Skip to main content

नातेपुते पोलिसांची वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर धडक कारवाई

जातिवादी यांना धडा शिकवण्यासाठी सर्व महाराष्ट्रातील दलित संघटनेने एकत्र येणे काळाची गरज तसेच माळेवाडी (बोरगाव) येथील मातंग समाजातील धनाजी साठे या मयत व्यक्तीच्या देहाची जातिवादी यांनी अवहेलना केली ही चीड आणणारी गंभीर बाब आहे त्याचा जाहीर निषेध

 संपादक

          सध्याच्या काळात जातिवादी यांना माज चढला आहे. सध्या कुठे ना कुठे महाराष्ट्रात अनुसूचित जातीजमाती वरती अन्याय अत्याचार जातिवादी समाजकंटक करीत आहेत. त्यामध्ये जास्त करून ग्रामीण भागातील ज्या ग्रामपंचायत आहेत त्यामधील जे सरपंच, उपसरपंच, सदस्य आहेत तसेच इतर समाजकंटकाकडून मोठ्या प्रमाणात अनुसूचित जाती-जमाती वरती अन्याय-अत्याचार, मानहानी, अपमान, नाशवंत पाणी पिण्यास सांगणे, बेकायदेशीर जमिनी बळकावणे, भीक मागावयास लावणे, दृष्टहेतूने कारवाई करणे, चुकीची खोटी माहिती अधिकारी यांना देणे, दमदाटी करणे, विनयभंग करणे, लैंगिक छळ करणे, पाणी दूषित करणे, जबरदस्तीने घरजागा सोडावयास लावणे, गाव सोडावयास लावणे, अतिक्रमणे नियमित करण्यास ठराव न करणे, खून करणे, जाणूनबुजून घर पाडण्याबाबत नोटिसा काढणे, जाणूनबुजून अनुसूचीत जातीच्या कुटुंबाच्या घरापर्यंत रस्ता करणे व घर रस्त्यात बांधले म्हणून खोटा आरोप करणे, स्मशानात मयताचे  दहन करण्यास विरोध करणे, जातीवरून शिव्या देणे, सार्वजनिक ठिकाणी नाहक बदनामी करणे, मानसिक छळ करणे, ग्रामपंचायतकडे घर नियमित करण्यासाठी अर्ज दिला असता अनुसूचित जातीजमातीचे कुटुंब समजून त्या अर्जाची दखल न घेणे तसेच महामानव भारतीय घटनेचे शिल्पकार प.पू.डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या विषयी अवमानकारक भाषा वापरणे, लिखाण करणे, विधाने करणे, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानाच्या रूपाने महान असा कायदा दिला त्याचा अवमान करणे इ. गंभीर स्वरूपाची गुन्हे समाजकंटक करीत असतात त्यामुळे त्यांच्यावरती अॅट्रोसिटी अॅक्ट या कायद्याप्रमाणे गुन्हे दाखल केलेच पाहिजेत त्यामध्ये गैर काहीच नाही. जातिवाद्यांना माहिती आहे की दलित समाजामध्ये एकसंघपणा नाही याचाच फायदा घेवून जातिवादी, हरामखोर, भडवे, भाडखाऊ, नालायक महिला विनाकारण समाजासमाजामध्ये तेढ निर्माण करण्याचे कट कारस्थान करीत आहेत. सामाजिक तेढ निर्माण करून गाव व शहरातील वातावरण दूषित करीत आहे. अशा समाजकंटकांना धडा शिकवण्यासाठी सर्व दलित संघटनेचे एकमत महत्वाचे आहे. संघटना वेगवेगळी असुदया परंतु अन्याय अत्याचार करणारे जे भडवे आहेत त्यांना जोर का झटका देण्यासाठी सर्वांनी एकत्रित येणे काळाची गरज आहे. त्या समाजकंटकाचा हिशोब चुकता करणे हे दलित संघटनेचे सर्वांचे कर्तव्य आहे. माळेवाडी (बोरगाव) येथील मातंग समाजातील धनाजी साठे या मृत व्यक्तीच्या देहाची त्याच गावातील जातीवादी समाजकंटकांनी अवहेलना केली आहे त्या जातीवादी समाजकंटकाचा बहुजन राष्ट्रशक्ति सामाजिक संघटना जाहीर निषेध करीत आहे. जास्त प्रमाणात ग्रामीण भागात जातीवाद मोठ्या प्रमाणात वाढत आहे त्याला सर्वस्वी ग्रामपंचायत मधील भाडखाऊ सरपंच, उपसरपंच, सदस्य कारणीभूत आहेत. जातिवादी समाजकंटकाने डोके वर काढले आहे त्या जातिवाद्यांना हिसका दाखविला पाहिजे. दलित संघटनेचे एकेचे बळ फार महत्वाचे आहे. सर्व गटतट, पक्ष, सामाजिक संघटना या सर्वांनी एकत्र येवून समाजकंटकांच्या ७० पिढीच फडक फाडण्यासाठी एकसंघपणा महत्वाचा आहे. जातिवादी यांना मोकाट सोडता कामा नये. समाजकंटकाच्या मुसक्या आवळण्यासाठी, लढा देण्यासाठी आपली ताकत महत्वाची आहे. आपल्याच बांधवाचे आपणास रक्षण करावयाचे आहे ही जबाबदारी सर्व दलित संघटनेचे आहे. सर्वांनी मतभेद चुलीत घालावे. आपला एकसंघपणा हेच आपले बळ आहे. प्रत्येक समाजामध्ये असे पात्रताहीन लायकी नसलेले समाजकंटक आहेत त्यामुळे अशा समाजकंटकापासून प्रत्येक समाजाने सावधगिरी बाळगावी तसेच जे समाजकंटक माथी भडकावण्याचे काम करतात तेढ निर्माण करण्याचा कट रचतात अशांना त्यांची लायकी दाखवावीच लागेल.

समाज जागृतीसाठी जनहितार्थ

अधिक जाहिरातीसाठी संपर्क

संपादक : मा. श्री. डॉ. अभिमन्यु बी. आठवले

९४२०३०२५६१

उपसंपादक : वैभव अ. आठवले

साप्ताहिक बहुजन भूषण, साप्ताहिक बहुजन मित्र वृत्तपत्र

बहुजन राष्ट्रशक्ति सामाजिक संघटना महाराष्ट्र राज्य

आठवले परिवार

टीप : जे दिसेल, जे पाहिले तेच लिहिले हेच वृत्तपत्राचे ध्येय उद्दीष्ट आहे.                  


Comments

Popular posts from this blog

नातेपुते पोलीस ठाण्याची धडक कामगिरी 6,200 रुपये हिसकून घेऊन जाणाऱ्या चोरांना आपले ताब्यातील थार वाहनांसह केली अटक

उपसंपादक: वैभव आठवले साप्ताहिक बहुजन भूषण वृत्तपत्र नातेपुते पोलिस स्टेशन यांचेकडून मिळालेल्या माहितीनुसार           नातेपुते पोलीस ठाणे हद्दीमध्ये फिर्यादी यांच्या दीपक जनार्दन चव्हाण, राहणार मोराची, तालुका माळशिरस, जिल्हा सोलापूर हे फलटण-पंढरपूर रोडवरील इंडीयन ऑईल कंपनीचा सुळ पेंट्रोल पंप येथे दि.01/10/2025 रोजी दुपारी 03.50 वा. सुमारास इंडीयन ऑईल कंपनीचा सुळ पेंट्रोल पंप येथे डिझेल टाकण्याचे काम करित असताना एक राखाडी रंगाची थार गाडी नं MH06CG5558 अशी डिझेल भरण्याकरीता आली व त्यातील ड्रायव्हर शेजारी बसलेल्या अनोळखी इसमाने गाडीत 4000 रुपयचे डिझेल भरायचे आहे व 6200 रु आम्हाला रोख पैशाची गरज आहे मी तुम्हाला माझे फोन पे वरून 10200 रु ऑनलाईन पाठवतो असे म्हणाल्याने मी गाडीचे डिझेलचे झाकन उघडण्यास गेलो असता पाठीमागे बसलेला अनोळखी इसम म्हणाला की, आम्हाला डिझेल नको 6200 रु रोख द्या अशी विनंती केली. त्यावेळी मी माझे खिश्यातील डिझेल विक्रीचे जमा झालेले पैसे खिश्यातुन काढुन 6200 रु मोजले त्यामध्ये 500 रु दराच्या 12 व 100 रु दराच्या 02 असे 6200 रु बाजुला काढले व बाकी ...

नातेपुते पोलीस ठाण्याची धडक कामगिरी उभ्या असलेल्या वाहनाची टायर चोरणाऱ्या अट्टल चोरास अटक व चोरीस गेलेला 100% मुद्देमाल सह 2,04,000/ किमतीचा मुद्देमाल जप्त

उपसंपादक: वैभव आठवले साप्ताहिक बहुजन भूषण वृत्तपत्र नातेपुते पोलिस स्टेशन यांचेकडून मिळालेल्या माहितीनुसार      नातेपुते पोलीस ठाणे हद्दीमध्ये फिर्यादी यांच्या आकाश तानाजी बोडरे, राहणार नातेपुते, तालुका माळशिरस यांनी त्यांच्याकडील वापरते वाहन टाटा टिपर नंबर एम एच 11 सी एच 0551 या उभ्या असलेल्या वाहनाचे दोन टायर डिस्कसह किंमत 75,000/ रुपये खोलून कोणीतरी अज्ञात चोरट्याने ते चोरून नेले आहेत म्हणून वगैरे हकीगत वरून नातेपुते पोलीस ठाणे गुर नंबर 331/2025 बीएनएस कलम 303 (2) प्रमाणे गुन्हा दाखल होता.       सदर गुन्ह्यातील घडला प्रकाराबाबत वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली नातेपुते पोलीस ठाणे व उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय गुन्हे प्रकटीकरण पथक गुन्ह्यातील घटनास्थळाच्या आजूबाजूची सीसीटीव्ही पाहणी करून तसेच  सायबर शाखेकडील तांत्रिक माहितीचे विश्लेषण करून संशयित  आरोपीचा शोध घेतला असता संशयित आरोपी हा कडेगाव जिल्हा सांगली येथील नामे बुरान इलाही मुलाणी वय 40 वर्ष असे  असल्याबाबत खात्री झाली आणि त्यानंतर सदर आरोपीस सापळा लावून कडेगाव जिल्हा सांगली येथे...

शिवसेनेच्या सोलापूर जिल्हाप्रमुख पदी राजकुमार हिवरकर-पाटील

  उपसंपादक: वैभव आठवले साप्ताहिक बहुजन भूषण वृत्तपत्र शिवसेनेचे मुख्य नेते तथा महाराष्ट्र राज्याचे संवेदनशील उपमुख्यमंत्री मा.ना.एकनाथराव शिंदे साहेब यांच्या आदेशाने महाराष्ट्र राज्याचे रोजगार हमी पणन मंत्री भरत शेठ गोगावले यांच्या हस्ते व महाराष्ट्र प्रदेशचे ओबीसी विभागाचे प्रमुख रमेशजी बारसकर यांच्या उपस्थितीत मंत्रालय मुंबई येथे सोलापूर जिल्ह्याचे प्रमुख ओबीसी विभाग म्हणून श्री.राजकुमार लता शंकरराव हिवरकर-पाटील यांना निवडीचे पत्र देण्यात आले. आजवर शिवसेनेमध्ये पक्षाचे जडणघडणीमध्ये मोर्चे, आंदोलन, साडेनऊ हजार पेक्षा जास्त गरिबांची केलेली ऑपरेशन, सोलापूरच्या अक्कलकोटचे माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे साहेब यांच्या पक्षप्रवेशावेळी मुख्य नेत्यांच्या उपस्थितीत 12 बलुत्तरांचा पक्ष म्हणून ओबीसी विभाग निर्माण करण्यामागची मुख्य नेते यांची दूरदृष्टी सर्वांसमक्ष केलेल भाषण, राष्ट्रमाता जिजाऊ क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीच्या निमित्ताने 55 सायकलींच मोफत झालेल वाटप,  सवलतीच्या दरात  99000 माता-भगिनींना केलेली डाळ वाटप, सत्तावीस गावांना बचत गटाच्या माध्यमातून दिलेली ...