Skip to main content

मुख्याधिकारी यांचा मनमानी कारभार, नगरसेवक असून काय उपयोग, नगरसेवक नाराज

पुढील वर्षापासून ज्या वाहनांना १५ वर्षे झाली आहेत ती वाहने भंगारात हे वाहनधारकांसाठी दुःखद निर्णय

संपादक

     पुढील वर्षापासून ज्या वाहनांना १५ वर्षे पूर्ण झाले आहेत ती वाहने भंगारात काढावे, त्याचे नूतनीकरण करण्यात येणार नाही असा प्रस्ताव केंद्रीय रस्ते महामार्ग मंत्रालयाचा आहे. परंतु ज्या परिस्थितीतुन वाहने ज्या कुटुंबाने घेतली आहेत त्या कुटुंबाला आर्थिक तोटा मोठ्या प्रमाणात सहन करावा लागणार आहे. वाहन धारकांचे प्रचंड नुकसान होणार आहे ते कुटुंब उध्वस्त होणार आहे, अधोगतीकडे जाणार आहे याचा विचार केंद्र सरकारने केला पाहिजे. केंद्र सरकारने जनतेचा फायदा बघावा जनतेचा तोटा बघू नये. जनतेचा तोटा करून काय आनंद मिळणार आहे सरकार ला? जनतेने अच्छे दिन येतील म्हणून मतदान केले आहे सत्ता दिली. कुठे गेले ते अच्छे दिन? चांगले निर्णय का घेत नाही? वाईट निर्णयच का सुचतात? जुने वाहने सरकारनेच ताब्यात घेऊन त्याचा मोबदला द्यावा. ज्या प्रमाणे रस्ते करीत असताना त्या शेतकऱ्यांच्या जागा, जमिनी, घरे, दारे, झाडे-झुडपे यांचे नुकसानाबाबत त्या शेतकऱ्यांना मोबदला दिला जातो, नुकसान भरपाई दिली जाते. त्याच धर्तीवरती जुने वाहने केंद्र सरकारने ताब्यात घेऊन त्याचा मोबदला द्यावा, वाहनधारकाचे नुकसान करू नये. जुने वाहने भंगारात घालून वाहन धारकाचे प्रचंड वाटोळे होणार आहे. केंद्र सरकारने जुन्या वाहनाबाबत घेतलेला निर्णय मागे घेऊन त्या वाहनाचे नूतनीकरण करण्यासाठी आदेश काढावा. जुन्या वाहनापासून काय प्रदूषण होते? सरकारचे असलेले डिझेल, पेट्रोल यामधील भेसळयुक्त पदार्थ आहेत त्यापासून प्रदूषण होत आहे. यासाठी डिझेल, पेट्रोल मधील भेसळयुक्त पदार्थ बंद करावेत स्वच्छ डिझेल, पेट्रोल वाहन धारकांना द्यावे अशी सुधारणा करावी जेणेकरून प्रदूषण होणार नाही याकडे सरकारने लक्ष द्यावे. जुनी वाहने भंगारात काढून वाहन धारकाचे नुकसान तोटा करू नये या निर्णयाबाबत वाहनधारकाने आंदोलने करावीत. जुनी वाहने सरकारने ताब्यात घेऊन नवीन वाहने वाहन धारकांना सरकारने द्यावेत. जनतेचे हित सरकारने बघावे, जनतेचे वाटोळे बघू नये. वाहनधारकांनी जुनी वाहने हळदी कुंकू लावून पूजत बसावे का? परिस्थितीनुसार गोर गरिबांनी वाहने घेतली आहेत त्यांच्यावरती ही सरकारचे संकट. सरकारला चांगले निर्णय का दिसत नाहीत? वाटोळेचे निर्णय का घ्यावे वाटतात? वाहनांच्या स्पेअर पार्टमुळे प्रदूषण होत नाही. सरकारच्या भेसळयुक्त इंधनामुळे प्रदूषण वाढत आहे त्यासाठी उपाय शोधावा. स्पेअर पार्टमुळे प्रदूषण वाढत नाही हे लक्षात घ्यावे. इंधनामधील चुका शोधाव्या. जुनी वाहने भंगारात काढता त्याचे नूतनीकरून करण्यासाठी आदेश जारी करावा त्यामुळे वाहनधारक आनंदी होतील त्यांना दुःख वेदना होणार नाहीत इतकेच.

 

जनहितार्थ

अधिक जाहिरातीसाठी संपर्क

संपादक : मा. श्री. डॉ. अभिमन्यु बी. आठवले

९४२०३०२५६१

उपसंपादक : वैभव अ. आठवले

साप्ताहिक बहुजन भूषण, साप्ताहिक बहुजन मित्र वृत्तपत्र

बहुजन राष्ट्रशक्ति सामाजिक संघटना महाराष्ट्र राज्य

आठवले परिवार

 

Comments

Popular posts from this blog

नातेपुते पोलीस ठाण्याची धडक कामगिरी 6,200 रुपये हिसकून घेऊन जाणाऱ्या चोरांना आपले ताब्यातील थार वाहनांसह केली अटक

उपसंपादक: वैभव आठवले साप्ताहिक बहुजन भूषण वृत्तपत्र नातेपुते पोलिस स्टेशन यांचेकडून मिळालेल्या माहितीनुसार           नातेपुते पोलीस ठाणे हद्दीमध्ये फिर्यादी यांच्या दीपक जनार्दन चव्हाण, राहणार मोराची, तालुका माळशिरस, जिल्हा सोलापूर हे फलटण-पंढरपूर रोडवरील इंडीयन ऑईल कंपनीचा सुळ पेंट्रोल पंप येथे दि.01/10/2025 रोजी दुपारी 03.50 वा. सुमारास इंडीयन ऑईल कंपनीचा सुळ पेंट्रोल पंप येथे डिझेल टाकण्याचे काम करित असताना एक राखाडी रंगाची थार गाडी नं MH06CG5558 अशी डिझेल भरण्याकरीता आली व त्यातील ड्रायव्हर शेजारी बसलेल्या अनोळखी इसमाने गाडीत 4000 रुपयचे डिझेल भरायचे आहे व 6200 रु आम्हाला रोख पैशाची गरज आहे मी तुम्हाला माझे फोन पे वरून 10200 रु ऑनलाईन पाठवतो असे म्हणाल्याने मी गाडीचे डिझेलचे झाकन उघडण्यास गेलो असता पाठीमागे बसलेला अनोळखी इसम म्हणाला की, आम्हाला डिझेल नको 6200 रु रोख द्या अशी विनंती केली. त्यावेळी मी माझे खिश्यातील डिझेल विक्रीचे जमा झालेले पैसे खिश्यातुन काढुन 6200 रु मोजले त्यामध्ये 500 रु दराच्या 12 व 100 रु दराच्या 02 असे 6200 रु बाजुला काढले व बाकी ...

नातेपुते पोलीस ठाण्याची धडक कामगिरी उभ्या असलेल्या वाहनाची टायर चोरणाऱ्या अट्टल चोरास अटक व चोरीस गेलेला 100% मुद्देमाल सह 2,04,000/ किमतीचा मुद्देमाल जप्त

उपसंपादक: वैभव आठवले साप्ताहिक बहुजन भूषण वृत्तपत्र नातेपुते पोलिस स्टेशन यांचेकडून मिळालेल्या माहितीनुसार      नातेपुते पोलीस ठाणे हद्दीमध्ये फिर्यादी यांच्या आकाश तानाजी बोडरे, राहणार नातेपुते, तालुका माळशिरस यांनी त्यांच्याकडील वापरते वाहन टाटा टिपर नंबर एम एच 11 सी एच 0551 या उभ्या असलेल्या वाहनाचे दोन टायर डिस्कसह किंमत 75,000/ रुपये खोलून कोणीतरी अज्ञात चोरट्याने ते चोरून नेले आहेत म्हणून वगैरे हकीगत वरून नातेपुते पोलीस ठाणे गुर नंबर 331/2025 बीएनएस कलम 303 (2) प्रमाणे गुन्हा दाखल होता.       सदर गुन्ह्यातील घडला प्रकाराबाबत वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली नातेपुते पोलीस ठाणे व उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय गुन्हे प्रकटीकरण पथक गुन्ह्यातील घटनास्थळाच्या आजूबाजूची सीसीटीव्ही पाहणी करून तसेच  सायबर शाखेकडील तांत्रिक माहितीचे विश्लेषण करून संशयित  आरोपीचा शोध घेतला असता संशयित आरोपी हा कडेगाव जिल्हा सांगली येथील नामे बुरान इलाही मुलाणी वय 40 वर्ष असे  असल्याबाबत खात्री झाली आणि त्यानंतर सदर आरोपीस सापळा लावून कडेगाव जिल्हा सांगली येथे...

अवैधरित्या देशी बनावटीचा गावठी कट्टा बाळगणा-या इसमास अटक अकलूज उपविभागीय गुन्हे प्रकटीकरण पथकाची विशेष कामगिरी

  उपसंपादक: वैभव आठवले साप्ताहिक बहुजन भूषण वृत्तपत्र नातेपुते पोलिस स्टेशन यांचेकडून मिळालेल्या माहितीनुसार      नातेपुते पोलीस ठाणे हददीमध्ये पुणे पंढरपुर रोडलगत मौजे मांडवे ता माळशिरस येथे असलेल्या अहिल्याचौक येथे गुप्त बातमीदारा मार्फत मिळालेल्या गुप्त माहितीनुसार, अनिकेत महादेव पडसळकर, रा. खंडाळी, ता. माळशिरस हा व्यक्ती स्वतः जवळ अवैधरीत्या विनापरवाना गावठी पिस्तूल कमरेला बाळगून फिरत असल्याचे समजले. सदर माहितीच्या आधारे उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय, अकलूज विभागाच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने तात्काळ कारवाई केली. दिनांक २०/०९/२०२५ रोजी पहाटे ०३.२५ वाजता मौजे मांडवे, येथील अहील्या चौक ता. माळशिरस येथे सदर इसमास पकडण्यात आले. सदर आरोपीचे अंगझडती तपासणी दरम्यान आरोपीकडून देशी बनावटीचे गावठी पिस्तूल जप्त करण्यात आले आहे. त्यानंतर सदर घडले प्रकाराबाबत नातेपुते पोलीस ठाणेकडील पोना/५६२ राकेश माणिक लोहार यांचे फिर्यादीवरून नातेपुते पोलीस ठाणेस गुरनं ३२९/२०२५ शस्त्र अधिनियम कायदा कलम ३,२५ प्रमाणे दिनांक २०/०९/२०२५ रोजी गुन्हा दाखल केला असुन सदर गुन्हयाचा पुढील तपास पोहे...