Skip to main content

नातेपुते पोलिसांची आदर्श कामगिरी

सरकारला लॉकडाऊनचा निर्णय घेण्यासाठी जनता जबाबदार

संपादक

गेल्या वर्षभरापासून देशात कोरोना कोव्हिड-१९ या रोगामुळे देशात लॉकडाऊन केले गेले. संचारबंदी, जमावबंदी केली गेली परंतु याकडे जनतेने दुर्लक्ष केले. बेफिकीरपणा, अहंपणा जनतेचा दिसून आला. शासन वेळोवेळी नियमाचे पालन करा अशा सूचना देऊन सुद्धा जनता त्याचा विचार करत नाही. मास्क वापरणे, सॅनिटायझर चा वापर करणे, अंतर ठेवणे हे जनतेच्या हातातील उपाय आहेत त्या उपायाला जनता बगल देत आहे मग सरकारने काय करावे? जनता जाणून बुजून शासनाच्या नियमाचे भंग करीत आहे त्यामुळे सरकारला लॉकडाऊन करणे भाग पडत आहे. लॉकडाऊन हाच एकमेव पर्याय आहे. प्रत्येक व्यक्तीने या कोरोना कोव्हिड-१९ या रोगाच्या अपत्य काळात स्वतःचे, कुटुंबाचे इतरांचे संरक्षण केले पाहिजे. जनतेच्या वागण्यामुळे शासनाला लॉकडाऊन हा पर्याय निवडावा लागत आहे. देश २०१४ पासून बरबादीकडे गेला आहे. शेतकरी उध्वस्त झाला आहे, शेतकऱ्याच्या मालाला भाव नाही, कंपन्या बंद पडल्या आहेत, युवकांच्या हाताला काम नाही, शिक्षणाच्या बारा वाजल्या आहेत. मुलामुलींच्या लग्नाचा प्रश्न उभा आहे. जगणे अवघड झाले आहे, मरण डोळ्यासमोर उभे आहे. सरकार चालवणारे मात्र कारभारी मजेत आहेत. झेड सुरक्षा अवतीभवती ठेऊन अगदी सरकार जगाच्या पाठीवर फिरून आनंद लुटत आहे. अच्छे दिनाचे गाजर दावले जनता भुलली सत्ता दिली त्याच सरकारने जनतेचा विश्वासघात केला असे सहन करीत असताना लॉकडाऊन करण्यासाठी जनताच जबाबदार ठरत आहे. सध्या नियमाचे पालन जनता करीत नाही. लॉकडाऊनमध्ये जनतेच्या हलगर्जीपणामुळे पोलिसांना कारवाई करावी लागत आहे. त्यामध्ये पोलीस बांधवांकडून जनतेवर अन्याय होत आहे तो म्हणजे हॉर्न आहे का? लायसन्स आहे का? लाईट आहे का? हवा कमी का? टायर नवीन का टाकले नाहीत? पेट्रोल, डिझेल भरपूर का नाही? आरसा का नाही? मास्क का नाही? या पद्धतीने पोलीस बांधव जनतेला वेठीस धरत आहेत हे जनतेमुळे. जोपर्यंत जनता भयानक कोरोना कोव्हिड-१९ या रोगाच्या काळात काळजी घेत नाही तोपर्यंत असे निर्णय सरकारला घेणे बंधनकारक आहे. सध्या या दुसऱ्या लाटेत मृत्यू होण्याचे प्रमाण प्रचंड आहे. जाळण्यासाठी स्मशानभूमीची जागा कमी पडत आहे. सरपण कमी पडत आहे हि भयानक परिस्थिती आहे. सन २०१४ पासून या देशावर संकटावर संकटे येत आहेत. सरकार हे अपशकुनी आहे काय? असे चित्र दिसत आहे. जनतेवर देशावर राज्यकर्त्यांची मनमानी त्यामध्ये कोरोना या रोगाच अपत्याचा काळ त्यामध्ये जनतेचा मीपणा बघायला मिळत आहे. मिळालेले जीवन तरी नियमाच्या चौकटीत राहून जगावे हि प्रत्येक नागरिकांची जबाबदारी आहे. त्यामध्ये सरकारला दोषी ठरवण्यात अर्थ नाही. जबाबदारी जनतेची पण आहे. देशाच्या सीमेवर शेतकरी आंदोलन करीत आहेत त्या शेतकऱ्याकडे देशाच्या सरकारला बघायला वेळ नाही परंतु इतर राज्यात लागलेल्या निवडणुकीत प्रचार करण्यासाठी देशाच्या सरकारला वेळ आहे.  ही चीड आणणारी भयानक परिस्थिती आहे. त्यामुळे जनतेने या रोगाच्या आपत्तीत स्वतःचे, कुटुंबाचे इतरांचे बरेवाईट होऊ नये यासाठी खबरदारी घ्यावी. विरोधकांना राजकारण महत्वाचे वाटत आहे. परंतु आपत्ती काळात जनतेसाठी सर्वानी एकसंघपणे या संकटावर मात करण्यासाठी यावे इतकेच.

जनहितार्थ

अधिक जाहिरातीसाठी संपर्क

संपादक : मा. श्री. डॉ. अभिमन्यु बी. आठवले

९४२०३०२५६१

उपसंपादक : वैभव अ. आठवले

साप्ताहिक बहुजन भूषण, साप्ताहिक बहुजन मित्र वृत्तपत्र

बहुजन राष्ट्रशक्ति सामाजिक संघटना महाराष्ट्र राज्य

आठवले परिवार

 

Comments

Popular posts from this blog

नातेपुते पोलीस ठाणेकडील गुन्हे प्रकटीकरण शाखेची आदर्श कामगिरी चंदन चोरी करणा-या आरोपीस २४ तासात केले जेरबंद

  उपसंपादक: वैभव आठवले साप्ताहिक बहुजन भूषण वृत्तपत्र नातेपुते पोलिस स्टेशन यांचेकडून मिळालेल्या माहितीनुसार      नातेपुते पोलीस ठाणे हददीमध्ये मौजे मांडवे, ता.माळशिरस येथे राजन सुकुमार दोशी यांचे शेतातील दिनांक २६/०६/२०२५ रोजी सकाळी ०८/०० वा ते सायंकाळी ०५/००वा. चे दरम्यान शेतातील बांधावरील १० वर्षे वयाची ०२ चंदनाची झाडे अंदाजे किंमत २७,०००/- रू चे कोणीतरी अज्ञात चोरटयाने चोरून नेली आहेत त्याबाबत फिर्यादी नामे राजन सुकुमार दोशी रा.नातेपुते, ता.माळशिरस, जि.सोलापुर यांचे फिर्यादीवरुन नातेपुते पोलीस ठाणेस गु.र.नं. २३७/२०२५ भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ३०३ (२) प्रमाणे दिनांक २६/०६/२०२५ रोजी गुन्हा दाखल झाला होता. सदर गुन्हयाचा तपास पोहेकॉ/१७०८ विकास बाबर हे करीत होते.      नातेपुते पोलीस ठाणेचे गुन्हे प्रकटीकरण शाखेचे अंमलदार यांनी सदर गुन्हयाचा तपास दरम्यान मिळालेल्या गोपनिय बातमीव्दारे माहीती काढून इसम नामे १) गोविंद दुर्याधन काळे २) मेघराज ज्ञानदेव भोसले दोघे रा माळशिरस यांनी गुन्हा केल्याचे निष्पन्न झाल्याने त्यास पोहकॉ/१७०८ बाबर व गुन्हे प्रकटीक...

अतुल कुलकर्णी साहेब पोलीस अधीक्षक, सोलापूर ग्रामीण यांच्या संकल्पनेतून धर्मतुरी, ता.माळशिरस रोडलगत वृक्षारोपण

  उपसंपादक: वैभव आठवले साप्ताहिक बहुजन भूषण वृत्तपत्र नातेपुते पोलिस स्टेशन यांचेकडून मिळालेल्या माहितीनुसार       दिनांक 26/06/2025 रोजी मा. श्री. अतुल कुलकर्णी साहेब पोलीस अधीक्षक ,सोलापूर ग्रामीण यांच्या संकल्पनेतून  व मा. उपविभागीय पोलीस अधिकारी श्री नारायण शिरगावकर उपविभाग माळशिरस यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू करण्यात आलेल्या हरित वारी सन 2025 उपक्रमांतर्गत  नातेपुते पोलीस  ठाणे हद्दीतील  मौजे धर्मपुरी येथे  पालखी मार्गवर हरितवारी अनुषंगाने, माननीय पोलीस अधीक्षक श्री अतुल कुलकर्णी साहेब, यांच्या हस्ते रोडलगत वृक्षारोपण करण्यात आले.       सदर ठिकाणी वृक्षारोपण करिता गावातील सरपंच,शेतकरी व गावातील प्रतिष्ठित नागरिक तसेच  पोलीस पाटील, पोलीस मित्र, ग्राम सुरक्षा दल यांच्या उपस्थितीत हरित वारी उपक्रम संपन्न झाला आहे. बातमी अधिक जाहिरातीसाठी संपर्क संपादक : मा.श्री. डॉ. अभिमन्यु बी. आठवले ९४२०३०२५६१ उपसंपादक : वैभव अ. आठवले साप्ताहिक बहुजन भूषण ,  साप्ताहिक बहुजन मित्र वृत्तपत्र संस्थापक :  बहुजन राष्ट्रशक्ति साम...

नातेपुते पोलीस ठाण्याची धडक कामगिरी 6,200 रुपये हिसकून घेऊन जाणाऱ्या चोरांना आपले ताब्यातील थार वाहनांसह केली अटक

उपसंपादक: वैभव आठवले साप्ताहिक बहुजन भूषण वृत्तपत्र नातेपुते पोलिस स्टेशन यांचेकडून मिळालेल्या माहितीनुसार           नातेपुते पोलीस ठाणे हद्दीमध्ये फिर्यादी यांच्या दीपक जनार्दन चव्हाण, राहणार मोराची, तालुका माळशिरस, जिल्हा सोलापूर हे फलटण-पंढरपूर रोडवरील इंडीयन ऑईल कंपनीचा सुळ पेंट्रोल पंप येथे दि.01/10/2025 रोजी दुपारी 03.50 वा. सुमारास इंडीयन ऑईल कंपनीचा सुळ पेंट्रोल पंप येथे डिझेल टाकण्याचे काम करित असताना एक राखाडी रंगाची थार गाडी नं MH06CG5558 अशी डिझेल भरण्याकरीता आली व त्यातील ड्रायव्हर शेजारी बसलेल्या अनोळखी इसमाने गाडीत 4000 रुपयचे डिझेल भरायचे आहे व 6200 रु आम्हाला रोख पैशाची गरज आहे मी तुम्हाला माझे फोन पे वरून 10200 रु ऑनलाईन पाठवतो असे म्हणाल्याने मी गाडीचे डिझेलचे झाकन उघडण्यास गेलो असता पाठीमागे बसलेला अनोळखी इसम म्हणाला की, आम्हाला डिझेल नको 6200 रु रोख द्या अशी विनंती केली. त्यावेळी मी माझे खिश्यातील डिझेल विक्रीचे जमा झालेले पैसे खिश्यातुन काढुन 6200 रु मोजले त्यामध्ये 500 रु दराच्या 12 व 100 रु दराच्या 02 असे 6200 रु बाजुला काढले व बाकी ...