Skip to main content

नातेपुते पोलिसांची वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर धडक कारवाई

युवकांनी शासनकर्ते, राज्यकर्ते बनले पाहिजे ही काळाची गरज आहे

संपादक

          सध्या महाराष्ट्रात राजकारण हे घराणेशाही परंपरेने चालत आहे त्यामुळे शिकले, सवरलेले युवक शासनकर्ते, राज्यकर्ते बनण्यापासून वंचित राहत आहेत. परंपरेने आपल्याच घराणेशाहीची वाटचाल असली पाहिजे मग ती ग्रामपंचायत असो, नगरपंचायत असो, नगारपरिषद असो, नगरपालिका असो, अथवा आमदार, खासदार, विधान परिषद आमदार, पंचायत समिति, जिल्हा परिषद इ. वर घराणेशाहीचे वर्चस्व असावे असा हेतु असतो. घराणेशाहीने पदे भोगत राहायची आणि कार्यकर्त्यांनी आयुष्यभर सतरंज्या उचलत राहायचे हेच पहायला मिळत आहे. “घराणेशाही ही ढेकुणाचे वंशावळ” आहे. स्वत: चा स्वार्थ साधण्यासाठी दुसर्‍याचे शोषण करीत राहायचे. युवकांचा उपयोग फक्त मतदानासाठी करून घ्यायचा, मत आपणच टाकायची आणि गुलाल, हारतुरे घालून सत्कार आपणच करायचा हेच चाललेले आहे. घराणेशाहीला निष्ठावान कार्यकर्ते असताना सुद्धा त्यांचा विचार हा युवक शासनकर्ता, राज्यकर्ता बनला पाहिजे ही मानसिकता दिसून येत नाही. मतदारांनी सुद्धा यापुढे घराणेशाहीची चालत आलेली परंपरा मोडीत काढून अभ्यासू विचारवंत, यांनी एकत्रित येवून शासनकर्ते, राज्यकर्ते होण्यासाठी राजकरणात प्रवेश केला पाहिजे. युवकांनी एकत्र येवून घराणेशाहीची चालत आलेली परंपरा संपुष्टात आणली पाहिजे. घराणेशाही म्हणजे एक प्रकारची “वाळवी” आहे. आपण शाबूत राहून इतरांना “खिळखिळी” करते. सध्या युवकांचे ग्रुप सामाजिक कामे करण्यासाठी पुढे येत आहेत. प्रत्येकाच्या सुखा: दु:खात सहभागी होत आहेत असे आदर्श कामे करीत आहेत. त्यांना मानणारा वर्ग तयार झाला आहे. त्यामुळे युवकांनी स्वत: ला कमी लेखू नये. पक्षाची उमेदवारी मिळेल ही भोळी अपेक्षा ठेवू नका. अपक्ष म्हणून राजकारणाच्या रिंगणात आत्मविश्वासाने उतारा. स्वत:च्या फायद्यासाठी घराणेशाही तुमचा फक्त वापर आणि फेकून द्या असे करीत आहे. तुमच्याबद्दल मासिकता व नियत वाईट असते. घराणेशाही शोषण करणारी आहे, पोषण करणारी नाही. “आयत्या बिळात नागोबा” ही त्यांची प्रवृत्ती असते. सत्ता हीच त्यांची शिदोरी असते. सत्यविणा जगने घराणेशाहीला अवघड होते. घराणेशाहीचा उदो-उदो करणारी लाचारी मंडळी ही दिसत आहेत ही परिस्थिति सगळीकडे आहे. युवकांनी पुढे येवून शासनकर्ते, राज्यकर्ते बनावे ही काळाची गरज आहे. युवकांनी घराणेशाही पुढे लाचारी पतकरू नये स्वाभिमानाने रहावे. घराणेशाही सन्मानाने तुम्हाला शासनकर्ते, राज्यकर्ते बनवीत असतील तर जरूर त्यांचा आश्रय घ्या.

          युवकांनो तुमचा वाढदिवस असेल तर हे घराणेशाहीचे नेते मंडळी साधा शुभेच्छा देण्यासाठी फोन तरी करतात का? त्यांना तुम्हाला शुभेच्छा देणे अवघड जागेचे दुखणे वाटते, कमीपणा त्यांना वाटतो हे मी संपादक म्हणून अनुभवले आहे. घराणेशाहीच्या नौटंकीला युवकांनो बळी पडू नका. घराणेशाही कशी संपुष्टात येईल याचा विचार करा. तुमच्या आनंदात, दु:खात जे सहभाही होतात तेच आपले खरे नेते असतात. घराणेशाहीला जाती-जातीचे वावडे असते, त्यांच्या ओठात एक आणि पोटात एक असते, त्यांना तुम्हाला राज्यकर्ते बनण्यापासून अलिप्त ठेवणे हेच त्यांचे कट कारस्थान चालू असते इतकेच.    

जनहितार्थ

अधिक जाहिरातीसाठी संपर्क

संपादक : मा. श्री. डॉ. अभिमन्यु बी. आठवले

९४२०३०२५६१

उपसंपादक : वैभव अ. आठवले

साप्ताहिक बहुजन भूषण, साप्ताहिक बहुजन मित्र वृत्तपत्र

बहुजन राष्ट्रशक्ति सामाजिक संघटना महाराष्ट्र राज्य

आठवले परिवार

टीप : जे दिसेल, जे पाहिले तेच लिहिले हेच वृत्तपत्राचे ध्येय उद्दीष्ट आहे.

 

              

Comments

Popular posts from this blog

नातेपुते पोलीस ठाण्याची धडक कामगिरी 6,200 रुपये हिसकून घेऊन जाणाऱ्या चोरांना आपले ताब्यातील थार वाहनांसह केली अटक

उपसंपादक: वैभव आठवले साप्ताहिक बहुजन भूषण वृत्तपत्र नातेपुते पोलिस स्टेशन यांचेकडून मिळालेल्या माहितीनुसार           नातेपुते पोलीस ठाणे हद्दीमध्ये फिर्यादी यांच्या दीपक जनार्दन चव्हाण, राहणार मोराची, तालुका माळशिरस, जिल्हा सोलापूर हे फलटण-पंढरपूर रोडवरील इंडीयन ऑईल कंपनीचा सुळ पेंट्रोल पंप येथे दि.01/10/2025 रोजी दुपारी 03.50 वा. सुमारास इंडीयन ऑईल कंपनीचा सुळ पेंट्रोल पंप येथे डिझेल टाकण्याचे काम करित असताना एक राखाडी रंगाची थार गाडी नं MH06CG5558 अशी डिझेल भरण्याकरीता आली व त्यातील ड्रायव्हर शेजारी बसलेल्या अनोळखी इसमाने गाडीत 4000 रुपयचे डिझेल भरायचे आहे व 6200 रु आम्हाला रोख पैशाची गरज आहे मी तुम्हाला माझे फोन पे वरून 10200 रु ऑनलाईन पाठवतो असे म्हणाल्याने मी गाडीचे डिझेलचे झाकन उघडण्यास गेलो असता पाठीमागे बसलेला अनोळखी इसम म्हणाला की, आम्हाला डिझेल नको 6200 रु रोख द्या अशी विनंती केली. त्यावेळी मी माझे खिश्यातील डिझेल विक्रीचे जमा झालेले पैसे खिश्यातुन काढुन 6200 रु मोजले त्यामध्ये 500 रु दराच्या 12 व 100 रु दराच्या 02 असे 6200 रु बाजुला काढले व बाकी ...

नातेपुते पोलीस ठाण्याची धडक कामगिरी उभ्या असलेल्या वाहनाची टायर चोरणाऱ्या अट्टल चोरास अटक व चोरीस गेलेला 100% मुद्देमाल सह 2,04,000/ किमतीचा मुद्देमाल जप्त

उपसंपादक: वैभव आठवले साप्ताहिक बहुजन भूषण वृत्तपत्र नातेपुते पोलिस स्टेशन यांचेकडून मिळालेल्या माहितीनुसार      नातेपुते पोलीस ठाणे हद्दीमध्ये फिर्यादी यांच्या आकाश तानाजी बोडरे, राहणार नातेपुते, तालुका माळशिरस यांनी त्यांच्याकडील वापरते वाहन टाटा टिपर नंबर एम एच 11 सी एच 0551 या उभ्या असलेल्या वाहनाचे दोन टायर डिस्कसह किंमत 75,000/ रुपये खोलून कोणीतरी अज्ञात चोरट्याने ते चोरून नेले आहेत म्हणून वगैरे हकीगत वरून नातेपुते पोलीस ठाणे गुर नंबर 331/2025 बीएनएस कलम 303 (2) प्रमाणे गुन्हा दाखल होता.       सदर गुन्ह्यातील घडला प्रकाराबाबत वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली नातेपुते पोलीस ठाणे व उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय गुन्हे प्रकटीकरण पथक गुन्ह्यातील घटनास्थळाच्या आजूबाजूची सीसीटीव्ही पाहणी करून तसेच  सायबर शाखेकडील तांत्रिक माहितीचे विश्लेषण करून संशयित  आरोपीचा शोध घेतला असता संशयित आरोपी हा कडेगाव जिल्हा सांगली येथील नामे बुरान इलाही मुलाणी वय 40 वर्ष असे  असल्याबाबत खात्री झाली आणि त्यानंतर सदर आरोपीस सापळा लावून कडेगाव जिल्हा सांगली येथे...

शिवसेनेच्या सोलापूर जिल्हाप्रमुख पदी राजकुमार हिवरकर-पाटील

  उपसंपादक: वैभव आठवले साप्ताहिक बहुजन भूषण वृत्तपत्र शिवसेनेचे मुख्य नेते तथा महाराष्ट्र राज्याचे संवेदनशील उपमुख्यमंत्री मा.ना.एकनाथराव शिंदे साहेब यांच्या आदेशाने महाराष्ट्र राज्याचे रोजगार हमी पणन मंत्री भरत शेठ गोगावले यांच्या हस्ते व महाराष्ट्र प्रदेशचे ओबीसी विभागाचे प्रमुख रमेशजी बारसकर यांच्या उपस्थितीत मंत्रालय मुंबई येथे सोलापूर जिल्ह्याचे प्रमुख ओबीसी विभाग म्हणून श्री.राजकुमार लता शंकरराव हिवरकर-पाटील यांना निवडीचे पत्र देण्यात आले. आजवर शिवसेनेमध्ये पक्षाचे जडणघडणीमध्ये मोर्चे, आंदोलन, साडेनऊ हजार पेक्षा जास्त गरिबांची केलेली ऑपरेशन, सोलापूरच्या अक्कलकोटचे माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे साहेब यांच्या पक्षप्रवेशावेळी मुख्य नेत्यांच्या उपस्थितीत 12 बलुत्तरांचा पक्ष म्हणून ओबीसी विभाग निर्माण करण्यामागची मुख्य नेते यांची दूरदृष्टी सर्वांसमक्ष केलेल भाषण, राष्ट्रमाता जिजाऊ क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीच्या निमित्ताने 55 सायकलींच मोफत झालेल वाटप,  सवलतीच्या दरात  99000 माता-भगिनींना केलेली डाळ वाटप, सत्तावीस गावांना बचत गटाच्या माध्यमातून दिलेली ...