Skip to main content

Posts

नातेपुते पोलिसांची आदर्श कामगिरी

सोलापूर विभागीय कार्यालय ता.पंढरपूर (वाखरी) साप्ताहिक बहुजन भूषण येथील कार्यालयात पाणीच पाणी

संपादक           पंढरपूर तालुका सोलापूर जिल्हा वाखरी गाव हे पुणे पंढरपूर रोड वर असून त्या गावात पंढरपूर येथील भीमा नदीला आलेल्या पुरामुळे वाखरी गावातील काही घरामध्ये व दलित कुटुंबाच्या घरामध्ये पाणी शिरल्याने तेथील कुटुंबे भयभीत झाले आहेत. त्यामुळे ग्रामस्थ वाखरी येथील शाळा , पालखी मैदान येथे कुटुंबांना स्थलांतर केले आहे. तसेच सोलापूर विभागीय कार्यालय पंढरपूर (वाखरी) बहुजन भूषणचे वृत्तपत्राच्या कार्यालयात पाणी शिरले आहे. भीमा नदीला १३ वर्षानी अशी पुर परिस्थिती आल्यामुळे दैनिय अवस्था निर्माण झाली आहे. सर्व जनतेने स्वत:ची कुटुंबाची काळजी घ्यावी. संकटामागुन संकटे येत आहेत. देशावर राज्यकर्त्यांचे संकट , कोरोना व इतर रोगांचे संकट तसेच पावसामुळे आलेले महापुराचे संकट , जनावरे व मानव जातीसाठी शाप ठरत आहेत. वाखरी ग्रामपंचायतचे प्रशासक अधिकारी , ग्रामसेवक , तलाठी , कर्मचारी , यांनी सतर्क रहावे. पुरामुळे झालेले शेतकर्‍याचे पिकाचे पंचनामे , घरात पाणी शिरल्यामुळे झालेले नुकसान त्याचे पंचनामे करून त्यांना त्वरित मदत देण्यासाठी सतर्क रहावे. तसेच...

श्री. बालयोगी महाराज यांच्या मूर्तिची स्थापना संपन्न

  श्री बालयोगी महाराज संपादक           श्रीबालयोगी महाराज यांचा जन्म श्री पिता नानासाहेब तातोबा भोसले व मातोश्री सौ. रतनबाई नानासाहेब भोसले यांचापोटी श्रीबाल योगी महाराज यांचा जन्म झाला. जन्माला आल्यापासुन बाबांनी घरदार सोडून दर्‍या-खोर्‍या , डोंगर , जंगल येथेच राहायचे. बाबा हेच बाळ घेऊन आई वडील समवेत भटकंती करीत चारोधाम यात्रा पूर्ण केली. बाबांना गगनगिरी महाराजावरती प्रचंड श्रद्धा होती श्री. बालयोगी महाराज यांना शाळा माहिती नव्हती तरीपण शाळेत न जाता बाबांना हिंदी , इंग्रजी , तेलगू , कन्नड अशा विविधी भाषा बोलता येत असत असे त्यांचे आई वडील व भाऊ व भक्त सांगत आहेत. बाबा शाळेत गेले नाहीत पण त्यांनी केलेले लिखाण मी स्वत: संपादक या नात्याने त्यांच्या वहीत लिहलेले पाहिले आहे. बाबांची भक्ति रंजल्या गांजल्यांना आनंदाचे , सुखाचे दिवस लाभावेत यासाठीच त्यांचा जन्म झाला असावा असे भक्त सांगतात. बाबांचे निधन हे सर्वांसाठी हळहळ करणारे आहे. भक्तांना वाटते की , बाबांचे निधन झाले नसून ते या पृथ्वीतलावर अजरामर आहेत , प्रत्येक हृदयात आहेत. बाबांच्...

मनसे आमदार मा. राजु दादा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या वतीने रक्तदान शिबीर घेण्यात आले

मनसे आमदार मा. राजु दादा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या वतीने नातेपुते येथील जिल्हा परिषद कन्या शाळा येथील सभागृहामध्ये ३०/०९/२०२० रोजी भव्य रक्तदान शिबिर भरवण्यात आले होते. " महाराष्ट्र कोरोना मुक्त हाच संकल्प" वाढत्या कोरोनाचा पादूर्भव महाराष्ट्र भर होत असल्याने कोरोनाग्रस्त यांना रक्त पुरवठा मोठ्या प्रमाणात मिळवा. हा संकल्प महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचा आहे. या शिबिराचे आयोजन मनसे विद्यार्थी सेना तालुका उपाध्यक्ष अक्षय बावकर व MNS YOUTH TEAM   नातेपुते यांनी केले होते.         या शिबिरात रक्तदात्यास कोरोना पासून वाचण्यासाठी वाफेचे मशिन , सॅं नि टा यझर व मास्क या वस्तू देण्यात आल्या. रक्तदान शिबिराचे उदघाटन मनसे तालुका अध्यक्ष मा. सुरेश भाऊ टेळे यांच्या हस्ते संपन्न झाला. यावेळी सुरेश भाऊ टेळे यांनी कार्यक्रमाचे   कौतुक केले. व कार्यकर्त्यांचे आभार मानले. व यावेळी उपस्थित मनसे तालुका संघटक अजित पवार , मनसे तालुका उपाध्यक्ष बाबा ननवरे , तालुका कार्यध्यक्ष मनोज लांडगे , विद्यार्थी से...

उत्तर प्रदेशातील हाथरस येथील तरुणीवर झालेल्या अत्याचाराचा निषेध

  उत्तरप्रदेशातील हाथरस येथे तरुणीवर झालेल्या अत्याचार आणि त्यात तिचा झालेला मृत्यू असे कृत्य करणार्‍या त्या नराधमांना न्यायालयीन आसरा नको तर त्यांना भरचौकात आणून त्यांचे तुकडे तुकडे केले पाहिजेत हिच शिक्षा योग्य आहे. ही घटना गंभीर व वेदनादायी व चीड आणणारी आहे , ही माणुसकीला काळीमा फासणारी आहे. या घटनेचा बहुजन राष्ट्रशक्ति सामाजिक संघटना महाराष्ट्र राज्य जाहीर निषेध करीत आहे.     टीप : जे दिसले , अनुभवले , पहिले तेच लिहले जे दिसते तेच लिहणे हे साप्ताहिक बहुजन मित्र , बहुजन भूषण या वृत्तपत्राचे ध्येय उद्दीष्ट आहे. निषेध संपादक : मा. श्री. डॉ. अभिमन्यु बी. आठवले ९४२०३०२५६१ उपसंपादक : वैभव अ. आठवले साप्ताहिक बहुजन भूषण , साप्ताहिक बहुजन मित्र वृत्तपत्र बहुजन राष्ट्रशक्ति सामाजिक संघटना महाराष्ट्र राज्य आठवले परिवार

साप्ताहिक बहुजन भूषण या वृत्तपत्राचे तिसर्‍या वर्षात दमदार पदार्पण होत आहे

  वैभव आठवले  संपादक            साप्ताहिक बहुजन भूषण या वृत्तपत्राचे २९/०९/२०२० रोजी तिसर्‍या वर्षात दमदार पदार्पण होत आहे. सर्व व्यवसायधारक , सामाजिक , राजकीय , शिक्षणक्षेत्रातील तसेच विविध क्षेत्रातील व्यक्तींनी भरभरून प्रतिसाद दिला आहे , आशीर्वाद दिला आहे हे माझ्यासाठी बळ आहे. जे दिसेल तेच लिहणे हे माझ्या वृत्तपात्राचे ध्येय उद्दीष्ट आहे. कोरोना या काळात अंक काढणे अवघड झाले असल्यामुळे अंक काढला गेला नाही. परंतु सोशल मीडियाच्या माध्यमातून मी माझ्या विचाराची शिदोरी सोशल मीडिया मधून वाचकापर्यंत पोहचवण्यासाठी प्रयत्नशील राहिलो. कोरोना या रोगाचा काळ चालू आहे. हा रोग संपुष्टात येऊ हीच परमेश्वर चरणी प्रार्थना...! आपण आपली सामाजिक कामे , पक्षाकडून निवड , गणेश मंडळाच्या वतीने केलेली कामे अशा सर्व स्थरातील कार्यकर्त्यांनी “ ना नफा ना तोटा” यावरती आधारित आपले काम माझ्या वृत्तपत्रातून देवून प्रसिद्धी करणार आहे. आपण आपले लेख , विचार , कविता , भ्रष्टाचार इ. विषयावर लेखन करून तसेच आपल्या व्यवसायाच्या जाहिराती देवून सहकार्य करावे. दिव...

“कोरोना काही जाईना संकट काही टळेना” भारत सरकारने या देशातील ज्या योजना सुरू आहेत त्या बंद करून त्या योजनेसाठी होणारा खर्च या देशातील जनतेसाठी वापरुन जनता जगवावी

  संपादक           कोरोना कोव्हिड-१९ या   रोगाची दिवसेंदिवस वाढ होत आहे यामुळे जनता हैराण झाली आहे. कसे जीवन जगावे असा प्रश्न जनतेसमोर उभा राहिला आहे. जिवंतपणी मरण यातना सोसाव्या लागत आहेत. त्यामध्ये सरकारचे लॉकडाऊन , संचारबंदी , जमावबंदी हे आदेश काय करावे जनतेने ? जनतेला जगवण्यासाठी सरकारची जबाबदारी दिसून येत नाही. केवळ ताप , थंडी , सर्दी , गर्दी , तापमान कमी जास्त होणे , अंग दुखणे , दमा , शुगर , बीपी इ. लक्षणे प्रत्येक माणसामध्ये दिसून येत आहेत. परंतु ही लक्षणे आढळली म्हणून त्या व्यक्तिला कोरोना या रोगाचा रुग्ण म्हणून क्वारंटाईन केले जाते ही चिंताजनक बाब आहे. भारत सरकारने या देशात विविध योजना राबवत आहेत. त्या योजना बंद करून त्या योजनेला येणारा खर्च तो जनतेसाठी प्रत्येक कुटुंबातील व्यक्तीप्रमाणे मानसी १०००/- रु. प्रमाणे त्यांना देऊन जगवावे त्यामुळे निदान जनता सुखी होईल. माणस मरत असतील तर त्या योजना बघणार कोण ? त्यामुळे भारत सरकारने जनतेचे हित पहावे. भारत सरकारने सर्व योजना बंद कराव्यात त्या निधिचा कोरोना या अपत्य काळा...

मा. श्री. अॅड. प्रकाशजी तथा बाळासाहेब आंबेडकर भारत देशातील जनतेसाठी “बापमाणूस” आहेत

मा. श्री. अॅड. प्रकाशजी तथा बाळासाहेब आंबेडकर   संपादक           घटनेचे शिल्पकार भारतरत्न परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू   मा. श्री. अॅड. प्रकाशजी तथा बाळासाहेब आंबेडकर म्हणजे या भारत देशातील जनतेसाठी सध्याचे “बापमाणूस” आहेत. स्वाभिमानी नेता , दिनदुबळ्यांचे कैवारी , प्रत्येक भारतीयांच्या हृदयात स्थान असलेले एकमेव नेते म्हणजे प्रकाशजी म्हणजे तथा बाळासाहेब आंबेडकर आहेत. रडण्यापेक्षा लढण्यात मजा असते. मागे लागून आमदार , खासदार होणे म्हणजे एक लाचारी असे साहेबांचे मत असते. साधी राहणी , उच्च विचार सरणी , कधी गर्व नाही असा सर्वांचा नेता आधार म्हणजे बापमाणूस प्रकाशजी तथा बाळासाहेब आंबेडकर. दिलेला शब्द पाळणारे “ना भय ना भीती” बाळगणारे असे श्रेष्ठ साहेब आहेत. माझा प्रत्यके जातीपातीचा , धर्माचा बांधव आज वंचित राहिला आहे त्यांना न्याय मिळत नाही , त्यांचावर अन्याय अत्याचार होतात म्हणून एक धाडसी , विद्वान , झुंजार नेते म्हणून ओळख असलेले मा. प्रकाशजी तथा बाळासाहेब आंबेडकर साहेबांनी वंचित बहुजन आघाडीची स्थापना करून वंचित आ...