Skip to main content

नातेपुते पोलिसांची वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर धडक कारवाई

घटनेचे शिल्पकार भारतरत्न प.पु. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराने "बळ" मिळाले

भारतरत्न .पुडॉबाबासाहेब आंबेडकर


संपादक

भारतीय घटनेचे शिल्पकार . पु. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १४ एप्रिल २०२१ रोजी १३० वी जयंती सर्व जगभर मोठया आनंदात साजरी होत आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची अनेक पुस्तके वाचली, त्यांचा संघर्षमय जीवन इतिहास वाचला, त्यांच्या विचारांची मला माझ्या कुटुंबाला कसे जगावे, कसे रहावे, काय करावे, काय करू नये या विचाराची शिदोरी मिळाली त्या विचारामुळे माझ्यात परिवर्तन झाले. मी सतत अवांतर वाचन आणि लिखाण करतो, मी व्यसनापासून अलिप्त राहिलो आहे. व्यसन हे स्वतःचे कुटुंबाचे नुकसान करते. बाबांचे विचार हे माझ्यासाठी माझ्या कुटुंबासाठी प्रेरणादायी, स्पृतीदायी ठरत आहेत. बाबांनी सांगितलेल्या विचारामुळे मी आचरण करू लागलो त्यामुळे येणाऱ्या संकटाचा सामना करण्यासाठी झुंज देण्यासाठी माझ्यामध्ये बळ निर्माण झाले. विचाराने माणूस शहाणा होतो. चांगले काय? आणि वाईट काय? याबाबत भूमिका बजावतो. मी बाबांचे विचार वाचले त्या विचारामुळे झुंजारवृत्ती माझ्यात निर्माण झाली. अन्यायाला वाचा फोडण्यासाठी बाबांनी लिहिलेल्या संविधानाने दिलेले अधिकार त्यामुळे न्याय हक्कासाठी, लढण्यासाठी दक्ष असतो. अन्याय करणारे असतात त्यांना जोर का झटका कशा पद्धतीने द्यायचा ते मला संविधानामुळे समजले आहे. बाबांनी सांगितलेला विचार शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. मी शिकलो, सर्व धर्म समभावात मिसळतो आणि न्यायासाठी लोकशाही मार्गाने संघर्ष करतो. बाबांनी सांगितलेल्या विचारामुळे मला मार्ग दिशा मिळाली. त्यांचे विचार माझ्यासाठी अमृत आहेत. जो वाचेल, आत्मसात करेल तो कधीच भीती बाळगणार नाही. बाबांच्या विचारामुळे लेखणीद्वारे प्रबोधन करण्यासाठी मला प्रेरणा मिळाली, माझा आत्मविश्वास वाढला. रडत बसण्यापेक्षा लढत राहणे यशासाठी संघर्ष महत्वाचा असतो. "शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे आणि जो ते प्राशन करील तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही" हा बाबांचा विचार मला गप्प बसू देत नाही. रक्त काढण्यासाठी जे हत्यार वापरले जाते त्यापेक्षाही विचाराचे हत्यार अन्याय करणारे असतात त्यांना घायाळ करू शकतात, वेदना देऊ शकतात. माझ्या आयुष्यात अनेक संकटमय वादळे आली वेदना देऊन गेली, खडतर प्रवास सहन केला, मान-अपमान सहन केला पण मी कधी धीर सोडला नाही, डगमगलो नाही. उच्च शिक्षण घेऊन सन्मानित झालो. माझी पत्नी, मुलगा, मुलगी उच्च शिक्षण घेऊन पदवीधर आहेत. माझ्या आयुष्यात जे चढ-उतार आले त्यासाठी मी सामोरे गेलो. येणारा काळ भयानक आहे. याकाळात मी निर्भीडपणे विचार मांडत आहे. माझी संघटना बहुजन राष्ट्रशक्ती सामाजिक संघटना न्याय हक्कासाठी लढणारी आहे. बाबांच्या विचारामुळे क्रांतीची मशाल ज्योत माझ्यात निर्माण झाली. अंधारातून प्रकाशाकडे वाटचाल करण्यासाठी दिशा मिळाली, विचाराने प्रभावित झालो. बाबांचे विचार मला माझ्या कुटुंबाला एक नवी पहाट दाखवू लागले. विचारात ताकत असते त्याची मला जाणीव झाली. बाबांचे विचार मला बळ देतात त्यामुळे मी सडेतोड लेखणीद्वारे विचार मांडतो. माझ्या बाबांच्या विचारामुळे माझ्या जीवनाचे सोने झाले. बाबांमुळे मी माणसात आलो. शिकलो, सवरलो, शहाणा झालो. स्वाभिमानाचे जीवन जगू लागलो. बाबांचे उपकार देशासाठी देशातल्या जनतेसाठी आदर्शवादी ठरत आहेत. पोट भरण्यासाठी भाकरीची गरज असते त्याचप्रमाणे परिवर्तनवादी, प्रबोधनवादी होण्यासाठी बाबांच्या विचाराची आज गरज आहे. १३० व्या जयंतीनिमित्त सर्व बांधवाना आठवले परिवाराचा क्रांतिकारी जय भिम. जय संविधान, जय महाराष्ट्र, जय भारत.

जनहितार्थ

अधिक जाहिरातीसाठी संपर्क

संपादक : मा. श्री. डॉ. अभिमन्यु बी. आठवले

९४२०३०२५६१

उपसंपादक : वैभव अ. आठवले

साप्ताहिक बहुजन भूषण, साप्ताहिक बहुजन मित्र वृत्तपत्र

बहुजन राष्ट्रशक्ति सामाजिक संघटना महाराष्ट्र राज्य

आठवले परिवार

 

Comments

Popular posts from this blog

नातेपुते पोलीस ठाण्याची धडक कामगिरी 6,200 रुपये हिसकून घेऊन जाणाऱ्या चोरांना आपले ताब्यातील थार वाहनांसह केली अटक

उपसंपादक: वैभव आठवले साप्ताहिक बहुजन भूषण वृत्तपत्र नातेपुते पोलिस स्टेशन यांचेकडून मिळालेल्या माहितीनुसार           नातेपुते पोलीस ठाणे हद्दीमध्ये फिर्यादी यांच्या दीपक जनार्दन चव्हाण, राहणार मोराची, तालुका माळशिरस, जिल्हा सोलापूर हे फलटण-पंढरपूर रोडवरील इंडीयन ऑईल कंपनीचा सुळ पेंट्रोल पंप येथे दि.01/10/2025 रोजी दुपारी 03.50 वा. सुमारास इंडीयन ऑईल कंपनीचा सुळ पेंट्रोल पंप येथे डिझेल टाकण्याचे काम करित असताना एक राखाडी रंगाची थार गाडी नं MH06CG5558 अशी डिझेल भरण्याकरीता आली व त्यातील ड्रायव्हर शेजारी बसलेल्या अनोळखी इसमाने गाडीत 4000 रुपयचे डिझेल भरायचे आहे व 6200 रु आम्हाला रोख पैशाची गरज आहे मी तुम्हाला माझे फोन पे वरून 10200 रु ऑनलाईन पाठवतो असे म्हणाल्याने मी गाडीचे डिझेलचे झाकन उघडण्यास गेलो असता पाठीमागे बसलेला अनोळखी इसम म्हणाला की, आम्हाला डिझेल नको 6200 रु रोख द्या अशी विनंती केली. त्यावेळी मी माझे खिश्यातील डिझेल विक्रीचे जमा झालेले पैसे खिश्यातुन काढुन 6200 रु मोजले त्यामध्ये 500 रु दराच्या 12 व 100 रु दराच्या 02 असे 6200 रु बाजुला काढले व बाकी ...

नातेपुते पोलीस ठाण्याची धडक कामगिरी उभ्या असलेल्या वाहनाची टायर चोरणाऱ्या अट्टल चोरास अटक व चोरीस गेलेला 100% मुद्देमाल सह 2,04,000/ किमतीचा मुद्देमाल जप्त

उपसंपादक: वैभव आठवले साप्ताहिक बहुजन भूषण वृत्तपत्र नातेपुते पोलिस स्टेशन यांचेकडून मिळालेल्या माहितीनुसार      नातेपुते पोलीस ठाणे हद्दीमध्ये फिर्यादी यांच्या आकाश तानाजी बोडरे, राहणार नातेपुते, तालुका माळशिरस यांनी त्यांच्याकडील वापरते वाहन टाटा टिपर नंबर एम एच 11 सी एच 0551 या उभ्या असलेल्या वाहनाचे दोन टायर डिस्कसह किंमत 75,000/ रुपये खोलून कोणीतरी अज्ञात चोरट्याने ते चोरून नेले आहेत म्हणून वगैरे हकीगत वरून नातेपुते पोलीस ठाणे गुर नंबर 331/2025 बीएनएस कलम 303 (2) प्रमाणे गुन्हा दाखल होता.       सदर गुन्ह्यातील घडला प्रकाराबाबत वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली नातेपुते पोलीस ठाणे व उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय गुन्हे प्रकटीकरण पथक गुन्ह्यातील घटनास्थळाच्या आजूबाजूची सीसीटीव्ही पाहणी करून तसेच  सायबर शाखेकडील तांत्रिक माहितीचे विश्लेषण करून संशयित  आरोपीचा शोध घेतला असता संशयित आरोपी हा कडेगाव जिल्हा सांगली येथील नामे बुरान इलाही मुलाणी वय 40 वर्ष असे  असल्याबाबत खात्री झाली आणि त्यानंतर सदर आरोपीस सापळा लावून कडेगाव जिल्हा सांगली येथे...

शिवसेनेच्या सोलापूर जिल्हाप्रमुख पदी राजकुमार हिवरकर-पाटील

  उपसंपादक: वैभव आठवले साप्ताहिक बहुजन भूषण वृत्तपत्र शिवसेनेचे मुख्य नेते तथा महाराष्ट्र राज्याचे संवेदनशील उपमुख्यमंत्री मा.ना.एकनाथराव शिंदे साहेब यांच्या आदेशाने महाराष्ट्र राज्याचे रोजगार हमी पणन मंत्री भरत शेठ गोगावले यांच्या हस्ते व महाराष्ट्र प्रदेशचे ओबीसी विभागाचे प्रमुख रमेशजी बारसकर यांच्या उपस्थितीत मंत्रालय मुंबई येथे सोलापूर जिल्ह्याचे प्रमुख ओबीसी विभाग म्हणून श्री.राजकुमार लता शंकरराव हिवरकर-पाटील यांना निवडीचे पत्र देण्यात आले. आजवर शिवसेनेमध्ये पक्षाचे जडणघडणीमध्ये मोर्चे, आंदोलन, साडेनऊ हजार पेक्षा जास्त गरिबांची केलेली ऑपरेशन, सोलापूरच्या अक्कलकोटचे माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे साहेब यांच्या पक्षप्रवेशावेळी मुख्य नेत्यांच्या उपस्थितीत 12 बलुत्तरांचा पक्ष म्हणून ओबीसी विभाग निर्माण करण्यामागची मुख्य नेते यांची दूरदृष्टी सर्वांसमक्ष केलेल भाषण, राष्ट्रमाता जिजाऊ क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीच्या निमित्ताने 55 सायकलींच मोफत झालेल वाटप,  सवलतीच्या दरात  99000 माता-भगिनींना केलेली डाळ वाटप, सत्तावीस गावांना बचत गटाच्या माध्यमातून दिलेली ...