Skip to main content

Posts

नातेपुते पोलिसांची आदर्श कामगिरी

साप्ताहिक बहुजन भूषण या वृत्तपत्राचे तिसर्‍या वर्षात दमदार पदार्पण होत आहे

  वैभव आठवले  संपादक            साप्ताहिक बहुजन भूषण या वृत्तपत्राचे २९/०९/२०२० रोजी तिसर्‍या वर्षात दमदार पदार्पण होत आहे. सर्व व्यवसायधारक , सामाजिक , राजकीय , शिक्षणक्षेत्रातील तसेच विविध क्षेत्रातील व्यक्तींनी भरभरून प्रतिसाद दिला आहे , आशीर्वाद दिला आहे हे माझ्यासाठी बळ आहे. जे दिसेल तेच लिहणे हे माझ्या वृत्तपात्राचे ध्येय उद्दीष्ट आहे. कोरोना या काळात अंक काढणे अवघड झाले असल्यामुळे अंक काढला गेला नाही. परंतु सोशल मीडियाच्या माध्यमातून मी माझ्या विचाराची शिदोरी सोशल मीडिया मधून वाचकापर्यंत पोहचवण्यासाठी प्रयत्नशील राहिलो. कोरोना या रोगाचा काळ चालू आहे. हा रोग संपुष्टात येऊ हीच परमेश्वर चरणी प्रार्थना...! आपण आपली सामाजिक कामे , पक्षाकडून निवड , गणेश मंडळाच्या वतीने केलेली कामे अशा सर्व स्थरातील कार्यकर्त्यांनी “ ना नफा ना तोटा” यावरती आधारित आपले काम माझ्या वृत्तपत्रातून देवून प्रसिद्धी करणार आहे. आपण आपले लेख , विचार , कविता , भ्रष्टाचार इ. विषयावर लेखन करून तसेच आपल्या व्यवसायाच्या जाहिराती देवून सहकार्य करावे. दिव...

“कोरोना काही जाईना संकट काही टळेना” भारत सरकारने या देशातील ज्या योजना सुरू आहेत त्या बंद करून त्या योजनेसाठी होणारा खर्च या देशातील जनतेसाठी वापरुन जनता जगवावी

  संपादक           कोरोना कोव्हिड-१९ या   रोगाची दिवसेंदिवस वाढ होत आहे यामुळे जनता हैराण झाली आहे. कसे जीवन जगावे असा प्रश्न जनतेसमोर उभा राहिला आहे. जिवंतपणी मरण यातना सोसाव्या लागत आहेत. त्यामध्ये सरकारचे लॉकडाऊन , संचारबंदी , जमावबंदी हे आदेश काय करावे जनतेने ? जनतेला जगवण्यासाठी सरकारची जबाबदारी दिसून येत नाही. केवळ ताप , थंडी , सर्दी , गर्दी , तापमान कमी जास्त होणे , अंग दुखणे , दमा , शुगर , बीपी इ. लक्षणे प्रत्येक माणसामध्ये दिसून येत आहेत. परंतु ही लक्षणे आढळली म्हणून त्या व्यक्तिला कोरोना या रोगाचा रुग्ण म्हणून क्वारंटाईन केले जाते ही चिंताजनक बाब आहे. भारत सरकारने या देशात विविध योजना राबवत आहेत. त्या योजना बंद करून त्या योजनेला येणारा खर्च तो जनतेसाठी प्रत्येक कुटुंबातील व्यक्तीप्रमाणे मानसी १०००/- रु. प्रमाणे त्यांना देऊन जगवावे त्यामुळे निदान जनता सुखी होईल. माणस मरत असतील तर त्या योजना बघणार कोण ? त्यामुळे भारत सरकारने जनतेचे हित पहावे. भारत सरकारने सर्व योजना बंद कराव्यात त्या निधिचा कोरोना या अपत्य काळा...

मा. श्री. अॅड. प्रकाशजी तथा बाळासाहेब आंबेडकर भारत देशातील जनतेसाठी “बापमाणूस” आहेत

मा. श्री. अॅड. प्रकाशजी तथा बाळासाहेब आंबेडकर   संपादक           घटनेचे शिल्पकार भारतरत्न परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू   मा. श्री. अॅड. प्रकाशजी तथा बाळासाहेब आंबेडकर म्हणजे या भारत देशातील जनतेसाठी सध्याचे “बापमाणूस” आहेत. स्वाभिमानी नेता , दिनदुबळ्यांचे कैवारी , प्रत्येक भारतीयांच्या हृदयात स्थान असलेले एकमेव नेते म्हणजे प्रकाशजी म्हणजे तथा बाळासाहेब आंबेडकर आहेत. रडण्यापेक्षा लढण्यात मजा असते. मागे लागून आमदार , खासदार होणे म्हणजे एक लाचारी असे साहेबांचे मत असते. साधी राहणी , उच्च विचार सरणी , कधी गर्व नाही असा सर्वांचा नेता आधार म्हणजे बापमाणूस प्रकाशजी तथा बाळासाहेब आंबेडकर. दिलेला शब्द पाळणारे “ना भय ना भीती” बाळगणारे असे श्रेष्ठ साहेब आहेत. माझा प्रत्यके जातीपातीचा , धर्माचा बांधव आज वंचित राहिला आहे त्यांना न्याय मिळत नाही , त्यांचावर अन्याय अत्याचार होतात म्हणून एक धाडसी , विद्वान , झुंजार नेते म्हणून ओळख असलेले मा. प्रकाशजी तथा बाळासाहेब आंबेडकर साहेबांनी वंचित बहुजन आघाडीची स्थापना करून वंचित आ...

श्री गणेश प्रतिष्ठान यांच्याकडून सौ. पदमन (वाडकर) मॅडम (आरोग्य सेविका) यांना “कोव्हिड योद्धा” सन्मानपत्र देऊन गौरवण्यात आले

संपादक           नातेपुते येथील श्री गणेश प्रतिष्ठान यांच्याकडून  सौ. पदमन मॅडम (आरोग्य सेविका) यांना “कोव्हिड योद्धा” सन्मानपत्र देऊन गौरवण्यात आले.   श्री गणेश प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष शेखर (दादा) अटक यांनी कोरोना या काळात अहोरात्र झटत असलेल्या आरोग्य सेविका यांचा सन्मान केला. यावेळी श्री गणेश प्रतिष्ठानचे अध्यक्ष मल्हारी गवळी , उपाध्यक्ष आदेश पवार , जयश्री अटक तसेच श्री गणेश प्रतिष्ठानचे सदस्य उपस्थित होते. *बातमी* *अधिक जाहिरातीसाठी संपर्क* संपादक : मा. श्री. डॉ. अभिमन्यु बी. आठवले ९४२०३०२५६१ उपसंपादक : वैभव अ. आठवले साप्ताहिक बहुजन भूषण , साप्ताहिक बहुजन मित्र वृत्तपत्र बहुजन राष्ट्रशक्ति सामाजिक संघटना महाराष्ट्र राज्य आठवले परिवार

साप्ताहिक बहुजन मित्र व साप्ताहिक बहुजन भूषण वृत्तपत्राचे संस्थापक संपादक मा. श्री. अभिमन्यु बी. आठवले यांना "कोरोना योद्धा" पुरस्काराने सन्मानित

मा. सौ. यशश्री प्रमोद पाटील संस्थापक अध्यक्ष महाराष्ट्र राज्य पोलिस पत्नी संघ यांचाकडून साप्ताहिक बहुजन मित्र व साप्ताहिक बहुजन भूषण वृत्तपत्राचे संपादक निर्भिड पत्रकार व तसेच संस्थापक बहुजन राष्ट्रशक्ति सामाजिक संघटना महाराष्ट्र राज्य श्री. अभिमन्यु बी. आठवले यांना “कोरोना योद्धा” पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. अधिक जाहिरातीसाठी संपर्क संपादक : मा. श्री. डॉ. अभिमन्यु बी. आठवले ९४२०३०२५६१ उपसंपादक : वैभव अ. आठवले साप्ताहिक बहुजन भूषण , साप्ताहिक बहुजन मित्र वृत्तपत्र बहुजन राष्ट्रशक्ति सामाजिक संघटना महाराष्ट्र राज्य आठवले परिवार  

जिल्हाधिकारी सोलापूर मिलिंद शंभरकर साहेब यांच्याकडे कोरोना या रोगाच्या रुग्णावर उपचार करण्यासाठी नातेपुते येथे कोव्हिड उपचार केंद्र सुरू करावे यासाठी सोलापूर जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष मा. श्री. बाबाराजे (दादा) देशमुख यांची मागणी

मा. श्री. बाबाराजे (दादा) देशमुख  संपादक           कोरोना कोव्हिड -१९ या रोगाचे शहर , गाव , वाडी , वस्ती , वार्ड , गल्ली मध्ये कोरोना या रोगाची मोठ्या प्रमाणात लागण होत असून नातेपुते हे गाव बाजारपेठेचे असून या गावाला जोडून असंख्य गावे आहेत. या ग्रामीण भागातील गावात कोरोना या रोगाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात या भागात सापडत असून या रूग्णाला बाहेर न जाता नातेपुते येथेच कोव्हिड उपचार केंद्र सुरू केले तर रुग्णाची गैरसोय होणार नाही. आता पर्यंत ग्रामस्थांच्या मदतीने दोन लाख रुपये खर्च तातडीने उभा केला आहे असे सोलापूर जिल्हा परिषदेचे माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष मा. श्री. बाबाराजे (दादा) देशमुख यांनी सांगितले आहे. त्वरित जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर साहेब यांनी   कोरोना कोव्हिड केंद्रास मान्यता देऊन रुग्णाचे होणारे हाल थांबवावे. तसेच नातेपुते येथे कोव्हिड सेंटर झाल्यास रूग्णाला याच ठिकाणी चांगले उपचार मिळतील. माळशिरस तालुक्यातील पूर्व भागात अकलूज , महाळूंग येथे उपचार केंद्र सुरू असून सोलापूर जिल्ह्याचे शेवटचे पश्चिम भागातील नातेपुते हे मो...

ज्या ग्रामपंचायतचा पाच वर्षाचा कालावधी संपला आहे त्यावरती सामाजिक कार्यकर्त्याची प्रशासक म्हणून नेमणूक करावी यासाठी शासनाने आदेशाचे परिपत्रक काढावे

संपादक           महाराष्ट्र राज्यातील ज्या ग्रामपंचायतचा पाच वर्षाचा कालावधी संपला आहे. सध्याच्या या कोरोना कोव्हिड-१९ या रोगाच्या काळात ग्रामपंचायत निवडणुका घेणे योग्य नाही असे शासनाचे मत आहे त्यामुळे त्याच गावातील स्वच्छ , पारदर्शी , उच्चशिक्षण , एक आदर्श सामाजिक कार्यकर्ता असे असलेला त्याच गावातील ग्रामपंचायतीवर प्रशासक म्हणून त्या सामाजिक कार्यकर्त्याची नेमणूक करण्यात यावी. यामध्ये जिल्हा परिषदेच्या मुख्यकार्यकारी अधिकारी यांनाच तो अधिकार असावा. त्यामध्ये राजकीय पुढार्‍यांचा हस्तक्षेप नको. प्रशासक नेमताना तो अडाणी , कमी शिकलेला , अवैध धंदे करणारा व गुन्हेगारी वृत्तीचा नसावा. त्यागावातील जनतेच्या अडीअडचणी सोडविणारा गावाचा विकास करणारा व त्या विकासाची माहिती असणारा असावा. ज्या ग्रामपंचायतचा पाच वर्षाचा कार्यकाळ संपला आहे त्यातील कोणत्याही सरपंच , उपसरपंच , सदस्य यांना अधिकार देऊ नयेत व प्रशासक म्हणून नियुक्ती करू नये असे वाटते. सामाजिक कार्यकर्त्याला प्रशासक म्हणून नेमण्यात यावे तसेच पोलिस पाटला सारखी परीक्षा प्रशासक पदासाठी घेण्या...