Skip to main content

Posts

Showing posts from November, 2022

मंत्रालय, विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, तहसील कार्यलयातील लोकशाही दिन म्हणजे “कागदी घोडे” नाचवले जातात ही चिंताजनक बाब

उपसंपादक : साप्ताहिक बहुजन भूषण वृत्तपत्र     लोकशाही दिन विभागीय आयुक्त मंत्रालय , जिल्हाधिकारी तहसील कार्यालयात साजरा होत आहे पण यामधून जनतेने दिलेल्या अर्जाचे “ना निवारण ना न्याय” होत नाही. या लोकशाही दिनात दिलेल्या अर्जानुसार त्या अर्जदाराला न्याय दिला पाहिजे. त्याचे निवारण केले गेले पाहिजे किंवा अडचण असल्यास अधिकारी यांनी अर्जदाराला मार्गदर्शन केले पाहिजे. लोकशाही दिन हा न्याय दिन झाला पाहिजे परंतु लोकशाही दिन जनतेसाठी “शाप दिन” ठरत आहे. लोकशाही दिनातील अर्जदाराच्या अर्जाला केराची टोपली दाखवली जाते. लोकशाही दिनात ज्या अधिकारी कार्यालयात अर्जदार अर्ज देतो व न्याय मिळेल अशी अपेक्षा ठेवतो परंतु ज्या अर्जदाराचे अर्ज ज्या त्या विषयानुसार आले असतात त्यानुसार त्या त्या विभागाचे अधिकारी यांच्याकडे त्या अर्जदाराचे अर्ज पाठवून कागदी “घोडे” नाचवून बनवाबनवी केली जाते. लोकशाही दिनातून त्या अर्जदाराला न्यायच मिळाला पाहिजे हा न्यायदिन सांगतो. लोकशाही दिनातील अर्ज हा एक प्रकारचा तक्रार ( FIR) असतो. त्यानुसार त्याची दखल घेवून त्या अर्जदाराचे समाधान व न्याय मिळाला पाहिजे. लोकशाही द...

गायरान जमिनीवर अतिक्रमणे नियमित केली गेली पाहिजेत त्या कुटुंबाला बेघर करू नये

उपसंपादक : साप्ताहिक बहुजन भूषण           सध्या गायरान जमिनीवर अतिक्रमणे काढण्यात येणार असल्यामुळे गोरगरीब कुटुंबावर अन्याय होणार आहे. शासनाने वेळोवेळी परिपत्रके काढून गावठाणामध्ये राहत असलेल्या कुटुंबाची घर जागा नियमित करण्यात यावी असे असंख्य परिपत्रके शासनाने काढलेली आहेत व लाखो कुटुंबाची घर जागा नियमित करून त्यांना शासनाच्या लोककल्याणकारी योजना देवून आधार दिला आहे. अतिक्रमणे ही गायरान जमिनी असो वा ग्रामपंचायत गावठाण असो. कुटुंबाच्या सदस्यानुसार ती जागा त्या कुटुंबाच्या नावावर करावी असे शासनाचे परिपत्रक सांगते. गायरान जमिनी त्या कुटुंबांनी मोठ्या प्रमाणात धरून त्या वहिवाट करून कब्जा केला आहे. त्याची मोजणी केली गेली पाहिजे व गरजेनुसार शासनाच्या परिपत्रकानुसार ती जागा देवून कायम करावी , त्यांना बेघर करू नये , उध्वस्त करू नये. महाराष्ट राज्यात मोठ्या प्रमाणात राजकीय पुढार्‍यांनी सत्तेचा दुरुपयोग करून शासनाच्या गायरानी जमिनी , गावठाण जागा बळकावून कब्जा केला आहे. त्याचप्रमाणे आजी - माजी ग्रामपंचायत मधील कारभारी , पंचायत समिति , जिल्हा परि...

अहिंसा सेवा समितीचे संस्थापक मा.श्री.अविनाशजी दोशी साहेब (नातेपुते नगरपंचायत, नगरसेवक) यांच्या सामाजिक कार्याची ओळख महाराष्ट्रभर

मा.श्री.अविनाशजी दोशी संस्थापक - अहिंसा सेवा समिती  नातेपुते नगरपंचायत नगरसेवक उपसंपादक : साप्ताहिक बहुजन भूषण           नातेपुते ता.माळशिरस , जि.सोलापूर येथील अहिंसा सेवा समितीचे संस्थापक मा.श्री.अविनाशजी दोशी नातेपुते नगरपंचायत नगरसेवक यांचे सामाजिक कार्य एक इतिहास बनत चालला आहे. अहिंसा सेवा समितीच्या माध्यमातून सामाजिक कार्य जोमाने व दिमाखदार चालू आहे. भुकेलेल्यांना अन्न , गरजूंना पाणी , अनाथांना पांघरून घेण्याइतपत कपडे , संकट काळात मदत , रोगराई काळात मदत , सर्वधर्म समभाव या नात्याने सर्व सामाजिक उपक्रमात सहभाग , वृक्षारोपण , व्यवसायभिमुख उपक्रम असे विविध उपक्रम राबवित आहेत. “अहिंसा “ याला समोर ठेवून आपले कर्तव्याचे पालन करीत आहेत. द्वेष , मत्सर , भेदभाव , निंदा , वाईट बोलणे याबाबत दक्षता घेवून आपली वाटचाल करीत आहेत. रागाला जवळ करती नाहीत. आदर द्या आदर घ्या ही भूमिका त्यांची अतिशय मौल्यवान ठरत आहे. माणुसकी कशी जपावी , मैत्री कशी करावी याचे ज्वेलंत उदाहरण म्हणजे अविनाश दोशी होय. सत्ता , संपत्तीचा कधी गर्व नाही , एक म...

शासनाच्या योजना गोरगरीब जनतेपर्यंत पोहोचवून त्याचा लाभ जनतेला मिळाला पाहिजे यासाठी बाळासाहेबाची शिवसेना (शिंदे गट) मा.श्री.राजकुमार शंकरराव हिवरकर पाटील माळशिरस तालुका अध्यक्ष यांची आदर्श कामगिरी

मा.श्री.राजकुमार शंकरराव हिवरकर पाटील माळशिरस तालुका अध्यक्ष बाळासाहेबाची शिवसेना (शिंदे गट) उपसंपादक : साप्ताहिक बहुजन भूषण           नातेपुते ता.माळशिरस , जि.सोलापूर येथील सामाजिक व राजकीय क्षेत्रात ठसा उमठविलेले मा.श्री.राजकुमार शंकरराव हिवरकर-पाटील बाळासाहेबांची शिवसेना(शिंदे गट) माळशिरस जि.सोलापूर यांनी शिवसेना तालुका अध्यक्ष पदाची जबाबदारी घेतले पासून विविध प्रश्नावर लक्ष देवून त्या सोडविण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. कर्तव्यदक्षपणे जबाबदारी पार पाडीत आहेत. जनतेच्या हिताचे प्रश्न मार्गी लावत आहेत. त्यांची कामगिरी आदर्श ठरत आहे. त्यांच्या कामगिरीचे कौतुक जनतेकडून होत आहे. पक्षाचे काम जोमाने करीत आहेत. पक्ष वाढीसाठी वेळ , पैसा खर्च करीत आहेत. शासनाच्या योजना जनतेपर्यंत पोहोचवण्याचे काम करीत आहेत. प्रधानमंत्री आयुष्मान भारत व महात्मा फुले जन आरोग्य योजना राबविण्यात यावी यासाठी मा.वैद्यकीय अधिक्षक ग्रामीण रुग्णालय नातेपुते , मुख्याधिकारी नगरपंचायत , नातेपुते , मा.जिल्हा समन्वयक डॉ.रवी भोपळे सोलापूर , तालुका वैद्यकीय अधिकारी माळशिरस यां...

वाखरी गावाला जोडणारे रस्ते तात्काळ दुरुस्त करून ग्रामस्थांचे हाल थांबवावे : वाखरी ग्रामसभेत ग्रामस्थांची मागणी

संपादक : पंढरपूर साप्ताहिक बहुजन भूषण मिळालेल्या माहितीनुसार - वाखरी ता.पंढरपूर जि.सोलापूर ग्रामपंचायत कार्यालय येथे विशेष ग्रामसभा बोलवण्यात आली होती. या ग्रामसभेत ग्रामस्थांनी मतदान ओळख पत्र आधारकार्ड सोबत लिंक करून घ्यावे असे आवाहन ग्रामपंचायतने केले. ही ग्रामसभा सरपंच धनश्री तानाजी साळुंखे यांचे अध्यक्षतेखाली संपन्न झाली. यावेळी ग्रामस्थांनी वाखरी ते कोर्टी , वाखरी ते शिंदेवस्ती या रस्त्याची दुरूस्ती करून ग्रामस्थांना होणारा त्रास थांबविण्यात यावा अशी मागणी केली गेली. वाखरी गावाला जे जोडले गेलेले रस्ते म्हणजे वाखरी ते कोर्टी रस्ता तसेच वाखरी ते शिरढोन रस्ता पुर्णपणे उखडला असून ग्रामस्थांचे प्रचंड हाल होत आहेत. तसेच वाखरी ते शिंदेवस्ती रस्त्याचा प्रश्न ग्रामपंचायत अस्तीत्वात आले तेव्हापासून ते आजतागायत मार्गी लागलेला नाही. त्यामुळे शिंदे वस्तीच्या ग्रामस्थांचे प्रचंड हाल होत आहेत. त्वरित रस्त्याची दुरूस्ती करून रस्ता बनवण्यात यावा. रस्त्याची अवस्था बिकट झाली आहे. या रस्त्यावरून येणे-जाणे अवघड झाले आहे. या रस्त्यावरून वयोवृद्ध , महिला , पुरुष , शाळकरी मुलांचे हाल होत आहेत त्या...

नामजपामुळे माणसं एकत्रित येण्याचे पवित्र काम : विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक-निंबाळकर

उपसंपादक : साप्ताहिक बहुजन भूषण           कारुंडे (लोंढेवस्ती) ता.माळशिरस , जि.सोलापूर येथे चैतन्य जप प्रकल्पाचे २२ वे राज्यस्तरीय शिबीर आयोजित केले होते. या नाम जपामुळे माणसं एकत्र येतात. व्यसनाच्या आहेरी गेलेली , बिघडलेली , जातीपातीत द्वेष, मत्सर, भेदभाव होत आहेत तो या नामजपामुळे नाहीसे होऊन आम्ही सारे बांधव आहोत हाच संदेश यामधून मिळतो आहे. नामजपाच्या माध्यमातून माणसे घडविण्याचे काम केले जाते. सामाजिक समतोल यामधून राखला जातो. संत ज्ञानेश्वर महाराज, ब्रम्हचैतन्य महाराज यांनी दिला आहे असे प्रतिपादन विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी केले. यावेळी परमपूज्य शिवानंद भारती महाराज, माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहते-पाटील, माजी जिल्हा परिषद सोलापूर उपाध्यक्ष बाबाराजे (दादा) देशमुख यांची प्रमुख उपस्थिती होती. या सोहळ्यानिमित्त ब्रम्हचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या प्रतिमेची हत्तीवरून शोभा यात्रा काढली. तसेच पुढे रामराजे नाईक निंबाळकर म्हणाले की, माणूस हा सध्या लोभी झाला आहे, त्याला हाव सुटली आहे असे असताना त्यामध्ये ते समाधान...

वाखरी ता.पंढरपूर जि.सोलापूर येथे दर महा पन्नास हजार युनिटची चोरी मीटर धारकांना बसतोय फटका

संपादक : बहुजन भूषण वृत्तपत्र वाखरी :           वाखरी ता.पंढरपूर जि.सोलापूर या गावी मोठ्या प्रमाणात आकडे टाकून प्रकाशाचा आनंद घेणारे वीज चोरी धारक आहेत. रात्रंदिवस आकडे टाकून वीज चोरी करून मजेत राहत आहेत. ही वीज चोरी वाखरी येथील स्मशानभूमी , बागवान वस्ती , रामोशी समाज , वाडी-वस्ती इ. ठिकाणी मोठ्या प्रमाणात होत आहे. वाखरी गावात जे वीज वितरण कंपनीचे जे कर्मचारी आहेत ते "आंधळे” आहेत. त्यांनी डोळ्यावरती पट्टी बांधली आहे. त्यांना वीज चोरी करणारे वीज चोर दिसत नाहीत. त्यांना वीज चोरी करणार्‍याकडून दर महिना हफ्ते आहेत असे वाटते. वीज चोरी करणारे चोर वीज वितरण कंपनीच्या कर्मचारी यांना दिसत नाही. परंतु एखाद्या मीटर ग्राहकाचे वीज बिल थकले की , हे कर्मचारी त्वरित वीज कट करतात. तसेच २६-०९-२०२२ रोजी पत्र जा.क्र.५५५ वीज वितरण कार्यालय शाखा अभियंता गादेगाव ता.पंढरपूर यांना वीज चोरी बाबत बहुजन राष्ट्रशक्ति सामाजिक संघटना महाराष्ट्र राज्य अभिमन्यु बी. आठवले यांनी पोस्टाने पत्र पाठविले आहे. तरीपण अधिकारी यांनी दखल घेतलेली नाही असे दिसून आले आहे. वाखरी येथील वी...