Skip to main content

नातेपुते पोलीसांची उल्लेखनिय कामगिरी खुनाच्या गुन्ह्यातील मुख्य आरोपीस 24 तासाच्या आत केले जेरबंद

कोरोना कोव्हिड-१९ या आपत्तीच्या रोगावर जे सरकार जनतेला इंजेकशन देते त्या इंजेकशनाचे फायदे, त्याची ध्येय उद्दिष्टे जनतेला माहिती असायला हवे यासाठी जनजागृती करणे हिताचे आहे

संपादक                                               

कोरोना कोव्हिड-१९ या रोगाची आपत्ती जनतेला वेदना देण्यासाठी तसेच जगाचा निरोप घेण्यासाठी मारक ठरत आहे. या रोगावरती सरकार जनतेला वाचवण्यासाठी विविध कंपनीचे इंजेकशन देण्याचा जो सपाटा लावलेला आहे तो चांगला व आनंदाची बाब आहे. परंतु या इंजेकशनाचे फायदे काय आहेत हे इंजेकशन माणसाच्या शरीरात असलेल्या किती रोगावर प्रभावित आहे जेणेकरून त्या माणसाच्या शरीरातील रोग आहेत ते नष्ट होतील. तसेच या इंजेकशनचा परिणाम होईल का? यासाठी माणसाच्या शरीरात असलेले असंख्य रोग त्या रोगावर सध्या दिले जाणारे इंजेकशन काय परिणाम करेल का? शरीरातील कोणकोणत्या आजारावर हे इंजेकशन उपयोगी पडू शकते त्या आजारांची नावे कंपनी व सरकारने देणे मला संपादक म्हणून योग्य वाटते. केवळ कोरोना कोव्हिड-१९ ही आपत्ती समजून ह्या इंजेकशन चे फायदे तोटे न बघता जनतेला माहिती न देता जनतेला देणे हे योग्य नाही असे माझे ठाम मत आहे. एकतर या देशातील जनता “माकड” झाली आहे. राज्यकर्त्यांनी थाळी वाजवा, घरे पेटवा, आत्महत्या करा, अन्न-अन्न करून मरा असे जरी आदेश काढले तरी भोळीभाबळी जनता त्या राज्यकर्त्याच्या आदेशाची तंतोतंत पालन करेल यामध्ये शंका नाही एवढी आंधळी जनता झाली आहे. दिले जाणारे इंजेकशन वयोमार्यादा कमी करण्यासाठी की वयोमार्यादा वाढवण्यासाठी आहे हे सरकारने जनतेला सांगितले पाहिजे. हुशार राज्यकर्ते आणि आंधळी जनता हे या देशाचे दुर्भाग्य म्हणावे वाटते. हे कोरोना या रोगावर इंजेकशन देताना जनतेला या इंजेकशनचे फायदे तोटे सांगून प्रथम जनजागृती करणे हिताचे आहे. सध्या हे इंजेकशन घेण्यासाठी असंख्य व्यक्ति पुढे येत नाहीत ते इंजेकशन ची भीती बाळगत आहेत आणि ते खरे ही आहे. हे इंजेकशन केवळ कोरोना हा रोग शरीरातून घालवण्यासाठी आहे असे चित्र आहे परंतु ज्या व्यक्ति अनेक शारीरिक रोगामुळे त्रस्त आहेत. वेदनेने घायाळ आहेत त्या रोगावर हे इंजेकशन परिणाम करेल का? असंख्य व्यक्तींना रोगराईने घायाळ केले आहे त्यामुळे सरकारने कोरोना कोव्हिड-१९ या काळात इंजेकशन देण्याची मोहीम राबवली आहे त्या इंजेकशनचे फायदे तोटे जनतेसमोर मांडले पाहिजेत. प्रत्येक व्यक्तीचा रक्तगट हा सारखा नाही त्यामुळे हे इंजेकशन घेतले तर “जीवदान” मिळेल का? या इंजेकशनामुळे मृत्यू होईल का? यामध्ये जनता विचाराधीन आहे. या इंजेकशनचे फायदे तोटे सरकारने जनतेला सांगावेत. सरकार इंजेकशन घ्या म्हणून घेत राहणे ते जिवावर बेतू शकते असेही माझे मत आहे. इंजेकशनचे महत्व जनतेला समजले पाहिजे. जर हे इंजेकशन घेतले आणि तो व्यक्ति “मरण” पावला तर याला जबाबदार कोण? खुनाचा गुन्हा कोणावर दाखल केला पाहिजे हे सरकारने जनतेला सांगितले पाहिजे. या इंजेकशनचे ध्येय उद्दिष्टे जनतेला समजली पाहिजेत. या देशावर राज्यकर्त्यांनी जनतेला खेळणी माकड बनवले आहे त्यामुळे “डोळस जनता आंधळी झाली आहे”. जनता या इंजेकशनला भीत असल्यामुळे त्याचे फायदे तोटे सरकारने सांगणे हे कर्तव्य आहे इतकेच.

 

जनहितार्थ

अधिक जाहिरातीसाठी संपर्क

संपादक : मा. श्री. डॉ. अभिमन्यु बी. आठवले

९४२०३०२५६१

उपसंपादक : वैभव अ. आठवले

साप्ताहिक बहुजन भूषण, साप्ताहिक बहुजन मित्र वृत्तपत्र

बहुजन राष्ट्रशक्ति सामाजिक संघटना महाराष्ट्र राज्य

आठवले परिवार

टीप : जे दिसेल, जे पाहिले तेच लिहिले हेच वृत्तपत्राचे ध्येय उद्दीष्ट आहे.  

     

Comments

Popular posts from this blog

नातेपुते पोलीस ठाणेकडील गुन्हे प्रकटीकरण शाखेची आदर्श कामगिरी चंदन चोरी करणा-या आरोपीस २४ तासात केले जेरबंद

  उपसंपादक: वैभव आठवले साप्ताहिक बहुजन भूषण वृत्तपत्र नातेपुते पोलिस स्टेशन यांचेकडून मिळालेल्या माहितीनुसार      नातेपुते पोलीस ठाणे हददीमध्ये मौजे मांडवे, ता.माळशिरस येथे राजन सुकुमार दोशी यांचे शेतातील दिनांक २६/०६/२०२५ रोजी सकाळी ०८/०० वा ते सायंकाळी ०५/००वा. चे दरम्यान शेतातील बांधावरील १० वर्षे वयाची ०२ चंदनाची झाडे अंदाजे किंमत २७,०००/- रू चे कोणीतरी अज्ञात चोरटयाने चोरून नेली आहेत त्याबाबत फिर्यादी नामे राजन सुकुमार दोशी रा.नातेपुते, ता.माळशिरस, जि.सोलापुर यांचे फिर्यादीवरुन नातेपुते पोलीस ठाणेस गु.र.नं. २३७/२०२५ भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ३०३ (२) प्रमाणे दिनांक २६/०६/२०२५ रोजी गुन्हा दाखल झाला होता. सदर गुन्हयाचा तपास पोहेकॉ/१७०८ विकास बाबर हे करीत होते.      नातेपुते पोलीस ठाणेचे गुन्हे प्रकटीकरण शाखेचे अंमलदार यांनी सदर गुन्हयाचा तपास दरम्यान मिळालेल्या गोपनिय बातमीव्दारे माहीती काढून इसम नामे १) गोविंद दुर्याधन काळे २) मेघराज ज्ञानदेव भोसले दोघे रा माळशिरस यांनी गुन्हा केल्याचे निष्पन्न झाल्याने त्यास पोहकॉ/१७०८ बाबर व गुन्हे प्रकटीक...

नातेपुते पोलीस ठाणेकडून जबरी चोरी करणा-या आरोपीस २४ तासाच्या आत केले जेरबंद

उपसंपादक: वैभव आठवले (साप्ताहिक बहुजन भूषण वृत्तपत्र) नातेपुते पोलीस ठाणे यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार      नातेपुते पोलीस ठाणे हददीमध्ये मौजे नातेपुते, ता.माळशिरस येथे दिनांक ०३/०४/२०२५ रोजी सायकाळी ०७.३० वा सुमारास गुन्ह्यातील फिर्यादी नामे वैभव विठ्ठल नष्टे वय ३१ वर्षे, रा. माळशिरस ता. माळशिरस जि. सोलापुर व सोबत त्यांची आई माया नष्टे असे त्यांचेकडील स्कुटी गाडी क्र. एम.एच. ४५ ए.व्ही. १२६१ यावरुन नातेपुते परिसरात शिंगणापुर पाटी ते बायपास रोड मार्गे नातेपुते फडतरी जाणारे बायपास रोडवर आले असताना दोन अज्ञात इसमांनी त्यांचे पाठीमागुन येऊन फिर्यादीचे आई माया विठल नष्टे याचे गळयातील सोन्याचे दागीने बळजबरीने काढुन घेऊन मोटार सायकल वरुन पळुन गेल्याने त्याबाबत फिर्यादी नामे वैभव विठ्ठल नष्टे वय ३१ वर्षे रा. माळशिरस ता. माळशिरस जि. सोलापुर यांचे फिर्यादीवरुन नातेपुते पोलीस ठाणेस गुरनं १३३/२०२५ भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ३०९ (४), ३ (५) प्रमाणे दिनांक ०८/०४/२०२५ रोजी १८ वा ३९ मि. गुन्हा दाखल झाला होता. सदर गुन्हयाचा तपास गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोना/५६२ राकेश लोहार करीत ...

अतुल कुलकर्णी साहेब पोलीस अधीक्षक, सोलापूर ग्रामीण यांच्या संकल्पनेतून धर्मतुरी, ता.माळशिरस रोडलगत वृक्षारोपण

  उपसंपादक: वैभव आठवले साप्ताहिक बहुजन भूषण वृत्तपत्र नातेपुते पोलिस स्टेशन यांचेकडून मिळालेल्या माहितीनुसार       दिनांक 26/06/2025 रोजी मा. श्री. अतुल कुलकर्णी साहेब पोलीस अधीक्षक ,सोलापूर ग्रामीण यांच्या संकल्पनेतून  व मा. उपविभागीय पोलीस अधिकारी श्री नारायण शिरगावकर उपविभाग माळशिरस यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू करण्यात आलेल्या हरित वारी सन 2025 उपक्रमांतर्गत  नातेपुते पोलीस  ठाणे हद्दीतील  मौजे धर्मपुरी येथे  पालखी मार्गवर हरितवारी अनुषंगाने, माननीय पोलीस अधीक्षक श्री अतुल कुलकर्णी साहेब, यांच्या हस्ते रोडलगत वृक्षारोपण करण्यात आले.       सदर ठिकाणी वृक्षारोपण करिता गावातील सरपंच,शेतकरी व गावातील प्रतिष्ठित नागरिक तसेच  पोलीस पाटील, पोलीस मित्र, ग्राम सुरक्षा दल यांच्या उपस्थितीत हरित वारी उपक्रम संपन्न झाला आहे. बातमी अधिक जाहिरातीसाठी संपर्क संपादक : मा.श्री. डॉ. अभिमन्यु बी. आठवले ९४२०३०२५६१ उपसंपादक : वैभव अ. आठवले साप्ताहिक बहुजन भूषण ,  साप्ताहिक बहुजन मित्र वृत्तपत्र संस्थापक :  बहुजन राष्ट्रशक्ति साम...