Skip to main content

विभागीय आयुक्त कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालय, तहसील कार्यालय मधील लोकशाही दिन जनतेसाठी न्यायदिन ठरावा यासाठी अधिकारी यांची भूमिका असावी नौटंकी नसावी

 

संपादक

        विभागीय आयुक्त कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालय, तहसील कार्यालय या ठिकाणी लोकशाही दिन साजरा होत असतो. यामध्ये जनतेने दिलेल्या अर्जातील लेखी म्हणणे, अडचणी त्या लोकशाही दिनात दिलेल्या अर्जानुसार त्वरित दखल घेवून जनतेला न्याय दिला पाहिजे. परंतु लोकशाही दिनात जनतेने दिलेले अर्ज त्यानुसार फक्त अधिकारी पत्र व्यवहार करून ज्या त्या कार्यालयाकडे पाठवीत असतात. ठोस निर्णय घेत नाहीत. लोकशाही दिन हा न्याय दिन जनतेसाठी ठरला पाहिजे. परंतु सध्या लोकशाही दिन अधिकार्‍याची अशीही बनवाबनवी असा झाला आहे. लोकशाही दिनातील अधिकारी यांच्याकडे जनतेने दिलेल्या अर्जानुसार त्वरित निवारण करून अर्जदाराला न्याय दिला पाहिजे. अर्जदार वेळ, पैसा घालवून लोकशाही दिनात न्याय मिळेले ही अपेक्षा बाळगून अर्ज देत आहेत. परंतु अर्जदाराच्या हाती निराशाच येत आहेत. लोकशाही दिन हवा कशासाठी? त्याचा उपयोग काय? हे अधिकारी यांनी लक्षात घेतले पाहिजे. लोकशाही दिन हा जनतेचे प्रश्न अडीअडचणी, आलेल्या अर्जाचे निवारण करून त्वरित न्याय द्यावे. हे लोकशाही दिनाचे वैशिष्ट आहे. परंतु लोकशाही दिन हरामखोर अधिकारी यांच्यामुळे या न्याय दीनाला गालबोट लागले जात आहे. केवळ शासनाच्या परिपत्रकाचे आम्ही पालन करीत आहोत हे दाखविण्यासाठी अधिकारी लोकशाही दिन साजरा करीत आहेत. लोकशाही दिनातील जनतेचा अर्ज म्हणजे निवारण करून न्याय देणे असा असायला हवा. परंतु अधिकारी यांच्या नासक्या मानसिकतेमुळे या लोकशाही दिनातील अर्जदाराच्या अर्जाला केराची टोपली दाखवली जाते. न्याय मिळत नाही. लोकशाही दिन सध्या जनतेसाठी शापदिन ठरत आहे. त्याचप्रमाणे लोकशाही दिनात जास्त करून ग्रामपंचायत गावठाणात राहणार्‍या कुटुंबाचे अर्ज जागा नावावर करण्यासाठी आदेश ग्रामपंचायतला देण्यात यावेत. यासाठी लोकशाही दिनात अर्ज दाखल करतात. ग्रामपंचायत वर गटविकास अधिकारी हे नियंत्रण अधिकारी असतात. परंतु काही तालुक्याचे गटविकास अधिकारी जातिवादी, टाळाटाळ करणारे, दखल न घेणारे असे हरामखोर अधिकारी मी संपादक म्हणून पाहिले आहे. अधिकारी यांनी दफ्तर दिरंगाई कायद्याचा मान ठेवून लोकशाही दिनात आलेल्या अर्जानुसार न्याय देवून कर्तव्य पार पाडले पाहिजे. लोकशाही दिन हा न्यायदिन ठरावा. लोकशाही दिनात अर्जदाराच्या अर्जाला न्याय मिळत नसेल तर लोकशाही दिन काय कामाचा? लोकशाही दिनातील अर्जाचे निवारण करून अधिकारी यांनी न्याय द्यावा. तसेच अडचण असल्यास अर्जदाराला मार्गदर्शन करावे. हीच अपेक्षा.    

जनहितार्थ

अधिक जाहिरातीसाठी संपर्क

संपादक : मा.श्री. डॉ. अभिमन्यु बी. आठवले

९४२०३०२५६१

उपसंपादक : वैभव अ. आठवले

साप्ताहिक बहुजन भूषण, साप्ताहिक बहुजन मित्र वृत्तपत्र

बहुजन राष्ट्रशक्ति सामाजिक संघटना महाराष्ट्र राज्य

आठवले परिवार

टीप : जे दिसेल, जे पाहिले तेच लिहिले हेच वृत्तपत्राचे ध्येय उद्दीष्ट आहे.

  

 

 

 

Comments

Popular posts from this blog

नातेपुते पोलीस ठाणेकडील गुन्हे प्रकटीकरण शाखेची आदर्श कामगिरी चंदन चोरी करणा-या आरोपीस २४ तासात केले जेरबंद

  उपसंपादक: वैभव आठवले साप्ताहिक बहुजन भूषण वृत्तपत्र नातेपुते पोलिस स्टेशन यांचेकडून मिळालेल्या माहितीनुसार      नातेपुते पोलीस ठाणे हददीमध्ये मौजे मांडवे, ता.माळशिरस येथे राजन सुकुमार दोशी यांचे शेतातील दिनांक २६/०६/२०२५ रोजी सकाळी ०८/०० वा ते सायंकाळी ०५/००वा. चे दरम्यान शेतातील बांधावरील १० वर्षे वयाची ०२ चंदनाची झाडे अंदाजे किंमत २७,०००/- रू चे कोणीतरी अज्ञात चोरटयाने चोरून नेली आहेत त्याबाबत फिर्यादी नामे राजन सुकुमार दोशी रा.नातेपुते, ता.माळशिरस, जि.सोलापुर यांचे फिर्यादीवरुन नातेपुते पोलीस ठाणेस गु.र.नं. २३७/२०२५ भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ३०३ (२) प्रमाणे दिनांक २६/०६/२०२५ रोजी गुन्हा दाखल झाला होता. सदर गुन्हयाचा तपास पोहेकॉ/१७०८ विकास बाबर हे करीत होते.      नातेपुते पोलीस ठाणेचे गुन्हे प्रकटीकरण शाखेचे अंमलदार यांनी सदर गुन्हयाचा तपास दरम्यान मिळालेल्या गोपनिय बातमीव्दारे माहीती काढून इसम नामे १) गोविंद दुर्याधन काळे २) मेघराज ज्ञानदेव भोसले दोघे रा माळशिरस यांनी गुन्हा केल्याचे निष्पन्न झाल्याने त्यास पोहकॉ/१७०८ बाबर व गुन्हे प्रकटीक...

नातेपुते पोलीस ठाणेकडून जबरी चोरी करणा-या आरोपीस २४ तासाच्या आत केले जेरबंद

उपसंपादक: वैभव आठवले (साप्ताहिक बहुजन भूषण वृत्तपत्र) नातेपुते पोलीस ठाणे यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार      नातेपुते पोलीस ठाणे हददीमध्ये मौजे नातेपुते, ता.माळशिरस येथे दिनांक ०३/०४/२०२५ रोजी सायकाळी ०७.३० वा सुमारास गुन्ह्यातील फिर्यादी नामे वैभव विठ्ठल नष्टे वय ३१ वर्षे, रा. माळशिरस ता. माळशिरस जि. सोलापुर व सोबत त्यांची आई माया नष्टे असे त्यांचेकडील स्कुटी गाडी क्र. एम.एच. ४५ ए.व्ही. १२६१ यावरुन नातेपुते परिसरात शिंगणापुर पाटी ते बायपास रोड मार्गे नातेपुते फडतरी जाणारे बायपास रोडवर आले असताना दोन अज्ञात इसमांनी त्यांचे पाठीमागुन येऊन फिर्यादीचे आई माया विठल नष्टे याचे गळयातील सोन्याचे दागीने बळजबरीने काढुन घेऊन मोटार सायकल वरुन पळुन गेल्याने त्याबाबत फिर्यादी नामे वैभव विठ्ठल नष्टे वय ३१ वर्षे रा. माळशिरस ता. माळशिरस जि. सोलापुर यांचे फिर्यादीवरुन नातेपुते पोलीस ठाणेस गुरनं १३३/२०२५ भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ३०९ (४), ३ (५) प्रमाणे दिनांक ०८/०४/२०२५ रोजी १८ वा ३९ मि. गुन्हा दाखल झाला होता. सदर गुन्हयाचा तपास गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोना/५६२ राकेश लोहार करीत ...

अतुल कुलकर्णी साहेब पोलीस अधीक्षक, सोलापूर ग्रामीण यांच्या संकल्पनेतून धर्मतुरी, ता.माळशिरस रोडलगत वृक्षारोपण

  उपसंपादक: वैभव आठवले साप्ताहिक बहुजन भूषण वृत्तपत्र नातेपुते पोलिस स्टेशन यांचेकडून मिळालेल्या माहितीनुसार       दिनांक 26/06/2025 रोजी मा. श्री. अतुल कुलकर्णी साहेब पोलीस अधीक्षक ,सोलापूर ग्रामीण यांच्या संकल्पनेतून  व मा. उपविभागीय पोलीस अधिकारी श्री नारायण शिरगावकर उपविभाग माळशिरस यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू करण्यात आलेल्या हरित वारी सन 2025 उपक्रमांतर्गत  नातेपुते पोलीस  ठाणे हद्दीतील  मौजे धर्मपुरी येथे  पालखी मार्गवर हरितवारी अनुषंगाने, माननीय पोलीस अधीक्षक श्री अतुल कुलकर्णी साहेब, यांच्या हस्ते रोडलगत वृक्षारोपण करण्यात आले.       सदर ठिकाणी वृक्षारोपण करिता गावातील सरपंच,शेतकरी व गावातील प्रतिष्ठित नागरिक तसेच  पोलीस पाटील, पोलीस मित्र, ग्राम सुरक्षा दल यांच्या उपस्थितीत हरित वारी उपक्रम संपन्न झाला आहे. बातमी अधिक जाहिरातीसाठी संपर्क संपादक : मा.श्री. डॉ. अभिमन्यु बी. आठवले ९४२०३०२५६१ उपसंपादक : वैभव अ. आठवले साप्ताहिक बहुजन भूषण ,  साप्ताहिक बहुजन मित्र वृत्तपत्र संस्थापक :  बहुजन राष्ट्रशक्ति साम...