाहीत. पावसाळा चालू आहे. वाखरी गावात कोठूनही जावा त्या ठिकाणी जनावरे धारकांनी शेणाचे उकिरडे केलेले आहेत. त्यामुळे मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरली आहे. काळे किडे, डास, चिलटे, आळया झाल्या आहेत. त्यामुळे डेंगू, चिकनगुणिया, मलेरिया असे रोग होतील अशी परिस्थिती आहे. जनावरे पाळणारे जे ग्रामस्थ आहेत त्यांच्यामुळे रोगराईला आमंत्रण मिळत आहे. जनावरे पाळणार्‍या ग्रामस्थांनी शेणाचे उकिरडे केल्यामुळे डेंगूचे लागण होईल असे चित्र आहेत. ग्रामपंचायतने अशी दुर्गंधी करणार्‍या व स्वच्छता न राखणार्‍या ग्रामस्थांना लेखी नोटीसीद्वारे समज देण्यात यावी. जनावरे पाळणार्‍या ग्रामस्थामुळे अनेक व्यक्ति दगावतील तर याला जबाबदार कोण? याकडे ग्रामपंचायत कारभारी यांनी लक्ष देणे गरजेचे आहे. वाखरी गावापासुन डेंगू, चिकनगुणिया, मलेरिया या रोगाची लागण झाल्यास याला जबाबदार कोण धरायचे? व या गावापासून महाराष्ट्रात साथ पसरेल अशी परिस्थिति निर्माण झाली आहे. तरी ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच, सदस्य, ग्रामसेवक यांनी तातडीने लक्ष घालावे तसेच ज्या ज्या ठिकाणी उकिरडे आहेत ते हटवावेत व रस्त्यावर जनावरे बांधणारे जे ग्रामस्थ आहेत त्यांनाही रस्त्यावर जनावरे बांधू नयेत यासाठी लेखी नोटिस द्यावी. यामध्ये गावाचे हित आहे. वाखरी गावात डेंगूची लागण झाल्यास अनेकांना जीव गमवावा लागेल. या घाणीमुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. ही साथ पसरल्यास, ही साथ आटोक्यात येईल असे वाटत नाही. तसेच सध्या जनावर यांच्यावर लंपी रोगाचे संकट आले आहे. गावात मोठ्या प्रमाणात ग्रामस्थांनी जनावरे पाळली आहेत तसेच अभिमान (दादा) साळुंखे यांची सून सध्या सरपंच आहेत. अभिमान साळुंखे सामाजिक कार्यकर्ते म्हणून त्यांची ओळख आहे त्यामुळे सुनेच्या कालावधीमधील  वाखरी गाव आदर्श गाव बनवतील असे जनतेमध्ये बोलले जात आहे. तसेच गटारी तुडुंब घाणीने भरलेले आहेत. त्या स्वच्छ करणे गरजेचे आहेत. तसेच काही ठिकाणी गटारावरील फरशा फुटलेल्या आहेत त्या बसविण्यात याव्यात हीच अपेक्षा.       

बातमी

अधिक जाहिरातीसाठी संपर्क

संपादक : मा.श्री. डॉ. अभिमन्यु बी. आठवले

९४२०३०२५६१

उपसंपादक : वैभव अ. आठवले

साप्ताहिक बहुजन भूषण, साप्ताहिक बहुजन मित्र वृत्तपत्र

बहुजन राष्ट्रशक्ति सामाजिक संघटना महाराष्ट्र राज्य

आठवले परिवार

टीप : जे दिसेल, जे पाहिले तेच लिहिले हेच वृत्तपत्राचे ध्येय उद्दीष्ट आहे.

 

 

Comments

Popular posts from this blog

नातेपुते पोलीस ठाणेकडील गुन्हे प्रकटीकरण शाखेची आदर्श कामगिरी चंदन चोरी करणा-या आरोपीस २४ तासात केले जेरबंद

  उपसंपादक: वैभव आठवले साप्ताहिक बहुजन भूषण वृत्तपत्र नातेपुते पोलिस स्टेशन यांचेकडून मिळालेल्या माहितीनुसार      नातेपुते पोलीस ठाणे हददीमध्ये मौजे मांडवे, ता.माळशिरस येथे राजन सुकुमार दोशी यांचे शेतातील दिनांक २६/०६/२०२५ रोजी सकाळी ०८/०० वा ते सायंकाळी ०५/००वा. चे दरम्यान शेतातील बांधावरील १० वर्षे वयाची ०२ चंदनाची झाडे अंदाजे किंमत २७,०००/- रू चे कोणीतरी अज्ञात चोरटयाने चोरून नेली आहेत त्याबाबत फिर्यादी नामे राजन सुकुमार दोशी रा.नातेपुते, ता.माळशिरस, जि.सोलापुर यांचे फिर्यादीवरुन नातेपुते पोलीस ठाणेस गु.र.नं. २३७/२०२५ भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ३०३ (२) प्रमाणे दिनांक २६/०६/२०२५ रोजी गुन्हा दाखल झाला होता. सदर गुन्हयाचा तपास पोहेकॉ/१७०८ विकास बाबर हे करीत होते.      नातेपुते पोलीस ठाणेचे गुन्हे प्रकटीकरण शाखेचे अंमलदार यांनी सदर गुन्हयाचा तपास दरम्यान मिळालेल्या गोपनिय बातमीव्दारे माहीती काढून इसम नामे १) गोविंद दुर्याधन काळे २) मेघराज ज्ञानदेव भोसले दोघे रा माळशिरस यांनी गुन्हा केल्याचे निष्पन्न झाल्याने त्यास पोहकॉ/१७०८ बाबर व गुन्हे प्रकटीक...

नातेपुते पोलीस ठाणेकडून जबरी चोरी करणा-या आरोपीस २४ तासाच्या आत केले जेरबंद

उपसंपादक: वैभव आठवले (साप्ताहिक बहुजन भूषण वृत्तपत्र) नातेपुते पोलीस ठाणे यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार      नातेपुते पोलीस ठाणे हददीमध्ये मौजे नातेपुते, ता.माळशिरस येथे दिनांक ०३/०४/२०२५ रोजी सायकाळी ०७.३० वा सुमारास गुन्ह्यातील फिर्यादी नामे वैभव विठ्ठल नष्टे वय ३१ वर्षे, रा. माळशिरस ता. माळशिरस जि. सोलापुर व सोबत त्यांची आई माया नष्टे असे त्यांचेकडील स्कुटी गाडी क्र. एम.एच. ४५ ए.व्ही. १२६१ यावरुन नातेपुते परिसरात शिंगणापुर पाटी ते बायपास रोड मार्गे नातेपुते फडतरी जाणारे बायपास रोडवर आले असताना दोन अज्ञात इसमांनी त्यांचे पाठीमागुन येऊन फिर्यादीचे आई माया विठल नष्टे याचे गळयातील सोन्याचे दागीने बळजबरीने काढुन घेऊन मोटार सायकल वरुन पळुन गेल्याने त्याबाबत फिर्यादी नामे वैभव विठ्ठल नष्टे वय ३१ वर्षे रा. माळशिरस ता. माळशिरस जि. सोलापुर यांचे फिर्यादीवरुन नातेपुते पोलीस ठाणेस गुरनं १३३/२०२५ भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ३०९ (४), ३ (५) प्रमाणे दिनांक ०८/०४/२०२५ रोजी १८ वा ३९ मि. गुन्हा दाखल झाला होता. सदर गुन्हयाचा तपास गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोना/५६२ राकेश लोहार करीत ...

अतुल कुलकर्णी साहेब पोलीस अधीक्षक, सोलापूर ग्रामीण यांच्या संकल्पनेतून धर्मतुरी, ता.माळशिरस रोडलगत वृक्षारोपण

  उपसंपादक: वैभव आठवले साप्ताहिक बहुजन भूषण वृत्तपत्र नातेपुते पोलिस स्टेशन यांचेकडून मिळालेल्या माहितीनुसार       दिनांक 26/06/2025 रोजी मा. श्री. अतुल कुलकर्णी साहेब पोलीस अधीक्षक ,सोलापूर ग्रामीण यांच्या संकल्पनेतून  व मा. उपविभागीय पोलीस अधिकारी श्री नारायण शिरगावकर उपविभाग माळशिरस यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू करण्यात आलेल्या हरित वारी सन 2025 उपक्रमांतर्गत  नातेपुते पोलीस  ठाणे हद्दीतील  मौजे धर्मपुरी येथे  पालखी मार्गवर हरितवारी अनुषंगाने, माननीय पोलीस अधीक्षक श्री अतुल कुलकर्णी साहेब, यांच्या हस्ते रोडलगत वृक्षारोपण करण्यात आले.       सदर ठिकाणी वृक्षारोपण करिता गावातील सरपंच,शेतकरी व गावातील प्रतिष्ठित नागरिक तसेच  पोलीस पाटील, पोलीस मित्र, ग्राम सुरक्षा दल यांच्या उपस्थितीत हरित वारी उपक्रम संपन्न झाला आहे. बातमी अधिक जाहिरातीसाठी संपर्क संपादक : मा.श्री. डॉ. अभिमन्यु बी. आठवले ९४२०३०२५६१ उपसंपादक : वैभव अ. आठवले साप्ताहिक बहुजन भूषण ,  साप्ताहिक बहुजन मित्र वृत्तपत्र संस्थापक :  बहुजन राष्ट्रशक्ति साम...