Skip to main content

नातेपुते पोलिसांची वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर धडक कारवाई

कोरोना कोव्हिड-१९ या आपत्तीच्या रोगावर जे सरकार जनतेला इंजेकशन देते त्या इंजेकशनाचे फायदे, त्याची ध्येय उद्दिष्टे जनतेला माहिती असायला हवे यासाठी जनजागृती करणे हिताचे आहे

संपादक                                               

कोरोना कोव्हिड-१९ या रोगाची आपत्ती जनतेला वेदना देण्यासाठी तसेच जगाचा निरोप घेण्यासाठी मारक ठरत आहे. या रोगावरती सरकार जनतेला वाचवण्यासाठी विविध कंपनीचे इंजेकशन देण्याचा जो सपाटा लावलेला आहे तो चांगला व आनंदाची बाब आहे. परंतु या इंजेकशनाचे फायदे काय आहेत हे इंजेकशन माणसाच्या शरीरात असलेल्या किती रोगावर प्रभावित आहे जेणेकरून त्या माणसाच्या शरीरातील रोग आहेत ते नष्ट होतील. तसेच या इंजेकशनचा परिणाम होईल का? यासाठी माणसाच्या शरीरात असलेले असंख्य रोग त्या रोगावर सध्या दिले जाणारे इंजेकशन काय परिणाम करेल का? शरीरातील कोणकोणत्या आजारावर हे इंजेकशन उपयोगी पडू शकते त्या आजारांची नावे कंपनी व सरकारने देणे मला संपादक म्हणून योग्य वाटते. केवळ कोरोना कोव्हिड-१९ ही आपत्ती समजून ह्या इंजेकशन चे फायदे तोटे न बघता जनतेला माहिती न देता जनतेला देणे हे योग्य नाही असे माझे ठाम मत आहे. एकतर या देशातील जनता “माकड” झाली आहे. राज्यकर्त्यांनी थाळी वाजवा, घरे पेटवा, आत्महत्या करा, अन्न-अन्न करून मरा असे जरी आदेश काढले तरी भोळीभाबळी जनता त्या राज्यकर्त्याच्या आदेशाची तंतोतंत पालन करेल यामध्ये शंका नाही एवढी आंधळी जनता झाली आहे. दिले जाणारे इंजेकशन वयोमार्यादा कमी करण्यासाठी की वयोमार्यादा वाढवण्यासाठी आहे हे सरकारने जनतेला सांगितले पाहिजे. हुशार राज्यकर्ते आणि आंधळी जनता हे या देशाचे दुर्भाग्य म्हणावे वाटते. हे कोरोना या रोगावर इंजेकशन देताना जनतेला या इंजेकशनचे फायदे तोटे सांगून प्रथम जनजागृती करणे हिताचे आहे. सध्या हे इंजेकशन घेण्यासाठी असंख्य व्यक्ति पुढे येत नाहीत ते इंजेकशन ची भीती बाळगत आहेत आणि ते खरे ही आहे. हे इंजेकशन केवळ कोरोना हा रोग शरीरातून घालवण्यासाठी आहे असे चित्र आहे परंतु ज्या व्यक्ति अनेक शारीरिक रोगामुळे त्रस्त आहेत. वेदनेने घायाळ आहेत त्या रोगावर हे इंजेकशन परिणाम करेल का? असंख्य व्यक्तींना रोगराईने घायाळ केले आहे त्यामुळे सरकारने कोरोना कोव्हिड-१९ या काळात इंजेकशन देण्याची मोहीम राबवली आहे त्या इंजेकशनचे फायदे तोटे जनतेसमोर मांडले पाहिजेत. प्रत्येक व्यक्तीचा रक्तगट हा सारखा नाही त्यामुळे हे इंजेकशन घेतले तर “जीवदान” मिळेल का? या इंजेकशनामुळे मृत्यू होईल का? यामध्ये जनता विचाराधीन आहे. या इंजेकशनचे फायदे तोटे सरकारने जनतेला सांगावेत. सरकार इंजेकशन घ्या म्हणून घेत राहणे ते जिवावर बेतू शकते असेही माझे मत आहे. इंजेकशनचे महत्व जनतेला समजले पाहिजे. जर हे इंजेकशन घेतले आणि तो व्यक्ति “मरण” पावला तर याला जबाबदार कोण? खुनाचा गुन्हा कोणावर दाखल केला पाहिजे हे सरकारने जनतेला सांगितले पाहिजे. या इंजेकशनचे ध्येय उद्दिष्टे जनतेला समजली पाहिजेत. या देशावर राज्यकर्त्यांनी जनतेला खेळणी माकड बनवले आहे त्यामुळे “डोळस जनता आंधळी झाली आहे”. जनता या इंजेकशनला भीत असल्यामुळे त्याचे फायदे तोटे सरकारने सांगणे हे कर्तव्य आहे इतकेच.

 

जनहितार्थ

अधिक जाहिरातीसाठी संपर्क

संपादक : मा. श्री. डॉ. अभिमन्यु बी. आठवले

९४२०३०२५६१

उपसंपादक : वैभव अ. आठवले

साप्ताहिक बहुजन भूषण, साप्ताहिक बहुजन मित्र वृत्तपत्र

बहुजन राष्ट्रशक्ति सामाजिक संघटना महाराष्ट्र राज्य

आठवले परिवार

टीप : जे दिसेल, जे पाहिले तेच लिहिले हेच वृत्तपत्राचे ध्येय उद्दीष्ट आहे.  

     

Comments

Popular posts from this blog

नातेपुते पोलीस ठाण्याची धडक कामगिरी 6,200 रुपये हिसकून घेऊन जाणाऱ्या चोरांना आपले ताब्यातील थार वाहनांसह केली अटक

उपसंपादक: वैभव आठवले साप्ताहिक बहुजन भूषण वृत्तपत्र नातेपुते पोलिस स्टेशन यांचेकडून मिळालेल्या माहितीनुसार           नातेपुते पोलीस ठाणे हद्दीमध्ये फिर्यादी यांच्या दीपक जनार्दन चव्हाण, राहणार मोराची, तालुका माळशिरस, जिल्हा सोलापूर हे फलटण-पंढरपूर रोडवरील इंडीयन ऑईल कंपनीचा सुळ पेंट्रोल पंप येथे दि.01/10/2025 रोजी दुपारी 03.50 वा. सुमारास इंडीयन ऑईल कंपनीचा सुळ पेंट्रोल पंप येथे डिझेल टाकण्याचे काम करित असताना एक राखाडी रंगाची थार गाडी नं MH06CG5558 अशी डिझेल भरण्याकरीता आली व त्यातील ड्रायव्हर शेजारी बसलेल्या अनोळखी इसमाने गाडीत 4000 रुपयचे डिझेल भरायचे आहे व 6200 रु आम्हाला रोख पैशाची गरज आहे मी तुम्हाला माझे फोन पे वरून 10200 रु ऑनलाईन पाठवतो असे म्हणाल्याने मी गाडीचे डिझेलचे झाकन उघडण्यास गेलो असता पाठीमागे बसलेला अनोळखी इसम म्हणाला की, आम्हाला डिझेल नको 6200 रु रोख द्या अशी विनंती केली. त्यावेळी मी माझे खिश्यातील डिझेल विक्रीचे जमा झालेले पैसे खिश्यातुन काढुन 6200 रु मोजले त्यामध्ये 500 रु दराच्या 12 व 100 रु दराच्या 02 असे 6200 रु बाजुला काढले व बाकी ...

नातेपुते पोलीस ठाण्याची धडक कामगिरी उभ्या असलेल्या वाहनाची टायर चोरणाऱ्या अट्टल चोरास अटक व चोरीस गेलेला 100% मुद्देमाल सह 2,04,000/ किमतीचा मुद्देमाल जप्त

उपसंपादक: वैभव आठवले साप्ताहिक बहुजन भूषण वृत्तपत्र नातेपुते पोलिस स्टेशन यांचेकडून मिळालेल्या माहितीनुसार      नातेपुते पोलीस ठाणे हद्दीमध्ये फिर्यादी यांच्या आकाश तानाजी बोडरे, राहणार नातेपुते, तालुका माळशिरस यांनी त्यांच्याकडील वापरते वाहन टाटा टिपर नंबर एम एच 11 सी एच 0551 या उभ्या असलेल्या वाहनाचे दोन टायर डिस्कसह किंमत 75,000/ रुपये खोलून कोणीतरी अज्ञात चोरट्याने ते चोरून नेले आहेत म्हणून वगैरे हकीगत वरून नातेपुते पोलीस ठाणे गुर नंबर 331/2025 बीएनएस कलम 303 (2) प्रमाणे गुन्हा दाखल होता.       सदर गुन्ह्यातील घडला प्रकाराबाबत वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली नातेपुते पोलीस ठाणे व उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय गुन्हे प्रकटीकरण पथक गुन्ह्यातील घटनास्थळाच्या आजूबाजूची सीसीटीव्ही पाहणी करून तसेच  सायबर शाखेकडील तांत्रिक माहितीचे विश्लेषण करून संशयित  आरोपीचा शोध घेतला असता संशयित आरोपी हा कडेगाव जिल्हा सांगली येथील नामे बुरान इलाही मुलाणी वय 40 वर्ष असे  असल्याबाबत खात्री झाली आणि त्यानंतर सदर आरोपीस सापळा लावून कडेगाव जिल्हा सांगली येथे...

शिवसेनेच्या सोलापूर जिल्हाप्रमुख पदी राजकुमार हिवरकर-पाटील

  उपसंपादक: वैभव आठवले साप्ताहिक बहुजन भूषण वृत्तपत्र शिवसेनेचे मुख्य नेते तथा महाराष्ट्र राज्याचे संवेदनशील उपमुख्यमंत्री मा.ना.एकनाथराव शिंदे साहेब यांच्या आदेशाने महाराष्ट्र राज्याचे रोजगार हमी पणन मंत्री भरत शेठ गोगावले यांच्या हस्ते व महाराष्ट्र प्रदेशचे ओबीसी विभागाचे प्रमुख रमेशजी बारसकर यांच्या उपस्थितीत मंत्रालय मुंबई येथे सोलापूर जिल्ह्याचे प्रमुख ओबीसी विभाग म्हणून श्री.राजकुमार लता शंकरराव हिवरकर-पाटील यांना निवडीचे पत्र देण्यात आले. आजवर शिवसेनेमध्ये पक्षाचे जडणघडणीमध्ये मोर्चे, आंदोलन, साडेनऊ हजार पेक्षा जास्त गरिबांची केलेली ऑपरेशन, सोलापूरच्या अक्कलकोटचे माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे साहेब यांच्या पक्षप्रवेशावेळी मुख्य नेत्यांच्या उपस्थितीत 12 बलुत्तरांचा पक्ष म्हणून ओबीसी विभाग निर्माण करण्यामागची मुख्य नेते यांची दूरदृष्टी सर्वांसमक्ष केलेल भाषण, राष्ट्रमाता जिजाऊ क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीच्या निमित्ताने 55 सायकलींच मोफत झालेल वाटप,  सवलतीच्या दरात  99000 माता-भगिनींना केलेली डाळ वाटप, सत्तावीस गावांना बचत गटाच्या माध्यमातून दिलेली ...