Skip to main content

Posts

नातेपुते पोलिसांची आदर्श कामगिरी

एक देश एक सिधापत्रिका (रेशनकार्ड) केंद्र सरकारच्या महत्वपूर्व निर्णयाचे स्वागत

  संपादक केंद्र सरकारने भारत देशातील जनतेसाठी एक देश एक सिधापत्रिका हा निर्णय जनतेच्या हिताच्या दृष्ठीने अत्यंत महत्वपूर्ण व योग्य आहे या निर्णयाचे मी स्वागत करतो. या निर्णयामुळे देशाचे नागरिक रहिवासी व सुपुत्र म्हणून वावरतील  व त्यांना देशातील राज्यात , जिल्ह्यात , तालुक्यात , गावात कोठेही रेशन दुकानातून त्या कुटुंबांना , त्या नागरिकांना जीवनावश्यक वस्तु , अन्नधान्य मिळेल. त्यामुळे कोणीही वंचित व परका म्हणून त्या कुटुंबांना संभोधनार नाही त्यांचा तो हक्क व अधिकार राहणार आहे त्यासाठी त्वरित अंमलबजावणी केंद्र सरकारने अंमलबजावणीकरावी व तसे आदेश जलद गतीने सर्व राज्यातील जिल्हाधिकारी यांना द्यावेत. या निर्णयामुळे खर्‍या अर्थाने संविधानाने त्या कुटुंबाला न्याय दिला असे होईल. सध्याच्या काळात आम्ही गावचे रहिवासी हे परक्या गावचे हा जो भेदभाव मोठ्या प्रमाणात जास्त करून ग्रामीण भागात दिसतो त्यामुळे त्या कुटुंबाला अपमान सहन करावा लागतो. मान खाली घालावी लागते तसेच विविध शासनाच्या योजना त्या कुटुंबाला मिळू नयेत यासाठी ग्रामीण भागातील काही निवडक मंडळी दुजाभाव करतात. त्यामुळे केंद्र सर...

मी जे लिहतो ते माझे स्वतंत्र विचार असतात व निर्भिडपणे मांडणे हे माझे कर्तव्य समजतो

मा. श्री. डॉ. अभिमन्यु बी. आठवले  संपादक           मी उच्च शिक्षण अत्यंत गरिबीतून घेतले. जवळपास ७०० लेखकांची पुस्तके , अनेक लेखकांचे लेख वाचले असून त्यामुळे मी अवांतर वाचन केले. त्यामुळे मला माझे विचार मवाळवादी असो वा जहालवादी त्यामध्ये परिवर्तनवादी , प्रबोधनवादी सामावलेले असतात. मी जे लिहतो त्यामध्ये कोणाचा द्वेष , मत्सर , टीका टिपणी , मतभेद असे काहीच नसते. पण मला एक चीड येत आहे की , खरे बोलणे , खरे लिहणे यावरती ०५/०३/२०१५ रोजी माझ्याच समाजातील काही मोजक्या समाजकंटकाने मी लिहलेल्या लेखावर आक्षेप घेऊन समाजात चुकीची माहिती पसरवून हल्ला केला. हल्ला केल्याने मी भीत नाही किंवा माझे विचार मेले नाहीत . हल्ल्यामुळे मी जोमाने सडेतोड विचार लिहण्यासाठी उलट मला बळ मिळाले. परंतु वाईट वाटते की , मी परिवर्तनवादी विचार मांडले होते त्यामध्ये गैर काही नव्हते असे असताना माझ्यावरती माझ्याच समाजाने हल्ला करावा ही चिंताजनक बाब आहे . त्यामुळे मी कधीही त्यांना माफ करणार नाही व कधीच चांगले म्हणणार नाही ही माझी भीम प्रतिज्ञा आहे असो. कोणावर काय लिहाय...

आत्महत्या करणारे पुरुष हे नामर्द पणाचे लक्षण ठरू शकते

संपादक           सध्याच्या काळात माणसावर अनेक संकटावर संकटे येत आहे त्यासाठी कुटुंबाला जगवण्यासाठी घरातील कर्ता पुरुष त्या अडचणी सोडवण्यासाठी एखाद्याकडून कर्ज घेणे , त्या कर्जाचा ताणतणाव येणे त्यामुळे व्यसनाच्या आहारी जाणे , कामधंदा न करता सतत इतरांकडून आर्थिक देवाण घेवाण करणे. पाणी अभावी शेती मध्ये काहीच करता न येणे , मुलामुलीचे लग्ने , शिक्षणाचा खर्च अशा विविध समस्या घरातील कर्ता पुरुष या नात्याने असतात पण हे कशामुळे तर स्वत: च्या आळशी पणामुळे काम धंदा न करता सतत दुसर्‍याकडून आर्थिक मदत घ्यायची आणि घर परपंचा चालवायचा हेच काम या पुरुषाचे असते. त्यामुळे घेतलेले पैसे देता येत नसल्यामुळे कुटुंबाला वेठीस धरायचे घरात सतत भांडणतंटे यामुळे तो माणूस आत्महत्या करायचा विचार करतो. मिळालेले जीवन अर्ध्यावर सोडून पत्नीचा , आई , वडील , भाऊ , भावजय , मुले , नातेवाईक यांचा विचार न करता जीवन संपवतो व आपण सुटलो. माझ्या मागे या कुटुंबाचे काही होवो न होवो याची मला काळजी नाही असे मनात आणून अनमोल जीवन संपवतो. परंतु जीवन संपवण्यापूर्वी जर विचार केला असत...

हेलमेट याच कंपनीचे वापरले पाहिजे यासाठी सरकारने मार्केटिंग करू नये व जनतेला वेठीस धरू नये

संपादक           सध्या सरकार हे जनतेसाठी आहे की जनतेवर अन्याय करण्यासाठीच आहे ? कोरोना कोव्हिड-१९ च्या काळात देश व जनता होरपळून निघत आहे आणि सरकारचे आदेश जनतेच्या हिताचे न राहता जनतेला वेठीस धरण्यासाठी आहेत अशी परिस्थिति निर्माण झाली आहे. जो नागरिक आहे त्यानुसार आपल्या परिस्थितीनुसार शासनाच्या आदेशाचे पालन व स्वत: च्या शरीराचे पालन करीत आहे. त्यामध्ये आता सरकारने BIS प्रमाणितच हेलमेट वापरणे पाहिजे असा आदेश काढला त्यामुळे जनतेमध्ये असंतोष पसरला आहे हा जनतेवर अन्याय आहे. कारण की या हेलमेटमुळे डोक्याला मार लागला तर हे हेलमेट डोक्याचे रक्षण करते हे झाले डोक्यापुरते अपघातामुळे हात पाय व इतर अवयव मोडू नये त्यासाठी कोणते हेलमेट वापरले पाहिजे त्यासाठी जनतेला सांगावे. जनतेने निवडून राज्यकर्ते बनवले हेच राज्यकर्ते जनतेवर आदेशावर आदेश काढून जनतेचा छळ करीत आहेत त्यासाठी सरकारने हेलमेट याच कंपनीचे वापरले गेले पाहिजे यासाठी मार्केटिंग चालू केले आहे व न वापरल्यास दंडात्मक कारवाई केली जाईल असे सरकार सांगत आहे. जनतेच्या अवयवाचे रक्षण करावे असे वाटत असेल त...

वृत्तपत्र चालवणे संपादकापुढे अडचण निर्माण झालेमुळे महाराष्ट्र सरकारने आर्थिक मदत करावी

संपादक           सध्या कोरोना कोव्हिड-१९ या रोगाने थैमान घातले असून देश व जनता यामध्ये भरडुन व व्याकुळ होत आहे. त्यामध्ये एक सामाजिक बांधिलकी म्हणून दैनिक , साप्ताहिक , मासिक , पाक्षिक , लहान , मोठे चॅनेल चालवणे संपादकापुढे मोठे आव्हान उभे राहिले आहे. शाई , कागद , वाहतूक , कर्मचारी इ. साठी भरमसाठ खर्च येत असल्यामुळे सध्या वृत्तपत्रे छापणे संपादकापुढे आर्थिक पैशाची अडचण येत आहे. तर वृत्तपत्रे छापण्यसाठी लागणारा पैसा यासाठी मित्रमंडळी , नातेवाईक किंवा इतरांकडून हात उसने पैसे घेऊन वृत्तपत्रे छापावे लागत आहेत. सध्या वृत्तपत्रांना जाहिराती मिळणे सुद्धा अवघड झाले आहे. पत्रकारिता हा लोकशाहीचा चौथा खांब आहे परंतु हा चौथा खांब मजबूत रहावा यासाठी वृत्तपत्रे चालवणे महत्वाचे आहे. परंतु संपादकापुढे आर्थिक पैशाची अडचण भासत आहे तर काही संपादकाने आपली वृत्तपत्रे पैशा अभावी छापणे बंद केले आहे. सर्व वृत्तपत्राचे संपादक असो वा चॅनेल चे संपादक असो त्यांना सरकारकडून आर्थिक पैशाच्या मदतीची गरज आहे. संपादक गुडघ्यावर आले आहेत , वृत्तपत्र छापणे व वितरीत क...

समाधान (भाऊ) भोसले म्हणजे माळशिरस तालुक्यातील लहान थोरांचे आशास्थान

मा. श्री. समाधान (भाऊ) भोसले संपादक             सिद्धार्थनगर , ता. माळशिरस जि. सोलापूर येथील सामाजिक कार्यकर्ते समाधान भोसले हे लहान थोरांचे आधारस्तंभ आहेत. ते असंख्य युवकांच्या गळ्यातील ताईत आहेत. माणूसपणा जपणे हाच छंद समाधान यांना आहे. कधी चांगल्या वाईट संकट समयी संभाळलेली माणसं त्यांच्याकडून चुका झाल्या तरी त्यांना मोठया मनाने माफ करतात. मोठा मनाचा हा युवक एक आदर्श सामाजिक कार्यकर्ता अशी ओळख निर्माण झाली आहे. असंख्य राजकीय पक्षाचे कार्यकर्ते , नेते समाधान भोसले यांना मान सन्मान देत आहेत. समाधान भोसले नावाचे मंच काढून सर्व समाजाला न्याय देण्याच्या उद्देशाने कार्यकर्त्यांनी मंच स्थापन केले आहे. एक जिवाभावाचा आपला लाडका भाऊ समाधान भोसले आहेत असे प्रत्येक युवकांना वाटत आहेत. प्रचंड लोकप्रियता असलेले समाधान भोसले सर्वांच्या आनंदात , दु:खात  सहभागी होताना दिसतात. त्यांच्याजवळ माणुसकीचा झरा आहे. मा. आयुष्मान समाधान (भाऊ) भोसले साहेब आज आपला वाढदिवस आहे. तुमचे सामाजिक कार्य जसा सूर्य कलेकलेने उगवतो व मोठा होऊन सर्वांना प्रकाश देतो...

कर्मयोगी रघुनाथ उराडे उर्फ बापू यांना आठवले परिवाराकडून भावपूर्ण श्रद्धांजली

          नातेपुते ता. माळशिरस , जि. सोलापूर येथील कर्मयोगी रघुनाथ (बापू ) उराडे यांची निधन वार्ता समजली खूप दु:ख झाले. बापूंचा प्रामाणिकपणा , सत्यपणा , सत्यवादी , मनमोकळेपणा निर्भिडपणे आपले विचार मांडत असत. साधी राहणी , उच्च विचारसरणी बापूंची होती. त्यांचे विचार परिवर्तनवादी व प्रबोधनवादी असत , रोखठोक न्यायाची बाजू घेऊनच न्याय देणारे असे बापू होते. बापूंचा हात माझ्या पाठीवर शब्बासकी देऊन गेला. बापूंच्या जाण्याने न भरून निघणारी पोकळी निर्माण झाली. बापू लहान थोरांचे आदर्श होते. त्यांच्या जाण्याने जो त्यांच्या कुटुंबावर आघात झाला तो आघात पचवण्याची ताकत परमेश्वराने त्यांच्या कुटुंबांना द्यावी. तसेच बापूंच्या आत्म्यास शांति लाभू ही ईश्वर चरणी प्रार्थना. त्यांच्या दु:खात माझा आठवले परिवार सामील होत आहे.