Skip to main content

जातिवादी यांना धडा शिकवण्यासाठी सर्व महाराष्ट्रातील दलित संघटनेने एकत्र येणे काळाची गरज तसेच माळेवाडी (बोरगाव) येथील मातंग समाजातील धनाजी साठे या मयत व्यक्तीच्या देहाची जातिवादी यांनी अवहेलना केली ही चीड आणणारी गंभीर बाब आहे त्याचा जाहीर निषेध

 संपादक

          सध्याच्या काळात जातिवादी यांना माज चढला आहे. सध्या कुठे ना कुठे महाराष्ट्रात अनुसूचित जातीजमाती वरती अन्याय अत्याचार जातिवादी समाजकंटक करीत आहेत. त्यामध्ये जास्त करून ग्रामीण भागातील ज्या ग्रामपंचायत आहेत त्यामधील जे सरपंच, उपसरपंच, सदस्य आहेत तसेच इतर समाजकंटकाकडून मोठ्या प्रमाणात अनुसूचित जाती-जमाती वरती अन्याय-अत्याचार, मानहानी, अपमान, नाशवंत पाणी पिण्यास सांगणे, बेकायदेशीर जमिनी बळकावणे, भीक मागावयास लावणे, दृष्टहेतूने कारवाई करणे, चुकीची खोटी माहिती अधिकारी यांना देणे, दमदाटी करणे, विनयभंग करणे, लैंगिक छळ करणे, पाणी दूषित करणे, जबरदस्तीने घरजागा सोडावयास लावणे, गाव सोडावयास लावणे, अतिक्रमणे नियमित करण्यास ठराव न करणे, खून करणे, जाणूनबुजून घर पाडण्याबाबत नोटिसा काढणे, जाणूनबुजून अनुसूचीत जातीच्या कुटुंबाच्या घरापर्यंत रस्ता करणे व घर रस्त्यात बांधले म्हणून खोटा आरोप करणे, स्मशानात मयताचे  दहन करण्यास विरोध करणे, जातीवरून शिव्या देणे, सार्वजनिक ठिकाणी नाहक बदनामी करणे, मानसिक छळ करणे, ग्रामपंचायतकडे घर नियमित करण्यासाठी अर्ज दिला असता अनुसूचित जातीजमातीचे कुटुंब समजून त्या अर्जाची दखल न घेणे तसेच महामानव भारतीय घटनेचे शिल्पकार प.पू.डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या विषयी अवमानकारक भाषा वापरणे, लिखाण करणे, विधाने करणे, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानाच्या रूपाने महान असा कायदा दिला त्याचा अवमान करणे इ. गंभीर स्वरूपाची गुन्हे समाजकंटक करीत असतात त्यामुळे त्यांच्यावरती अॅट्रोसिटी अॅक्ट या कायद्याप्रमाणे गुन्हे दाखल केलेच पाहिजेत त्यामध्ये गैर काहीच नाही. जातिवाद्यांना माहिती आहे की दलित समाजामध्ये एकसंघपणा नाही याचाच फायदा घेवून जातिवादी, हरामखोर, भडवे, भाडखाऊ, नालायक महिला विनाकारण समाजासमाजामध्ये तेढ निर्माण करण्याचे कट कारस्थान करीत आहेत. सामाजिक तेढ निर्माण करून गाव व शहरातील वातावरण दूषित करीत आहे. अशा समाजकंटकांना धडा शिकवण्यासाठी सर्व दलित संघटनेचे एकमत महत्वाचे आहे. संघटना वेगवेगळी असुदया परंतु अन्याय अत्याचार करणारे जे भडवे आहेत त्यांना जोर का झटका देण्यासाठी सर्वांनी एकत्रित येणे काळाची गरज आहे. त्या समाजकंटकाचा हिशोब चुकता करणे हे दलित संघटनेचे सर्वांचे कर्तव्य आहे. माळेवाडी (बोरगाव) येथील मातंग समाजातील धनाजी साठे या मृत व्यक्तीच्या देहाची त्याच गावातील जातीवादी समाजकंटकांनी अवहेलना केली आहे त्या जातीवादी समाजकंटकाचा बहुजन राष्ट्रशक्ति सामाजिक संघटना जाहीर निषेध करीत आहे. जास्त प्रमाणात ग्रामीण भागात जातीवाद मोठ्या प्रमाणात वाढत आहे त्याला सर्वस्वी ग्रामपंचायत मधील भाडखाऊ सरपंच, उपसरपंच, सदस्य कारणीभूत आहेत. जातिवादी समाजकंटकाने डोके वर काढले आहे त्या जातिवाद्यांना हिसका दाखविला पाहिजे. दलित संघटनेचे एकेचे बळ फार महत्वाचे आहे. सर्व गटतट, पक्ष, सामाजिक संघटना या सर्वांनी एकत्र येवून समाजकंटकांच्या ७० पिढीच फडक फाडण्यासाठी एकसंघपणा महत्वाचा आहे. जातिवादी यांना मोकाट सोडता कामा नये. समाजकंटकाच्या मुसक्या आवळण्यासाठी, लढा देण्यासाठी आपली ताकत महत्वाची आहे. आपल्याच बांधवाचे आपणास रक्षण करावयाचे आहे ही जबाबदारी सर्व दलित संघटनेचे आहे. सर्वांनी मतभेद चुलीत घालावे. आपला एकसंघपणा हेच आपले बळ आहे. प्रत्येक समाजामध्ये असे पात्रताहीन लायकी नसलेले समाजकंटक आहेत त्यामुळे अशा समाजकंटकापासून प्रत्येक समाजाने सावधगिरी बाळगावी तसेच जे समाजकंटक माथी भडकावण्याचे काम करतात तेढ निर्माण करण्याचा कट रचतात अशांना त्यांची लायकी दाखवावीच लागेल.

समाज जागृतीसाठी जनहितार्थ

अधिक जाहिरातीसाठी संपर्क

संपादक : मा. श्री. डॉ. अभिमन्यु बी. आठवले

९४२०३०२५६१

उपसंपादक : वैभव अ. आठवले

साप्ताहिक बहुजन भूषण, साप्ताहिक बहुजन मित्र वृत्तपत्र

बहुजन राष्ट्रशक्ति सामाजिक संघटना महाराष्ट्र राज्य

आठवले परिवार

टीप : जे दिसेल, जे पाहिले तेच लिहिले हेच वृत्तपत्राचे ध्येय उद्दीष्ट आहे.                  


Comments

Popular posts from this blog

नातेपुते पोलीस ठाणेकडील गुन्हे प्रकटीकरण शाखेची आदर्श कामगिरी चंदन चोरी करणा-या आरोपीस २४ तासात केले जेरबंद

  उपसंपादक: वैभव आठवले साप्ताहिक बहुजन भूषण वृत्तपत्र नातेपुते पोलिस स्टेशन यांचेकडून मिळालेल्या माहितीनुसार      नातेपुते पोलीस ठाणे हददीमध्ये मौजे मांडवे, ता.माळशिरस येथे राजन सुकुमार दोशी यांचे शेतातील दिनांक २६/०६/२०२५ रोजी सकाळी ०८/०० वा ते सायंकाळी ०५/००वा. चे दरम्यान शेतातील बांधावरील १० वर्षे वयाची ०२ चंदनाची झाडे अंदाजे किंमत २७,०००/- रू चे कोणीतरी अज्ञात चोरटयाने चोरून नेली आहेत त्याबाबत फिर्यादी नामे राजन सुकुमार दोशी रा.नातेपुते, ता.माळशिरस, जि.सोलापुर यांचे फिर्यादीवरुन नातेपुते पोलीस ठाणेस गु.र.नं. २३७/२०२५ भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ३०३ (२) प्रमाणे दिनांक २६/०६/२०२५ रोजी गुन्हा दाखल झाला होता. सदर गुन्हयाचा तपास पोहेकॉ/१७०८ विकास बाबर हे करीत होते.      नातेपुते पोलीस ठाणेचे गुन्हे प्रकटीकरण शाखेचे अंमलदार यांनी सदर गुन्हयाचा तपास दरम्यान मिळालेल्या गोपनिय बातमीव्दारे माहीती काढून इसम नामे १) गोविंद दुर्याधन काळे २) मेघराज ज्ञानदेव भोसले दोघे रा माळशिरस यांनी गुन्हा केल्याचे निष्पन्न झाल्याने त्यास पोहकॉ/१७०८ बाबर व गुन्हे प्रकटीक...

नातेपुते पोलीस ठाणेकडून जबरी चोरी करणा-या आरोपीस २४ तासाच्या आत केले जेरबंद

उपसंपादक: वैभव आठवले (साप्ताहिक बहुजन भूषण वृत्तपत्र) नातेपुते पोलीस ठाणे यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार      नातेपुते पोलीस ठाणे हददीमध्ये मौजे नातेपुते, ता.माळशिरस येथे दिनांक ०३/०४/२०२५ रोजी सायकाळी ०७.३० वा सुमारास गुन्ह्यातील फिर्यादी नामे वैभव विठ्ठल नष्टे वय ३१ वर्षे, रा. माळशिरस ता. माळशिरस जि. सोलापुर व सोबत त्यांची आई माया नष्टे असे त्यांचेकडील स्कुटी गाडी क्र. एम.एच. ४५ ए.व्ही. १२६१ यावरुन नातेपुते परिसरात शिंगणापुर पाटी ते बायपास रोड मार्गे नातेपुते फडतरी जाणारे बायपास रोडवर आले असताना दोन अज्ञात इसमांनी त्यांचे पाठीमागुन येऊन फिर्यादीचे आई माया विठल नष्टे याचे गळयातील सोन्याचे दागीने बळजबरीने काढुन घेऊन मोटार सायकल वरुन पळुन गेल्याने त्याबाबत फिर्यादी नामे वैभव विठ्ठल नष्टे वय ३१ वर्षे रा. माळशिरस ता. माळशिरस जि. सोलापुर यांचे फिर्यादीवरुन नातेपुते पोलीस ठाणेस गुरनं १३३/२०२५ भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ३०९ (४), ३ (५) प्रमाणे दिनांक ०८/०४/२०२५ रोजी १८ वा ३९ मि. गुन्हा दाखल झाला होता. सदर गुन्हयाचा तपास गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोना/५६२ राकेश लोहार करीत ...

अतुल कुलकर्णी साहेब पोलीस अधीक्षक, सोलापूर ग्रामीण यांच्या संकल्पनेतून धर्मतुरी, ता.माळशिरस रोडलगत वृक्षारोपण

  उपसंपादक: वैभव आठवले साप्ताहिक बहुजन भूषण वृत्तपत्र नातेपुते पोलिस स्टेशन यांचेकडून मिळालेल्या माहितीनुसार       दिनांक 26/06/2025 रोजी मा. श्री. अतुल कुलकर्णी साहेब पोलीस अधीक्षक ,सोलापूर ग्रामीण यांच्या संकल्पनेतून  व मा. उपविभागीय पोलीस अधिकारी श्री नारायण शिरगावकर उपविभाग माळशिरस यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू करण्यात आलेल्या हरित वारी सन 2025 उपक्रमांतर्गत  नातेपुते पोलीस  ठाणे हद्दीतील  मौजे धर्मपुरी येथे  पालखी मार्गवर हरितवारी अनुषंगाने, माननीय पोलीस अधीक्षक श्री अतुल कुलकर्णी साहेब, यांच्या हस्ते रोडलगत वृक्षारोपण करण्यात आले.       सदर ठिकाणी वृक्षारोपण करिता गावातील सरपंच,शेतकरी व गावातील प्रतिष्ठित नागरिक तसेच  पोलीस पाटील, पोलीस मित्र, ग्राम सुरक्षा दल यांच्या उपस्थितीत हरित वारी उपक्रम संपन्न झाला आहे. बातमी अधिक जाहिरातीसाठी संपर्क संपादक : मा.श्री. डॉ. अभिमन्यु बी. आठवले ९४२०३०२५६१ उपसंपादक : वैभव अ. आठवले साप्ताहिक बहुजन भूषण ,  साप्ताहिक बहुजन मित्र वृत्तपत्र संस्थापक :  बहुजन राष्ट्रशक्ति साम...