Skip to main content

नातेपुते पोलीसांची उल्लेखनिय कामगिरी खुनाच्या गुन्ह्यातील मुख्य आरोपीस 24 तासाच्या आत केले जेरबंद

पुढील वर्षापासून ज्या वाहनांना १५ वर्षे झाली आहेत ती वाहने भंगारात हे वाहनधारकांसाठी दुःखद निर्णय

संपादक

     पुढील वर्षापासून ज्या वाहनांना १५ वर्षे पूर्ण झाले आहेत ती वाहने भंगारात काढावे, त्याचे नूतनीकरण करण्यात येणार नाही असा प्रस्ताव केंद्रीय रस्ते महामार्ग मंत्रालयाचा आहे. परंतु ज्या परिस्थितीतुन वाहने ज्या कुटुंबाने घेतली आहेत त्या कुटुंबाला आर्थिक तोटा मोठ्या प्रमाणात सहन करावा लागणार आहे. वाहन धारकांचे प्रचंड नुकसान होणार आहे ते कुटुंब उध्वस्त होणार आहे, अधोगतीकडे जाणार आहे याचा विचार केंद्र सरकारने केला पाहिजे. केंद्र सरकारने जनतेचा फायदा बघावा जनतेचा तोटा बघू नये. जनतेचा तोटा करून काय आनंद मिळणार आहे सरकार ला? जनतेने अच्छे दिन येतील म्हणून मतदान केले आहे सत्ता दिली. कुठे गेले ते अच्छे दिन? चांगले निर्णय का घेत नाही? वाईट निर्णयच का सुचतात? जुने वाहने सरकारनेच ताब्यात घेऊन त्याचा मोबदला द्यावा. ज्या प्रमाणे रस्ते करीत असताना त्या शेतकऱ्यांच्या जागा, जमिनी, घरे, दारे, झाडे-झुडपे यांचे नुकसानाबाबत त्या शेतकऱ्यांना मोबदला दिला जातो, नुकसान भरपाई दिली जाते. त्याच धर्तीवरती जुने वाहने केंद्र सरकारने ताब्यात घेऊन त्याचा मोबदला द्यावा, वाहनधारकाचे नुकसान करू नये. जुने वाहने भंगारात घालून वाहन धारकाचे प्रचंड वाटोळे होणार आहे. केंद्र सरकारने जुन्या वाहनाबाबत घेतलेला निर्णय मागे घेऊन त्या वाहनाचे नूतनीकरण करण्यासाठी आदेश काढावा. जुन्या वाहनापासून काय प्रदूषण होते? सरकारचे असलेले डिझेल, पेट्रोल यामधील भेसळयुक्त पदार्थ आहेत त्यापासून प्रदूषण होत आहे. यासाठी डिझेल, पेट्रोल मधील भेसळयुक्त पदार्थ बंद करावेत स्वच्छ डिझेल, पेट्रोल वाहन धारकांना द्यावे अशी सुधारणा करावी जेणेकरून प्रदूषण होणार नाही याकडे सरकारने लक्ष द्यावे. जुनी वाहने भंगारात काढून वाहन धारकाचे नुकसान तोटा करू नये या निर्णयाबाबत वाहनधारकाने आंदोलने करावीत. जुनी वाहने सरकारने ताब्यात घेऊन नवीन वाहने वाहन धारकांना सरकारने द्यावेत. जनतेचे हित सरकारने बघावे, जनतेचे वाटोळे बघू नये. वाहनधारकांनी जुनी वाहने हळदी कुंकू लावून पूजत बसावे का? परिस्थितीनुसार गोर गरिबांनी वाहने घेतली आहेत त्यांच्यावरती ही सरकारचे संकट. सरकारला चांगले निर्णय का दिसत नाहीत? वाटोळेचे निर्णय का घ्यावे वाटतात? वाहनांच्या स्पेअर पार्टमुळे प्रदूषण होत नाही. सरकारच्या भेसळयुक्त इंधनामुळे प्रदूषण वाढत आहे त्यासाठी उपाय शोधावा. स्पेअर पार्टमुळे प्रदूषण वाढत नाही हे लक्षात घ्यावे. इंधनामधील चुका शोधाव्या. जुनी वाहने भंगारात काढता त्याचे नूतनीकरून करण्यासाठी आदेश जारी करावा त्यामुळे वाहनधारक आनंदी होतील त्यांना दुःख वेदना होणार नाहीत इतकेच.

 

जनहितार्थ

अधिक जाहिरातीसाठी संपर्क

संपादक : मा. श्री. डॉ. अभिमन्यु बी. आठवले

९४२०३०२५६१

उपसंपादक : वैभव अ. आठवले

साप्ताहिक बहुजन भूषण, साप्ताहिक बहुजन मित्र वृत्तपत्र

बहुजन राष्ट्रशक्ति सामाजिक संघटना महाराष्ट्र राज्य

आठवले परिवार

 

Comments

Popular posts from this blog

नातेपुते पोलीस ठाणेकडील गुन्हे प्रकटीकरण शाखेची आदर्श कामगिरी चंदन चोरी करणा-या आरोपीस २४ तासात केले जेरबंद

  उपसंपादक: वैभव आठवले साप्ताहिक बहुजन भूषण वृत्तपत्र नातेपुते पोलिस स्टेशन यांचेकडून मिळालेल्या माहितीनुसार      नातेपुते पोलीस ठाणे हददीमध्ये मौजे मांडवे, ता.माळशिरस येथे राजन सुकुमार दोशी यांचे शेतातील दिनांक २६/०६/२०२५ रोजी सकाळी ०८/०० वा ते सायंकाळी ०५/००वा. चे दरम्यान शेतातील बांधावरील १० वर्षे वयाची ०२ चंदनाची झाडे अंदाजे किंमत २७,०००/- रू चे कोणीतरी अज्ञात चोरटयाने चोरून नेली आहेत त्याबाबत फिर्यादी नामे राजन सुकुमार दोशी रा.नातेपुते, ता.माळशिरस, जि.सोलापुर यांचे फिर्यादीवरुन नातेपुते पोलीस ठाणेस गु.र.नं. २३७/२०२५ भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ३०३ (२) प्रमाणे दिनांक २६/०६/२०२५ रोजी गुन्हा दाखल झाला होता. सदर गुन्हयाचा तपास पोहेकॉ/१७०८ विकास बाबर हे करीत होते.      नातेपुते पोलीस ठाणेचे गुन्हे प्रकटीकरण शाखेचे अंमलदार यांनी सदर गुन्हयाचा तपास दरम्यान मिळालेल्या गोपनिय बातमीव्दारे माहीती काढून इसम नामे १) गोविंद दुर्याधन काळे २) मेघराज ज्ञानदेव भोसले दोघे रा माळशिरस यांनी गुन्हा केल्याचे निष्पन्न झाल्याने त्यास पोहकॉ/१७०८ बाबर व गुन्हे प्रकटीक...

नातेपुते पोलीस ठाणेकडून जबरी चोरी करणा-या आरोपीस २४ तासाच्या आत केले जेरबंद

उपसंपादक: वैभव आठवले (साप्ताहिक बहुजन भूषण वृत्तपत्र) नातेपुते पोलीस ठाणे यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार      नातेपुते पोलीस ठाणे हददीमध्ये मौजे नातेपुते, ता.माळशिरस येथे दिनांक ०३/०४/२०२५ रोजी सायकाळी ०७.३० वा सुमारास गुन्ह्यातील फिर्यादी नामे वैभव विठ्ठल नष्टे वय ३१ वर्षे, रा. माळशिरस ता. माळशिरस जि. सोलापुर व सोबत त्यांची आई माया नष्टे असे त्यांचेकडील स्कुटी गाडी क्र. एम.एच. ४५ ए.व्ही. १२६१ यावरुन नातेपुते परिसरात शिंगणापुर पाटी ते बायपास रोड मार्गे नातेपुते फडतरी जाणारे बायपास रोडवर आले असताना दोन अज्ञात इसमांनी त्यांचे पाठीमागुन येऊन फिर्यादीचे आई माया विठल नष्टे याचे गळयातील सोन्याचे दागीने बळजबरीने काढुन घेऊन मोटार सायकल वरुन पळुन गेल्याने त्याबाबत फिर्यादी नामे वैभव विठ्ठल नष्टे वय ३१ वर्षे रा. माळशिरस ता. माळशिरस जि. सोलापुर यांचे फिर्यादीवरुन नातेपुते पोलीस ठाणेस गुरनं १३३/२०२५ भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ३०९ (४), ३ (५) प्रमाणे दिनांक ०८/०४/२०२५ रोजी १८ वा ३९ मि. गुन्हा दाखल झाला होता. सदर गुन्हयाचा तपास गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोना/५६२ राकेश लोहार करीत ...

अतुल कुलकर्णी साहेब पोलीस अधीक्षक, सोलापूर ग्रामीण यांच्या संकल्पनेतून धर्मतुरी, ता.माळशिरस रोडलगत वृक्षारोपण

  उपसंपादक: वैभव आठवले साप्ताहिक बहुजन भूषण वृत्तपत्र नातेपुते पोलिस स्टेशन यांचेकडून मिळालेल्या माहितीनुसार       दिनांक 26/06/2025 रोजी मा. श्री. अतुल कुलकर्णी साहेब पोलीस अधीक्षक ,सोलापूर ग्रामीण यांच्या संकल्पनेतून  व मा. उपविभागीय पोलीस अधिकारी श्री नारायण शिरगावकर उपविभाग माळशिरस यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू करण्यात आलेल्या हरित वारी सन 2025 उपक्रमांतर्गत  नातेपुते पोलीस  ठाणे हद्दीतील  मौजे धर्मपुरी येथे  पालखी मार्गवर हरितवारी अनुषंगाने, माननीय पोलीस अधीक्षक श्री अतुल कुलकर्णी साहेब, यांच्या हस्ते रोडलगत वृक्षारोपण करण्यात आले.       सदर ठिकाणी वृक्षारोपण करिता गावातील सरपंच,शेतकरी व गावातील प्रतिष्ठित नागरिक तसेच  पोलीस पाटील, पोलीस मित्र, ग्राम सुरक्षा दल यांच्या उपस्थितीत हरित वारी उपक्रम संपन्न झाला आहे. बातमी अधिक जाहिरातीसाठी संपर्क संपादक : मा.श्री. डॉ. अभिमन्यु बी. आठवले ९४२०३०२५६१ उपसंपादक : वैभव अ. आठवले साप्ताहिक बहुजन भूषण ,  साप्ताहिक बहुजन मित्र वृत्तपत्र संस्थापक :  बहुजन राष्ट्रशक्ति साम...