Skip to main content

Posts

नातेपुते पोलिसांची आदर्श कामगिरी

सरकारला लॉकडाऊनचा निर्णय घेण्यासाठी जनता जबाबदार

संपादक गेल्या वर्षभरापासून देशात कोरोना कोव्हिड - १९ या रोगामुळे देशात लॉकडाऊन केले गेले . संचारबंदी , जमावबंदी केली गेली परंतु याकडे जनतेने दुर्लक्ष केले . बेफिकीरपणा , अहंपणा जनतेचा दिसून आला . शासन वेळोवेळी नियमाचे पालन करा अशा सूचना देऊन सुद्धा जनता त्याचा विचार करत नाही . मास्क वापरणे , सॅनिटायझर चा वापर करणे , अंतर ठेवणे हे जनतेच्या हातातील उपाय आहेत त्या उपायाला जनता बगल देत आहे मग सरकारने काय करावे ? जनता जाणून बुजून शासनाच्या नियमाचे भंग करीत आहे त्यामुळे सरकारला लॉकडाऊन करणे भाग पडत आहे . लॉकडाऊन हाच एकमेव पर्याय आहे . प्रत्येक व्यक्तीने या कोरोना कोव्हिड - १९ या रोगाच्या अपत्य काळात स्वतःचे , कुटुंबाचे व इतरांचे संरक्षण केले पाहिजे . जनतेच्या वागण्यामुळे शासनाला लॉकडाऊन हा पर्याय निवडावा लागत आहे . देश २०१४ पासून बरबादीकडे गेला आहे . शेतकरी उध्वस्त झाला आहे , शेतकऱ्याच्या मालाला भाव नाही , कंपन्या बंद पडल्या आहेत , युवकांच्या हाताला काम नाही , शिक्षणाच्या बारा वा...
  अन्यायाविरुधात लढा देणाऱ्या बहुजन राष्ट्रशक्ती सामाजिक संघटना महाराष्ट्र राज्य या संघटनेच्या कराड तालुका अध्यक्षपदी मा.श्री. विठ्ठल पांडुरंग काटेकर (महाराज) यांची नियुक्ती संघटनेचे संस्थापक मा. श्री. डॉ. अभिमन्यू बी. आठवले यांनी संघटनेचे असलेले कार्यालय नातेपुते ता. माळशिरस, जि.सोलापूर येथे नियुक्ती पत्र देऊन केले व त्यांना चांगले काम करण्यासाठी शुभेच्छा दिल्या. 
अन्यायाविरुधात लढा देणाऱ्या बहुजन राष्ट्रशक्ती सामाजिक संघटना महाराष्ट्र राज्य या संघटनेच्या सातारा जिल्हा अध्यक्षपदी मा.श्री. विक्रम उमेश साठे यांची नियुक्ती संघटनेचे संस्थापक मा. श्री. डॉ. अभिमन्यू बी. आठवले यांनी संघटनेचे असलेले कार्यालय नातेपुते ता. माळशिरस, जि.सोलापूर येथे नियुक्ती पत्र देऊन केले व त्यांना चांगले काम करण्यासाठी शुभेच्छा दिल्या. 

घटनेचे शिल्पकार भारतरत्न प.पु. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराने "बळ" मिळाले

भारतरत्न   प . पु .  डॉ .  बाबासाहेब आंबेडकर संपादक भारतीय घटनेचे शिल्पकार प . पु . डॉ . बाबासाहेब आंबेडकर यांची १४ एप्रिल २०२१ रोजी १३० वी जयंती सर्व जगभर मोठया आनंदात साजरी होत आहे . डॉ . बाबासाहेब आंबेडकर यांची अनेक पुस्तके वाचली , त्यांचा संघर्षमय जीवन इतिहास वाचला , त्यांच्या विचारांची मला व माझ्या कुटुंबाला कसे जगावे , कसे रहावे , काय करावे , काय करू नये या विचाराची “ शिदोरी ” मिळाली त्या विचारामुळे माझ्यात परिवर्तन झाले . मी सतत अवांतर वाचन आणि लिखाण करतो , मी व्यसनापासून अलिप्त राहिलो आहे . व्यसन हे स्वतःचे व कुटुंबाचे नुकसान करते . बाबांचे विचार हे माझ्यासाठी व माझ्या कुटुंबासाठी प्रेरणादायी , स्पृतीदायी ठरत आहेत . बाबांनी सांगितलेल्या विचारामुळे मी आचरण करू लागलो त्यामुळे येणाऱ्या संकटाचा सामना करण्यासाठी व झुंज देण्यासाठी माझ्यामध्ये “ बळ ” निर्माण झाले . विचाराने माणूस शहाणा होतो . चांगले काय ? आणि वाईट काय ? याबाबत भूमिका बजावतो . मी बाबांचे विचार वाचले त...