संपादक: अभिमन्यु आठवले, बहुजन भूषण वृत्तपत्र
आज पर्यंत जी आंदोलने मराठा बांधवानी केली ती सर्वं आदर्श घेण्यासारखी ठरली आहेत. आपल्या हक्कासाठी मराठा समाज आंदोलने करीत आहे. आंदोलने करणे हा सर्वं समाजाचा हक्क आहे, मराठा बांधवाची आंदोलने शिस्तबद्ध असतात हे मी संपादक म्हणून पाहिले आहेत. त्यांच्या आंदोलनात बेशिस्थपणा कधीच आढळून आला नाही.
सध्या मनोज जरांगे पाटील मुंबई येथील आझाद मैदान या ठिकाणी मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून आंदोलन करीत आहेत, लाखो बांधव सोबत आहेत. या आंदोलनामुळे कोणालाही त्रास झाला नाही, त्रास होत आहे तो म्हणजे "राजकीय राज्यकर्ते." या राज्यकर्तेकडून आंदोलनकर्ते यांना व समाज बांधवाना जाणूनबुजून त्यांच्या हक्कापासून वंचित ठेवण्याचे कटकारस्थान करीत आहेत ही चिंताजनक व गंभीर बाब आहे.
मराठा समाजाने हक्कासाठी पुकारलेल्या आंदोलनामुळे कोणत्याही समाजाचे, व्यापारी वर्गाचे, किंवा बंधू-भगिनिंना नुकसान व त्रास झालेला दिसत नाही. उलट राज्यकर्ते यांनी आंदोलनकर्ते व समाज बांधवांचे हाल-हाल केले आहेत. शौचालय, हॉटेल, पाणी इत्यादी बंद करून गैरसोय केली ही लाजिरवाणी व चीड आणणारी बाब आहे. तसेच वीज पुरवठाही केला नाही. पाऊस प्रचंड पडल्यामुळे समाज बांधवांचे हाल झाले पण ते पावसाला घाबरले नाहीत, त्यांचा पिंडच ऊन,वारा,पाऊस यांना भिणारा नाही. ज्या राज्यकर्ते यांना मतदान करून राज्यकर्ते बनविले त्याच राज्यकर्ते यांनी आंदोलन समाज बांधवाचे हाल केले. परंतु दानशुरांनी मराठा बांधवासाठी पाणी, अन्न पाठवून आधार दिला, माणुसकीचे दर्शन घडविले.
मराठा बांधवाची आंदोलने एक इतिहास झाला आहे. मराठा आंदोलने लक्षात राहतील अशी नियोजनबद्ध झाली आहेत, आंदोलने कशी करावी हे मराठा बांधवाकडून शिकावे असे वाटते. राज्यकर्त्यांनी मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्या मान्य केल्या त्याबद्दल राज्यकर्ते यांचे अभिनंदन असे मत बहुजन राष्ट्रशक्ती सामाजिक संघटनेचे संस्थापक व बहुजन भूषण वृत्तपत्राचे संपादक/पत्रकार मा.अभिमन्यू आठवले यांनी अनुभवातून मांडले
बातमी
अधिक जाहिरातीसाठी संपर्क
संपादक : मा.श्री. डॉ. अभिमन्यु बी. आठवले
९४२०३०२५६१
उपसंपादक : वैभव अ. आठवले
साप्ताहिक बहुजन भूषण, साप्ताहिक बहुजन मित्र वृत्तपत्र
संस्थापक : बहुजन राष्ट्रशक्ति सामाजिक संघटना महाराष्ट्र राज्य
टीप : जे दिसले, जे पाहिले तेच लिहिले हेच वृत्तपत्राचे ध्येय उद्दीष्ट आहे.

Comments
Post a Comment